(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • इंधन दर वाढ आणि इंधन शिल्लक नाही

    मग काय मोजायचे ना आता वाढीव पैसे इंधनासाठी

      October 16, 2010


  • कोजागरी – कोण जागे आहे?

    पोर्णिमा’ ही समस्त जगातील प्रतिभावंतांची आदिम प्रेरणा झाली आहे. त्या एकमेवाद्वीतीय चंद्राच्या शीतल प्रकाशबिंदूंनी जणू प्रतिभेच्या कमळाला फुलण्याची अंतःप्रेरणा मिळते. ते शतदलकमल मग फुलून येतं मनस्वीपणे, चंद्रासारखंच!

      November 16, 2023


  • मनाचे रंग . ..प्रेमभंग ! (नशायात्रा – भाग ४४)

    मी अगदी टिपेच्या स्वरात ' मेरे नैना सावन भादों ' हे गाणे म्हणत होतो , आवाजही मस्त लागला होता माझा , गाण्याच्या बाबतीत माझा ऐक नेहमीचा अनुभव सांगतो , कदाचित प्रत्येक गायकाला हा अनुभव येत असावा , जेव्हा अगदी तल्लीन होऊन गाणे म्हंटले जाते , गाण्यातील शब्द , सूर व गळा हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा गाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर हलकेच रोमांच उभे राहते व ही खुण असते गाणे सुंदर होतेय याची , गायकाला स्वतःलाच जाणवते की गाणे मस्त म्हणतोय आपण ते, कदाचित श्रोत्यांना देखील अश्या वेळी एकाग्रतेने गाणे ऐकताना त्या गाण्यातील शब्दांशी एकरूपता साधली गेली की असेच होत असावे . . अगदी तसेच झाले होते माझे त्यावेळी . गाणे संपले सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला . अजून एकदोन गाणी म्हणण्याचा आग्रह झाला मला , नंतर मग तेथे जमलेल्या पैकी एका स्त्रीने मला माझे नाव वगैरे विचारले व सांगितले की मी तुझ्या आई वडिलांना ओळखते त्या स्त्री चे पती देखील रेल्वेत होते त्यांनी मला घरात बोलावले .

    ती रोखून पाहणारी मुलगी याच घरातली होती , त्यांना एकूण तीन मुली त्यापैकी ही मधली इयत्ता सहावीत होती , मोठी माझ्याच वयाची आठवीत होती तर धाकटी पाचवीत . तिन्ही मुली दिसायला एकदम छान होत्या , माझ्या रोखून पाहणाऱ्या मुलीचे नाव सुमा होते . माझी त्या कुटुंबाशी ओळख झाली आणि त्यांनी मला परत दुसऱ्या दिवशी ये इकडे असे म्हंटले , मला ते आवडले, सुमा नाकेली ,उंच , गोरी , एका वेणीचा शेपटा घातलेली होती ती काही बालली नाही मात्र तिचे डोळे खूप काही सांगत होते . उन्हाळ्याच्या सुट्या सुरु असल्याने मग सतत त्यांच्याकडे जाऊ लागलो त्या तिन्ही मुलींशी चांगली मैत्री झाली माझी त्या भागातील माझा मित्र दिलीप होता त्याच्या तेथील मित्रांशी देखील ओळख झाली माझी , मग मी सर्व सुट्टीत खेळण्यासाठी त्या इमारतीत जाऊ लागलो , लपाछपी, जोडीची शिवाशिवी ,कँरम , पत्ते असे खेळ आम्ही खेळत असू आणि ऐक खेळ नेहमीचा झाला होता तो फक्त सुमाला न मलाच माहित होता नजरेचा खेळ , तसे आम्ही लहानच होतो पण सिनेमा वगैरे पाहून थोडाफार शहाणपणा आला होता या बाबतीत व जाणवत होते की सुमाला मी आवडतो व मलाही ती आवडत होती , ज्या ज्या खेळत दोन गट पाडावे लागत असत त्या खेळात ती नेहमी माझ्या बाजूने येत असे , मलाही सारखे तिच्याशी बोलावे , तिला हसवावे , असे वाटत होते . ऐरवी मी अंगावरच्या कपड्यानबाबत फारसा जागृत नसे पण आता मला नीटनेटके रहावेसे वाटू लागले .

    माझ्या आईकडे जेव्हा मी सुमाच्या कुटुंबां बद्दल उल्लेख केला तेव्हा आई म्हणाली की ' मी ओळखते त्या काकुना , क्वचित हळदीकुंकू वगैरे निमित्ताने आईची व त्यांची भेट होई , ती उन्हाळ्याची सुट्टी जरा लवकरच संपली माझी आणि शाळा सुरु झाली तेव्हा माझे सुमाच्या घरी जाणे जरा कमी झाले , मात्र शाळेत जाता येताना सुमा दिसत असे , तिची शाळा र . ज बिटको गर्ल्स हायस्कूल आमच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल च्या समोरच होती . जेव्हा जेव्हा आमची नजरानजर होई तेव्हा आम्हाला एकमेकांकडे पाहतच रहावेसे वाटे वळणावर आल्यावर ती मागे वळून पाहतेय का हे बघण्याचा छंद लागला मला आणि तिलाही . मनात सारखी तिला बघण्याची ओढ वाटू लागली .. कदाचित हेच प्रेम असावे असे मी समजलो .. ती रस्त्यात कधी माझ्याशी बोलत नसे फक्त समोर आलो की ऐक जीवघेणे स्मित करीत असे , मात्र तिच्या घरी मी गेल्यावर खूप बोलत असे माझ्याशी .. पाहता पाहता दिवस संपत होते . रेल्वे क्वार्टर्स मधील माझ्या इतर अवांतर गोष्टी सुरूच..ज्यात माझा आडदांड पणा , मस्ती , खोड्या , मारामाऱ्या वगैरे सुरूच होत्या , अव्यक्त अशी सुमाबद्दल असलेली ओढ काही केल्या मला प्रत्यक्ष तिच्याकडे व्यक्त करण्याची हिम्मत होत नव्हती व ती देखील फक्त नजरेनेच मला प्रतिसाद देत होती , बाहेर मित्रांमध्ये कोणालाही न घाबरणारा , आक्रमक , अश्या प्रवृत्तीचा मी असलो तरी सुमा समोर आली की मी एकदम मऊ होत असे , पाहता पाहता मी दहावी पास होऊन अकरावीला गेलो , व माझे सिनेमा बघण्याचे वेड वाढले त्या बद्दल मी मागील एका भागात लिहिलेच आहे . अकरावीला मी सिगरेट देखील ओढू लागलो होतो . चक्क नापास झालो . ..

    एकदा तर गम्मतच झाली , मी अनुराधा थेटरला मित्राबरोबर सिनेमा पाहायला गेलो होतो व मध्यंतरात बाहेर थेटरच्या कंपाऊंड पाशी उभा राहून सिगरेट ओढत होतो , सुमाचा क्लास हून घरी जाण्याचा रस्ता थेटर समोरूनच जात होता .मी दूर रस्त्यावर ती घरी येताना दिसते का ते पाहत होतो , मी सिगरेट तोंडात घेऊन झुरका मारणे आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या सुमाला मी दिसणे ही एकच वेळ आली तोंडातील सिगरेट घाई घाई ने बाजूला करेपर्यंत व्हायचे ते झालेच होते .तेव्हापासून बिनसायला सुरवात झाली ... सुमाला मी नेमकी काय चीज आहे ते समजले होते आणि त्याकाळी असे सिगरेट ओढणे वगैरे आजच्या सारखे लोकमान्य झालेले नव्हते . सुमाचे वडील चेनस्मोकर होते व कदाचित तिला सिगरेट श्रचा तिटकारा असावा..त्या दिवसापासून तिचे वागणे जरा बदलले तिच्या घरी गेल्यावर ती माझ्याशी फारशी बोलेनाशी झाली ..

    मी देखील मुर्खासारखा सिगरेट पिणे सोडून देण्याएवजी इतरही व्यसनात अडकत गेलो आणि वर सुमाचे असे तुटक वागणे ऐक व्यथा बनवून त्यात बुडत गेलो . पुढे सुमा बिटको कॉलेज ला आली तेव्हा देखील ती अनेक सूचक शब्दांनी मला सगळे धंदे सोडून शहाण्या मुलासारखे वागावे हे सांगत गेली पण तो पर्यंत माझी केस हाताबाहेर गेली होती . तिच्या वर्गातील ऐक मित्र आम्ही गांजा , ब्राऊन शुगर वगैरे ओढतो या बातम्या तिच्या पर्यंत पोचवत असावा बहुतेक त्यामूळे सगळेच फिस्कटत गेले . एकदाच ती मी जेव्हा ब्राऊन शुगर मध्ये अडकलो तेव्हा मला म्हणाली कशाला हे सगळे करतोस ? चांगले नाही . त्यावर मी उद्यापासून बंद करतो असे म्हणालो ..मात्र स्वतःशी प्रामाणिक नसल्याने मला ते पाळता आले नाही . सुमा माझ्या साठी ऐक वेदना बनून राहिली दोष माझाच होता तरीही मी काही व्यसनातून योग्य वेळी बाहेर पडू शकलो नाही आणि वर प्रेमभंग झाला म्हणून अधिकच हळवा होत गेलो .

    'मेहबुबा ' सिनेमातील ' मेरे नैना ' या बाजूच्या थेटर मधून ऐकू येणाऱ्या गाण्याने माझ्या सुमा बद्दलच्या सर्व स्मृती उफाळून आल्या खूप अवस्थ झालो , कसेही करून एकदा तरी सुमाला डोळे भरून पहावेसे वाटू लागले ताबडतोब मागचा पुढचा विचार न करता माझी तब्येत खूप बिघडल्याचे सांगितले आमच्या टीम च्या मँनेजरला आणि मी घरी परत जातो असे सांगून रात्री ११ वा ,खामगाव स्टेशनवर आलो तेथून नासिक कडे जाणारी रेल्वे सुमारे ३ तास लेट होती म्हणून मग मनमाड पर्यंत जाणाऱ्या गाडीने मनमाड ला पोचलो , तेथून बसने नाशिक गाठले , आधी अड्ड्यावर जाऊन ब्राऊन शुगर घेतली , आणि संडासात असून ब्राऊन शुगर पीत चेसिंग करत माझे दुखः कुरवाळत बसलो नंतर कॉलेजला गेलो सुमाला एकदा डोळेभरून पाहायला .

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

      July 2, 2020


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ७

    नो शक्यं स्मार्तकर्म प्रतिपदगहनप्रत्यवायाकुलाख्यं
    श्रौते वार्ता कथं मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गानुसारे ।
    तत्वऽज्ञाते विचारैः श्रवणमननयोः किं निदिध्यासितव्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥७॥

    आपल्या ठिकाणी उपासनेशी संबंधित कोणतीही पात्रता नाही अशा स्वरूपात पूज्यपाद आचार्यश्री आपल्या अज्ञानाचे भगवंताच्या चरणाशी प्रदर्शन करीत आहेत.
    वेगवेगळ्या शास्त्र ग्रंथात उपासनेचे नियम सांगितलेले असतात त्यांना श्रुती प्रतिपादित म्हणजे श्रौत तर स्मृती प्रतिपादित म्हणजे स्मार्त कर्म असे म्हणतात.
    आचार्य श्री प्रथम चरणात म्हणतात,
    नो शक्यं स्मार्तकर्म प्रतिपदगहनप्रत्यवायाकुलाख्यं - एखाद्या घरंदाज अर्थात परंपरेने युक्त असणाऱ्या पंडितालाच कळावे अशा प्रत्येक पदाच्या कठीण अर्थांनी भरलेल्या स्मार्त कर्माची मला शक्यता नाही. मला त्यांचा अर्थ कळत नाही.
    श्रौते वार्ता कथं मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गानुसारे - मग पंडितांच्या वंशपरंपरेत ब्रह्म मार्गानुसार केल्या जाणाऱ्या श्रौत कर्माची तर गोष्टच कुठे? तो तर आणखीन पलीकडचा मार्ग. आणखीनच कठीण.
    तत्वऽज्ञाते विचारैः श्रवणमननयोः किं निदिध्यासितव्यं - खूप विचारपूर्वक अर्थात प्रयत्नपूर्वक जरी मी श्रवण मनन केले तरी मला त्या ग्रंथातील तत्त्व अज्ञातच राहते. मग श्रवण मननच शक्य नाही तर पुढील निदिध्यासन कसे जमणार? ते तर असंभव आहे.
    श्रवण,मनन आणि निधिध्यासन अशी तीन स्तरीय रचना असते. श्रवण या शब्दाचा अर्थ श्रीगुरुंनी, ग्रंथांनी सांगितलेले यथायोग्य स्वरूपात ऐकणे. मनन शब्दाचा अर्थ आहे त्यावर शांतपणे विचार करून तो विचार सर्वार्थाने अंगीकारणे. तरी निधिध्यासन शब्दाचा अर्थ त्या विचारानुसार आचरण करणे. जर श्रवण मननच नीट झाले नाही तर आचरण होणारच कसे? अशी स्वतःची अगतिकता आचार्य येथे सादर करीत आहेत. वास्तविक ती आपली अवस्था आहे. आपल्याला ती सांगता सुद्धा येत नाही त्यामुळे आपल्या वतीने आचार्य सांगत आहेत.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या शास्त्र अज्ञानरूपी अपराधांना क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 26, 2020


  • सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग – १

    आजकाल प्रत्येक कॉम्पुटर वापरणार्‍या व्यक्तीला सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? असा जटील प्रश्न नेहमी पडत असतो. तसं ते काही कठीण काम नाही, पण असा पासवर्ड बनविण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी मात्र अवश्य घेतली पाहिजे.

      December 21, 2010


  • बहारदार बहार

    "सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती;
    मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती."
    कविश्रेष्ठ मर्ढेकरांच्या या ओळींतून निसर्गवर्णन नेमक्या रीतीने आपल्याला वाचायला मिळते. विशेषत: "मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती" ही ओळ तर खास "बहार" रागाचीच आठवण करून देते.
    बहार रागाची जाती "औडव/षाडव" आहे, म्हणजे आरोहात ५ स्वर तर अवरोहात ६ स्वर येतात. आरोही सप्तकात "रिषभ, पंचम" स्वर वर्ज्य असतात तर अवरोही सप्तकात "धैवत" स्वराला अजिबात जागा नसते. रागाचे वादी-संवादी स्वर आहेत, मध्यम, षडज. प्राचीन ग्रंथानुसार, रात्रीच दुसरा प्रहर किंवा वसंत ऋतूमध्ये कधीही सादर केला तरी चालतो. त्या दृष्टीने, ऋतूप्रधान राग आहे. रागात, कोमल गंधार आणि दोन्ही निषाद स्वरांचे स्थान खास मानले गेले आहे. किंबहुना रागातील कोमल गंधार स्वराचे स्थान अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. मुख्य स्वरसंहती बघायला गेल्यास, "ग म ध नि सा","रे ग रे ग सा रे नि सा","नि सा रे रे स नि सा" या स्वरिक वाक्यांशांना अधिक महत्व असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.
    प्रत्येक वाद्याबरोबर एकेक कलाकाराचे नाव कायमचे जोडले गेल्याचे आपल्याला आढळून येते. शहनाई वाद्याबाबत, "एकमेवाद्वितीयम" म्हणावे असे "उस्ताद बिस्मिल्ला खान" यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे. इतिहासात जरा डोकावले तर असे आढळते, शहनाई वाद्य हे प्रामुख्याने, मंगल प्रसंगी किंवा काही समारंभ, इतपतच मर्यादित असायचं परंतु उस्तादांनी, आपल्या प्रतिभेने, शहनाई वादनात कमालीची सुधारणा घडवून आणली आणि सादरीकरणाचा असामान्य आदिनमुना सादर केला. केवळ, रागदारी संगीत(च) नव्हे तर लोकसंगीताला देखील, त्यांनी प्रमाणभूत दर्जा मिळवून दिला. विशेषत: उत्तर भारतीय लोकसंगीतातील, "होरी","चैती","कजरी" इत्यादी प्रकारांना, त्यांनी मैफिलीत स्थान मिळवून दिले.
    प्रस्तुत रचना, आलापीपासून सुरु होते, अगदी ठाय लयीत, संथपणे,प्रत्येक सूर "न्याहाळता" यावा, इतक्या लडिवाळपणे वादन केले आहे, याचा परिणाम, आपल्या मनावर रागाची आकृती स्पष्टपणे ठसते. तसे काटेकोरपणे ऐकले तर, शहनाई वाद्याच्या काही अंगभूत मर्यादा आहेत, विशेषत: श्रुती मांडणी आणि स्थिरावणे, इथे काही वेळा हे वाद्य कमतरता दर्शविते. इथे एक बाब स्पष्टपणे मांडतो, भारतीय संगीत शास्त्रानुसार, श्रुती व्यवस्था बघितली तर कुठलेच वाद्य परिपूर्ण नाही. तेंव्हा शहनाई वाद्याबद्दलचे जे मत वर उद्धृत केले आहे, ते इतर वाद्यांबाबत देखील लागू होते.
    वादनात, रागदारी संगीतातील जे खास सांगीतिक अलंकार असतात, त्याचे व्यवस्थित दर्शन होते, जसे, हरकती, दीर्घ ताना, गुंतागुंतीच्या ताना, मिंड, गमक हे सगळे इथे ऐकायला मिळते आणि त्यामुळे वादन समृद्ध होते. एका समृद्ध वादनाचा आनंद आपल्याला इथे नक्की घेता येतो.
    आता आपण, हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे ऐकायला घेऊ. "छाया" चित्रपटातील, "छम छम नाचत आई बहार" हे गाणे प्रथितयश आणि प्रयोगशील संगीतकार, सलिल चौधरी यांनी बांधलेले आहे. गाण्यात स्पष्टपणे "त्रिताल" आणि "केरवा" हे ताल वापरले आहेत. या रागाचे लक्षणगीत म्हणून, या गाण्याची ओळख करून देता येईल. गाण्याच्या सुरवातीला, "जलतरंग","सरोद" आणि "सतार" या वाद्यांचे सूर एकत्रित केले आहेत, ते जर का बारकाईने ऐकले तर, वर निर्देशित केलेल्या स्वरसंहतीचा पडताळा घेता येतो. विशेषत:, जलतरंग वाद्याचा खास उल्लेख करावाच लागेल इतके उठावदारपणे हे वाद्य या गाण्यात वापरले आहे. जलद लयीत जेंव्हा वाद्यांची गत जाते, तिथे दोन्ही निषाद, मध्यम आणि षडज, या सुरांचा खास आढळ दिसतो. त्याच लयीत पुढे तबल्याचा अप्रतिम चक्रधार सादर होतो आणि गाण्याला एक "वजन" प्राप्त होते. त्रितालातील ते सादरीकरण आहे आणि, जिथे त्रितालातील "धा" अक्षर येते, तिथे लताबाईंचा अप्रतिम स्वर ऐकायला मिळतो आणि तिथे राग सिद्ध होतो. संगीतकार म्हणून, सलिल चौधरींनी, ज्या प्रकारे भारतीय वाद्यांचा समर्पक उपयोग करून घेतला आहे आणि त्यामुळे गाण्याची बांधणी आणि वीण घट्ट होते, तिथे आपल्याला दाद द्यावीच लागते. गाण्यात, पहिला अंतरा जिथे सुरु होतो, तिथे "फुल फुल जोबन आया" या ओळीवर, लताबाई ज्याप्रकारे, हलका स्वर घेऊन, उतरल्या आहेत, तो स्वरिक वाक्यांश तर केवळ अतुलनीय म्हणावा लागेल, कारण तोपर्यंत, गाण्याची लय जलद झालेली आहे पण, तिथेच लयीने वेगळे "वळण" घेतले आहे. लताबाईंच्या गळ्यावरील स्वामित्वाचे सुंदर उदाहरण.
    "छम छम नाचत आई बहार,
    पट पट ने ली अंगडाई,
    झूम राही है डार डार."
    सलिल चौधरींच्या संगीताचे मुल्यमापन करायचे झाल्यास, आपल्याला ४ टप्पे ध्यानात घ्यावेच लागतील. १] युथ क्वायर (युवासमूह गायन),२] त्यांनी दिलेले हिंदी चित्रपट संगीत, जे संपूर्णपणे मुंबईत फळाला आले, ३] "बंगाली गीते" आणि इथे त्यांची कामगिरी फारच वेधक आहे, ४] बालगीते. हे चार टप्पे अशासाठी विचारात घ्यायचे, कारण त्यांच्या एकूण सांगीतिक कारकीर्दीचा विचार करायचा झाल्यास, त्यात कुठे ना कुठे तरी याच टप्प्यांचा समावेश झालेला आढळतो. आणखी एक अनन्यसाधारण विशेष मांडायचा झाल्यास, त्यांनी समूह्गायनाचा, पार्श्वसंगीतासाठी वाद्यांसारखा केलेला वापर. इथे त्यांच्या पिंडावर, पाश्चात्य सिंफनी संगीताचा प्रभाव जबरदस्त आढळतो.
    सलिल चौधरींची गीतसर्जनशक्ती वारंवार आपले सौंदर्यपूर्ण सांगीत वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक त्या चैतन्याने भारलेली होती. काम जर अधिक केंद्रीभूत झाले असते तर सुगमसंगीताच्या गतिमान कोटींत चपखल बसणारे संगीत, ते आपल्याला देऊ शकले असते. त्यांची गाणी ऐकताना, अनेकवेळा हिंदी चित्रपट संगीतात जे संगीत होते, त्यापेक्षा अधिक टिकाऊ आणि सार्थ संगीतसंगम साधण्याची त्यांना इच्छा होती, असे फार जाणवते आणि तशी त्यांची क्षमता देखील होती. हे काम कुणालाही सहज पेलणारे नव्हते!!
    आपल्याकडे अभंग, भजन यांचा ठराविक साचा आहे. सर्वसाधारण रचना या बहुतांशी पारंपारिक रचनेत बांधल्या जातात. याला, अपवाद म्हणून काही रचना मराठीत सिद्ध करणाऱ्या झाल्या आहेत. यात, हृदयनाथ मंगेशकरांची "गणराज रंगी नाचतो" ही रचना अवश्य सामावली जाते. बहार रागावर आधारित हे गाणे आहे. कवियत्री शांताबाई शेळक्यांची ही अनुपमेय, गेयतापूर्ण रचना आहे. सुंदर गाण्याच्या बाबतीत एक बाब नेहमीच बघण्यासारखी असते. गाण्यातील शब्द असे असावेत की वाचतानाच त्यातील अंतर्गत लय, जाणवायला लागावी आणि त्यातूनच चालीचा "जन्म" होत जावा. बहुतेक रचनाकारांचा हाच अनुभव आहे. स्वरिक रचना बघताना, जिथे स्वर संपतात, तिथेच शब्द देखील संपत राहणे, हे संगीतकाराचा हुरूप वाढवणारे असते. प्रस्तुत रचना, या अपेक्षा बहुतांशी पूर्ण करते.
    "गणराज रंगी नाचतो, नाचतो;
    पायी घागऱ्या करिती रुणझुण,
    नाद स्वर्गी पोचतो!."
    गाण्यात पारंपारिक तबला किंवा ढोलक न वापरता, पखवाजावर ताल घेतल्यामुळे, गाण्याला अंगभूत अशी गंभीरता प्राप्त होते आणि वजन मिळते. अर्थात, रचनेचा बाज जरी आनंदी, खेळकर असा असला तरी देखील, बांधणी ही नेहमीच गंभीरतेने करणे आवश्यक असते. गाण्याच्या पहिल्या सुरापासून, आपल्याला "बहार" रागाची ओळख पटते. अर्थात, कुठल्याही सुगम संगीताच्या रचनेत, विशुद्ध स्वरूपात राग आढळणे कठीण असते, तरीही इथे बऱ्याच प्रमाणात रागाचे शुद्धत्व राखले आहे. विशेषत: अंतऱ्यामधील स्वर रचनेत, जे सतारीचे सूर आहेत, तिथे तर ओळख स्पष्ट होते. नेहमीप्रमाणे, या रचनेत देखील, खास "मंगेशकरी" ठसा उमटलेला आहे. विशेषत: गाण्यातील ओळ संपवताना, अवघड तान किंवा हरकत घ्यायची आणि लय थोडी लांबवायची किंवा असाच प्रकार, कवितेची ओळ किंचित खंडित करून घेताना, अशीच अवघड हरकत घ्यायची. याचा परिणाम एकच होतो आणि तो म्हणजे रचना गळ्याची परीक्षा घेते. हृदयनाथ मंगेशकरांवर एक आक्षेप नेहमी घेतला जातो - त्यांना, चाल बांधण्यासाठी, रागदारीची चीज लागते. वेगळ्या शब्दात त्यांची सर्जनशीलता ही बहुतांशी रागदारीतील चीजेवर आधारित असते आणि त्यामुळे, त्यात त्यांची,स्वत:ची "सर्जनशीलता" कुठे आढळते? काही गाण्यांच्या बाबतीत हा आक्षेप जरी मान्य केला तरी, चालीसाठी चीज आधाराला घेतली तरी, त्यानिमित्ताने सामान्य रसिकाला रागदारी संगीताची आवड आणि जाणकारी निर्माण होते, हे देखील नक्की.
    जुना हिंदी चित्रपट "शबाब" मध्ये "मन की बीन मतवारी" हे गाणे, बहार रागाची सुरेख ओळख करून देते.गाण्याची चाल तशी सोपी, ठाय लयीत आहे आणि सुरांच्या वरून बहर राग ठळकपणे ओळखता येतो. नौशाद यांच्या चाली बहुतांशी रागाच्या सावलीत वावरत असतात आणि हे गाणे देखील अपवाद नाही. जरा विस्ताराने बोलायचे झाल्यास, एका ठराविक शैलीचा अवलंब केल्याने, चालीतील वैविध्य तसेच वाद्यमेळ रचना यात तोचतोचपणा डोकावत राहतो. अर्थात, दुसऱ्या बाजूने लिहायचे झाल्यास, कारकीर्द प्रदीर्घ झाली म्हंजे शैलीचा अंदाज येणे, क्रमप्राप्त ठरते. नौशाद यांच्या बाबतीत, त्यांच्या वरील उत्तर प्रदेशच्या आणि त्यातही लखनवी संस्कृतीचा परिणाम गडद दिसतो.
    "मन की बीन मतवारी बाजे,
    आशा झुमे, जीवन नाचे".
    या गाण्याच्या बाबतीत, गाणे ऐकताना त्यांच्या काही रचनांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. गाण्याचा आस्वाद घेण्याच्या दृष्टीने ही बाब अडचणीची होते. आपल्या हातात उरते फक्त, गाण्यामध्ये रागाची सांभाळलेली चौकट आणि त्या चौकटीत सापडलेली रचना!! त्या दृष्टीने हे गाणे तसे "एकसुरी" होते कारण, गाण्यातील हरकती ऐकताना देखील, त्यांच्याच काही गाण्यांची स्मृती जागृत होणे, एक रचनाकार म्हणून अपुरेपण दर्शवते. गाण्यातील ताल सर्वसाधारणपणे वापरात असलेला त्रिताल असून तालाच्या आधारे घेतलेल्या हरकती, यात कुठेही गुंतागुंतीचे वळण आढळत नाही. अर्थात गुंतागुंतीचे वळण असणे, हा गाण्याच्या दर्जाविषयी निकष ठरविणे कठीण आहे.
    मराठी संगीत नाटक "कट्यार काळजात घुसली" मध्ये एक अजरामर रचना बहार रागावर आधारलेली ऐकायला मिळते - "सुरत पिया की छिन बिसराये". ठुमरीच्या अंगाने जरी संगीत रचना केली असली तरी रंगभूमीवर गायचे आहे, याचे भान ठेऊन, रचनेत आवश्यक तो बदल केलेला आहे. पंडित अभिषेकींना याबद्दल श्रेय देणे आवश्यक आहे. वसंतराव देशपांड्यांच्या गायकीचा "मिजाज" ध्यानात ठेऊन, रचना करताना, त्यांच्या गायकीचा "विकास" कसा होईल, हे अभिषेकी बुवांनी नेमकेपणी टिपले आहे. वसंतरावांची तीनही सप्तकात गिरकी घेत गायन करण्याची असामान्य क्षमता, या गाण्यात उठून दिसते.
    "सुरत पिया की छिन बिसराये,
    हर हर दम उनकी याद आये".
    गाण्यात विकासाचे काही ठराविक टप्पे आहेत आणि गाण्याची लय त्यानुसार बदलत असते. अतिशय आव्हानात्मक संगीत रचना आहे आणि गाणे फार वर-खाली होत असते.गाण्यात, अगदी पहिल्या ओळीतच बहार रागाची छटा ऐकायला मिळते. सुरवातीचा दीर्घ आलाप आणि त्या जोडीने घेतलेली वक्र तान, यातून रागाची मूर्ती दिसते. गायन मात्र, वसंतरावांच्या संपूर्ण गायन शैलीचे सम्यक दर्शन घडवेल असे आहे. विशेषत: गाण्यातील बोलताना ऐकताना, हे फार जाणवते. बहार सारख्या ऋतूप्रधान गाण्यात देखील इतके "बुद्धीगामी" गाणे बांधणे आणि तसेच सादर करणे, यातच अभिषेकी बुवा आणि वसंतराव देशपांडे यांचे कार्य प्रशंसनीय ठरते.
    - अनिल गोविलकर

      September 23, 2018


  • सज्जन: सन्तु निर्भया: ।

    व्यक्ती आणि समाज हे नेहमी परस्परावलंबी असतात. प्रत्येक व्यक्ती एकेकटी आदर्श, सदगुणी झाली की समाज आदर्श होतोच. मात्र व्यक्तीच्या विकासाकरिता सामाजिक परिस्थितीदेखील चांगली असली पाहिजे. म्हणूनच की काय, भारतीय संस्कृतीमध्ये वैयक्तिक पूजा-अर्चा करताना जे श्लोक म्हटले जातात त्यांचा सामाजिक आशयही मोठा असतो.

      December 4, 2023


  • शैक्षणिक सहल आयोजनातील सावधानता

    शाळा सुरू असताना अनेक सहशालेय उपक्रम घेतले जातात. स्नेहसंमेलन, परिसर भेट, चावडी वाचन अशा काही उपक्रमाचा प्रामुख्याने त्यामध्ये समावेश असतो.स्पर्धा परीक्षा, रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , संगीत खुर्ची,जिलेबी रेस, विविध खेळ या उपक्रमामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते . सहल हा भौगोलिक आणि ऐतिहासिक माहीतीसाठी उत्तम प्रकार आहे. गड-किल्ले पाहणे, धरण, पर्यटनस्थळ पाहणे किंवा मग ऐतिहासिक किंवा भौगोलिक स्थळ पाहणे हे औत्सुक्याचा विषय ठरतो. मुलांना पर्यटन आवडते. त्यातून जी ज्ञानप्राप्ती होते ती चिरःकाल टिकाऊ स्वरूपाची असते.कायम स्मरणात राहते. मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन आणि दृढीकरण होते किंबहुना ते शिक्षणाचेच कार्य आहे.

    शाळास्तरावर सहलीचे आयोजन करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.मुलं उत्साही असतील तरीही ग्रामीण भागातील मुलांचे पालक बसभाडे देण्यास तयार नसतात . दुसरे म्हणजे दिले तर उशीरा . त्यातही शाळेतील मुलांची संख्या कमी असते अशी मुले सहलीचे आयोजन करू शकत नाहीत. ज्या शाळेत जास्तीची मुलं आहेत तेच सहलीचे आयोजन करतात. तिथेही शिक्षक, पालक यांच्या भूमिकेवर ते अवलंबून आहे. सहलीचे ठिकाण, मुक्कामाचे स्थळ, तेथील भोजन व्यवस्था यांचा सारासार विचार करावा लागतो.सुरक्षितता हा एक प्रश्नच आहे. अनुचित काही घडू नये याचीही दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षक पालक मानसिकतेवर ते अवलंबून असते.

    प्रवासाच्या बाबतीत खाजगी वाहनाच्या ऐवजी एस.टी.बसला पसंती दिल्यास तो उत्तम पर्याय ठरतो. सहलीसाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. ती तालुकास्तरावर मिळत नाही. जिल्ह्यावरून परवानगी आणणे खर्चिक काम ठरते. सहलीच्या परवानगीसाठी चिरीमिरी दिल्याचे एका मित्राने खाजगीत सांगितले. मुख्याध्यापक , शिक्षक यांच्या सकारात्मक दृष्टिकोनावर बरेच अवलंबून असते. स्थळांची निवड करताना मुलांना जास्त कष्टप्रद होणार नाहीत असे किल्ले निवडावे लागतात.सहलीसाठी वापरण्यात येणारी बस दुरूस्त असणे आणि चालकास रस्त्याची माहीती असणे गरजेचे असते. डोंगर , दरी , एकेरी वाहतुक, गर्दीची ठिकाणे या बाबी प्राधान्यक्रमाने पहाव्या लागतात. सोबत पाण्याची सोय असावी लागते त्याचबरोबर मुक्कामाची ठिकाणे अगोदरच निश्चित झालेली असावीत. समुद्राच्या किनारी जाणार असाल तर पाण्याची खोली किती आहे ? मुलं काय करताहेत ? हेही लक्षात घ्यायला हवे. मध्यंतरी सहलीसाठी गेलेली काही मुलं बुडून मृत्यूमुखी पडल्याचे आपण ऐकले असेल. अशा दुर्घटना टाळणे आपल्या हाती आहे. इतर वेळी बंदिस्त असणारी मुले आनंदाच्या भरात सैरावैरा धावण्याची शक्यता असते. याबाबत दक्षता घेणे गरजेचे असते. मुलांना शिस्त असणे यावेळी कामी येते . यामुळे स्थळ पाहण्याचा आनंदही घेता येतो. हलका-फुलका म्हणजे पचनास सोपा असा आहार प्रवासात सोबत असावा.तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत. त्याचबरोबर प्रथमोपचार पेटीही जवळ असणे आवश्यक आहे. त्यात आवश्यक ते साहित्य असावे. स्थळ पाहणी करताना टिपणे काढण्याची सवय मुलांना लावावी. गाईड, मार्गदर्शकाचे मानधन पुरातत्व विभागाशी संपर्क करूनच ठरवावे. गाईडमुळे योग्य मार्गदर्शन मिळते. सहलीदरम्यान छायाचित्र काढण्याचा मोह होणे साहजिकच आहे तद्वतच काळजी घेणे महत्वाचे असते . किल्ल्यांची तटबंदी किंवा निमुळता कडा फोटोसाठी निवडू नये. अपघात होण्याची शक्यता अधिक असते.त्या स्थळाचे पावित्र्य टिकविणे आपल्या हाती असते. सोबतचा कचरा कचराकुंडीतच टाकावा . इतरत्र तो फेकून देऊ नये. मुलांच्या सोबत आपल्या शाळेचे ओळखपत्र असणे गरजेचे असते. कारण अनेक शाळांचे अनेक विद्यार्थी सहलीसाठी आलेले असतात. मुलांचे गट पाडून यादी आपल्याजवळ ठेवावी. पालकांचे दुरध्वनी क्रमांक असल्यास उत्तमच. प्रसंगी गटनायक पद्धती अवलंबवावी. निरीक्षण नोंदी ठेवल्या पाहिजेत . शिक्षकांनी तेथील स्थळांबाबत अधिकची माहीती अगोदरच दिली पाहिजे. कित्येकवेळा मुलं काय पाहतात हेच त्यांना कळत नाही. पाहणी निरीक्षणानंतर कुणी चुकलेच तर कुठे यायचे याची निश्चिती अगोदरच करावी. कारण सहलीनंतर कोण कुठे कसे चुकले? मग कशी घबराट झाली? याचे मजेदार किस्से ऐकायला मिळतात. सहल हा आनंदाचा क्षण असतो.या आनंदात विरजण पडू नये.या काळात प्रत्येक घटकांचे वर्तन सहकार्याचे एकोप्याचे असावे लागते. बसगाडी पंक्चर , डिझेल व इतर उणिवा दूर करून सज्ज असली पाहिजे. इतकी काळजी घेतली सावधानता बाळगली तर सहशालेय उपक्रमात सहल या उपक्रमास मात्र तोड नाही तो एक अविष्मरणिय क्षण असतो एवढे मात्र नक्की . कारण मोठ्यांना आपण बालपणी ज्या सहलीसाठी गेलो होतो ती सहल आठवतेच ना ?

    सहली या शासकीय यंत्रणेने आयोजित केल्यास अधिकाधिक मुलांना त्याचा फायदा होईल. प्रत्येक मुलाचा विमा असावा. स्थळे ठरवून द्यावीत. शिक्षकांना अधिक संरक्षण द्यावे. बसचे वाहक, बसगाडी ठरवून द्यावी.भोजनासाठी परवाने द्यावेत. परवानाधारक हाॅटेलमध्ये निवास आणि भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. सर्वच सहलींसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी. खर्चाची प्रतिपुर्ती वाहतुक खर्चासह शासनस्तरावर झाल्यास या उपक्रमास पाठबळ मिळेल..

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार जि.बीड
    मो.9421442995

      March 15, 2017


  • रुपयाचं नवं रुपडं……….

    भारतीय रुपया आता नव्या रुपात जगासमोर आलाय..

    हे नवं रुप रुपयाशी असलेल्या आपल्या नात्याला बदलू शकेल का…?

    ते बदलावं अशी एक भोळसट आशा प्रत्येक सामान्याला वाटतेय…!!

      August 6, 2010


  • नववर्ष श्रीकृष्णभक्तीमय होवो

    सीता-राम, लक्ष्मी-नारायण, राधा-कृष्ण. मायावादी विद्वान वैष्णवांसमोर गोंधळून जातात. कारण मायावादी जीवाच्या बंधनाच्या कारणांचे विश्‍लेषण करू शकत नाही.

      December 31, 2010