(सत्तेची खुर्ची एक वेगळी मजबूत होती. चार पायांवर भक्कम उभी होती. आताची खुर्ची - ?)
एक खुर्ची चार पाई
भक्कम मजबूत एके ठाई
एक खुर्ची तीन पाय
एक गळाला कळलं नाय
एक खुर्ची दोन पाय
दोन गळाले, खुर्ची तर हाय
एक खुर्ची एक पाय
काय बिगडलं फिरती हाय
कुटं बी वळीवलं तर
काय बी बिगडत नाय
आजकाल अशाच खुर्चीची
तर राव चलती हाय!
-- विनायक अत्रे.
समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई
सबळ दुर्बल याचा संघर्ष, टळत नेहमी जाई....१,
मर्दूमकीचा विचार ठेवूनी, मैदानी उतरी
त्याच स्थरावर सारे घडते, मुरले जे शरिरी....२,
ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी
हात घाईची सिमा परि, तो टाळी विचारांनी.....३,
मस्तावले शरिर असतां, धक्का-बुक्की होते
देहामधली जमली शक्ती, बाह्य मार्ग शोधते....४,
दिसून येतो ऊर्जा वापर, देह बुद्धी वा मनी
संस्काराचे बीज अंकूरते, परिस्थिती बघूनी...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तुझ्या भिंतीवर मारला खिळा
आणि पडला भोक तिला...
त्या भोकातून पाहिले तुला
पण दिसला चंद्र मला...
त्या भोकाला लावला डोळा
तेंव्हा दिसला काळोख मला...
त्या भोकातूनच मग भिडला
तुझ्या डोळ्याला माझा डोळा...
त्या भोकातून पाहिले तुला
तुही मग पाहिले मला...
त्या भोकावर टांगले मला
तुही मग टांगलेस तुला...
त्या भोकातून दिले तुला
तुही दिले प्रेम मला...
त्या भोकाने धोका दिला
एका धक्काने मोकळा झाला...
प्रेमाचा मार्ग भोकात गेला
आपले प्रेम इतिहास झाला...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 15 मे 2016
|| हरी ओम ||
वारी आषाढीची !
नाम वारीचे घेता
पंढरपूर आठवे भक्ता !
चंद्रभागेच्या तिरी
विठ्ठल विठ्ठल नाम गजरी !
जप तप नाम हाची लळा
हाची पांडुरंगाचा सोहळा !
जया मनी गोड भाव
तया सावळ्याचा तो ठाव !
भक्तीरसात डुंबावे
कैसे इतरा सांगावे !
स्वहानुभावे वेचावे
पांडुरंगी तल्लीन व्हावे !
ऐसा वारीचा सोहळा
जैसा आषाढीचा मेळा !
कृतकृत्य होतसे जीवा
मनी आठवून आठवावा !
होता पांडुरंगाचे दर्शन
जाहले कोट कल्याण !
ऐसा दर्शन सोहळा
कुठे पहिला म्या डोळा !
-- जगदीश पटवर्धन
कवितेच्या तलम पडद्याआडून
माझ्या भावना तुला सागतात
माझ्या विरहव्यथा
शकुंतलेची व्यथा सांगावी
दुष्यंताला तिच्या सखींनी तशी
क्वचित दुर्लक्षिल्यासारखं
क्वचित दाद देत तू म्हणतोस
वा ।’
आणि निघून जातोन
कसं सांगू तुला कवितेतून?
माझ्या कविता तुझ्यासाठी असतात!
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
इमारतीचा झाला आहे आता खंडहर,
अनेक खिडक्यात आहेत दोन जीर्ण,
एकमेका पाहत, म्हणत एक दुसरीला,
आहे का कोणी आपली काळजी घ्यायला?
काळ चालला आहे वेगात,
न थांबता, न संपता,
बिचाऱ्या पाहत होत्या वाट
आपल्या ‘कांती’ बदलाची !
ओसरला त्यांचा आनंद क्षणात,
आले होते कोणी इमारत पाडण्या,
काही होत्या सुपात काही जात्यात,
बघोनिया दूर, भयंकर प्रश्नचिन्हांत !
संपला होता त्यांचा निवास,
करोनिया मन घट्ट,
सारोनिया दूर विचार,
फिरून नाविण्याचा पुनर्विचार !
जगदीश पटवर्धन
मला अजूनही कळले नाही
तुझ्यात, मीच गुंतलो कसा
मनास ध्यास हा नित्य तुझा
नकळे तुझ्यात गुंतलो कसा
जगी सारी नाती ऋणानुबंधी
सत्यसाक्षी, हे अनादिकाली
कां? हीच ओढ गतजन्मांची
मीच तुझ्यात गुंतलो हा असा
वास्तव! आज तसे दुरत्वाचे
दुर्भाग्य! भाळी हे प्राक्तनाचे
दग्धता ही नां कधी शमणारी
तरी तव स्मरणी जगतो असा
उरी आर्त ओढ प्रीतभावनांची
घनमेघ, आठवांचे ते दाटलेले
लोचनी रूप तुझेच तरळलेले
सावरूनी मी जगतो हा असा
मी भाव तुझे ओळखून आहे
प्रीतासक्त! तूं, तरीही अबोल
छळते, मौन हे तुझे जिव्हारी
तरीही मी प्रतीक्षेत उभा असा
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५५.
२२ - २ - २०२२.
जिथे वेचला प्राजक्त
तिथे गोवऱ्या नशिबी आल्या
कोमल निशिगंधाच्या पाकळया
नजरेसमोर चोरीला गेल्या
कुठे मागावी दाद फिर्याद
सुगंधच फितूर झाला
बघता बघता चोराच्या
श्वासात तो सामावला
शुन्य नजर,मती गुंग, बधिर मी
स्वतः ला हरवून बसलो
स्वतः च पेटवलेल्या चितेत
धुमसत जळु लागलो
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
जन्मापासूनी बघतो तूला
परि जन्मापूर्विच ओळखले
रोप लावले बागेमध्ये
फूल तयाने दिले
चमकत होती नभांत तेंव्हा
एक चांदणी म्हणूनी
दिवसाही मिळावा सहवास
हीच आशा मनी
तीच चमकती गोरी कांती
तसेच लुकलुकणे
मध्येच बघते मिश्कीलतेने
हासणे रडणे आणि फुलणे
चांदणीचा सहवास होता
केवळ रात्रीसाठी
दिवस उजाडतां निघून गेली
आठवणी ठेवून पाठी
नको जाऊस जरी ही इच्छा
परि जाशील सोडून दुजा घरी
आठवणीसाठा देत जा मजला
दिलासा तोच हे समाघान धरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti