(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रिंस एडवर्ड थिएटर, लंडन

    लंडन! सगळ्यांच्या मनात घर करुन राहिलेलं शहर. जेवढी इथे आर्थिक सुबत्ता आहे तेवढीच कलाप्रेमींची संख्या मोठी आहे. युनायटेड किंगडमच्या या भव्य आर्थिक राजधानीत जर थिएटर नसेल तर तो या राजबिंड्या राजधानीचा फार मोठा अपमान ठरेल. “प्रिंस एडवर्ड थिएटर”! नावातच प्रिंस आहे तर मग थिएटर किती भव्य आणि देखणं असेल हे तुमच्या ध्यानात आलेच असेल.

      November 30, 2020


  • आनुवंशिक तत्व आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद.

    १२ फेब्रुवारी २०१२ ला चार्ल्स डार्विनची २०३ वी जयंती होती. केवळ २६ वर्षांचे वय असलेला चार्ल्स, ब्रिटिश नौदलाच्या ‘एचएमएस बीगल’ या बोटीवरून, ५ वर्षांच्या काळासाठी, १८३५ साली, जगप्रवासाला निघाला. या काळात, आर्किडपासून व्हेलपर्यंतच्या प्रजातींचा त्याने अभ्यास केला, स्वत:च्या अचाट बुध्दीमत्तेचा वापर करून आणि खूप मेहनत घेऊन नोंदी केल्या. पुढील  २०-२५ वर्षे मनन करून, १८५९ साली ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’ हा ग्रंथ, त्याच्या वयाच्या ५० व्या वर्षी लिहीला. या पुस्तकात त्याने, ‘नैसर्गिक निवड’ या तत्वावर आधारलेला उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडला.

      May 15, 2012


  • सारोळ्याचे वनपर्यटन

    औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.

      February 6, 2010


  • बेवड्याची डायरी – भाग १० – “हॅलुस्नेशन” च्या गमती जमती !

    मॉनीटर मला भ्रम ..किवा भास होण्याबद्दल सविस्तर माहिती देत असतानाच तेथे शेरकर काका आले .. ही ऐक वल्ली होती ..प्रत्येक गोष्टीत काहीतरी मस्करी करणे ..हा शेरकर काकांच्या डाव्या हाताचा मळ होता..वयाच्या ६५ व्या वर्षी ..माणूस इतका कसा कार्यक्षम आणि गमत्या असू शकतो याचे मला नवल वाटे

      February 2, 2020


  • आंधप्रदेश मराठी साहित्य परिषदेस राज्य शासनातर्फे १० लाखांची देणगी

    हैदराबादच्या आंध्रप्रदेश मराठी साहित्य परिषदेस राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची देणगी देणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

      August 27, 2010


  • हा घ्या पुरावा……..!

    पुराणकालीन रामसेतू आख्यायिकेतील काल्पनिक भाग नसून नैसर्गिक चमत्कार आहे, भूगर्भातील चमत्कारिक संसाधनांचा वापर करून नल व नील या वानरांच्या(वनात राहणारे नर)सहकार्याने प्रभू श्रीरामचंद्राने बांधलेला सेतू होय. समुद्राच्या तळाशी बुडालेल्या रामसेतूच्या अस्तित्वाची साक्ष देणारे कितीतरी पुरावे भारतात आहेत. रामसेतू हा संशोधानाचा भाग आहे. अश्याच काही पुराव्यांचा मागोवा घेणारा हा लेखप्रपंच….

      August 24, 2012


  • पीक विमा योजनेची नवी संकल्पना

    गेल्या वर्षी लांबलेल्या पावसाने आणि आता अचानक वाढलेल्या थंडीमुळे कृषीक्षेत्र अडचणीत आले. खरे तर अलीकडे तापमानातील बदल आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशा वेळी त्याला शासनाकडून नुकसानभरपाई दिली जात असलेली तुटपुंजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विमा कोष ही नवी संकल्पना अस्तित्वात यायला हवी.

      January 11, 2011


  • शृंगारिक तिलक कामोद

    कुठलीही कला, ही किती "अमूर्त" स्वरूपात असते हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्या कलेचे शास्त्र अवगत करून घेणे अत्यावश्यक ठरते. संगीत आणि रागदारी संगीत याबाबतीत हा विचार फारच आवश्यक ठरतो. पूर्वीच्या काही संस्कृत ग्रंथात, स्वरांबद्दलची बरीच वर्णने वाचायला मिळतात आणि त्यानुसार, स्वरांचे रंग, देवता इत्यादी बाबी वाचायला मिळतात परंतु या वर्णनांना तसा "शास्त्राधार" सापडत नाही. बहुतेक वर्णने ही पारंपारिक संकेतावार आधारलेली आढळतात. याचाच वेगळा अर्थ, स्वरांचे सौंदर्य बघताना, स्वरांतून जाणवणारा "आशय" आणि त्याची व्याप्ती, हेच महत्वाचे असते. याच स्वरांतून, पुढे होणाऱ्या रागदारी संगीताबाबत हाच विचार प्रबळ ठरतो.

    इथे बरेचवेळा, मी रागांविषयी लिहिताना, अनेक भावछटांचा उपयोग करतो पण, ते केवळ, त्या रागाबाबत एक विशिष्ट चित्र मनासमोर उभे राहावे, इतपतच. अन्यथा, एकाच रागातून, एकापेक्षा अनेक भावनांचा आढळ अशक्य. यामागे नेमके म्हणायचे झाल्यास, आपल्याला परत त्या रागांच्या सुरांकडेच वळावे लागते. त्यामुळेच, रागदारी संगीतात, कुठलाही सूर हा "उगीच" म्हणून किंवा "चूष" म्हणून येत नाही. प्रत्येक सुरांमागे काहीना काहीतरी कार्यकारणभाव नक्की असतो आणि तो भाव जाणून घेणे, म्हणजे रागसंगीताचा अननुभूत आनंद घेणे!!
    "देस" राग आणि "तिलक कामोद" राग याबाबत हेच अतिशय महत्वाचे आहे. दोन्ही रागांत स्वर तेच आहेत पण, तरीही दोन्ही राग वेगवेगळे आहेत. हे नेमके कसे घडते? यामागे मुख्य कारण हेच आहे, दोन्ही रागांतील स्वरांचे "ठेहराव" वेगळे आहेत आणि स्वरांची खरी गंमत इथे दिसून येते. कुठला स्वर कशाप्रकारे घेतला की, त्या रचनेचे सगळे स्वरूप पालटून जाते, याचा प्रत्यक्षानुभव, हे दोन राग आलटून, पालटून ऐकले तर सहज ध्यानात येऊ शकते. गुरु-शिष्य परंपरा भारतीय संगीतात का आवश्यक आहे, यासाठी या दोन रागांचे उदाहरण चपखल होऊ शकते.
    आपल्या भारतीय संगीतात, "षडज-पंचम" भावाला निरातिशय महत्व आहे आणि या रागाचे वादी/संवादी स्वर तर "षडज/पंचम" हेच आहेत!!
    पंडिता केसरबाई केरकर हे नाव फार आदराने घेतले जाते. मला काही त्यांची मैफिल प्रत्यक्ष ऐकायचे भाग्य लाभले नाही परंतु त्यांच्या गायनाच्या अनेक रेकॉर्ड्स, सीडी ऐकायला मिळाल्या. अर्थात, प्रत्यक्ष मैफिलीतला आनंद जरी रेकॉर्ड ऐकण्यात तितका येत नसला तरी, आवाजाची जात, गोडवा, शैली इत्यादींचा आपल्याला आनंद घेता येऊ शकतो. आवाजाची जात थोडी "मर्दानी" भासते पण तरीही गायनाची पट्टी "काळी चार" च्या आसपास आहे. विस्ताराची लय, सप्तकाचा धुंडाळलेला जाणारा अर्थ तसेच निकोप, स्वच्छ आणि ताकदवान असा स्वर अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यात, आ-कार तर खासच म्हणावा लागेल. जयपूर घराण्याची खास वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात म्हणजे गुंतागुंतीची तानक्रिया हे खास ऐकायला मिळते.
    "सूर संगत आज" या बंदिशीत आपल्याला ही सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. तान दुहेरी विणीची करून, तान बांधणे तसेच तानांचे व्यापक आकृतिबंध जाणीवपूर्वक योजणे, हा विचार अगदी स्पष्ट दिसतो. आणखी एक बारकावा इथे नोंदता येईल. ताना अति दीर्घ नसून, त्याचे छोटे छोटे आकृतिबंध त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे बरेचवेळा ताना द्रुतगती असल्याचा भास होतो. दुसरे युक्ती अशी दिसते, ठेक्याची लय फार विलंबित न ठेवता, त्याच्या दुप्पट गतीने ताना घ्यायच्या. याचा परिणाम असा होतो, श्रोत्यांचे चित्त जरादेखील विचलित होत नाही आणि गाण्याचा संपूर्ण आनंद मिळतो.
    आता आपण, रागाच्या ललित स्वरूपाकडे वळूया. १९७७ साली आलेल्या "भूमिका" या चित्रपट या रागावर आधारित एक सुंदर गाणे आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर, यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला, संगीतकार वनराज भाटीया यांनी नितांत रमणीय गाणी दिली आहेत. प्रस्तुत गाणे, प्रीती सागर या गायिकेने गायले आहे. "My heart is beating" सारख्या पाश्चात्य संगीतावर आधारित गाण्याने प्रकाशात आलेली ही गायिका. हे गाणे गाउन, मात्र तिने रसिकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. "तुम्हारे बिना जी ना लगे" हेच ते गाणे इथे ऐकणार आहोत.
    "तुम्हारे बिना जी ना लगे घर में,
    बलम जी तुम से मिलाके अन्खीया".
    काहीशी लाडिक वळणाची चाल, ठुमरीच्या अंगाने गेलेल्या ताना इत्यादी खास बाबी या गाण्यात उठून दिसतात. पारंपारिक पंजाबी ठेक्यावर हे गाणे उचलून धरले आहे. तशी चाल साधी आहे पण गोड आहे. प्रीती सागरने देखील तितक्याच गोडव्याने गायली आहे.
    "ये नीर कहा से बरसे" हे गाणे देखील याच रागावर आधारित आहे, "प्रेमपर्बत" चित्रपटातील अतिशय सुश्राव्य आणि गायकी ढंगाचे गाणे आहे. जयदेव आणि लताबाई, या जोडगोळीने खूपच अप्रतिम गाणी दिली आहेत आणि बहुतेक गाणी, चालीच्या दृष्टीने अवघड आणि लयीला कठीण अशी(च) आहेत. जेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत, पाश्चात्य चाली, पाश्चात्य वाद्ये हाच संगीताचा "ढाचा" बनत चालला होता, त्यावेळी जयदेवने मात्र, अपवाद वगळता, आपली बहुतेक गाणी, ही भारतीय संगीतावर आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, कुठलेही गाणे केले तरी त्याला कुठेतरी रागदारी संगीताचा "स्पर्श" द्यायचा, याच हेतूने बनवली आणि तिथे मात्र कसलीही तडजोड केली नाही. याचा परिपाक असा झाला, त्यांची गाणी ही नेहमीच गायनाच्या दृष्टीने आव्हानात्मक झाली.
    "ये नीर कहां से बरसे है,
    ये बदरी कहां से आई है".
    या गाण्यातील पहिल्याच वाद्यमेळ्याच्या रचनेतून, आपल्याला तिलक कामोद रागाची झलक ऐकायला मिळते. पहिल्याच ओळीत, "ये बदरी कहा से आयी रे" ऐकताना, आपल्याला ही ओळख अधिक "घट्ट" झालेली आढळेल. या गाण्यात आणखी एक मजा आहे. पहिला अंतरा सुरु होतो तेंव्हाचे शब्द - "गहरे गहरे नाले, गहरा पानी रे" या ओळीत, हा राग बाजूला सारला जातो आणि तिथे "पानी रे" या शब्दावरील हरकत तर, या रागाशी संपूर्ण फारकत घेते. असे होऊन देखील, दुसऱ्या ओळीत चाल, परत "मूळ" रुपाकडे वळवून घेतली आहे. हे जे "वळवून" घेणे आहे, इथे संगीतकाराची दृष्टी समजून घेता येते.
    १९८२ मध्ये मराठीत आलेल्या "उंबरठा" चित्रपटात असेच एक अप्रतिम गाणे आपल्याला ऐकायला मिळते. हृदयनाथ मंगेशकरांच्या रचना देखील अशाच "गायकी" ढंगाच्या असतात, किंबहुना काहीवेळेस तर अति अवघड असतात. कवी वसंत बापटांची सघन शब्दकळा आणि मंगेशकरांची चाल, या गाण्यात अतिशय सुंदरपणे जुळून आली आहे. अर्थात, ही चाल मंगेशकरांनी आपल्याच बाबांच्या "वितरी प्रखर" या गाण्यावरून बेतलेली आहे, हे कबूल केले आहे पण तरीही नाट्यगीताचे स्वरूप लक्षात घेऊन, चित्रपटगीत करताना, आवश्यक ते फेरफार करावेच लागतात आणि त्या दृष्टीने, ही रचना ऐकण्यासारखी आहे.
    " गगन सदन तेजोमय,
    तिमिर हरून करुणाकर,
    दे प्रकाश, देई अभय."
    चालीवर खास मंगेशकरी ठसा तर आहेच पण तरीही बऱ्याच ठिकाणी, शब्दाप्रमाणे चालीला "वळण" दिल्याचे दिसून येईल. वास्तविक तिलक कामोद राग तसा सरळ, गोड, फारशा अति वक्र ताना नाहीत,अशा प्रकारे बरेचवेळा सादर होतो पण तरीही अशा रागात अशा प्रकारचे अति अवघड तर्ज बनविणे, हे केवळ हृदयनाथ मंगेशकर(च) करू जाणे. या गाण्याच्या सुरवातीला, रचना मंद्र सप्तकात सुरु होते पण, एकदम "दे प्रकाश, देई अभय" इथे रचना जे काही अकल्पित वळण घेते, ते केवळ आणि केवळ, लताबाई(च) घेऊ जाणे, इतके अवघड आहे.
    संगीत नाटक "संगीत मानापमान" मध्ये गायलेले "रवि मी चंद्र कसा" हे पद खास तिलक कामोद रागावर आधारलेले आहे. खरे तर मूळ पद, मास्टर दीनानाथांनी गायलेले आहे पण पुढे पंडित वसंतराव देशपांड्यांनी या गाण्याला अपरिमित लोकप्रियता मिळवून दिली. वसंतरावांच्या गायकीवर मास्टर दीनानाथांच्या गायकीचा दाट ठसा दिसून येत असे पण तरीही या गायकाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. चालीचा आराखडा तसाच ठेऊन, त्यात वसंतरावांनी अनेक सौंदर्यस्थळे निर्माण केली आणि रसिकांना स्तिमित करून टाकले.
    "रवी मी चंद्र कसा मग मिरवितसे लावीत पिसे".
    वसंतरावांची गायकी म्हणजे स्वरांवर काबू ठेऊन, लयीच्या अपरिमित बंधांना खेळवीत, गाण्याचा विकास करायचा. तसे करताना, रचनेत अंतर्भूत असलेल्या तानांची इतकी वेगवेगळी रूपे दर्शवायची आणि रचनेचे सौंदर्य अधिक खोल करायचे. बोलताना घेण्यात तर वसंतराव हातखंडा होते. लय एकाच रेषेत चालत असताना, त्याला "वक्र" गती देऊन, रसिकांना आश्चर्यचकित करून टाकणे, त्यांना मनापासून आवडत असे. पंजाबी ढंगाच्या ताना घेऊन, गाण्याला नवीन आयाम द्यायचे, हा त्यांच्या गायनाचा दुसरा विलोभनीय भाग.
    मराठी भावगीतांत, सुधीर फडक्यांचे नाव फार वरच्या श्रेणीत घ्यायला हवे. भावगीत गायनात, शब्दोच्चार कसे करावेत, याबाबत त्यांनी आदिनमुना तयार केला. शब्दोच्चार स्पष्ट असावेत पण त्याच बरोबर शब्दांतील आशय ओळखून, त्याचे प्रकटीकरण करताना, आशयवृद्धी कशी होईल, याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आणि भावगीत गायन समृद्ध केले, प्रसिद्ध कवी, सुधीर मोघ्यांच्या "दिसलीस तू, फुलले ऋतू" या कवितेला संगीतकार राम फाटक यांनी चाल लावली. हे गाणे, आपल्याला तिलक कामोद रागाशी जवळीक दाखवेल.
    "दिसलीस तू, फुलले ऋतू,
    उजळीत आशा, हसलीस तू".
    गाण्याची चाल काहीशी पारंपारिक नाट्यगीतासारखी आहे आणि त्याच अनुरोधाने गाण्यात मोजकाच वाद्यमेळ आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी रंगभूमीवर, नाट्यगीताच्या रचनेचा, चालीचा स्वतंत्र ढाचा तयार केला आणि एक वेगळे मन्वंतर घडवले. त्या पायवाटेवरून या गाण्याची चाल जाते. गाण्यात थोड्याफार हरकती आहेत पण त्याचे प्रमाण अतिशय अल्प असे आहे आणि त्यामुळे रसिकांचे लक्ष सतत कवितेकडे आणि त्याचबरोबर गाण्याच्या चालीकडे राहील, याची खबरदारी, संगीतकार राम फाटक यांनी घेतली आहे आणि तोच विचार सुधीर फडक्यांनी आपल्या गायनातून दर्शवला आहे.
    हिंदी चित्रपट "गोदान" मध्ये मुकेश यांनी गायलेले "हिया जरत रहत दिन रैन" हे गाणे तिलक कामोद रागावर आधारित आहे. या गाण्याची चाल सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांनी तयार केली आहे आणि शब्दरचना शैलेंद्र यांची आहे.
    "हिया जरत रहत दिन रैन,
    अंबुवा की डाली पे कोयल बोले,
    तनिक ना आवत चैन,
    हिया जरत रहत दिन रैन".
    गाण्याच्या शब्दावरून गाण्याची "संस्कृती" आपल्याला सहज जाणून घेता येईल. लोकसंगीतावर आधारित शब्दरचना आहे आणि त्याच आधाराने चाल निर्माण केली आहे. वास्तविक, गायक म्हणून मुकेश यांच्या गळ्याला खूप मर्यादा होत्या आणि हे लक्षात घेऊन, जरी रागाधारित चाल असली तरी त्यातील "गायकीचा" भाग वगळून, संगीतकाराने "तर्ज" बांधली आहे. मुकेश यांचा आवाज मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात(च) गोड लागतो आणि गाण्याची जडणघडण त्यानुसार केली आहे. त्यामुळे हे गाणे ऐकायला खूपच श्रवणीय होते.
    - अनिल गोविलकर

      August 28, 2018


  • बातम्यांचे आकर्षक आणि खेचक मथळे

    आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या मंडळींना “अमृत” वगैरे मासिके आठवत असतीलच. या मासिकांमध्ये “मुद्राराक्षसाचा विनोद” वगैरेसारखी मनोरंजक सदरे असत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या मुद्णावर अचूक बोट ठेवून त्यातल्या चुका दाखवून त्यातून मनोरंजन करणे हाच या सदरांचा उद्देश.

    सध्या “ब्रेकिंग न्यूज” आणि खळबळजनक मथळ्यांचा जमाना आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यामुळे वर्तमानपत्रे जरा मागेच पडलेली आहेत. “ब्रेकिंग न्यूज” आधल्या दिवशी बघितल्यावर पुन्हा बातमी कोण कशाला वाचेल ? मात्र वृत्तपत्रातल्या बातमीचा मथळा दिलखेचक असेल तर ती बातमी किंवा लेख हमखास वाचला जाणार असेच हे गणित.

    काही बातम्यांचे मथळे असेच आकर्षक आणि खेचक असतात. त्यातलेच काही नमूने....


    - खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते,
    'भाळी तिच्या, जन्म आभाळी.'


    - वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्क असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं,
    'मापात पाप' करणार्‍यांना चाप!


    - काही वर्षापूर्वी मुंबई पावसात तुंबली. एका बातमीचं हेडिंग होतं..
    'तुंबई'!


    - आणखी एका बातमीचं हेडिंग ...
    “अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!”


    बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं.
    'जीव वाचवण्यासाठी पळताना खड्ड्यात पडून मृत्यू! '


    सौरभ गांगुली आणि युवराज सिंग यांनी त्रिशतकी भागीदारी पाकिस्तानविरुद्ध केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली.

    लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग.

    डाव्यांचा तडाखा


    मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा.
    त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती, 'नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!'
    ... नंतर रिक्षांच्या मागेही दिसू लागले... 'नाम्या, बगतूस काय, घाल गोळी!'


    राहुल द्रविड च्या निवृत्ती वेळी एका इंग्रजी पेपर चा अप्रतिम मथळा होता.
    'indian team is now bread n butter but without jammy'


    भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा....
    'चारले खडे आता वानखेडे'


    पतंजली कोलगेटचे दात पाडणार! - मटा ऑनलाइन


    हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…

    गोव्यात पाळी नावाचं गाव आहे.विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुस-या दिवशी हेडिंग दिले,
    "डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार"!


    वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे.

    खैरनार देवनारचे पवनार करणार


    या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती - मुंबापुरीवर जलात्कार !!!


    मस्त... दिलखेचक शीर्षकांच्या आठवणींचा पाऊस पडतोय इथे. याच सम्दर्भात २००४ साली अटल सरकारचा पराभव करुन कॉंग्र्स बहुमताने जिंकली त्यावेळचं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं, King Cong... Queen Sonia. अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.


    बुटासिंघ २००५मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनविण्यापासून रोखले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते(बहुधा "सामना"चे) - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला "बुटा"ने हाणले.


    मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत कि कुठल्याशा वर्तमानपत्राने ' तांबेचं पितळ उघडं' अशी बातमी दिली होती.


    'वडील लग्न करत नसल्याने मुलाची आत्महत्या'


    डिसेंबर २०१३ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते,
    'हाताची घडी, कमळावर बोट! '


    नवाकाळचे एक हेडिंग : श्रीकांतने जयसूर्याला गिळले. भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली श्रीलंकेत हनुमान जयंती !


      August 16, 2017


  • झडती.. कडक तपासणी – (बेवड्याची डायरी – भाग ३१ वा)

    सकाळी प्रार्थनेच्या वेळीच माॅनीटरने जाहीर केले की आता प्रार्थना झाल्यावर सर्वांनी आपापल्या लॉकर मधून ताबडतोब चहाचे ग्लास काढून घेवून ..आपल्या लॉकरची किल्ली इथे कार्यकर्त्याकडे जमा करायची आहे ..आज सर्वांच्या लॉकरची तपासणी करणार आहोत आम्ही ..हे ऐकून सगळ्याचा आश्चर्य वाटले ..काहीजण कुरबुर करू लागले ..हे काय नवीन लफडे ? आम्ही काय चोर आहोत का ? वगैरे चर्चा सुरु झाली ..एकंदरीत सर्वाची या प्रकाराबद्दल नाराजी दिसली ..कोणीतरी म्हणाले की वार्डात कोणीतरी ब्राऊन शुगर लपवून आणली आहे अशी ' खबर ' आहे म्हणून ही झडती घेण्याचे काम सुरु आहे ..मात्र सगळ्यांनी चहाचे ग्लास काढून घेवून किल्ली दिली कार्यकर्त्याच्या ताब्यात ..चहा घेवून झाल्यावर मग माॅनीटर आणि त्याचे साथीदार एकेका लॉकर जवळ जावून ..ज्याचा लॉकर आहे त्याला सोबत घेवून त्याच्या समक्ष त्याच्या लॉकरची तपासणी करू लागले ..

    कुतूहलाने आम्ही सगळे गर्दी करून कोणाच्या लॉकरमधून काय निघते हे पाहत होतो ..सुमारे तासभर हा प्रकार चालला ..जेमतेम आठ दहा लॉकर असे निघाले ज्यात कपडे ..तेलाची छोटीशी बाटली ..लोणच्याची बाटली ..इतर सटरफटर वस्तू नीट व्यवस्थित ठेवलेल्या होत्या ..बाकी बहुतेक लॉकर मध्ये या सर्व वस्तू कोंबल्यासारख्या भरलेल्या आढळल्या .शेरकर काकांचा लॉकर उघडताना मजा आली ..ते लॉकरची किल्ली देण्यास कुरकुर करत होते ..त्यांच्या लॉकर मधून इतर सामानासोबातच खोबरेल तेलाच्या रिकाम्या झालेल्या आठदहा प्लास्टिकच्या बाटल्या ..दहा पंधरा चमचे .. आंघोळीचे अर्धवट वापरलेले चारपाच साबण ..दोन तीन हातरुमाल ..भांडी ड्युटीसाठी किचन मध्ये गेले असताना कोणाच्याही नकळत तेथून उचलून आणलेले आठदहा कांदे ..मिरच्या ..असा इतर अनधिकृत ऐवज सापडला ..

    एकाच्या लॉकर मध्ये मासिके आणि वर्तमान पत्रातून फाडून घेतलेले सिने अभिनेत्रींचे अर्धवट कपड्यातील फोटो सापडले ..हे कशाला इथे ? असे विचारल्यावर तो खजील झाला ..दुसऱ्या एकाच्या लॉकरमध्ये त्याच्या सामानाखेरीज ..इतरांच्या चारपाच अंडरवेअर..दोन तीन बनियन ..अर्धवट लिहिलेल्या डायऱ्या.. डझनभर पेन ..असा माल सापडला ..त्या वस्तू बाहेर पडताच आमच्यातील चारपाच जण ..अरे ही तर माझी अंडर्वेअर आहे ..हा बनियन माझा आहे असे ओरडू लागले .. झडती घेणार्यांना नेमका कशाचा शोध आहे ते आम्हाला समजत नव्हते ..एकाच्या लॉकर मध्ये किचन मधील चाकू सापडला ..कार्यकर्ते बारकाईने प्रत्येक लॉकरचा कोपरान कोपरा धुंडाळत होते ... एकाच्या लॉकर मध्ये शंभर रुपयांच्या दोन नोटा अगदी काळजीपूर्वक बारीक घडी करून लॉकर मध्ये घातलेल्या कागदाच्या खाली लपवून ठेवलेल्या आढळल्या ...झडतीचे सगळे काम पार पडल्यावर कार्यकर्त्यांनी अनिधिकृत असलेल्या वस्तू ताब्यात घेवून ..किल्ल्या दिल्या आम्हाला ..व प्रत्येकाला आपला लॉकर व्यवस्थित लावायला लावला..

    कार्यकर्ते बाहेर आफिसात निघून गेल्यावर ..आम्ही सगळे घोळक्याने चर्चा करत होतो ..समूह उपचारांची बेल वाजल्यावर सगळे बसले ..सरांनी समूह उपचारांना आत आल्याबरोबर ..लॉकर्सच्या झडती बद्दल दिलगिरी व्यक्त केली ...म्हणाले ..मित्रांनो ही अशी झडती घेतली म्हणून आपल्यातील अनेकांना राग येणे स्वाभाविक आहे ..मात्र वार्डात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे आवश्यक असते ..तसेच या निमित्ताने आपलं लॉकर नीट व्यवस्थित लावला गेला हा फायदा आहेच ..अशी झडती घेण्यामागे प्रमुख कारण हे होते की ..किचन मधून एक चाकू गायब झालेला आहे हे आमच्या लक्षात आले होते ..तसेच वार्डातील बऱ्याच लोकांच्या अंडरवेअर ..बनियन ..व काही इतर वस्तू गहाळ झाल्याच्या आमच्याकडे तक्रारी होत्या .. भांडी ड्युटीच्या निमित्ताने प्रत्येक जण किचन मध्ये जात असतो ..तेथून कांदे मिरच्या लोक वार्डात उचलून आणत आहेत हे आढळले होते..

    सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता रविवारी पालक भेटायला आल्यावर एकाने पालकांकडून ..येथे मला बिस्किटे .चिवडा वगैरे विकत घ्यायला लागतात असे सांगून दोनशे रुपये मागून घेतल्याचे आम्हाला समजले होते ...येथे राहत असताना तुम्हा सर्वांच्या खिश्यात अजिबात पैसे नसावेत असा आमचा कटाक्ष असतो ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यावर आपल्याला इथे दारू ..अथवा इतर कोणतेही मादक पदार्थ सेवन करायला मिळत नाहीत ..मात्र या व्यसनांची मानसिक ओढ खूप तीव्र असल्याने .. अनेकदा असे मादक पदार्थ बाहेरून कोणाकडून तरी मागवता येतील का असा विचार काहींच्या डोक्यात सुरु असतो ..अनेकांनी बाहेर हॉस्पिटल मध्ये दाखल असताना वार्डबॉयला पैश्याचे आमिष देवून ...अथवा हॉस्पिटल मध्ये भेटायला येणाऱ्या मित्रांकडून व्यसने मिळवलेली आहेत ..काही लोकांच्या मनात येथून पळून जाण्याचे विचार सुरु असतात ..त्यांना येथील शिस्तबद्ध जीवन जगणे आवडत नाही ..इथे बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत असतात ..त्यातून सुटका करून घ्यावी असा बंडखोरीचा विचार करून ते टोळी बनवून ..कार्यकर्त्यांना दमदाटी करून पळून जाण्याच्या विचारात असतात ..

    अर्थात हा मोठा अविचार असतो ..कारण तुम्ही येथून पळून जाण्यात जरी यशस्वी झालात तरी ..तुम्ही शेवटी आपल्या घरीच जाणार ..आम्ही पुन्हा तुम्हाला घरून पकडून आणू शकतो हे विसरता कामा नये ..व्यसनाधीनते मुळे अनेक प्रकारचे मानसिक विकार उदभावू शकतात किवा काहीना व्यसनी होण्याच्या आधीपासून काही मानसिक विकार असू शकतात ..त्यात एक ' क्लँप्टोमॅनिया ' नावाचा आजार आहे ..ज्यात व्यक्ती इतरांचा डोळा चुकवून ...त्यांच्या वस्तू चोरून आपल्याकडे ठेवतात असे लक्षण आढळते ..खरे तर अनेकदा त्या वस्तू चोरणाऱ्या व्यक्तीच्या उपयोगाच्या नसतात ..किवा त्या उपयोगात आणल्यादेखील जात नाहीत ..तरीही विशिष्ट प्रकारच्या अशा वस्तू दिसल्यावर त्या व्यक्तीला आपला ' हाताळपणा ' थांबविता येणे अशक्य होते ..यात वेगवेगळ्या प्रकरचे चमचे ..पेन्स ..हात रुमाल ..छोटे कपडे अश्या प्रकारच्या किरकोळ वस्तू असतात..आपण पहिले की एकाच्या लॉकर मधून आपल्याला एकाच्या लॉकर मध्ये झडती घेताना इतरांच्या अंडरवेअर ..बनियन्स ..डायऱ्या वगैरे आढळल्या ..अश्या वस्तू गहाळ करण्यामागे नक्कीच वाईट हेतू नसला तरी ..हे ' हाताळपण ' योग्य नसते ..त्यावर उपचार घेतले पाहिजेत ..कारण अशा छोट्या छोट्या मानसिक व्याधी देखील आपल्याला पुन्हा व्यसन करण्यास प्रवृत्त करू शकतात ..सर देत असलेली माहिती ऐकून झडती घेतल्याबद्दलचा सर्वांचा राग निवळत होता ..मग ही अशी झडती घेणे आवश्यक आहे हे आम्हाला पटले ..

    सरांनी ज्यांच्या ज्यांच्या लॉकर मध्ये अशा अनधिकृत वस्तू मिळाल्या त्यांना आम्ही काही शिक्षा करणार नाही आहोत ..मात्र त्यांनी या पुढे असे प्रकार करता कामा नयेत अशी ताकीद दिली ..एकाने प्रश्न विचारला ..सर पण एकाच्या लॉकरमध्ये नट्यांचे अर्धवट कपड्यातील फोटो सापडले आहेत ..त्याचे कारण काय ? हा कोणता आजार ? ..सर्व खिदळू लागले या प्रश्नावर ..ज्याच्या लॉकर मध्ये ते फोटो सापडले तो खाली मान घालून बसला होता ..सरांनी सांगितले ..ही जरा नाजूक बाब आहे ..लैंगिक संबंधांची ओढ ही पत्येक व्यक्तीच्या मनात असतेच ..मात्र सर्वाना ती इच्छा पूर्ण करता येणे शक्य नसते ... इथे तर नाहीच नाही ..ज्यांना लैंगिक तृप्तीचे अधिकृत मार्ग नाहीत असे लोक लैंगिक तृप्ती करता हस्तमैथुन करतात हे शास्त्रीय सत्य आहे ..मग लैंगिक उत्तेजनेसाठी हे असे फोटो ..अश्लील साहित्य ..पोर्नोग्राफिक फिल्मस वगैरेंचा उपयोग होतो ..अर्थात इथे इतर काही उपलब्ध होऊ शकत नाही ..म्हणून मासिकातले ..वर्तमान पत्रातले नट्यांचे फोटो कामी येतात ...सगळे पुन्हा हसू लागले .. सर पुढे म्हणाले इथे पुढे आपण लैंगिक समस्यांवर बोलणारच आहोत ..मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच हे लक्षात घेतले पाहिजे ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

      May 20, 2020