आमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची.
दुसऱ्याचा अपमान करून क्षणभर आनंद घेऊन नेहमीसाठी आतल्या आत यातना भोगणे अशी नकारात्मकता निरर्थक आहे. याउलट भारतीय संस्कृती तुमच्याच सुखासाठी कृतज्ञतेचा संस्कार देते.
एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने संकटात तुम्हाला मदत केली. त्याने ही मदत अगदी निरपेक्ष भावनेने केलेली असते. त्याला त्याबद्दल काही परत मिळावे ही अपेक्षाही नसते. पण त्याने संकटकाळी तुम्हाला केलेली मदत किती मोलाची होती हे लक्षात घेऊन प्रथम साध्या शब्दाने तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. शक्य असेल तर त्यांना काही भेटवस्तू देऊन सन्मानित करणे ही आणखी चांगली भावना !
ही सकारात्मक अशी उच्च दर्जाची शिकवण भारतीय संस्कृती देते, आपल्या स्वत:च्याच कल्याणासाठी.
अशी सकारात्मकता नेहमीसाठी असली तर तुमचे कोणतेच काम कधी अडत नाही. कारण तुम्ही कृतज्ञ असता ब्रह्मांडाशी ! म्हणजे जो देतो त्याच्याशी !
भूतकाळातील माझ्या अनेक आठवणी देव तारी त्याला कोण मारी अशाच आहेत. माझ्या सुदैवाने म्हणा अथवा भाग्याने…
बिरबलाची चातुर्यकथा – दुसर्यासाठी खड्डा खणला आणि आपण त्यात पडला.
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज म्हणजे १० डिसेंबर या दिवशी निधन झाले.
त्यानंतर खेळात रंग बाई होळीचा , पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा , सोळावं वरीस धोक्याचं , फड साभाळ तुऱ्याला ग आला , पाडाला पिकलाय आंबा ,लाडे लाडे बाई करू नका अशा एकापेक्षा एक लावण्या त्यांनी गायल्या. पट्ठे बापूराव, होनाजी सगनभाऊ , अनंत फंदी , परशुराम रामजोशी त्यांच्या लावण्या सुलोचनाबाईमुळे जिवंत होत होत्या तर दुसरीकडे ग. दि. माडगूळकर , पी. सावळाराम , राजा बढे , जगदीश खेबुडकर या गीतकारांच्या लावण्या सर्वोतमुखी झाल्या.१८५७ चे रणशिंग फुंकले गेले. कमांडर कोलीन कॅम्पबेल च्या नेतृत्वाखाली लखनऊ च्या सिकंदरबाग येथे ब्रिटिशांनी हमला केला. आपल्या तुकडीला योग्य ते मार्गदर्शन करून, ऊदा देवी जवळच्याच एका झाडावर चढल्या आणि तिथून ब्रिटिश सैन्यावर गोळ्या झाडू लागल्या. एकट्या ऊदा देवींनी ३० च्या वर इंग्रजी सैनिकांना मारले.
प्रयोगशील माणसे ही नेहमीच नव्याचा ध्यास घेत कार्यरत असतात. सुरेश वाघधरे हे नावसुद्धा शेतीत प्रयोग करणाऱयांमधील एक प्रमुख आहे. म्हणूनच त्यांच्या प्रयोगाची माहिती देणाऱया `केशर : सेंद्रियातून संजीवनी’ या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे प्रयोग केले प्रामुख्याने वीजनिर्मिती, शेण, गोमूत्र, स्लरी, खतनिर्मिती, सिंचनाची किफायतशीर पद्धत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून जे आपल्याला समजले ते दुसऱयाला सांगावे यानुसार शेतकऱयांसाठी माहिती त्यांनी अत्यंत खुलेपणाने उपलब्ध करून दिली आहे.
तुम्ही शेवटचे मनमुराद,खळखळून ,मोठ्याने कधी हसलाय ?गेल्या आठवड्यात ? गेल्या महिन्यात ? आठवतंय ?
मी काल रात्रीच हसलो. निमित्त होते “शहेनशहा ” सिनेमाचे. सवयीने चॅनल सर्फिंग करता करता अचानक, जगदीप मिनाक्षी शेषाद्रीच्या मसाज पार्लरमध्ये गेल्याचा प्रसंग सुरु असल्याचे माझ्या नकळत माझ्या डोळ्यांनी माझ्या बोटांना सांगितले आणि ते बेटे पुढे सर्फिंग करायचंच विसरले.
राहुल गांधींना उत्तर प्रदेशात अटक म्हणजे, राजकुमार आता प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कशी करायची याचे प्रॅक्टीकली धडे गिरवीत आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसे पाहायला गेले तर राजकुमारांना आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे राजकीय गुरु दिग्विजयसिंह आणि रीटा बहुगुणा, राजबब्बर या हाय प्रोफाइल राजकीय नेते मंडळीना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्येबाबत किती कळवळा आहे?
Copyright © 2025 | Marathisrushti