शिक्षणास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन आणि उत्पन्नात भरीव वाढ करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील रहिवासी दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी घालून दिले आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री. चव्हाण यांनी फळबाग आणि भाजीपाला पदविका मिळविली. पदविका घेत असतानाच ते खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राचे सदस्य झाले आणि कृषिविषयक माहिती घेऊ लागले.
शांतीचा केला खात्मा…….
एका वेबसाईटवरील एका भव्य कथा स्पर्धेचा मी कधी नव्हे तो भाग होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कथा म्हणजे लघू कथा ! ज्या बर्याचदा दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात.
आयुष्य आणि बुध्दिबळाचा खेळ एक आशयार्थाने तुलना ? बुध्दिबळाचा डाव सुरु होतो तेंव्हा दोघां कडेही सामर्थ सारखेच असतें. जसें जसें एकमेकांकडुन चाली रचल्या जातात त्याप्रमाणे एकमेकांच्या शक्तिचा कस लागतो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. यानिमित्ताने संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) मुख्यालयात एक दिमाखदार सोहोळा होणार आहे.
युनोमध्ये डॉ. आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदाचा होणार असून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारला जाणार आहे.
युनोमध्ये कल्पना सरोज फौंडेशन आणि फौंडेशन फॉर ह्युमन होरायझन यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.
या संदर्भात भारतीय प्रशासनाला युनोच्यावतीने देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतातील अब्जावधी लोकांचे आयकॉन असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा जपण्यासाठी समाजात काम करणाऱ्या जगभरातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. अशा १२५ जाणांची जगभरातून निवड केली गेली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ जणांना त्यांच्या नावाचा ‘डॉ. आंबेडकर रत्न पुरस्कार’ दिला जाणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात सध्या नेलसन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग यांचे पुतळे आहेत. या ठिकाणी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. ही बाब तमाम भारतीयांसाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानाची आहे.
यासाठी कल्पना सरोज यांनी पुढाकार घेतला आहे. युनोच्यावतीने त्यासंदर्भात त्यांना मान्यता दिली गेली आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल.
ध्यास बोध ( श्लोक )
*******
मना फेसबुकने असे काय केले
तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले
मना त्वा चि रे मित्र ही वाढविले
तया तोंड देणे आता प्राप्त झाले ।।१।।
मना नेट रात्रीस खेळु नको रे
सुखी घोर निद्रेस टाळु नको रे
नको रे मना रात्रिला जास्त जागु
नको तु असा स्वैर होवोनि वागु ।।२।।
घरातील संवाद ही बंद झाला
अरे रात्रिचा एक वाजोनि गेला
मना आज या आवरी मोह जाला
करी बंद आराम दे तर्जनीला ।।३।।
मना कोणता ग्रूप काढु नको रे
हाताने असे विघ्न ओढु नको रे
तिथे अॅडमिनला बहु त्रास देती
बळे त्रासवोनी तया नागवीती ।।४।।
कुणी फेक अकाउंट ही काढीती रे
झणी एक दुस-यास ते नाडीती रे
अशा मिथ्य फोटोस भाळु नको रे
फुले स्वप्निचि त्यास माळु नको रे ।।५।।
मना यातुनि चांगले तेच घेई
अति मिथ्य ते सर्व सोडोनि देई
मना सत्य मित्रास ध्यानी धरावे
अशा पोस्ट वाचूनि लाईक करावे ।।६।।
जरी नेट ला खर्च काही न केला
अमर्याद डेटा जिओ चा मिळाला
आता कुठवरी संधी मिळणार पाही
फुकटचे महागात पडते कधीही ।।७।।
मना सर्व हा नश्वराचा पसारा
नको गर्व त्याचा नको त्यास थारा
अरे नेट गेल्यावरी मार्ग नाही
उगी पांढरे चक्र फिरते सदा ही ।।८।।
मला नाटकात काम करायची हौस कधीच नव्हती. लहानपणी नाटकात किंवा सिनेमात सगळं खोटं असतं हे सत्य भिनलं होतं. लहान मुलांच्या विविध वेष स्पर्धेत (Fancy Dress Competition) मध्ये मला एक गुराखी बनवला होता. “अहो मी गुराखी आलो, गुरे घेऊन चाराया ” हे गाणं म्हणत स्टेजवर नाचलो. मला बक्षीस मिळालं होतं.
केसांच्या काळ्या भोर लटांमध्ये अचानक चांदीच्या तारा दिसायला लागतात आणि हळूच लक्षात येते.....
"देवाने काय मस्त सोय केली आहे नैसर्गिक हायलाईट्सची ....."
कालपरवा पर्यंत "ताई" म्हणणारे अचानक काकू, मावशी, किंवा आजी वगैरे म्हणायला लागतात आणि हळूच लक्षात येते.....
"किती छान आता आपण अल्लड न रहाता प्रगल्भ झालोय ..."
टी व्ही वर छान कार्यक्रम बघत निवांत भाजी निवडणे चालू असते. अचानक कशासाठी तरी उठावे लागते आणि बारीकशी कळ गुडघ्यात येते आणि हळूच लक्षात येते....
"हाय हील्स ऐवजी आज वाॅकिंग शूज घालावेत....."
टीव्ही वर मॅच मध्ये भारत जिंकतो आणि मुलांबरोबर जल्लोष करताना बारीकसा दम लागतो आणि हळूच लक्षात येते.....
"आज जिमला जायला विसरले"
बसमध्ये प्रवास करताना कुणी तरी पटकन उठून जागा देते आणि बसा मावशी म्हणते आणि हळूच लक्षात येते....
"संस्कार शिकवणाऱ्या माझ्यासारख्या आयाही आहेत तर......"
शाळेत घ्यायला गेले की अनेक छोटी कोकरे पाहून मन मस्त प्रफुल्लीत झालेले असते. आपली उंची क्राॅस करून गेलेले आपले कोकरू पुढ्यात उभे राहून म्हणते "आई, लक्ष कुठे आहे तुझे" आणि हळूच लक्षात येते....
"कोकराला "हाय फाइव" द्यायची वेळ झाली आहे......"
एखाद्या काॅलेज जवळ आपले पाय आपोआप रेंगाळतात.
त्या तरूणाईचा उत्साह मस्ती बघून मन पण उल्हसित होते पण हळूच लक्षात येते....
"आपण केलेली धमाल आपली मुलंही करू शकतात ......."
देवाजवळ सांजवात लावताना स्तोत्र म्हणताना आपोआप डोळे पाणावतात आणि हळूच लक्षात येते....
"देव किती चांगला आहे व किती सुंदर त्याचे चमत्कार...."
कैरीचे लोणचे घालताना सगळे बाजूला ठेवून कैरीच्या करकरीत फोडी मीठाबरोबर पटकन तोंडात जातात. एखाद्या दातातुन निघालेली कळ ...."आई गं".... आणि हळूच लक्षात येते....
"लोणच्यात मीठ जरा जास्त झालंय या खेपेस ....."
बाहेर पाऊस चालू असतो, असे वाटते की कुरकुरीत कांदा भजी गरम गरम सगळ्यांना खाऊ घालावी. स्वतः घेताना मात्र वाढलेले वजन हळूच लक्षात आणून देते नको इतके, कारण....
पुढच्याच महिन्यात असलेल्या वर्गाच्या ३० वर्षाच्या reunion साठी घेतलेल्या Evening Gown मध्ये फिट व्हायचंय ना.....
काॅफीचा वाफाळणारा मग मात्र सांगत असतो कितीही वय झाले तरी तुझी माझी सोबत मात्र कायमसाठी आहे....
"घे बिनधास्त...."
आणि मी स्वतःशीच गाणे गुणगुणायला लागते ....
"दिल तो बच्चा है जी ....."
शाळा सुरू असताना अनेक सहशालेय उपक्रम घेतले जातात. स्नेहसंमेलन, परिसर भेट, चावडी वाचन अशा काही उपक्रमाचा प्रामुख्याने त्यामध्ये समावेश असतो.स्पर्धा परीक्षा, रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , संगीत खुर्ची,जिलेबी रेस, विविध खेळ या उपक्रमामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते . सहल हा भौगोलिक आणि ऐतिहासिक माहीतीसाठी उत्तम प्रकार आहे. गड-किल्ले पाहणे, धरण, पर्यटनस्थळ पाहणे किंवा मग ऐतिहासिक किंवा भौगोलिक स्थळ पाहणे हे औत्सुक्याचा विषय ठरतो. मुलांना पर्यटन आवडते. त्यातून जी ज्ञानप्राप्ती होते ती चिरःकाल टिकाऊ स्वरूपाची असते.कायम स्मरणात राहते. मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन आणि दृढीकरण होते किंबहुना ते शिक्षणाचेच कार्य आहे.
शाळास्तरावर सहलीचे आयोजन करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.मुलं उत्साही असतील तरीही ग्रामीण भागातील मुलांचे पालक बसभाडे देण्यास तयार नसतात . दुसरे म्हणजे दिले तर उशीरा . त्यातही शाळेतील मुलांची संख्या कमी असते अशी मुले सहलीचे आयोजन करू शकत नाहीत. ज्या शाळेत जास्तीची मुलं आहेत तेच सहलीचे आयोजन करतात. तिथेही शिक्षक, पालक यांच्या भूमिकेवर ते अवलंबून आहे. सहलीचे ठिकाण, मुक्कामाचे स्थळ, तेथील भोजन व्यवस्था यांचा सारासार विचार करावा लागतो.सुरक्षितता हा एक प्रश्नच आहे. अनुचित काही घडू नये याचीही दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षक पालक मानसिकतेवर ते अवलंबून असते.
प्रवासाच्या बाबतीत खाजगी वाहनाच्या ऐवजी एस.टी.बसला पसंती दिल्यास तो उत्तम पर्याय ठरतो. सहलीसाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. ती तालुकास्तरावर मिळत नाही. जिल्ह्यावरून परवानगी आणणे खर्चिक काम ठरते. सहलीच्या परवानगीसाठी चिरीमिरी दिल्याचे एका मित्राने खाजगीत सांगितले. मुख्याध्यापक , शिक्षक यांच्या सकारात्मक दृष्टिकोनावर बरेच अवलंबून असते. स्थळांची निवड करताना मुलांना जास्त कष्टप्रद होणार नाहीत असे किल्ले निवडावे लागतात.सहलीसाठी वापरण्यात येणारी बस दुरूस्त असणे आणि चालकास रस्त्याची माहीती असणे गरजेचे असते. डोंगर , दरी , एकेरी वाहतुक, गर्दीची ठिकाणे या बाबी प्राधान्यक्रमाने पहाव्या लागतात. सोबत पाण्याची सोय असावी लागते त्याचबरोबर मुक्कामाची ठिकाणे अगोदरच निश्चित झालेली असावीत. समुद्राच्या किनारी जाणार असाल तर पाण्याची खोली किती आहे ? मुलं काय करताहेत ? हेही लक्षात घ्यायला हवे. मध्यंतरी सहलीसाठी गेलेली काही मुलं बुडून मृत्यूमुखी पडल्याचे आपण ऐकले असेल. अशा दुर्घटना टाळणे आपल्या हाती आहे. इतर वेळी बंदिस्त असणारी मुले आनंदाच्या भरात सैरावैरा धावण्याची शक्यता असते. याबाबत दक्षता घेणे गरजेचे असते. मुलांना शिस्त असणे यावेळी कामी येते . यामुळे स्थळ पाहण्याचा आनंदही घेता येतो. हलका-फुलका म्हणजे पचनास सोपा असा आहार प्रवासात सोबत असावा.तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत. त्याचबरोबर प्रथमोपचार पेटीही जवळ असणे आवश्यक आहे. त्यात आवश्यक ते साहित्य असावे. स्थळ पाहणी करताना टिपणे काढण्याची सवय मुलांना लावावी. गाईड, मार्गदर्शकाचे मानधन पुरातत्व विभागाशी संपर्क करूनच ठरवावे. गाईडमुळे योग्य मार्गदर्शन मिळते. सहलीदरम्यान छायाचित्र काढण्याचा मोह होणे साहजिकच आहे तद्वतच काळजी घेणे महत्वाचे असते . किल्ल्यांची तटबंदी किंवा निमुळता कडा फोटोसाठी निवडू नये. अपघात होण्याची शक्यता अधिक असते.त्या स्थळाचे पावित्र्य टिकविणे आपल्या हाती असते. सोबतचा कचरा कचराकुंडीतच टाकावा . इतरत्र तो फेकून देऊ नये. मुलांच्या सोबत आपल्या शाळेचे ओळखपत्र असणे गरजेचे असते. कारण अनेक शाळांचे अनेक विद्यार्थी सहलीसाठी आलेले असतात. मुलांचे गट पाडून यादी आपल्याजवळ ठेवावी. पालकांचे दुरध्वनी क्रमांक असल्यास उत्तमच. प्रसंगी गटनायक पद्धती अवलंबवावी. निरीक्षण नोंदी ठेवल्या पाहिजेत . शिक्षकांनी तेथील स्थळांबाबत अधिकची माहीती अगोदरच दिली पाहिजे. कित्येकवेळा मुलं काय पाहतात हेच त्यांना कळत नाही. पाहणी निरीक्षणानंतर कुणी चुकलेच तर कुठे यायचे याची निश्चिती अगोदरच करावी. कारण सहलीनंतर कोण कुठे कसे चुकले? मग कशी घबराट झाली? याचे मजेदार किस्से ऐकायला मिळतात. सहल हा आनंदाचा क्षण असतो.या आनंदात विरजण पडू नये.या काळात प्रत्येक घटकांचे वर्तन सहकार्याचे एकोप्याचे असावे लागते. बसगाडी पंक्चर , डिझेल व इतर उणिवा दूर करून सज्ज असली पाहिजे. इतकी काळजी घेतली सावधानता बाळगली तर सहशालेय उपक्रमात सहल या उपक्रमास मात्र तोड नाही तो एक अविष्मरणिय क्षण असतो एवढे मात्र नक्की . कारण मोठ्यांना आपण बालपणी ज्या सहलीसाठी गेलो होतो ती सहल आठवतेच ना ?
सहली या शासकीय यंत्रणेने आयोजित केल्यास अधिकाधिक मुलांना त्याचा फायदा होईल. प्रत्येक मुलाचा विमा असावा. स्थळे ठरवून द्यावीत. शिक्षकांना अधिक संरक्षण द्यावे. बसचे वाहक, बसगाडी ठरवून द्यावी.भोजनासाठी परवाने द्यावेत. परवानाधारक हाॅटेलमध्ये निवास आणि भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. सर्वच सहलींसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी. खर्चाची प्रतिपुर्ती वाहतुक खर्चासह शासनस्तरावर झाल्यास या उपक्रमास पाठबळ मिळेल..
विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995
दीपक दलाल हे नाव इंग्रजी भाषेतील साहसकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी लक्षद्वीप, अंदमान, लडाख यासंबंधी साहसकथा लिहिल्या आहेत. राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यासंबंधीच्या त्यांच्या साहसकथेचा अनुवाद श्री. पु. गोखले यांनी केला आहे. नावावरून हे प्रवासवर्णन वाटत असले, तरी प्रत्यक्षात ती साहसकथा आहे. गोखले यांनी इतक्या सहजतेने अनुवाद केला आहे, की हा अनुवाद आहे, हे सांगावे लागते.
Copyright © 2025 | Marathisrushti