घडेल मनीचे,असेच वाटले होते
ते तर कधीच, काही घडले नाही
सरला, जरी भयाण काळोख
तरी, सभोवार उजाडलेच नाही
उरी,कृतार्थतेची आंस निर्मळी
परी, कृपावंत गवसलाच नाही
झाल्या घायाळ साऱ्या भावनां
अर्थ जीवनाचा कळलाच नाही
भासले होते सारेच सारे आपुले
व्यर्थ सारे, ही खंत सरली नाही
सत्य! कलियुगाचे हेची शाश्वत
मानवताच, जगती रुजली नाही
राम कृष्णही इथेची होवूनी गेले
महाभारत, आजही संपले नाही
सांध्यपर्वात! जाहलो आत्ममुख
तरी ही जगरहाटी कळलीच नाही
मनीचेच घडेल, असे वाटले होते
ते तर कधीच, काही घडले नाही
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १४८.
११ - १२ - २०२१.
मंडळी हा जो फोटो दिसत आहे तो फोटो आहे ज्येष्ठ कवी गीतकार जगदीश खेबुडकर यांचा. इतका मोठा माणूस कोणाला ओळखणार नाही अशी ही महान वल्ली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना मोठी माणसे भेटतात. त्यांचं वर्णन करणार अवघड होऊन जाते साहित्य कला कवी गीतकार ही नाती उत्तुंग अशी मोठी असतात. परंतु अशी मोठी माणसं फार थोड्या लोकांना भेटतात यापैकी हे जगदीश खेबुडकर होय.
मागील कर्म पुढे चालूनी,
कर्माची होई शृखंला,
फळ मिळते कर्मावरूनी,
मदत होई मुक्तीला ।।१।।
चांगले कार्य करीतेवेळी,
मृत्यू येता अवचित,
पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां,
खेचतो त्याच कार्यात ।।२।।
अपूरे झाले असतां कार्य,
ज्ञानेश्वराच्या हातून,
पुनरपि येऊनी पूर्ण केले,
आठरा वर्षे जगून ।।३।।
ध्रुव जगला पांच वर्षे,
अढळ पद मिळवी,
कित्येक जन्मीचे तपोबल,
पांच वर्षांत पूर्ण होई ।।४।।
कर्म मुक्तता मिळे आत्म्याला,
जन्म-मृत्यू पासूनी,
‘कर्म’ फळानेच जे साधते,
‘मोक्ष’ म्हणती कुणी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
निरोगी असतां तुम्ही,
नामस्मरण करा प्रभूचे,
ठेवू नका उद्या करीता,
महत्व जाणा वेळेचे ।।१।।
शरिराच्या नसता व्याधी,
राहू शकता आनंदी,
आनंदातच होऊ शकते,
चित्त एकाग्र ते ।।२।।
व्याधीने जरजर होता ,
चित्त होई अस्थीर,
स्थिरतेतत दडला ईश्वर,
जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
वसंत ऋतूची हीच तर गंमत आहे. निसर्ग साद घालतो आणि बाहेरच्या पानगळी बरोबर आपला आळसही गळून जातो. कोणत्याही झाडोऱ्यात फांदी हलली की स्थिर होऊन पहावे. कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे बागडणे अव्याहतपणे चालू असते. हीच माझ्या बागेभोवतीच्या चैत्रबनातून जाणवणारी चैत्राची चाहूल. हाच माझा वसंतोत्सव.
गरीब माणुस दारु पितो.
मध्यमवर्गीय मद्यपान करतो..
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात...!
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते.
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळते..
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते...!
गरीब माणुस करतो ते लफडं.
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम..
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर...!
शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते.
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते..
शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
स्वप्न फरारीच बघायच का ?
अपना बजाज मधे सुख शाेधायचं...!
डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे का ?
संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे...!
आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची का ?
त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
स्वबळावर नवनवीन देश पादाक्रांत करायचे ?
मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं...!
What's Up वर स्वत:चं मनोरंजन करायचं का ?
आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं...!
जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच का ?
समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा का ?
विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा...!
मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची का ?
निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे...!
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं का ?
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं...!
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे
टेस्ट केलं तरी वितळतं...!
वेस्ट केलं तरी वितळतं...!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका...!
वेस्ट तर ते तसंही होतच आहे...!
पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा...!
कारण गरिबांच्या घरावर लिहलेल असतं सुस्वागतम्...!
आणि श्रीमंतांच्या घरावर लिहलेल असतं कुत्र्यांपासुन सावधान...!
टेन्शन घ्यायचंच नाही...
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही...
कारण, नशीब(कर्म+संधि) कधी ही बदलु शकते....
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."
हा जन्म पुन्हा नाही
-- भरत कानविंदे
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा
यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ||१||
तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर
तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ||२||
बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी
एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ||३||
मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी
डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ||४||
टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी साऱ्या जमवूनी
लय लागूनी जातां सारी संसार गेली विसरूनी ||५||
राधा तर वेडी झाली तुझ्यावरील प्रेमानें
लूटून जावे प्रेमामध्यें शिकविले श्रीकृष्णानें ||६||
गीतेचे तर ज्ञान आगळे उकलेले जीवन कोडे
आत्मज्ञान घेतां त्यातील जीवनाचे दर्शन घडे ||७||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कशांत दडले समाधान ते,
शोधत असतो सदैव आम्ही,
धडपड सारी व्यर्थ होऊनी,
प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।
बाह्य जगातील वस्तू पासूनी,
देह मिळवितो सदैव सुख,
क्षणीकतेच्या गुणधर्माने,
निराशपणाचे राहते दुःख ।।२।।
'समाधान' ही वृत्ती असूनी,
सुख दुःखातही दिसून येती,
चित्त तुमचे जागृत असतां,
समाधान ते सदैव मिळते ।।३।।
सावधतेने प्रसंग टिपता,
समाधान ते येईल हाती,
सुख दुःखाला दूर सारता,
अंतरभागी समाधान दिसती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti