विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
सारे जीवन जाते आपले, अन्न शोधण्याकडे ।
काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।।
जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे ।
आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।।
धडपड करी आम्ही सारी, देह सुखापाठी ।
विचार ही मनांत नसतो, इतरांच्यासाठी ।।३।।
वेळ काढावा जीवनामधूनी, इतरांकरीता थोडा,
सार्थकी लावा आयुष्य, जीवन शिकवी धडा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
( ही कविता प्राणवायुला समर्पित !)
इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू ।
जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।।
लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे ।
प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।।
इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा ।
जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।।
एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक ।
भयसूचक त्या घंटा नीचा आता तरी त्या ऐक ।।
मरणानंतर सरणासाठी उरली नाहीत झाडे ।
नरकयातना दिल्या तयांना कशी पेटतील हाडे ?
-- डॉ .श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
ही कविता नावासह सर्वत्र पाठवायलाच हवी !
‘गुरु शिवाय मोक्ष नाही’ जेंव्हा जेंव्हा काही अध्यात्मिक चर्चा ऐकल्या, वाचल्या सर्वातून हा एकच निष्कर्ष निघाला. तशी मी फार कर्म-कांड करणारी नाही.
सारे धर्म मानव निर्मीत
त्यांतच आणली जात पात ।।
सर्व धर्म महान
तत्वज्ञानाची असे खाण ।।
प्रत्येकाचा धर्म निराळा
जन्मताचि मिळाला ।।
व्यर्थ का भांडता धर्मावरुन
तो तर मिळाला जन्मापासून ।।
भेदभाव जावे विसरुन
त्यातच सर्वांचे कल्याण ।।
स्वधर्म तत्वे पाळा घरांत
बाहेर एक मानवधर्म सर्वांत ।।
मानवधर्म फक्त मानवता
त्यांतची मानवाची श्रेष्ठता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नादावले सखीने
मन जडल्या नात्याचे
चंद्र पाकळ्यांची बरसात
फुलणार मग निशेने
भिजशिल गं प्रेमाने
सखी कोणता ऋतुमास
ओठावरी तुझा ध्यास
मन करुन वारुचे
ये प्रणयसखे वेगाने
भिजशिल गं प्रेमाने
भेटशील ना त्या ठिकाणी
दुसरे नसेल कोणी
क्षण तुझ्या भेटीचे
ये करुनि बहाणे
भिजशील गं प्रेमाने
-सौरभ दिघे
जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना ।
कांहीं तरी मागत होते, हात जोडूनी चरणा ।।
दयावान ती आहे समजता, गर्दी होते तिजपाशीं ।
कधी न दिले काहींहीं तिजला, मग ही मागणी कशी ? ।।
जावू नका दर्शनास तिच्या, रिक्त अशा त्या हाताने ।
तिला पाहिजे ताट पूजेचे, भरलेले भक्ती भावाने ।।
व्यर्थ होवून जाती ते श्रम, भक्तीभावाच्या अभावी ।
उभे आयुष्य वाऱ्या करूनी, हाती काही न येई ।।
मानव रूप देऊनी तिजला, धनादी वस्तू अर्पिती ।
पूजाविधींचा थाट करूनी, मोठेपणा दर्शविती ।।
भक्तीची ती भुकेली असूनी, काही न लागे तिजला ।
केवळ तुमचे भाव जाणूनी, सर्वच मिळेल तुम्हाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
भरोसा नसला जरी श्वासांचा
जीवनखेळी सहजी खेळावी...
मनात असावा स्पर्श प्रीतीचा
भावशब्दातुनी नाती जपावी...
वाळवंटातही अंकुर फुटतो
भावनांना फुटावी शब्दपालवी...
गीतातुनी उमलावे हृद्य मनीचे
फुलांफुलांतुनी प्रीती फुलावी...
आलो मोकळे, जाणार मोकळे
जीवास वृथा आसक्ती नसावी...
सुखनैव जगावे अन जगवावे
अंतसमयी मनास खंत नसावी...
--वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908
रचना क्र. २६५
१९/१०/२२
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली मंदाकिनी पाटील यांची हि कविता
Copyright © 2025 | Marathisrushti