सकाळच्या या प्रसन्न प्रहरी
सूर्यकिरण पसरले अंबरी ।।
उदर भरण करण्यासाठी
लगबग उडाली ही पक्ष्यांची ।।
कावळे, घारी, साळुंखी ही
पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।।
प्रत्येकाचा सूर निराळा
गाऊन सवंगड्या साद घालती ।।
पटकन आला थवा राव्यांचा
मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।।
घाणेरीच्या झुडुपांमध्ये
क्षणात हा थवा मिसळून गेला ।।
मोबाईल हा गप्प बसेना
मग नजारा हा राव्यांचा ।।
छायाचित्रण करुनी तयांचा
आनंदाचा क्षण साठविला ।।
(रावा =पोपट)
-- मी सदाफुली
संध्या प्रकाश बापट
03/10/2019
October 4, 2019
November 14, 2021
आंस राहते सतत मनीं
मिळत नसते त्याचे साठी
प्रयत्न सारे होत असती
हाती नाही ते मिळविण्यापोटीं
प्रयत्न्यांत तो आनंद होता
धडपड होती, होती शंका
मिळविण्याच्या त्या लयीमध्यें
जिद्द मनाची आणिक हेका
यश मिळते जेव्हां पदरीं
धडपड सारी थंडावते
ज्याच्या करिता सारे सोशिले
त्यातील उर्मी निघून जाते
यशांत नाहीं आनंद तेवढा
मिळविण्यांत जो दिसून येई
कांहीं तरी ते मिळवावयाचे
ह्याच विचारी रमून जाई
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
April 11, 2016
झालं इलेक्शन
व्होट-कलेक्शन.
एक पार्टी हरली
एक जिंकली.
पण कुठेतरी
माशी शिंकली ;
आणि, लागली
भलत्याच भिडूच्या माथीं,
सोनेरी सत्तेची टिकली.
- सुभाष स. नाईक
August 25, 2018
सकाळी रोजच्या प्रमाणे
अाँफीसची तयारी केली
पत्नीने चहा केला, डबा केला रोजप्रमाणे
मी ओफिसला
ती घरी
मुलींचा अभ्यास बघितला, शाळेसाठी तयारी केली
परत अाणायला घाई केली रोजप्रमाणे
मी घरी आलो
तिने पाणी दिलं
चहा केला रोजप्रमाणे
महिलादिनानिमीत्त
सोसायटीत कार्यक्रम आहे म्हणाली
माझ्यासाठी जेवण तयार करुन ठेवलं
..........नंतरच ती गेली कार्यक्रमाला
मी तिला शुभेच्छा दिल्या
रोजसारखीच आजही राबली
वर्षभर राबणार अशीच
अन
फेबुवर,वाँट्सअपवर नुसत्याच शुभेच्छा देत मी सुटलो
आज कारण मिळाले म्हणून....
असा .....
मी महिलादिन साजरा केला
-- श्रीकांत पेटकर
March 15, 2019
आडगेवाडीतल्या अण्ण्याचं लग्न व्यवस्थित पार पडलं. जास्त काही नाही, फक्त दोन डोकी फुटली. एका आगाउु आडगेवाडीकराने वर्हाडातल्या पोरीला शिटी मारली म्हणून थोडा दंगा झाला, पण बापूच्या चोख व्यवस्थापणामुळे लगेच आटोक्यात आला. लग्न होउुन चार दिवस उलटले. पूजा झाली, फक्त गोंधळ तेवढा बाकी होता. आईबापाला काही पडलेली नव्हती, ते गोंधळात इंटरेस्टच घेत नव्हते. म्हणून अण्ण्याने बापूला सांगून गोंधळयांची व्यवस्था करायला सांगितले. त्याने स्वत:च जाउुन सांगितलं असतं, पण गावात गोंधळी नव्हते आणि नवरदेवाने लग्न झाल्यावर हातातले हळकुंड सोडेपर्यंत तोंड वर करून गावाची शिव ओलांडायची नसते अशी प्रथा असल्याने आण्ण्याचा नाईलाज होता.
बापूचा लोकसंग्रह दांडगा म्हणून लग्नाची सगळी व्यवस्था बापूने अंगावर घेतलेली. त्यात बापूचा काहीही फायदा नाही पण पुढे पुढे होउुन पुढारीपणा करायचा त्याचा शौक तो अशा प्रसंगातून भागवून घ्यायचा. शिवाय वयाने सगळ्यांनाच वडिलधारा असल्याने सहसा त्याचा शब्द कोण मोडत नव्हते. पाच मैलांवर शिंदेवाडी होती. तिथल्या गोंधळयांची जोडी सगळया पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. बापूने सांगितल्यावर लगेच एक माणूस टांग टाकून सायकलीवरून शिंदेवाडीला गेला आणि त्याच रात्रीची गोंधळाची सुपारी देउुन आला.
“बाबा, त्यांना लवकर यायला सांगितलं आहेस का?”
“मग, दिवस बुडायच्या आत टच व्हायला सांगून आलोय.”
“ते एक चांगल केलंस बघ. आणि त्यांना रस्ता कुठला सांगितलास?”
“काय बापू तुम्ही पण विचारताय राव रस्ता कुठला सांगितलास म्हणून! त्या भूताच्या पांदीशिवाय दुसरा रस्ता आहे का वाडीला यायला?”
बापू त्याच्या उत्तरावर गप्प बसला. भूताची पांद ही वाडीजवळची ऐतिहासिक जागा होती. रात्री अपरात्री तिथून कोण आला की त्याला काहीतरी विचित्र अनुभव यायचे. लक्सूबापूला याच पांदीने वेड लावलं होतं. शेवटी त्याने तिथल्याच एका विहीरीत उडी टाकून जीव दिला होता. तेव्हापासून तर लोक दिवसाही तिथून जायला घाबरायचे. एकदम निर्मनुष्य रस्ता होता. रस्त्यावरून चारचाकी चालायचीच नाही. कशीबशी बैलगाडी जात असे एवढा ओबडधोबड. सायकल मात्र एका बाजूने चाकोरी धरून चालवता यायची. पण जी काही वर्दळ असेल ती दिवस बुडायच्या आतच असायची. बाकी इतरवेळी चिटपाखरूही नसायचं. म्हणून या बाबाने नीट सांगितलं नसेल तर गोंधळाची पंचाईत व्हायची ही बापूला काळजी लागलेली.
दिवस बुडाला. सात वाजून गेले, आठ वाजले तरी गोंधळयांचा पत्ता नाही. गोंधळाला लागणारं सगळं सामान घरात आणून ठेवलेलं. अण्ण्या घाईवर आलेला. लग्न होउुनही काही उपयोग नव्हता. गोंधळ झाल्याशिवाय बायकोजवळ जाता येणार नव्हते म्हणून तो वैतागला होता. लोक बायकोशी बोलूही देत नव्हते. गोंधळी आले नाहीत तर भटजीला बोलवून गोंधळ घाला म्हणून तो नाचायला लागला होता. एवढा टाईम होउुनही ते लेकाचे अजून का आले नाहीत म्हणून बापू चिंतेत होता. तसल्या काळ्याकुट्ट अंधारात कुणीही एकटा जायला तयार झाला नसता म्हणून बापूने दामा आणि गण्याला सायकली घेउुन शिंदेवाडीकडे पिटाळले.
दोघेही सायकलवरून रस्त्याचा अंदाज घेत बॅटरीच्या उजेडात चालले होते. अर्धा रस्ता गेल्यावर त्यांच्या कानावर संबळाचा आवाज येउु लागला. दोघांचेही कान खडे झाले. त्यांनी चमकून एकमेकांकडे पाहिले. काहीतरी आक्रित घडलं होतं यात वादच नव्हता. त्या रस्त्याने जसजसे ते जवळ जाउु लागले तसतसा त्यांच्या कानावर माणसाच्या गाण्याचा आवाजही यायला लागला. अजून पुढे गेल्यावर संबळ आणि गोंधळाची पदं ऐकू येउु लागली. पांदीतल्या भूताने दोघा गोंधळयांना धरलंय याची त्यांना खात्रीच झाली.
गोंधळयांनी शिंदेवाडीतला एक गोंधळ आटोपला. बराच उशिर झाला होता. आडगेवाडीच्या सुपारीला दिवस बुडायच्या आत या म्हणून सांगितले होते. पण तिथेच मुक्काम करायचा आहे, थोडा वेळ लागला तरी हरकत नाही असा विचार करून सायकलीवरून ते आडगेवाडीकडे निघाले. ते नेमके भूताच्या पांदीत आले आणि कुठून कुणास ठाउुक दोन भलेमोठे लांडगे समोर येउुन उभा राहिले.
सायकली तशाच बाजूला टाकून लांडग्यांना पळवून लावण्यासाठी दोघांनी खूप आरडाओरडा केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लांडगे मागे हटायला तयार नव्हते. अंधारात त्यांचे चकाकाणारे डोळे बघितल्यावर दोघांच्या तोंडचं पाणी पळालं. लांडगे गुरगुरायला लागल्यावर विचार करायला वेळही नव्हता. दोघांनीही सरळ संबळ काढले, कमरेला करकचून बांधले, हात जोडले आणि “आई अंबाबाईच्या नावानं …” सुरू केलं. लांडग्यांनाही मजा वाटू लागली. उभे असणारे लांडगे संगीत गोंधळ ऐकत पायावर पाय टाकून आरामात खाली बसले. संबळ थांबला की गुरगुरायचे. गोंधळयांचे सगळे देव बोलवून झाले. संबळ बडवून हात दुखायला लागले पण लांडगे हटेनात.
दामा आणि गण्या सावधपणे पांदीजवळच्या चढावर आले. खालच्या तालीतून आवाज येत होता. समोर दिसायला काहीच मार्ग नव्हता. आधीच रात्र, त्यात मोठमोठ्या झाडांनी अजून काळोख वाढला होता. सायकली वरच्या बाजूला उभा करून कानोसा घेत ते हळूहळू खाली उतरू लागले. नजरेच्या टप्प्यात आल्यावर त्यांना समोरचा सीन दिसू लागला. दोन भलेथोरले लांडगे आरामात पायावर पाय टाकून दर्दी रसिकासारखे गोंधळ ऐकत बसले होते आणि या दोघांचा गोंधळ रंगात आला होता. थोडावेळ ह्या दोघांनीही त्या अनोख्या मैफलीची मजा घेतली. शेवटी गोंधळ्यांना तर घेउुन जायला पाहिजे म्हणून त्यांनी आरडाओरड करत बॅटरीचा उजेड लांडग्यांच्या डोळयांवर मारला आणि त्यांना पळवून लावले तरीही अंगात आल्यासारखे गोंधळी सुंबूळुंग गुंबूळुंग वाजवतच होते. पुढचे दोन लांडगे पळून गेल्याचा त्यांना पत्ताच नव्हता.
“कोल्हापुरची लक्षुमी गोंधळाला यावं न् जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला यावं.” हे त्याचं चालूच होतं. शेवटी दामा आणि गण्याने जाउुन त्यांचे हात धरले तेव्हा ते भानावर आले.
“ये खंडेरायाच्या लाडक्यांनो, बास करा आता. च्यायला, दिवस बुडायच्या आत या म्हटल्यावर हा टाईम आहे होय रे तुमचा? गुंडाळा आता हे सगळं आन् चला आमच्यामागं गपगुमानं.”
कपाळावरचा घाम पुसून धरथरत्या अंगाने दोघा गोंधळ्यांनी आपला बाडबिस्तरा आवरला आणि निमुटपणे ते दामा आणि गण्याच्या मागे चालू लागले. शेवटी भेदरलेल्या गोंधळयांची वरात घेउुन ते आडगेवाडीत पोहोचले आणि दिवसातला तिसरा गोंधळ चालू झाला.
©विजय माने, ठाणे
http://vijaymane.blog
चित्र : खलील आफताब
July 26, 2018
आधी मूळ धाडा
अष्ट गणेशांना
इच्छिल्या कार्याला शुभारंभ ।
आधी मूळ धाडा
बापुजी देवाला
घरच्या कार्याला हातभार ।
आधी मूळ धाडा
कार्ला गडावरी
बैसोनी अंबारी येई माते ।
आधी मूळ धाडा
सप्तश्रुंगावरी
भगवतीची स्वारी येई कार्या ।
आधी मूळ धाडा
कृष्णेला वाईच्या
मान आजोळीचा आहे तिचा ।
आधी मूळ धाडा
जेजूरी खंडेराया
बहिणीच्या कार्या पाठी उभा ।
October 11, 2018
घटना' जेव्हां घडली अघटित ।
कुणीही नव्हते शेजारी ।।
कां उगाच रुख रुख वाटते ।
दडपण येवूनी उरीं ।।
जाणून बुजून दुर्लक्ष केले ।
नैतिकतेच्या कल्पनेला ।।
एकटाच आहे समजूनी ।
स्वार्थी भाव मनी आला ।।
नीच कृत्य जे घडले हातून ।
कुणीतरी बघत होता ।।
सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे ।
हेच सारे सुचवित होता ।।
कोण असावा हा गुप्त साक्षीदार ।
नितिमत्ता शिकवी त्याला ।।
बाह्य जगातील द्रष्टा असूनी ।
अंतर्यामीही बसलेला ।।
त्या साक्षीदाराची जाणीव होता ।
कचरुनी जाते मन सदा ।।
अपप्रवृत्तींना आळा बसूनी ।
सत् कर्मे घडती अनेकदा ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 3, 2016
पाऊस आलाय.....भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या.....
आलाय पाऊस.....भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..... आलाय पाऊस.....भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..... आलाय पाऊस.....भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच.....
त्याला औषध तेच तेच..... प्यायचेच आहेत नंतर काढे , आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस.....भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..... आलाय पाऊस.....भिजून घ्या
WhatsApp वरुन
June 30, 2017
निराशेचे बीज पेरतो, आम्हीच आमच्या गुणानें,
विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।।
जाणूनी ईश्वरी स्वरूप, प्रतिमा ती मनीं बसवी,
धडपड चालते सतत, तशीच प्रतीमा दिसावी ।।२।।
तपसाधना ती बघूनी, कित्येकदा मिळे दर्शन,
परि केवळ अज्ञानाने, न होई त्याचे अवलोकन ।।३।।
सभोवतालच्या वस्तूंमध्यें, जाण तयाची येते,
निसर्ग रम्य सौंदर्यात, भावना तशी उमटते ।।४।।
अस्तित्वाची जाणीव देतो, हर एक घडीचा ठेवा,
ध्यास लागतो आम्ही, परी कल्पिलेल्या रूपी दिसावा ।।५।।
निराशा राहते सदैव, दर्शन न मिळता त्याचे,
पाण्यात राहून देखील, तहानलेला असे याचे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 7, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti