(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संत संगती

    ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले
    संत जाणती दिव्य दृष्टीने
    नियतीच्या ह्या हलचालीना
    दिली जाती आवाहने

    जाणून घेता भविष्यवाणी
    जीवन मार्ग हे ज्याना कळती
    तपशक्तीने संत महात्मे
    योग्य मार्ग ते दाखवूनी देती

    कर्माने जरी भाग्य ठरते
    सुख दुखःच्या गुंत्या भोवती
    त्या गुंत्यातील धागा शोधुनी
    सुसाह्य त्याचे जीवन करीती

    कृपा होता संत जनाची
    चुकला-मुकला जाई ठिकाणी
    घनदाट त्या जंगलामधली
    पाऊलवाट ते देई दाखवुनी

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      February 20, 2013


  • जागा वाटपातील वाढती अस्वस्थता

    जागा वाटपातील वाढती अस्वस्थता

      August 25, 2014


  • एक झाड

    एक झाड
    सारखं माझ्या स्वप्नांत येत राहतं
    अक्षरांनी लगडलेलं
    मी वेचतो,मी तोडतो
    मी जमवतो खुप अक्षरे
    आणि
    बनवतो निरनिराळे शब्द त्यांचेपासून
    माळेसारखी ओवून
    वाचकासाठी ठेवतो
    काही माझ्यासाठीही.....

    कुणी म्हणतात
    याला कविता
    कुणी गझल
    आणि
    कुणी काहीही!

    -- श्रीकांत पेटकर

      February 26, 2019


  • घुमू द्या खेळांचा महाजल्लोष !

    सर्व वाद मागे पडून आता राष्ट्रकुल स्पर्धांना प्रारंभ होत आहे. देशाच्या संस्कृतीचे निदर्शक असल्याने अशा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. या स्पर्धेमधून विविध क्रीडाप्रकारांमध्ये आयकॉन्स निर्माण होतील. हे आयकॉन्स होतकरू खेळाडूंना आकर्षित करतील. त्यांना उत्तम सुविधा मिळाल्या तर क्रीडाक्षेत्रात भारताचे भवितव्य उज्ज्वल राहिल. ही भावना हृदयी ठेवून राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेचा जल्लोष अनुभवायला हवा.

      October 2, 2010


  • कुठल्या वाटेवर या

    कुठल्या वाटेवर या
    पाऊल अलगद पडते
    ही वाट कुठे हरवून
    अनामिक मग होते..
    फुलतील फुलांचे मळे
    फुलपाखरे फुलात बागडे
    गंधित मन होईल अलगद
    सुवास अंतरी मोहक दाटे..
    ही वाट अशी मग चालता
    रमते क्षणभर मन हसरे बावरे
    पाहूनी निसर्ग फुलतील गात्रे
    नयनी साठविते हे फुलांचे ताटवे..
    किती किती मन हरखून जाई
    सुखद क्षण आनंद हृदयात भावे
    मोहरुन जाईल अबोल काया
    चुंबीता फुलास भुंगा कळी ती लाजे
    हरवते या वाटेवर पाऊल माझे
    किती रंगुन जाईल मनाचे धागे
    उरतील पाऊलखुणा या वाटेवरती
    ते धागे असतील धुंद रेशमी लडीचे..
    फुलतील फुले मोहक सारे
    फुलांचे गालिचे अलगद अंथरले
    मन तृषांत अधिर आल्हाद ओथंबले
    फुलात गंधाळून लाजले फुलपाखरे..
    -- स्वाती ठोंबरे.

      November 14, 2021


  • पाप वा पूण्य काय ?

    काय पूण्य ते काय पाप ते, मनाचा हा खेळ जाहला

    ज्यास तुम्ही पापी समजता, कसा काय तो तरूनी गेला....१,

    कित्येक जणाचे बळी घेवूनी, वाल्या ठरला होता पापी

    मनास वाटत होते आमच्या, उद्धरून न जाई कदापी....२,

    मूल्यमापन कृतिचे तुमच्या, जेव्हा दुसरा करित असे,

    सभोवतालच्या परिस्थितीशी, तुलना त्याची भासत असे.....३

    तेच असते पाप वा पुण्य, आमच्या अंत:करणी वाटे

    आतूनी आवाज सत्य येई, तोच तुमच्या मनास पटे....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 24, 2020


  • आठवावे गजानना

    आठवावे तव नाम हे गुरुराया
    शीणवटा मनाचा घालवाया ...।। धृ ।।

    रहाटगाडगे हे रोजचे चाले
    रेटूनी रेटूनी मन हे थकले
    एकचित्त होऊनी आता बसलो
    स्मरण करी तुमचे गजानना ।।१।।

    उपदेशपर तुम्ही जे सांगितले
    मनात हो साठवुनी ठेवियले
    विपरीत वर्तमानात आजच्या
    वागण्या बल द्यावे गजानना .....।।२ ।।

    किंमत हरवुनी बसली माणसे
    हरवून बसले बोलते शब्दही
    बदलणे बरे नव्हे रंग नाना
    हे भान तुम्हीच द्यावे गजानना ....।।३ ।।

    -- अरुण वि.देशपांडे - पुणे.
    9850177342

      January 29, 2019


  • प्रत्येकाला इथं दुःख असतं

    प्रत्येकाला इथं दुःख असतं
    असतं फक्त ते दिसतं नसतं,
    हास्य वरवर सगळीकडे असं
    म्हणून त्यात ते कळतं नसतं..
    गैरसमज करणं इथं तर
    खूप सोप्प सहज असतं,
    किंवा गैरसमज करुन
    घेणं नित्य रोज होतं असतं..
    तू मला बोलला मग मी
    राग तुझ्यावर तो धरेन,
    दोन शब्द तुला जास्त बोलेन
    हेच हल्ली मग सगळीकडे दिसतं..
    दुसऱ्याला गृहीत धरण
    सहज मग होतं असतं,
    जबरदस्तीच गणित त्यात
    नकळत सहज घडतं असतं..
    हक्काने रागवणार ओरडणार
    मोठं माणूस आपुलकीच नसतं,
    झाली चूक तर दाखवणारं आता
    आयुष्यात मोठं माणूस समोर नसतं..
    नातं पण हल्ली उलगडत नसतं
    एकमेकांना काय हवे कळतं नसतं,
    साधा गजरा आणण पण प्रेम आहे
    जुन्या पिढीतील हे प्रेम आता माहीत नसतं..
    दोघांचं चुकलं जरास कुठे हल्ली तर
    ओरडण राग हे नवरा बायकोत होतं,
    भांडण राग ह्यात वेळ सगळा जातो
    प्रेम करायला मग अबोला सोबत उरतो..
    फास्ट दुनियेत सगळचं फास्ट मग
    पैसा जवळ खूप ह्यातच सुख कळतं,
    गरजा कमी करुन थोडं तडजोड करुन
    आनंद मिळतो हे मग साधं गणित न कळतं..
    घरी आणि बाहेर पण नित्य हेच
    सगळीकडे घडतं ते असतं,
    हक्क आणि राग ह्यात पटकन रुसणं
    पण समुजन घेणं दुसऱ्याला होतं नसतं..
    कुणीही आवडून जावं सहज मनात
    अशी लोकं भेटणं आयुष्यात छान घडतं,
    नशिबात असेल तितकं दान मिळतं
    हेच तर जीवनाचं अंतिम सार ठरतं
    कुणी मनात गोड आवडून जावं
    अस हल्ली लोकांचं वागणं होतं नसतं,
    आणि आवडलं मनापासून कुणी तर
    ते सांगणं पण हल्ली कठीण असतं..
    मोह व्हावा अगदी साध्या गोष्टींचा
    पण त्या गोष्टी मिळणं अवघड ठरतं,
    देव करतो रचना ही अशी निराळी
    नशीबाचा दैव फेरा काय ते मग समजतं..
    मरणं सोप्प सहज हल्ली झाले
    जगणं फार कठीण होऊन बसलं,
    करोना कधीही घालेल घाला आता
    भीतीच हे संकट थोडं मनात असतं..
    कोण कधी फटकन जाईल
    कुणाला हे कधी माहीत नसतं,
    आज आहे क्षण आपला आनंदाचा
    तरुण म्हातारं काही मरणदारी नसतं..
    आज करते स्वाती कविता ही
    पण उद्या माझं ही मरणं येऊ शकतं,
    नसेल मग मी ह्या जगात अशी
    कधीही श्वास जाऊ शकतो..
    हेच अंतिम सत्य आयुष्यात
    भरवसा जगण्याचा जरा नसतो,
    नको राग द्वेष कटुता भांडण सारे
    मेल्यावर मग हळहळ करणं उरतं..
    जीवनाचे सूत्र हे सहज साधे
    माणूस अवघड ते करतो,
    समजून न घेणं दुसऱ्याला मग
    गैरसमजाचं दुष्ट चक्र ते फिरतं..
    वाचा कविता ही रसिकहो
    मनात किल्मिश कधी नसावं,
    येईल मरणं माझे कधीही मग
    काळ समोर कधी येऊ शकतो..
    निसर्ग,फुलं,पाऊस,काव्यांत
    मन सहज बेधुंद मुक्त करावं,
    कुणी आवडलं मनापासून मग
    हृदयात गोड बंदिस्त करावं..
    कविता झाली माझी मोठी खूप
    तरी रसिकहो वाचा तुम्ही सारे हो,
    गंध कवितेचा मनात माझ्या नेहमी
    स्वातीच्या प्रेमात राहील तारा हृदयस्थ..
    -- स्वाती ठोंबरे.

      May 10, 2022


  • विस्तीर्ण समुद्र किनारी

    विस्तीर्ण समुद्र किनारी,
    फिरत फिरत निघाले,
    वाळूत चालताना ठसे,
    पावलांचे उमटलेले, --!!!

    दूर क्षितिजी सूर्यबिंब,
    घाईत होते चालले,
    रंगांची आरास पाहून,
    अचंबित की झाले,--!!!

    ढगांमागून निघाला,
    संधिप्रकाश आता,
    दिसू लागला धरणीवर,
    पखरुन घातलेला, --!!!

    याच ढगांवर स्वार होऊन,
    निघाला सोन्याचा गोळा, आभाळाला सप्तरंगी,
    आज साज चढवलेला,--!!!

    किती रंगांची रासक्रीडा,
    गगनी होती चाललेली,
    चकित होऊनी धरा,
    कशी रंगात रंगलेली,--!!!

    उन म्हणावे तर थोडे,
    काढता पाय घेतलेले,
    तमाने पुढे येऊन,
    पाऊल आत टाकले, --!!!

    चांदण्यांचे पुंज,
    दिसू लागले जागोजागी,
    आकाशाचा निळा गालिचा,
    भरून गेला पदोपदी,--!!!

    लांबवर दूरस्थ किनारा,
    दिसत होता तटस्थ उभा,
    केव्हाच सारी उडून गेली,
    येथील पक्ष्यांची सभा, --!!!

    पार लांबवर उंच उंच,---
    बुडू लागला सोन्याचा गोळा, समुद्रात तो, का समुद्र त्यात,
    बघूनही कळेना मला,--!!?

    लाटेवर लाट वरचढ ठरुनी,
    निघाली कशी पुढे ,
    निरोप द्याया सज्ज,
    नाराज वातावरण केवढे,--!!!

    गगनी उगवला तोच आपला, लाडका चंदामामा,
    सारे विसरून गेले प्रकाशा,
    अंधाराची त्याला आभा,--!!!

    पांढरी,तांबडी,केशरी,करडी,
    जांभळी राखाडी, सोनेरी,
    सूर्यबाप्पाची मिरवणूक निघाली,
    सप्तरंगी मस्त रथांतुनी,--!!!

    स्तिमित होऊनी धरा,
    बघत राहिली किती,
    त्या रंगांची रासक्रीडा,--!!!
    सूर्यदेव मध्ये उभे तसे,
    गोकुळी खेळे हरी,जसा,
    भोवती नाचताना गोपिका,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      April 28, 2019


  • जखमी होऊन पिल्लू पडले

    जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे, करुण आवाजी साद घाले,
    आईस बोलावे सारखे,

    पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी,
    कळेना तिला काय जाहले,
    कसे पडले ते खाली ,--?

    करूण साद ती ऐकून कोणी,
    धावत आला दयावंत,
    अती गरीब असूनही,
    पक्षिणीस भासे देवदूत,

    हळुवार हाते पिल्लाला,
    जवळ घेऊन कुरवाळी,
    साशंक मनाने पक्षीण मात्र,
    सारखी हिंडे भोवताली,

    नाजुकशा स्पर्शाने जाणवे,
    ‌इवल्या पिल्लाच्या शरीरी,
    दिसे,-- कांटा रुतलेला,
    बघून कोवळ्या पिल्लाला,
    त्यांतील होई देव जागा,--!!

    पिल्लू सारखे वेदनेने,
    तडफडून रडत असे,
    पक्षीण घायाळ जखमेवाचून,
    तो असहाय्य जीव असे,--!!!

    प्राण तिच्या डोळ्यात सारे,
    डोळ्यातूनच बोलत असे,
    येई कींव दयावंता,
    बाजूस करे तो काटा,
    वर लावी औषध त्याला,
    विचार केवढा मोठा,--!!!

    घेऊन जाई घरी पिलास,
    पक्षीण येत असे पाठी,
    पिल्लू ठेवले कापसात,
    उपचार करण्यासाठी,

    पक्षीण येई रोज तेथे,
    करत मुक्त संचार,--!!!
    घास पिल्लाला भरवे ,
    आता भरोसा तिला फार,

    खूप काळ मध्ये जाई,
    पिल्लू तिथल्या तिथे हिंडे,
    आईस बघून तेवढे ,
    उडण्यास सज्ज होई,--!!!

    एक दिवस आला असा,
    पिल्लू घरातल्या घरात उडे,
    पक्षीण घेऊन जाई त्याला, मानवतेचे देणे केवढे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 2, 2019