(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो….

    राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो….

  • अतीसामान्य पण असामान्य :: सजीवांची त्वचा, कातडी, फळांची सालपटे वगैरे.

    सजीवांची त्वचा, कातडी, चामडी ही निसर्गाची अदभूत, अनन्यसाधारण निर्मिती आहे. त्वचा ही मानवी शरीराचेच नव्हे तर सर्व सजीवांचे बाहेरचे आवरण आहे. प्रत्येक प्राण्याची कातडी आणि तिचे सौंदर्य अप्रतीम, वैशिष्ठ्यपूर्ण असते. तिच्यावरील रंगाविष्कार अवर्णनीय आहेत. पोपटांचे, मोराचे रंग, वाघ, जिराफ, झेब्रांचे पट्टे, चित्त्यांचे ठिपके यांना जबाब नाही. कातडीवर केस असतात.

  • अण्णाभाऊ साठे, समजावून घेताना

    अण्णाभाऊ साठे सध्या आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचे साहित्य आज अमर आहे. साहित्यिक कधी मरत नसतो तो पुस्तक रूपाने अमर असतो. पाच वर्षांनी मंत्री संत्री बदलतील पण साहित्यिकाचे पुस्तक अथवा नाव बदलत नाही. साहित्यिकाचे नाव पिढ्यानपिढ्या जिवंत राहते वाचन संस्कृती जपत असताना. भरपूर साहित्यिकांची पुस्तके वाचाव यास मिळाली त्यापैकी अण्णाभाऊ साठे, बाबा कदम, बाबुराव अर्नाळकर, विश्वास पाटील, रणजीत देसाई, प्राध्यापक

  • रामकृष्ण मिशन सेवा समिती, अलिबाग

    समाजकार्य करताना आपण जे काम करतो आहे, व ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्याविषयी मनात प्रेम, आत्मीयता व स्थिरता हवी. निश्चलपणे व आजुबाजुला असलेल्या अडथळयांची तमा न बाळगता इतरांसाठी झटणारे समाजसेवक त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना अजिबात घाबरत नाहीत. त्यासाठी लागणारे असामान्य धैर्य, स्वतःच्या तत्वांवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, इतरांसाठी काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी लागणारी जिद्द व अखंड सेवाभाग या सर्व गोष्टी अंगी बाणवण्यासाठी मनात शुध्दता व शरीरात बळ हवं असतं. जरी सर्व धार्मिक संघटना समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी झटतीलच असं नाही, परंतु आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनांमुळे व सत्संगामुळे आपल्याला मनाला स्थैर्य मिळत, चंचलता कमी होते, आपल्या पुढचा मार्ग अगदी धुतलेल्या काचेसारखा चकचकीत दिसायला लागतो, जीवनाच्या निराशावादी, काळोख्या कप्प्यांमध्ये सुध्दा आशेचे काजवे चमचमायला लागतात, मनाला नवी उमेद व उभारी येते, इतरांची सेवा करताना कधीतरी डोकावणारे स्वार्थी व आत्मकेंद्रीत विचारसुध्दा बंद होतात, व प्रसिध्दीच्या आर्कषणापासून मनुष्य हळुहळू लांब होत जातो.

  • योग्य विमा योजना ठरवताना…

    विमा हे केवळ करसवलत मिळवण्याचे साधन नसून भविष्यात कर्त्या पुरुषाचे उत्पन्न थांबल्यानंतरही कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये हे विम्याचे मूळ उद्दिष्ट आहे. विम्याची गरज पटूनही नेमकी कोणती योजना निवडावी हे ग्राहकाला समजत नाही. आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यात उत्पन्नाची सांगड घातली की, काही समीकरणे मांडून योग्य योजना ठरवणे सोपे जाते.

  • साठवणुकीकडे कानाडोळाच

    योग्य साठवणुकी अभावी लाखो टन अन्नधान्य वाया जाण्याच्या घटना देशात अनेकदा घडतात. त्यासंदर्भात सरकारवर तसेच कृषी खात्यावर वेळोवेळी ताशेरेही झाडण्यात आले आहेत. तरीही धान्य साठवणुकीचा महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित आहे. खरीप हंगामात झालेले अधिक उत्पादन आणि रब्बीतील उत्पादनवाढीची शक्यता लक्षात घेता अजून तरी शासनाने साठवणुकीबाबत काही ठोस निर्णय घेतल्याचे दिसत नाही.

  • दिवाळीतले कंदिल

    kandil-01

  • मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा

  • भारतमातेच्या वीरांगना – ४१ – प्रभावती देवी

    गांधीजींच्या वचना खातर प्रभावती देवी आणि डॉ जयप्रकाश नारायण ह्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचा परिवार पुढे वाढवायचा नाही असे ठरवले. केवढा मोठा त्याग हा. आपलं आयुष्य पूर्णपणे देशासाठी समर्पित केले. प्रभावतींनी असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, चले जावं चळवळ ह्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अनेकदा जेलयात्रा भोगावी लागली.

  • न्यायव्यवस्था होईल लोकाभिमुख

    न्यायालयात वकिलीस प्रारंभ करण्यापूर्वी वकिलीची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्याचा निर्णय बार कौन्सिलने नुकताच घेतला. देशातील न्याय व्यवस्था अधिक लोकाभिमुख होण्यासाठी या निर्णयाचा चांगला उपयोग होणार आहे. मुख्य म्हणजे या निर्णयाने कायद्याचा अभ्यास नसणार्या, तो करण्याची तयारी नसणार्‍या तसेच कल्पनाविलासात रमणार्या वकीलांवर अंकुश निर्माण होईल.