(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • प्रेमःएक आठवणींची कविता.. भाग १

    प्रेमःएक आठवणींची कविता पुढे चालू….

  • कन्फेशन.. अपराधांची कबुली (बेवड्याची डायरी – भाग ४४ वा)

    कन्फेशन ' करताना अथवा आपल्या चुकांचा कबुली जवाब देताना पाचव्या पायरीत जो आदरणीय व्यक्तीचा उल्लेख आहे त्या बाबतीत सांगताना सरांनी आजच्या समूह उपचारात... अशी आदरणीय व्यक्ती कोण असावी असे आपल्याला वाटते ? हा प्रश्न सर्वाना विचारला ..एकाने सांगितले की त्याचे आजोबा त्याच्या दृष्टीने आदरणीय आहेत ..एकाने त्याच्या एका यशस्वी मित्राचे नाव सांगितले ..मी माझ्या एका नातलगाचे नाव सांगितले जो अध्यात्मिक विचारांचा होता ..सर्वांची उत्तरे ऐकून समाधानाने स्मित करत सर बोलू लागले ..मित्रानो , आपण योग्य विचार करत आहात ..पाचव्या पायरीत ईश्वराजवळ म्हणजे ईश्वरासामान असलेल्या आपल्या नातलगांपाशी ..स्वताच्या अंतर्मनाशी तसेच अन्य आदरणीय व्यक्तीजवळ आपल्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली देण्यास सांगितले आहे ..

    या कबुलीजबाबात एक अडचण अशी येते की आपण गतजीवनात केलेल्या अनेक चुकांची स्पष्ट कबुली आपल्या जवळच्या नातलगांपाशी देणे कठीण असते ..अनेकदा आपण नशेत ..अथवा नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी ..किवा नशेत असताना एखाद्या विकाराच्या आहारी जावून खूप खालच्या पातळीचे अनैतिक वर्तन केले असल्याची शक्यता असते ..जे वर्तन जवळच्या नातेवाईकांना कधीच समजू नये अशी आपली इच्छा असते ..कारण त्यातून त्यांना धक्का बसण्याची शक्यता असते ..किवा त्या गोष्टी सांगितल्याने नातलगांशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध बिघडण्याची शक्यता असते ..उदा . जर नशेच्या भरात मित्रांच्या आग्रहाने एखाद्याने विवाहित असूनही वेश्यागमन केले असेल ..विवाहबाह्य संबंध ठेवले असतील ..तर ते त्याला जवळच्या नातेवाईकांजवळ कबुल करणे कठीण असते ..त्यामुळे त्याच्या नातेसंबंधात बिघाड होण्याची शक्यता वाढते ..किवा पत्नी ..आईवडील ..भावंडे यांच्या दृष्टीने एखादा अक्षम्य गुन्हा केला असेल तर त्याबाबत कबुली त्यांच्याजवळच देणे शक्य नसते ..अशा वेळी मनमोकळे करण्यासाठी म्हणून आदरणीय व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे ..

    ही आदरणीय व्यक्ती बहुधा जवळच्या नात्यामधील नसते ..अथवा जी आपल्या कबुलीजवाबाने विचलित होईल अशी नसावी ..तसेच आपण केलेल्या कबुलीचा गैरफायदा घेईल अशीही नसावी ही दक्षता घ्यावी लागते ..किवा ती व्यक्ती अशा गोष्टी खाजगी ठेवेल याची आपल्याला खात्री असायला हवी,,तसेच आपल्याला आपण केलेल्या चुकीबद्दल दोष न देता ...समजून घेवून पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन करणारी असली पाहिजे ..कबुलीजवाबासाठी अशी आदरणीय व्यक्ती निवडणे हे हुशारीचे काम आहे ..उगाच भावनेच्या भरात कोणाजवळही अशी कबुली देणे नक्कीच हितावह नसते ..

    सरांनी या बाबत स्पष्ट केले की बहुधा अशी आदरणीय व्यक्ती म्हणून आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या जेष्ठ सदस्याची निवड करू शकतो .. ज्याला अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये ' स्पाँन्सर ' म्हंटले जाते ..किवा ही व्यक्ती एखादा व्यावसायिक समुपदेशक ..किवा व्यसनमुक्ती केंद्रातील जवाबदार समुपदेशक असली पाहिजे ..अन्यथा आपल्या कबुलीजवाबाने आपली अपराधीपणाची बोच कमी होऊन पुढील योग्य मार्गदर्शन मिळण्याऐवजी एखाद्या नवीन संकटाला सामोरे जावे लागेल ..ही आदरणीय व्यक्ती जर व्यसनमुक्तीच्या बाबत आपल्यालों मदत करणारी असली तर अधिक उत्तम असते ..अशी व्यक्ती निवडताना आपण नीट काळजी घेतली पाहिजे ..आपला कबुलीजवाब आपल्या पुढील मार्गात अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे ..असे सांगत सरांनी पाचव्या पायरीवरील चर्चा संपली असे जाहीर केले ..व्यसनी व्यक्तीचा स्वभाव बहुधा अनैतिकतेकडे झुकणारा असतो त्यामुळे त्याने व्यसनाच्या काळात कौटुंबिक दृष्ट्या , सामाजिक दृष्ट्या , कायद्याच्या दृष्टीने... काही गुन्हे केले असण्याची शक्यता असते ..अशा वेळी कबुलीजवाब जपून द्यावा हे सरांचे म्हणणे आम्हाला तंतोतंत पटले ..

    नंतर सरांनी आमच्यातील पाटील नावाच्या एकाला उभे केले व त्याला विचारले ' तू परवा रविवारी डिस्चार्ज झालेल्या कोणाजवळ आपल्या घराचा पत्ता व पत्नीचा फोन नंबर दिला होतास ते सांग ? सरांच्या या प्रश्नावर पाटील हडबडला ..त्याचा चेहरा गोंधळल्या सारखा झाला ..' नाही सर ..मी कोणालाच पत्ता व नंबर दिलेला नाही ..शपथ " असे म्हणू लागला ..हे नवीन काय ते आम्हाला समजेना ..सरांनी पुन्हा पाटीलला जरा दरडावून विचारले .' खरे सांग तू ..आम्हाला सगळे समजले आहे ..' यावर पाटीलने मान खाली घातली ...आम्हाला समजले की पाटील खोटे बोलतोय म्हणून ..
    सर पुढे सांगू लागले ' व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर लवकरात लवकर पडावे हे सर्वांनाच वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु त्यासाठी आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये ..इथे वेगवेगळ्या स्वभावाचे ..वेगवेगळ्या संस्कृतीचे ..वेगवेगळी नशा करणारे लोक उपचार घेत आहेत ..या पैकी कोण मनापासून उपचार घेतोय हे समजणे कठीण आहे ..

    कारण व्यसनी व्यक्ती हा दुहेरी व्यक्तिमत्वाचा किवा ढोंगी प्रवृत्तीचा असतो ..तेव्हा येथे मैत्री करताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे ..इथून बाहेर पडल्यावर येथे मैत्री झालेल्या मित्रांना बाहेर भेटणे धोकादायक असू शकते ..कारण जर त्या मित्राने पिणे सुरु केले तर आपणही त्याच्या सोबत ' रीलॅप्स ' होऊ शकतो ..काही लोक डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्ती जवळ आपल्या घरचा पत्ता किवा फोन नंबर देतात आणि सांगतात की माझ्या घरी जावून घरच्यांना सांग की मी खूप आजारी आहे ..इथे मला खूप त्रास होतोय ..मला उपाशी ठेवतात ..मारतात ..बांधून ठेवतात ..वगैरे ..म्हणजे घरचे लोक घाबरून लवकर मला डिस्चार्ज देतील ..मित्रानो हा मार्ग अत्यंत चुकीचा आणि खोटेपणाचा आहे ..आपण बाहेर व्यसने करून ..खोटे वागून कुटुंबियांना भरपूर त्रास दिलेला आहे ..आता येथे असताना पण आपण असे खोटे निरोप बाहेर पाठवून घरच्या मंडळीना त्रासात टाकणे योग्य नाही..

    ..या पाटीलने परवा डिस्चार्ज होणाऱ्या एकाजवळ आपल्या पत्नीचा फोन नंबर दिला होता ..तिला लवकर घेवून जा असा निरोप देण्यासाठी ...त्या माणसाने डिस्चार्ज होऊन बाहेर पडल्यावर सरळ याच्या पत्नीला फोन करून ..हा इथे खूप वाईट अवस्थेत आहे असा स्वताचे नाव न सांगता खोटा निरोप दिला ..याची पत्नी घाबरली ..तिने आम्हाला फोन करून खरी माहिती विचारली ..आम्ही सर्व काही ठीक आहे ..या असल्या फोनवर विश्वास ठेवू नका असा तिला धीर दिला ..मात्र नंतर ज्याला नंबर दिला होता तो आता रात्री बेरात्री वारंवार फोन करून याच्या पत्नीला याला लवकर घरी घेवून या असा आग्रह करतोय ..एकदा तर त्याने म्हणे दारू पिवून याच्या पत्नीला फोन केला ..आता हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा ..हे ऐकून आम्हाला सगळ्यांना त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचा रागच आला ..तसेच त्याच्याजवळ पत्नीचा फोन नंबर देवून तिला फोन करायला लावणाऱ्या पाटीलचा देखील राग आला ..शेवटी ती व्यक्ती पत्नीला त्रास देतेय हे ऐकून पाटीलने सरांना त्याचे नाव सांगितले ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • उकड (खाद्ययात्रा)

    उकड

  • कोणी तरी आहे तिथं

    •जगातली कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीशी फक्त सहा बिंदूंनी जोडली जाऊ शकते. हे सहा बिंदू व्यक्ती, संस्था वगैरे काहीही असू शकतात. त्याचं म्हणणं होतं, फेसबुक वगैरे माध्यमातनं आपण उगाचच एक बिंदू सहज पुरवतो. हे काहींसाठी फायद्याचं असलं तरी त्याचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापरही होऊ शकतो.

    •या समाजमाध्यमांत आपण कसे वागतो, कशाला ‘लाइक’ करतो, कशावर कशी प्रतिक्रिया नोंदवतो याचं पूर्णपणे विश्लेषण होत असतं. आणि व्यावसायिक, राजकीय कारणांसाठी या विश्लेषणाचा उपयोग करता येऊ शकतो; किंबहुना तो केला जातोय.
    •मायकेल कोसिन्स्की हा विख्यात मनोविश्लेषक व केंब्रिजमध्ये मायकेलचा सहाध्यायी डेव्हिड स्टिलवेल यांच्या अध्ययनानुसार,

    •एखाद्या व्यक्तीच्या फेसबुकवरच्या फक्त ६८ लाइक्सवरनं ती व्यक्ती गोरी की काळी, स्त्री की पुरुष, धूम्रपान करणारी/ न करणारी, मद्यपान करणारी/ न करणारी आणि मुख्य म्हणजे त्यांची राजकीय आवडनिवड.. हे सगळं सगळं निश्चित करता येऊ शकतं. यातली अचूकता ९५ टक्के इतकी निघाली. म्हणजे अशा पद्धतीनं काढलेल्या शंभर निष्कर्षांतले फक्त पाचच अंदाज त्याचे तितकेसे बरोबर आले नाहीत. बाकी सगळे तंतोतंत तसे निघाले. पुढे पुढे या लाइक्सची संख्या आणखी कमी झाली. साधारण १० लाइक्सवरनंच त्याला हे सगळे अंदाज बांधता यायला लागले. यातला भयानक धक्कादायक भाग म्हणजे एखाद्याच्या ७० लाइक्सचा अभ्यास केला तर ती व्यक्ती तिच्या जवळच्या स्नेह्यलाही कळली नसेल इतकी कळते, १५० लाइक्सचा अभ्यास केला की त्या व्यक्तीच्या आई-वडिलांनाही कळलं नसेल इतकं काही कळून येतं. आणि ३०० लाइक्सचं विश्लेषण केलं तर त्या व्यक्तीच्या जोडीदाराला कळलं नसेल इतकं काही समजून येतं.

    •याच तंत्रज्ञानाचा वापर ब्रेग्झिट आणि ट्रम्प यांच्या निवडणुकीत जनमत घडवणारं तंत्र एकाच कंपनीकडनं राबवलं गेलं ती कंपनी म्हणजे अलेक्झांडर निक्स यांची ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका.’

    •ट्रम्प यांना अर्थातच केंब्रिज अ‍ॅनालिटिकाचं महत्त्व पटलंय. म्हणून तर या कंपनीच्या संचालकातले एक स्टिव्ह बॅनन हे ट्रम्प यांचे धोरण सल्लागार म्हणून नेमले गेलेत. आता अशीही बातमी आहे, की इंग्लंडमध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगामी निवडणुकीसाठी या कंपनीशी बोलणी सुरू केलीयेत. निक्स हेही सूचित करतोय की स्वित्र्झलड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांतनं त्याला मागणी आहे.

    •अर्थसंकल्पोत्तर भाषण करताना आपले पंतप्रधान बोलून गेले. निश्चलनीकरणाच्या काळात आम्ही प्रचंड डेटा गोळा केलाय, त्याची छाननी सुरू आहे. पाठोपाठ कारवाईही होईल.

    •तो डेटाबॉम्ब आपणही अनुभवणार आहोत. आपण ऑनलाइन असू किंवा ऑफलाइन. आपल्यावर लक्ष ठेवलं जातंय.. कोणी तरी आहे तिथं!

    संदर्भ:- लोकसत्ता

  • आरक्षण…सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत!

    “मुस्लिम मागासवर्गाला आरक्षण”…निवडणुकांच्या तोंडावर घोषित आरक्षणाला सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत म्हटलं तर वावगे ठरेल का?…‘नॉन-क्रिमीलेअर’ सारख्या जाचक अटीमुळे ओबीसी, विमुक्त जाती, एस.बी.सी. व भटक्या जमातींना इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या कितीतरी सेवापदांना मुकावे लागले. ‘नॉन-क्रिमीलेअर’ या अटीची व्याख्या “उच्चवर्णीयांतील प्रत्येकजण श्रीमंत नसतो तसचं मागासवर्गातील प्रत्येकजण गरीब नसतो” या सिद्धांताला अनुसरून त्यांना समान पातळीवर आणायचे असेल तर मग उच्चवर्णीयांसहित सरसकट सगळ्यांनाच आर्थिक निकषावर आरक्षण का नाही?. आरक्षणासाठी फक्त जातींचाच व अल्पसंख्याकांचाच आधार का ?.केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरक्षणातून नेमका कोणत्या गोष्टीचा मागासलेपणा एका समान पातळीवर शासन आणू पाहतेय.

  • नियंत्रणमुक्तीचेही राजकारण

    राज्यातील साखर कारखानदारी सतत चर्चेत असते. विशेषत: आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना सरकारकडून दिल्या जाणार्‍या कोट्यवधींच्या मदतीबाबत उलटसुलट मते व्यक्त होतात. या पार्श्वभूमीवर साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. पण, इतर बाबतीत खासगीकरणाचे धोरण स्वीकारणारे सरकार सत्तास्वार्थासाठी या उद्योगाला नियंत्रणमुक्त करू इच्छित नाही.

  • आमची कोस्टारिकाची सफ़र-

    जवळ जवळ तीन-चार महिने आधी ठरविलेली कोस्टारिकाच्या सफ़रची तारीख जस जशी जवळ आली तस तशी आमची उत्सुकता वाढतच होती. तो देश कसा असेल, माणसं कशी असतील, हवामान आपल्याला मानवेल की नाही, आणि मूख्य म्हणजे टूर मध्ये असलेले ईतर लोक कसे असतील

  • पुरिया धनाश्री-संधिप्रकाश

    "गाय जशी हंबरते,
    तसेच व्याकूळ व्हावें
    बुडतां बुडतां सांजप्रवाही;
    अलगद भरून यावे."
    कवी ग्रेसच्या या अजरामर कवितेच्या ओळी वाचताना, मला नेहमी पुरिया धनाश्री रागाची आठवण येते. तसाच तो संधिप्रकाश, अंधार येत असतो पण प्रकाशाचे अस्तित्व जाणवत असतो. मनात कुठली एखादी आर्त आठवण दाटून येते आणि गळ्यात आवंढा अडकतो. आपल्याला फार एकटे, एकटे वाटत असते आणि त्या हुरहुरीला, "कोमल रिषभ" आणि "कोमल धैवत" स्वराची साथ मिळते. बघता, बघता तोच संधीप्रकाश आपल्याला आश्वस्त करायला लागतो. रागदारी संगीताचे हे अपूर्व वैभव आपल्या मनाला जाणवते.
    भारतीय संगीतात, "रागसंगीत' ही एक अपूर्व चीज आहे, ज्या स्वररचनेला जागतिक संगीतात तोड नाही. पाश्चात्य शास्त्रीय संगीतात, आपल्यासारखेच ७ स्वर असतात. पण, "सिंफनी" हीं अत्यंत बांधीव स्वर रचना असते, त्यात, वैय्यक्तिक विचारला फारसे स्थान नसते. "बीथोवन, मोझार्ट" यांच्या रचना असामान्य खऱ्या आणि सादर करणे, हे अति कौशल्याचे काम आहे. पण, आपल्या रागदारीत जसा, वैय्यक्तिक विचार, याला, जास्त प्राधान्य साते आणि ती "मिंड", "गमक" या अलंकारांनी सजलेली असते. त्यामुळेच, आपले रागसंगीत, संपूर्णपणे, स्वरलेखनाच्या परिभाषेत ठामपणे लिहिता येत नाही. प्रत्येक कलाकाराची प्रतिभा, त्या रागाचे तेच स्वर, अत्यंत वेगळ्या मांडणीतून सादर करीत असतो आणि आपण, ऐकणारे स्तिमित होत असतो.
    पुरिया धनाश्री हा असाच अवीट गोडीचा राग. आरोही सप्तकात "रे" आणि "ध" कोमल आणि अवरोही सप्तकात तीव्र "म" स्वराची आस घेऊन शुद्ध "म" स्वरूपात येतो. तसे बघितले तर हा संध्याकाळचा राग आहे त्यामुळे असेल पण, या रागासोबत "श्री","मारवा" रागाची छाया पडलेली दिसते. मला तर, नेहमीच मारवा ऐकताना, एखादी जिवंत ठसठसलेली जखम वाहत असल्याचा भास होतो. इतका, वेदनेचा उग्र अनुभव पुरिया धनाश्रीत येत नसला तरी, संध्यासमयीची आर्त हुरहूर आणि त्याचबरोबर, प्रणयोत्सुक विरहिणीची व्यथा नेमकेपणाने व्यक्त केली जाते. संध्याकाळी, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराला संकेतस्थळी भेटण्यास आतुर होत असताना, आपल्याला, तसाच प्रतिसाद मिळेल न मिळेल, या विवंचनेतून आकाराला आलेली भावना, या रागिणीत फार समर्थपणे दिसून येते. पुरिया राग हा तसा या रागीणीच्या जवळ जात असला तरी, पुरिया हा जास्त करून भैरवी जवळ फार जातो, कि त्यात, "आता सारे संपत येत आहे," अशी एकतर साफल्याची किंवा हताशतेची भावना अधिक दृग्गोचर होते. पुरिया धनाश्रीत, इतकी विवशता आढळत नाही. या रागातील काही स्वरसंहती फारच जीवघेण्या आहेत, जसे,"नि (को)रे ग म प","म ग म (को)रे ग","म(को) ध नि सा".
    सूर्यास्त होत असताना, गाभाऱ्यावर वस्त्र पडत जावे त्याप्रमाणे, अवकाशात तिमिराचे राज्य हळूहळू सुरु होत असताना, दूर क्षितिजावर, रंगांची उधळण होत असते. फक्त गुलाबी रंगात, निळ्या रंगाचा गडदपणा मिसळत असतो. अशा वेळेस, जाणवणारी, कालिदासाच्या भाषेत सांगायचे झाल्यास, "पर्युत्सुक" अवस्थेत, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराची आतुरतेने वात पाहत असताना, होणारी धडधड, पुरिया धनाश्रीमध्ये फार अप्रतिमरीत्या उमटते. थोड्या, काव्यात्मक भाषेत बोलायचे झाल्यास, बालकवींच्या, "औदुंबर" कवितेतील, येणारा, "गोड काळिमा" या रागीणीशी फार जवळचे नाते दर्शवून जातो.
    ज्ञानेश्वरांनी निर्मिलेला "दु;ख कालिंदी" या जाणिवेशी अधिक तरलतेने, हीं रागिणी आपले नाते सांगते. आणि इतके लिहूनही, पाडगावकरांच्या ओळीत म्हटल्याप्रमाणे, "शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले" हीं तर भावना मुळाशी सतत वास करताच असते. खर तर, कुठलाही राग/रागिणी हीं नेहमीच आपल्याला कैवल्यात्मक दर्शनातून, शब्दांच्या पलीकडल्या भावनेशी आपले नाते जोडीत असते, आणि हीं गोष्ट अधिक चांगल्याप्रकारे, पुरिया धनाश्रीमध्ये दृग्गोचर होते. इथे, या रागिणीचे स्वरलेखन करून, पांडित्याचा आव आणण्याची काहीच गरज नाही तरी देखील, "कोमल निषाद" हा, या रागिणीचा एक अलौकिक नजराणा आहे. खरतर, कुठलीही स्वरलिपी, हीं त्या कलाकृतीचा एक आराखडाच असतो. कलाकार, त्यात अंतर्भूत असलेला अनाहत नादाचे आपल्याला दर्शन घडवीत असतो. कुठलाही राग, हा मला नेहमीच आलापीमध्ये अधिक भावतो. त्याचे काय होते, एकदा लय मध्य आणि द्रुत लयीत शिरली कि मग त्याचे तालाशी गणित जुळते आणि, मग लयीचे वेगवेगळे बंध ऐकणे, इतकेच आपल्या हाती राहते. द्रुत लयीत तर, प्रत्येक स्वर, अनुभवायला वेळच मिळत नाही. संथ लयीत, तुम्ही प्रत्येक सुराचा आपल्या कुवतीप्रमाणे आनंद उपभोगू शकता. एखादा हिरा, जसा प्रत्येक कोनातून वेगवेगळी किरणे फाकीत असतो, तसा रागात प्रत्येक सूर हा वेगवेगळ्या अंदाजाने आपले अस्तित्व दर्शवित असतो.
    कलापिनी गंधर्वांची अप्रतिम चीज "दिन डुबा आजरा" ही मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. मध्य लयीत इतक्या वेगवेगळ्या "जागा" घेते की ऐकताना थक्क व्हावे. आधीच कुमारांची अभ्यासू वृत्ती आणि शिकवणी बिंबवल्याचे अप्रतिम उदाहरण म्हणून देता येईल. चीजेचे शब्द देखील, रागाच्या भावदर्शनाला सुयोग्य. चीज अप्रतिम रंगणार, यात कसली शंका.या रचनेत आपल्याला, रागातील "कोमल रिषभ" स्वरावरील आंदोलने खास ऐकण्यासारखी आहेत. संध्याकाळच्या समयीची अनामिक हुरहूर आणि विरही भावना, या स्वरातून किती अप्रतिमरीत्या निर्देशित होते. खरे तर गुरूची शिकवण तशीच्या तशी सादर करणे यात तशी सर्जनशीलता आढळत नाही परंतु शिकवलेल्या रचनेतून, नवीन सौंदर्यस्थळे शोधून, त्यांचे अत्यंत वैचारिक सादरीकरण करणे, इथे कलाकाराच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रत्यय येतो.
    या रागात तशी गाणी फार ऐकायला मिळत नाहीत. पण, जी गाणी आहेत, ती दीर्घकाळ मनात ठाण मांडून बसलेली आहेत. "बदलते रिश्ते" चित्रपटातील लताबाईंनी आणि महेंद्र कपूर यांनी गायलेले "मेरे सांसो को महेक आ रही है" हे असेच चिरस्मरणीय गाणे.
    "मेरे सांसो को महेक आ रही है
    ये पहले प्यार की खुशबू
    तेरी सांसो से शायद आ रही है"
    अतिशय संथ लयीत सुरु होणारे गाणे, बघता, बघता अवघड लयीत आणि तार सप्तकात जाते. सुरवातीचा "हुंकार" आणि "आलाप" यातून, या रागाची ओळख पटते. "मेरे सांसो को" हे "गंधार" आणि "मध्यम" स्वरावर किंचित थांबून, पुढे गाणे इतक्या वेगळ्या वळणाने सरकते आणि त्याबरोबर लय किती अवघड होत जाते, हे नीट लक्ष दिल्यावर ध्यानात येते.
    "शुरू ये सिलसिला है, उसी दिन से हुवा था, अचानक तुने जिस दिन मुझे युंही छुआ था" या ओळीत, "शुरू ये सिलसिला" इथे या रागातील, (कोमल) "रे","ग" आणि "म(तीव्र)" अशी स्वरयोजना किती सुंदर आहे. खरतर अशा स्वरलिपीत मांडून फारसे साध्य होत नाही, हे खरे म्हणजे बहुतेक लोकांना असे विवेचन डोक्यावरून जाते पण, असे शब्दागणिक जर का स्वर मांडले तर बहुदा, एकतर रागाची ओळख पटून, तेच गाणे वेगळ्या नजरेने ऐकता येते. तसेच, गाण्याची लज्जत अधिक वाढण्याची शक्यता असते. लताबाईंच्या आवाजाची खासियत पुढे येते. "अचानक तुने जिस दिन मुझे छुआ था" ही ओळ, अगदी खालच्या पट्टीत घेतलेली आणि, आधीची ओळ, वरच्या पट्टीतील स्वरांत गायल्यानंतर. हा सगळा सांगीतिक खेळ फार अवघड आहे. या वाक्यातील प्रणयी मुग्धता ध्यानात घेऊन, लताबाईंची गायकी अधिक मुग्ध करते.
    काही वर्षापूर्वी आलेल्या, "रंगीला" चित्रपटात असेच असामान्य गाणे ऐकायला मिळाले.
    "हाय रामा ये क्या हुवा, ऐसे हमें सताने लगे,
    तुम इतनी प्यारी हो सामने, हम काबू में कैसे रहे;
    जाओ हम को तो आती शरम है,
    तेरी ऐसी अदा पे तो फिदा हम हैं."
    हे देखील लयीला अतिशय कठीण गाणे, याच रागाच्या आधाराने, बांधले आहे. या गाण्यात, रेहमान सारखा संगीतकार, एखादी सुंदर "तर्ज" हाताशी आल्यावर, त्यात किती वेगवेगळे प्रयोग करू शकतो, याचे उत्तम उदाहरण आहे. गाण्याच्या सुरवातीलाच, हरिहरनच्या आवाजात, अनुरणात्मक हुंकार आहे आणि ते जर बारकाईने ऐकले तर त्यात "लपलेला" पुरिया धनाश्री ऐकायला मिळतो. संगीतकार फार प्रयोगशील असला की तो गाण्यात किती प्रकारे विविधता आणू शकतो, यासाठी हे गाणे अभ्यासण्यासारखे आहे. सुरवातीच्या आलापीनंतर ज्या तालात हे गाणे सुरु होते, त्याचा संबंध पाश्चात्य "शांत जाझ" संगीताशी सहज जोडता येतो.
    अर्थात, या गाण्यात, रेहमानवर, दक्षिणात्य संगीताचा असलेला प्रभाव स्पष्ट दिसतो. शब्दोच्चार आणि त्यानुसार होणारे स्वरोच्चार, यातून दक्षिणात्य शैली उठून दिसते. खरेतर पुरिया धनाश्री राग हा उत्तर भारतीय संगीतातील पण, त्या रागाचे सूर हाताशी घेऊन, त्याला दक्षिणात्य संगीताची डूब देऊन, त्याचा संबंध जाझ संगीताशी जोडणी करणे, हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. या गाण्यात, सुरवातीला जो ताल आहे, त्यापाठीमागे तंबोरा वाजत आहे आणि ते सूर नीट ऐकल्यावर तर पुरिया धनाश्री लगेच उठून दिसतो. एकतर तंबोरा हे वाद्यच असे आहे, त्यातून सूर उमटायला लागले की, मन तिथेच एकाग्र होते. या रागाचे जे प्रमुख स्वर आहेत - "पंचम" आणि "रिषभ" या स्वरांचे प्रत्यंतर या तंबोऱ्यातील गुंजणाऱ्या स्वरांतून मिळते.
    रागदारी संगीत अवघड असते, असे जे रसिक मानतात, त्यांच्यासाठी हे तंबोऱ्याचे सूर खरच आनंददायी ठरू शकतात. सुगम संगीतातून, राग संगीताची ओळख आणि आवड अशाच प्रकारे अधिक परिणामकारक होऊ शकते.
    असेच एक अतिशय सुंदर गाणे, "१९४७:अर्थ" या चित्रपटात, "रुत आ गयी रे, रुत छा गयी रे" हे गाणे सुखविंदर सिंग यांच्या आवाजात ऐकायला मिळते.
    "रुत आ गयी रे, रुत छा गयी रे.
    पीली पीली सरसो फुलें, पीले-पीले पत्ते झुमें
    पीहू-पीहू पपीहा बोले, चल बाग मे"
    लोकसंगीतात जसे काव्य असते त्याच धर्तीवर जावेद अख्तर यांनी इथे कविता लिहिली आहे.
    याची चाल देखील ए.आर. रेहमान यांनीच बांधलेली आहे. आता इथे एक गंमत आहे, वरती देखील मी रेहमानच्या दिग्दर्शनाखाली एक गाणे दिले आहे आणि आता इथे हे गाणे. एकच रागातून दोन भिन्न रंगाच्या चाली निर्माण केल्या आहेत. सुखविंदर सिंग यांचा आवाज अतिशय दमदार तसेच लगेच तार साप्तकाची पातळी गाठणारा पण इथे रेहमान यांनी त्यांच्याकडून काहीशा द्रुत लयीत पण प्रणयी थाताचेच गाणे गाउन घेतले आहे. चाल बारकाईने ऐकली म्हणजे लगेच फरक आढळून येतो पण स्वरावली तपासली आणि चालीचे "मूळ" शाढले म्हणजे पुरिया धनाश्री रागाचे नाते कळून घेता येते. रागदारी संगीत किती भरीव, श्रीमंत आहे, याची ही दोन गाणी म्हणजे उत्तम उदाहरणे आहेत.
    या रागात सुषिर वाद्यांचा प्रभाव अधिक भावतो, हे सहज समजून घेत येईल. एकतर सुषिर वाद्ये, ही श्वासाच्या गतीवर आणि दाबावर सादर केली जातात आणि त्यामुळे त्यातून, विशेषत: मंद्र सप्तकात अधिक परिणाम साधला जातो. सुषिर वाड्यातून निघणारे हलके, मंजुळ सूर, संध्याकाळची कातर वेळ आणि त्याची "सम" नेमकी साधतात.
    संध्याकाळ जवळ आलेली असते आणि आणि, अशा शांत समयी, अशाच हुरहुरत्या क्षणी, आसमंतात, प्रसिद्ध बासरी वादक रोणू मुजुमदार याच्या अप्रतिम बासरीचे सूर आसमंतात पसरतात. बासरीच्या त्या सुरांची अशी काही भूल मनावर पसरते की आपण आपल्या आजूबाजूचा परिसर, माणसे याची जाणीवच होत नाही,. संपूर्ण वेगळ्या विश्वात आपण वावरायला लागतो आणि असे हे वावरणे, हीच तर खरी रागदारी संगीताची खरी शक्ती आहे जी पुरिया धनाश्री रागातून आपल्याला जाणवून घेता येते.
    -- अनिल गोविलकर

  • रेव्ह पार्टी

    रेव्ह पार्टी

    रस्त्यावर होतो ते तमाशा

    आडोश्याला पार्ट्या असतात.

    त्यात पिचाळलेली कार्टी,

    पिचाळलेल्या कार्ट्या असतात.

  • विधीलिखित

    कोणाला कोणच्या प्रसंगातून कोणत्या वेळी जावं लागतं ते विधिलिखित असतं.
    ते टळणार नसतं. त्यांतून किती जीव मनस्तापाने होरपळून निघतात. आपण सिरीयल्स मधून,कथा कादंबर्यातून हे बघतो, वांचतो पण मी प्रत्यक्षात घडलेली घटना इथे सांगत आहे. ( पात्रांची नांव बदलली आहेत)
    वैशाली ताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता, संध्याकाळी बाहेर जेवायचं ठरलं होतं. मोठी मुलगी गांवातच होती, ती पण येणार होती केक घेऊन.
    आंघोळ आटपून त्या पूजेला बसल्या, तितक्यात फोन खणखणला. "आई, वेळ आहे कां ऐकायला" हो हो बोल बेटा.
    वैशाली ताईंना वाटलं, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पूजानी त्यांच्या धाकट्या मुलीने फोन केला असावा. "आई" तिचा आवाज थोडा रडवेला वाटला. रात्रीच तिच्याशी गोष्टी झाल्या होत्या, थोडी तुटकच बोलली होती, जेवण झालं कां असं विचारलं तर , "नाही ग इतक्यांत कसंच जेवण? आई तू झोप. मी सकाळी करते फोन" म्हणाली होती.
    "आई, तूं बसून घे" पूजा म्हणाली. बराच वेळ ती बोलणार होती.
    तिने सांगितलं ते वैशाली ताईंना धक्का देणारं होतं. तरी त्यांनी शांततेन एकेक गोष्ट ऐकली. "बरं मी ठेवते, मी कोर्टात जाते आहे. बघते कोणी वकील मिळाला तर. तूं अजिबात काळजी करूं नकोस. मी मॅनेज करीन. बाबांना पण ऊगीच पाठवू नकोस. त्यांच्या तब्येतीची काळजी घे" असं म्हणून तिने फोन कट केला. कशातरी रडवेल्या होत त्यांनी पूजा संपवली आणि तिच्या बाबांना सगळं सांगितलं. ते पण खूप काळजीत पडले.
    पूजाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. पहिलं नव नवलाईचं वर्ष एकमेकांचे वाढदिवस साजरे करण्यांत, हाॅटेल, आऊटींग मध्ये गेले. नंतर पूजानी तिच्याच कंपनीत पुनः जाॅब मिळवला. सासू सकाळीच डबा घेऊन शाळेत निघून जात होती. नंतरचं सगळं पूजा बघून घेत होती. सगळ्यांसाठी पोळ्या भाजी करून ती आॅफीसला जायची.
    हळूहळू घरांत कुरबूर सुरू झाली. एका माणसाचा खर्च वाढला. तिचे सासरे तिच्या आॅफीसमध्ये जाऊन जाऊन पैसे मागत. वरून म्हणतं, तूला आमच्याकडे सगळं घरचं जेवण मिळतं, राहायला झोपायला जागा मिळते, फळ-दूध सगळं मिळतं तर घरभाड्या सकट तूं सगळे पैसे दे.
    तिनी त्यांना ते द्यायला सूरवात केली. एका महिन्यांत प्रिमियम भरायचे होते म्हणून ती देऊ शकली नाही, तर सासरे आॅफीसमध्ये पोचले. पूजानी संध्याकाळी येतांना काढून
    आणते सांगितलं. तर तिला एटीएम कार्ड मागायला लागले. ती कांही पेइंग गेस्ट नाही, जे ते एक दिवस ऊशीर झाला तर कांगावा करत होते. त्यांचा मुलगा पूजाचा नवरा बॅन्केत मॅनेजर आहे, तो तिचा खर्च चालवूं शकत होता तरी ती भीक नको ........म्हणून पैसे पुरवत होती.
    त्यांना पैसे दिले. घरी पोचल्यावर पूजाच्या कानावर नवर्याचे बोलणे पडले. बाबा, तिला कां मागतां मी देतो आहे न ? घरभाडं, किराणा, प्लाॅटचं लोन सगळं मी करतो न. आईचा पूर्ण पगार वाचतोच आहे. बाबा म्हणत होते तिचा पगार घर बांधायला लागेल.
    खूप रगडा झाला त्यांवरून. सासूनी दोघांना वेगळं राहा सांगितलं. दोघं वेगळे झाले. थोडे दिवस बरे गेले. नंतर पूजाचा नवरा घरी आईकडे जाऊन जेवून यायचा. कधी न सांगता तिथेच राहून जायचा असं सुरू झालं. मग त्यावरून पूजात व तिच्या नवर्यात दोघांमध्ये वाद होऊ लागले. एक दिवस अचानक त्यानी बॅग भरली आणि चेन्नई ला जायचं आहे असं सांगून निघून गेला. सकाळी सकाळी दाराची बेल वाजली, पूजा नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिनी दार उघडलं तर कोर्टाचा माणूस नोटिस घेऊन दारांत ऊभा. तिच्या नवर्यानी घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती. तिच्या ह्रदयाचा थरकांप झाला. एका रात्री भांडणं झालं होतं तेव्हां मला आतां तुझ्या बरोबर राहायचचं नाही असं म्हणाला होताच. पण खरंच असा वागेल वाटलं नव्हतं. कालच बॅग घेऊन चेन्नई ला गेला आणि आज ही नोटिस. पूजाचा थरकांप उडाला. हात पाय कांपायला लागले. तिनी कशीतरी नोटीस घेतली व विचारलं हे काय आहे? घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती त्याने. दार बंद करून बालकनीत आली नोटिस वांचतच होती, तेवढ्यात तिला टोपीखाली चेहरा लपवून तो (तिचा नवरा) सुजित जातांना दिसला. तिने त्याचीच बाईक बाहेर काढली आणि त्याचा पाठलाग करून त्याला गाठलं. खूप सवाल जबाब झाले, तो घरी आलाच नाही. ती सासरच्या घरी गेली तर सासूनी घरांत घेतलंच नाही. उलट कांगावा केला, "मी पोलीसांना बोलावते, सांगते ही मुलगी आम्हांला त्रास द्यायला आली आहे" पूजा परत स्वतःच्या घरी आली.
    कोर्टात त्यांची भेट झाली. शेवटी सहा महिन्यांच्या ऊहापोही नंतर परस्पर संमतिने घटस्फ़ोट घेतला.
    त्यांतही सुजितने mutual divorce साठी मी कांही ही एल्युमिनी देणार नाही असं वकीलांना सांगितलं. आई आणि मुलानी मिळून सगळी योजना आधीच आंखून ठेवली होती.
    सुजितच्या एका मैत्रिणीने तिच्या भावासाठी पूजाला होकार द्यायला लावला, तो पण पूजाला ओळखत होता.
    इतक्या चंगल्या मुलीचे असे हाल झालेले त्यानी पण बघितले होते.
    वैशाली ताईंना आतां खूप छान जांवई मिळाला. पूजा आणि दिपक दोघंही आतां अमेरिकेत आहेत. त्यांना एक गोड मुलगी आहे.
    दिपक गंमतीनी म्हणतो, "सुजितचे आभार मानायला हवे आपण सुजितशी तुझं लग्न झालंच नसतं तर माझी तुझी गांठच पडली नसती, तूं इथे मिरजला कशाला आली असतीस? "
    --प्रतिभा जोगदंड केकरे