महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
बदाम आणि पिस्ते ३ तास भिजत घालावेत. नंतर सोलून पातळसर काप करावेत. एका जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळत ठेवावे. वर जी साय जमेल ती कालथ्याने मोडावी.
साहित्य:- ४ वाट्या मटारचे दाणे, एक वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी कोथिंबीर निवडून व स्वच्छ धुऊन, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गोडा मसाला, मीठ, तेल, फोडणीचे साहित्य, लिंबाएवढा गूळ, कढीपत्ताची १० ते १२ पाने.
कृती : प्रथम चार वाट्या मटार उकळत्या पाण्यात घालून ५ ते ७ मिनिटे राहू द्यावेत. मिक्सारमध्ये ओले खोबरे, मिरच्या, कोथिंबीर घालावे मीठ, जिरे घालून व थोडे पाणी घालून वाटण करून घ्यावे. पातेल्यात तेल घालून जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. त्यावर वाटण घालून परतावे. 2 वाट्या पाणी व मटार घालून उसळ उकळू द्यावी. मीठ, गूळ, धने, जिरे पूड, गोडा मसाला घाला व मटार नीट शिजू द्या. हवी त्याप्रमाणे दाट वा पातळ करा. ब्रेड, पोळीबरोबर लिंबू पिळून सर्व्ह करा. 1) हीच उसळ कांदा आले लसूण खोबरे यांचे वाटण घालूनही करतात. आवडत असल्यास टोमॅटोही घाला. हे वाटण, उकडलेले बटाटे, मटार व गरम मसाला घालून, आलू मटार ही पंजाबी डिश करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
दहीवड्याच्या मिश्रणात हिंग आणि सुंठेची पूड घालावी यामुळे दहीवडे चविष्ट बनतात. भोपळ्याच्या भाजीला वरून मेथी दाण्याचा तडका दिल्यानं भाजीला वेगळी चव येते.
आईस्क्रीमची कोणतीच माहिती जेव्हा उपलब्ध नव्हती, त्या सोळाव्या शतकात मोगलांनी कुल्फी तयार करण्याची पद्धत शोधून काढली. खवा, पिस्ते आणि केशर यांचं मिश्रण गोठवून केल्या जाणाऱ्या पदार्थाचं नाव कुल्फी. कारण कुल्फी तयार करण्याच्या साच्याला कुल्फी असं नाव होतं. त्यानंतर मोगल काळात हिमालयाच्या पर्वतराजीं मधून बादल्यांमध्ये बर्फ गच्च भरून तो नद्यांमार्गे सर्वत्र नेला जात असे.
) मेथी दाणे, उडीद डाळ, चणा डाळ, धणे (टीप) मंद आचेवर गुलाबीसर भाजावी. किंचीत रंग बदलला कि सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि नारळ घालून २ मिनीटे परतावे. गार झाले कि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
साहित्य:- बाकरवड्या, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक चिरलेला कांदा, फरसाण, शेव, दही, दोन्ही चटण्या.
कृती:- बाकरवड्यांचा चुरा करून घ्यावा. त्यावर उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी व बारीक चिरलेला कांदा घालावा. थोडा फरसाण व बारीक शेव घालून वर फेटलेले दही घालावे. त्यावर आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आता पावसात छान कोवळं पडवळ मिळायला लागेल. आपण खमंग काकडी करतो तशी पडवळाची कोशिंबीर खाल्ली आहे का कधी ? नसेल तर ही नक्की करून बघा. पडवळ न आवडणाऱ्यांना पण ही कोशिंबीर आवडेल.
पडवळाच्या बिया काढून किसून घ्या. थोडेसे हातानी पिळून पाणी वेगळं काढा. पडवळाच्या किसात ठेचलेली हिरवी मिरची, कोथिंबीर,नारळ, लिंबाचा रस,भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, मीठ आणि साखर घालून एकत्र करा. तूप, जिरे, हिंगाची खमंग फोडणी द्या. चविष्ट पडवळाची कोशिंबीर तयार आहे.
आणि हो, ते पडवळाच्या किसाचे पाणी काढलय त्यात थोडे काळे मीठ घालून पिऊन बघा. खूप पौष्टिक आणि चवदार असतं.
कोणत्याही देशाची सांस्कृतिक उत्क्रान्ती कशी झाली हे पाहताना तिथल्या समाजाच्या अन्नांबद्दलच्या कल्पना आणि अन्नपदार्थ बनविण्यासंबंधीच्या कल्पना कशा आणि का बदलल्या गेल्या हे बघणं अत्यंत महत्वावं आणि मनोरंजकही असतं. आपल्या देशासारखा भला मोठा इतिहास असलेल्या देशाच्या बाबतीत तर ते आवश्यकही असतं.
साहित्य :- पनीर पाव किलो, उकडलेले बटाटे दोन, काजू-बेदाणे अर्धी वाटी, गरम मसाला पूड अर्धा चमचा, मिरची पूड, थोडं कोर्नफ्लॉवर, तळणासाठी तेल, चवीनुसार मीठ .
ग्रेव्हीसाठी :- तेल पाव वाटी, शहाजिरं अर्धा चमचा, आलं-लसूण पेस्ट एक चमचा, कांदे दोन मोठे , काजू पाव वाटी, लाल तिखट एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, टोमाटो प्युरी पाव वाटी, सायीचं दही अर्धी वाटी, चवीनुसार मीठ-साखर, थोडं क्रीम व कोथिंबीर .
कृती :-
१) बटाटे किसून मऊ मळावेत . त्यात इतर पदार्थ घालून सर्व एकजीव करावं .
२) त्याचे मोठया गुलाबजामप्रमाणे गोळे करून त्यात थोडे काजू-बेदाणे भरावे .
३) पुन्हा गोल आकार देऊन कोफ्ते मंद आचेवर लालसर तळून घ्यावेत .
४) कांदा व काजूची पेस्ट करावी . ग्रेव्हीसाठी तेलात शहाजिरं फोडणीला घालावं .
५) त्यावर आलं-लसूण पेस्ट , कांदा-काजूची पेस्ट , लाल तिखट , गरम मसाला इ. परतून मग दही , टोमाटो प्युरी , मीठ व साखर घालावी .
६) गरजेनुसार गरम पाणी घालून दाटसर ग्रेव्ही करावी . शेवटी त्यात कोफ्ते सोडून क्रीम व कोथिंबीर घालून दयावं .
साहित्य:- २५० ग्रॅम सुरण, १ १/२ चमचा आले-मिरची पेस्ट, १०० ग्रॅम राजगिरा पीठ, २ चमचे मिरची पूड, २५० ग्रॅम गोड दही, पाव लीटर ताक, मीठ, तूप.
कृती:- सुरण कुकरमध्ये वाफवून घ्या. ते मळून घेऊन राजगिरा पीठ, मीठ, आले-मिरची पेस्ट टाका. सर्व एकत्र करून त्याचे चपटे गोळे करा. तुपात तळून घ्या. नंतर ताकात थोडेसे मीठ टाकून तळलेले वडे २ ते३ तास भिजत ठेवणे. सर्व्ह करताना ताकातले वडे काढून वरती दही टाकून चवीपुरते मीठ व लाल तिखट टाका.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti