(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीकृष्णासी कृष्णकमळ अर्पण

    वाहूनी कृष्णकमल तव शिरी,

    अर्पितो भाव माझे श्रीहरी....।।धृ।।

    तू आहेस ईश्वर,

    करी सारे साकार

    नशिब माझे थोर

    मिळे तुझा आधार

    सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी....१,

    अर्पितो भाव माझे श्री हरी....

    विविधतेने नटलेले

    कृष्णाचे जीवन गेले

    लय लागूनी जगले,

    कसे जगावे शिकवले

    जीवन सारे असूनी रूप ईश्वरी, दाखवी स्वानूभवे तो हरी….२

    अर्पितो भाव माझे श्री हरी,

    रंगीबेरंगी कोमल

    कृष्णकमळ फूल

    पाकळ्या बघता निल

    प्रसन्न चित्त होईल

    दरवळू दे कृष्ण कमळा परि, सेवा भावाचे समाधान उरी.....३,

    अर्पितो भाव माझे श्री हरी

    राही न्यूनता काही

    ही अज्ञानाची ग्वाही

    मज क्षमा ती व्हावी

    परि आशिर्वाद तू देई

    उकलन तव जीवनाची करी, यशासाठी जावे त्याच वाटेवरी....४

    अर्पितो भाव माझे श्री हरी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • तूच सुगंधा

    तुझे नित्य येणे जाणे
    हळूच वळूनी पाहणे
    नाही कधी विसरलो
    तुझे ते लाघवी लाजणे

    आठव ते सारे सुखद
    निःशब्दी, प्रीतचांदणे
    तुझे कटाक्ष सांत्वनी
    निर्मली तुझे गंधाळणे

    निष्पाप त्या जाणिवा
    मनास भुलवुनी जाणे
    तूंच हसरी कमलिका
    सालस ते तुझे वागणे

    अजूनही मी स्मरतो
    रुप तुझे गोजीरवाणे
    तू स्मरणगंधी सुगंधा
    तुझे उमलुनी बहरणे

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २२५

    ४/९/ २०२२

  • केसरी हिंदोळा

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

  • दुरत्व

    मला अजुनही समजले नाही
    मला तुझीच आठवण कां येते...

    तुच सदा माझ्या मनी लोचनी
    हे कसले, आपुले अगम्य नाते...

    मी, नित्य इथे संभ्रमात जगतो
    अस्तित्व तुझे सभोवार भासते...

    ऋणानुबंध जरी हे गतजन्मांचे
    मग हे दुरत्व कां मनास छळते...

    कसले प्रेम? कसल्या भावनां
    कां? व्यर्थ सारे, जगणे वाटते...

    तोच एक कर्ता आणि करविता
    त्यालाच सारे विचारावेसे वाटते...

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २४९

    २७/९/ २०२२

  • न्याहरीची तऱ्हा न्यारी

    दोसा असतो कसा छान जाळीदार
    मन मोकळे जसे असते त्याचे आरपार
    इडली सदाच टम्म फुगलेली.
    साधीदार सांबार नसला की असते रुसलेली
    खमंग खुसखुशीत आप्पे गोल गोल
    गरम गरम असतानाच खाणार किती बोलबोल
    आंबट ताकातली खमंग फोडणीत उकड शिजते रटरटा
    डोळे मिचकावत खायचे मस्त गटगटा
    कुणी म्हणतात उप्पीट तर कुणी ऊपमा
    या साठी बऱेच पदार्थ करावे लागतात जमा
    शिरा याचा मान तर असतो खूपच मोठा
    तूप साखर. बदाम. काजू यांचा असतो ना साठा
    साधे सरळ सोपे नाती जुळवणारे कांदे पोहे
    कुणीही या कधीही या ते तयारीतच आहे.
    सांगा सांगा लवकर सांगा. तुम्हाला काय आवडते ते लवकर सांगा
    -- सौ. कुमुद ढवळेकर.
  • झाडांची आज चालली रंगपंचमी

    झाडांची आज चालली रंगपंचमी गाली हसे नभ,
    विविध रंग पाहुनी कुणी आणे हिरवा तर कुणी गुलाबी
    कुणी गडद, कोणी लालेलाल झाला
    बुंध्यापासून कोणी हळदी ल्यालेला
    कुणी केशरट रंगाने अगदी न्हालेला
    कोणता अधिक सुंदर ते विचार करे
    माझा रंग बिनतोड', ते पक्के ठरवे
    मागे मी, म्हणून यांचे हे सौंदर्य,--
    निसर्गघटक कितीतरी, असती,
    कोण दाखवेल असे औदार्य,--?
    एकट्या मला या जगी तोड नसे,
    कुणी कोणतेही रंग आणो,
    निळ्या नभाला तर 'होड" नसे,--!!
    रंग माझे बदलती, नेहमी
    रंग पांढरे, काळसर,केशरी,
    रंगतदार सूर्योदयी, सूर्यास्ती,
    धुळवड खेळतो रोज मी,--
    सांगा कोणता रंग नसतो,
    इंद्रधनुष्याची पहा ना जादू,
    रंग सारे उतरती खाली,
    धरतीला घालती न्हाऊ,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • गोड चोरी

    रविवारला विदर्भ एक्सप्रेसने नागपुरवरुन कल्याणसाठी यायला निघालो. नेहमीच खिडकीतुन कितीदा बाहेर बघत राहायचं. तसा पाउसही नव्हता.. बाहेरचं दृश्य बघण्यासाठी….!

  • शब्द

    शब्द हसवतात शब्द रडवतात ....
    शब्द शब्दांची सांगड घालत
    मनात रूजंवतात नवं कोर वाक्य !

    शब्द तारतात शब्द मारतात
    शब्दच तलावरीचे घाव होऊन
    मन घायाळ करतात ....!

    शब्द अन् शब्दाचा समजून
    घेण्याचा भाव बदलला की
    शब्दच रूसून छळू पहातात ....!

    शब्द आतड्यांत उकीरडयाचे
    भक्ष विनतो शब्द शब्दांची
    रानफुल होऊन मृगजळ बनतो !

    शब्द कोवळे घन थरारतो
    थवे होऊन पक्षाचे उंच डोंगरावर
    संध्येच्या प्रहरी गंधारतो !

    शब्द निद्रेमधले गीत होतो
    शब्द माझ्या कवितेचे प्रित होतो
    शब्द करुणाघन होऊन शिळ

    घालत क्षितीजाच्या संग
    शुभ्र रत्न होऊन कोकिळाच्या
    कंठातले मधुर सूर होतो .......

    © कोमल मानकर , सिंदी रेल्वे . वर्धा

    9011071641

  • परमोच्य बिंदु

    ऊर्जा शोषत असतां पाणी

    उकलन बिंदूवर येते

    पाण्याचे रुप बदलूनी

    बाष्प त्यांतून निघूं लागते

    एक सिमा असे निसर्गाची

    स्थित्यंतर जेव्हां घडते

    एक स्थीति जावून पूर्ण

    दुजामध्ये ती मिळून जाते

    तपोबलाची ऊर्जा देखील

    प्रभूमय ते सारे करिते

    परमबिंदूचा क्षण येतां

    साक्षात्कार तुम्हां घडविते

    तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं

    ईश्वरमय होऊन जाता

    सारे परि ते तेव्हांच घडते

    परम बींदूला जेव्हां पोहंचता

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • ती तशी शाळेतली

    ती तशी शाळेतली
    तो ही तसाच
    ती दोघे नेहमी
    बोलताना दिसतात
    संपूर्ण नवखेपण
    जाणवत होते
    त्यांच्या बोलण्यावरून...
    एक दिवशी त्याचा हात
    तिच्या
    हातात आला..
    आणि मग सुरवात झाली..
    नवखेपण जाण्याची ती
    खुण होती......
    त्यानंतर..त्यांनतर
    बरेच काही घडणार होते...
    प्रेमाच्या बाराखडीला
    सुरवात तर झाली....
    पुढे काय झाले....
    तुम्ही विचारणार ना ,
    उत्तर तुमच्याकडेच आहे
    तुमच्या स्वभावात ?
    -- सतीश चाफेकर.