(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • टेलिफोन

    आमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची.

  • कृतज्ञता ब्रह्मांडाशी !

    दुसऱ्याचा अपमान करून क्षणभर आनंद घेऊन नेहमीसाठी आतल्या आत यातना भोगणे अशी नकारात्मकता निरर्थक आहे. याउलट भारतीय संस्कृती तुमच्याच सुखासाठी कृतज्ञतेचा संस्कार देते.

    एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने संकटात तुम्हाला मदत केली. त्याने ही मदत अगदी निरपेक्ष भावनेने केलेली असते. त्याला त्याबद्दल काही परत मिळावे ही अपेक्षाही नसते. पण त्याने संकटकाळी तुम्हाला केलेली मदत किती मोलाची होती हे लक्षात घेऊन प्रथम साध्या शब्दाने तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. शक्य असेल तर त्यांना काही भेटवस्तू देऊन सन्मानित करणे ही आणखी चांगली भावना !

    ही सकारात्मक अशी उच्च दर्जाची शिकवण भारतीय संस्कृती देते, आपल्या स्वत:च्याच कल्याणासाठी.

    अशी सकारात्मकता नेहमीसाठी असली तर तुमचे कोणतेच काम कधी अडत नाही. कारण तुम्ही कृतज्ञ असता ब्रह्मांडाशी ! म्हणजे जो देतो त्याच्याशी !

  • देव तारी त्याला कोण माती !

    भूतकाळातील माझ्या अनेक आठवणी देव तारी त्याला कोण मारी अशाच आहेत. माझ्या सुदैवाने म्हणा अथवा भाग्याने…

  • प्रिटोरिया – माझा सर्वोत्तम काळ – भाग १

    Standerton इथली खेळी संपली!! ती संपत असताना मला प्रिटोरियामध्ये नवीन नोकरी मिळाली होती पण ती join करण्याआधी, मी भारतात सुटीवर यायचे ठरले. येताना, मनात विचार आला, सुटीवर येत आहे तर महिंद्र कंपनीत “खडा” टाकून बघूया!! नाहीतरी महिनाभर तसा उद्योग नव्हता. महिंद्रने नुकताच साउथ आफ्रिकेत बिझिनेस सुरु केला होता, तेंव्हा त्यांना माणसांची गरज तर लागणारच, असा हिशेब मांडून एका मित्राच्या ( तो तिथे पूर्वी नोकरीला होता!!) ओळखीने, तिथल्या P.N.Shah या माणसाला भेटायला गेलो. वास्तविक,हातात नोकरी असल्याने,तसा जाताना बराच आत्मविश्वास होता. सुदैवाने, लगेच भेट मिळाली. प्राथमिक बोलणी चांगली झाली आणि साउथ आफ्रिकेहून पुढील आठवड्यातच, तिथला C.E.O. विजय नाक्रा आणि C.F.O. हेतल शाह इथे काही कामानिमित्त येणार आहेत, तेंव्हा त्यांच्याशी भेट घेऊन, पुढे ठरवायचे, असे ठरले. P.N.Shah बरोबर,सचिन आरोलकर म्हणून वरिष्ठ अधिकारी होता आणि त्याच्याबरोबर मला संधान बांधायचे ठरले. पुढील आठवड्यात, महिंद्र कॉर्पोरेट ऑफिसमध्येच माझी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्येच नोकरी पक्की झाल्याचे ठरले.
    अर्थात, भारतातली सुटी आनंदात गेली, तेंव्हा मी प्रिटोरिया शहरातील “लोडीयम” या उपनगरात रहात होतो. हेतलने, मला सांगितले की जसा, साउथ आफ्रिकेत येशील,तशी त्याला लगेच फोन करायचा. त्याप्रमाणे, जसा सकाळी मी, लोडीयम इथे पोहोचलो,तशी लगेच त्याला फोन केला. तोपर्यंत,मी “सेंच्युरीयन” हा भाग पाहिला देखील नव्हता आणि इथे, विशेषत: फ्रीवेवर रस्ता चुकला तर कमीत कमी १० किलोमीटरचा फटका!! त्यामुळे, त्याच्याकडून ऑफिसचा पत्ता व्यवस्थित घेतला आणि निघालो. वास्तविक रात्रभरचे विमान प्रवासाचे जागरण डोळ्यांवर होते तरीही महिंद्रमधील नोकरी, ही बाब मला उल्हसित करीत होती.प्रिटोरियामधील एक अतिशय सुंदर उपनगर म्हणजे सेंच्युरीयन!! क्रिकेटचे प्रसिद्ध स्टेडीयम इथलेच!!
    ऑफिसला गेलो त्यावेळी हेतल बाहेर गेला होता. त्याने, श्रीधर म्हणून एक कर्मचारी होता, त्याला भेटायचे, असा निरोप ठेवला होता. श्रीधर देखील, महिंद्र कॉर्पोरेट ऑफिसमधून इथे ट्रान्स्फर झालेला, माझ्यापेक्षा तरुण आणि हसमुख!! वास्तविक, मी पोहोचलो तेंव्हा जेवायची वेळ झाली होती तेंव्हा श्रीधर आणि मी बाहेर जेवायला गेलो. परत आलो, तेव्हढ्यात हेतल आला आणि माझ्या कामाचे स्वरूप नक्की झाले. रात्री परत गाडी घेऊन लोडीयममध्ये, मित्राच्या घरी!! परंतु, आता सेंच्युरीयन इथे नोकरी करायची म्हणजे तिथेच घर शोधणे आवश्यक!!
    रोज, साधारणपणे १०० किलोमीटर प्रवास करणे तसे कंटाळवाणे!! सुदैवाने, जिथे ऑफिस होते, तिथेच इको पार्क मध्ये घर मिळाले आणि लगेच shift झालो. साउथ आफ्रिकेत मी बऱ्याच शहरात राहिलो परंतु या Complex सारखी जागा त्यापूर्वी आणि नंतर कधीच मिळाली नाही. सुरक्षा व्यवस्था तर तोंडात बोट घालावी अशा दर्जाची, complex च्या समोर मॉल त्यामुळे खरेदी करायला जास्त लांब जायला नको!! वास्तविक, हा भाग अतिशय सधन लोकांच्या वस्तीचा आहे. त्यामुळे Infrastructure इतके सुरेख की मला भेटायला येणारी व्यक्तीदेखील खुश व्हायची.
    Complex चा स्वत:चा क्लब, पोहायचा तलाव, टेनिस कोर्ट (एकाचवेळी ३ सामने होऊ शकतील इतके मोठे) इत्यादी सोयी होत्या. समोरच्या मॉलमध्ये आयरिश पब, इटालियन हॉटेल्स आणि अर्थात Shoprite, Woolworth सारखी प्रचंड दुकाने. अर्थात, इथे मलाच घर घ्यायचे असल्याने, थोडेफार फर्निचर घेणे जरुरीचे होते, तसे लगेच घेतले. आता, ऑफिस आणि घर एकाच गल्लीत असल्याने, मला फारच सोयीचे झाले. Infrastructure वरून आठवण झाली, इथले रस्त्यांचे Planning इतके चोख असते की कॉम्प्लेक्समध्ये गाडी चालवायची तरी ३०, ४० च्या वेगाने नेता येते!! ऑफिसमध्ये, आम्ही भारतातून आलेले ५ जण आणि मी सहावा, वगळता बहुतेक सगळे गोरे!!
    त्यातील काहीजण तर आजही माझ्या संपर्कात आहेत, इतके की अधूनमधून आमचे फोनवर बोलणे होते, खासकरून, Natasha, James, Wendi यांच्याशी अजूनही चांगला संपर्क आहे. अर्थात, नेहमीप्रमाणे,सुरवातीला सगळेच असतात पण ओळख झाली की मग, मात्र मैत्री चांगली घट्ट होते. विशेषत: मी सेंच्युरीयन इथे नवीन आहे, म्हणून जेम्स मला त्याच्या गाडीतून हिंडवीत असे. मुंबईच्या मानाने प्रिटोरिया तसे लहान शहर आहे परंतु राजधानीचे शहर असल्याने देशात या शहराला राजकीय महत्व अधिक!!
    इतकी वर्षे, मी, मकरंद फडकेशी फोनवर बोलत असे परंतु आता तो जोहान्सबर्ग इथे रहात असल्याने, भेटीगाठी होण्याच्या शक्यता वाढल्या आणि पुढे तशा भरपूर झाल्या देखील. तसेच, जोहान्सबर्ग इथे माझा पुर्विचा मित्र,विनय असल्याने, त्याच्याशी भेटणे देखील व्हायला लागले. मकरंद तर इथे, याच शहरात १९९४ पासून असल्याने, इथला veteran!! Standerton च्या मानाने इथे थंडीचे प्रमाण तसे कमी!! म्हणजे -३,४ इतके नसून १,२ इतके!! मकरंद गाठीभेटी वाढल्या तशी, त्याच्याबरोबरचे, सुहास ओक,वैभव पोरे, बंटी( शाह) या तरुण मित्रांशी ओळखी झाल्या. पुढे यात अशोक,राजेश असे थोडे वयस्कर मित्र येउन मिळाले. महिन्यातून एकदा भेटायचे,असा आमचा अलिखित झाला. तसे,कधीकधी १,२ आठवड्यातून देखील भेटायचो, भेटीचे ठिकाण शक्यतो एखादा मॉल, म्हणजे तिथे जेवण-खाणे आणि एखादा सिनेमा!! कधीकधी कुणाच्या घरी देखील भेटीगाठी व्हायच्या.
    मी, एक बाब स्पष्टपणे बघितली, म्हणजे आम्ही अंतराने भेटायचो, पण गप्पांचे विषय तसे ठराविक!! राजकारण हमखास, त्यातून इथे आम्हाला NDTV 24, हे Channel बघायला मिळत असल्याने,भारताच्या बातम्या अद्ययावत कळायच्या. मला तसा राजकारणाचा मुळातून कंटाळा!! त्यामुळे बरेचवेळा मी ऐकण्याची भूमिका बजावत असे!! इथे, तोपर्यंत आणि पुढे मराठी मंडळात सक्रिय सहभागी झालो,परंतु कुणालाही साहित्य,संगीत,वाचन अशा बाबतीत फारसा रस नसायचा त्यामुळे मला नेहमीच “कानकोंडे” व्हायचे. त्यातून, बरेचवेळा ऑफिस आणि “मी किती मोठा” या विषयावर गाडी यायची,आणि मला तर याचा तिटकारा!! माझे म्हणणे असे, आपण दिवसातला बराचसा वेळ ऑफिसमध्ये देतो, मग एकदा ऑफिस सुटल्यावर परत त्याच विषयाचे चर्वितचर्वण कशाला !! पण, हे सगळीकडे चालत असते, मीच misfit!!
    अर्थात, इथे आपल्याला बरीच भारतीय माणसे भेटत आहेत,याचाच खरा आनंद व्हायचा. त्यातून, सुहास ओकला संगीतात चांगली गती होती,पण फारशा गप्पा झाल्या नाहीत कारण आम्ही भेटायचो ते सगळे एकत्र !! इथले मराठी मंडळ मात्र चांगले आहे, अर्थात, अमेरिका/युरपच्या मानाने इथे फारशी मराठी मंडळी नाहीत परंतु जी आहेत, ती एकमेकांना धरून आहेत!! त्यातही एक बाब गमतीची, दर वर्षी मंडळाची कार्यकारिणी ठरवली जायची आणि त्यानुसार कार्यक्रम ठरवले जायचे. प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होताना, कार्यकारी मंडळाचे सदस्य वगळता, ठराविक मंडळी (च) एकत्र यायची!! म्हणजे, जोहान्सबर्ग इथे जवळपास ३०० कुटुंबे आहेत पण कार्यक्रमाला येणाऱ्यांची संख्या असायची जास्तीतजास्त २० कुटुंबे!! प्रत्येकवेळेस काहीना काहीतरी कारणे ऐकायला ऐकायला मिळायची, काहीजण तर चक्क “टीका” करायचे!!
    तरीही, मी, राजीव तेरवाडकर, आदित्य, प्रशांत, विनय कुलकर्णी, मुसळे इत्यादी एकत्र जमत असू!! अर्थात, माझ्या सध्याच्या बातमीनुसार यात अजूनही फारसा फरक नाही. गंमतीचा भाग असा, एकीकडे “आमचे मराठी मंडळ” म्हणून ढोल वाजवायचा परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमात मात्र, न येण्याची शेकडो कारणे सांगायची!! असे दुटप्पी वागणे, बरेचवेळा मनाचा त्रागा करायचे!! वास्तविक, आमचे कार्यक्रम वर्षाला ५ ते ६ इतकेच असायचे, प्रत्येक कार्यक्रमाची कमीतकमी दोन महिने आधी तयारी व्हायची तरीही आयत्या वेळेस, कार्यक्रमाकडे “पाठ” फिरवायची!!
    - अनिल गोविलकर

  • बिरबलाची चातुर्यकथा – दुसर्‍यासाठी खड्डा खणला आणि आपण त्यात पडला.

    बिरबलाची चातुर्यकथा – दुसर्‍यासाठी खड्डा खणला आणि आपण त्यात पडला.

  • लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण

    लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज म्हणजे १० डिसेंबर या दिवशी निधन झाले.
    सुलोचना शामराव चव्हाण म्हणजेच सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुबंईत झाला. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी चौथी पर्यंत झाले. वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली " सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची " ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे . मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता "श्रीकृष्ण बाळमेळा". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले
    संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते "कृष्ण सुदामा". पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी फ्रॉकमध्ये गेलो होतो अशी आठवण देखील त्या आवर्जून सांगतात. या नंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत सी. रामचंद्र . पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या "भोजपुरी रामायण" गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचनाबाईंच्या आयुष्यातील आठवणींपैकी ही एक अतिशय महत्त्वाची आठवण. सुलोचनाबाईंचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या "हीच माझी लक्ष्मी" या चित्रपटात गायली. संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी चित्रित झाली होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. आचार्य अत्रे यांनीच त्यांना "लावणीसम्राज्ञी" असा किताब दिला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे पाहिले गाणे ध्वनिमुद्रित झाले, ते होते ' कृष्णसुदामा ' या चित्रपटासाठी. या चित्रपटास श्यामसुंदर पथक आणि भट्टाचार्य या जोडीने त्यांना प्रथम गायनाची संधी दिली. सुलोचनाबाईना कोणी गुरु नव्हता, सर्व काही उपजत होते त्या दहा वर्षाच्या असताना हानी, उर्दू, गुजराथी नाटकातून भूमिका करायला लागल्या. त्यांनी आधी हिंदी गाणी गायली . त्यांची १९४७ मधील ' मौसम आया है रंगीन ' , किसी मजबूर का जलता हुआ घर देखते जाना ' या गाण्यांचे आजही रसिक दिवाणे आहेत. एकदा त्यांना लखनौहून त्यांच्या पहिल्या गाण्यापासून म्हणजे १९४७ ते १९७५ पर्यंतच्या गाण्याची लिस्ट पाठवली होती , आणि त्याचे गीतकार कोण होते, संगीतकार कोण होते , गीतकार कोण होते त्याची ती लिस्ट होती. परत त्याच्याकडे ते गाणे रेकॉर्ड केलेले होते , प्रत्येकी ३०० रुपये देवून . असे त्यांचे चाहते सर्वदूर पसरले आहेत अगदी पाकिस्तानमध्येही . त्यांनी मुबई , दिल्ली , इंदोर , काश्मीर भारतभर दौरे केले. बेगम अख्तरीबाई सारख्या महान कलाकाराला सुलोचनाबाईच्या गजल , भजनाने पार भरवून टाकले. त्यांच्या सुरांची जादू पाकिस्तानही पसरली .' मेरे नसीबमें खुशिया नही जमानेकी । तुम्ही कहो ये बात क्या है भूल जाने की । या गजलांच्या रेकॉर्डस् आजही पाकिस्तानात आहेत, एच .एम .व्ही . ने त्या खास पाकीस्तानसाठी करून दिल्या होत्या. पुढे डी .पी . कोरगावकर , वसंत पवार , राम कदम , बाळ पळसुले , तुकाराम शिंदे अशा अनेक संगीत दिग्दर्शकाच्या लावण्याची बरसात सुरु झाली. सुलोचना चव्हाण यांनी १९५३-५४ च्या सुमारास "कलगीतुरा" या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव " एस. चव्हाण " होते. म्हणजेच श्यामराव चव्हाण , पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाबाईंचे लग्न झाले आणि सुलोचना कदम या सुलोचना चव्हाण झाल्या. श्यामराव चव्हाण यांना संगीताची आवड तर होतीच ते तबलाही उत्तम वाजवत. त्यांनी सुलोचनाबाईनां लावणी गाण्याचे शात्रशुद्ध प्रशिक्षण दिले , म्हणून त्या आपल्या पतीनाच गुरु मानतात.या दरम्यानच " रंगल्या रात्री अशा " या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि " नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची " या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यातूनच खर्या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातून ठसका व खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाणांइतके कुणीच उत्तम करू शकलेले नाही. " पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे " असे सुलोचना चव्हाणांचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच.
    त्यानंतर खेळात रंग बाई होळीचा , पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा , सोळावं वरीस धोक्याचं , फड साभाळ तुऱ्याला ग आला , पाडाला पिकलाय आंबा ,लाडे लाडे बाई करू नका अशा एकापेक्षा एक लावण्या त्यांनी गायल्या. पट्ठे बापूराव, होनाजी सगनभाऊ , अनंत फंदी , परशुराम रामजोशी त्यांच्या लावण्या सुलोचनाबाईमुळे जिवंत होत होत्या तर दुसरीकडे ग. दि. माडगूळकर , पी. सावळाराम , राजा बढे , जगदीश खेबुडकर या गीतकारांच्या लावण्या सर्वोतमुखी झाल्या.
    सुलोचना चव्हाण यांनी समाजकार्यातही स्वतःला झोकून दिले होते . कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातील मोठा हिस्सा धार्मिक निधीसाठी एखादा मदतनिधी उभा करण्यासाठी वापरतात. त्यांना जे पुरस्कार मिळत त्यातील काही भाग गरजूंसाठी उपलब्ध करून देत.
    काही वर्षापूर्वी माझा कार्यक्रम आणि स्वाक्षरी प्रदर्शन पार्ल्यातील ' मॅजेस्टिक गप्पा ' मध्ये होते तेव्हा त्यांनी माझ्या स्वाक्षरीच्या प्रदर्शनाला भेट दिली होती.
    ' मल्हारी मार्तंड ' या चित्रपटासाठी त्यांना लावणी गायिकेचा सन्मान मिळाला, पी. सावळाराम-गंगा जमना ' पुरस्कार , त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रातील अत्यंत मनाचा समाजाला जाणारा ' लता मंगेशकर ' पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले . आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे पुढेही तशीच राहील . खूप संकटे आली परंतु त्यांनी त्यांना तोंड दिले. स्वतःचे आजार चालूच होते , त्या मुंबईमध्ये गिरगाव भागात आपले आयुष्य शांतपणे व्यतीत करत असत त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले होते. आज १० डिसेंबर २०२२ रोजी ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
    --सतीश चाफेकर
  • भारतमातेच्या वीरांगना – 8 : उदा देवी (नेमबाज वीरांगना)

    १८५७ चे रणशिंग फुंकले गेले. कमांडर कोलीन कॅम्पबेल च्या नेतृत्वाखाली लखनऊ च्या सिकंदरबाग येथे ब्रिटिशांनी हमला केला. आपल्या तुकडीला योग्य ते मार्गदर्शन करून, ऊदा देवी जवळच्याच एका झाडावर चढल्या आणि तिथून ब्रिटिश सैन्यावर गोळ्या झाडू लागल्या. एकट्या ऊदा देवींनी ३० च्या वर इंग्रजी सैनिकांना मारले.

  • केशर-सेंद्रियातून संजीवनी – (पुस्तक परिक्षण)

    प्रयोगशील माणसे ही नेहमीच नव्याचा ध्यास घेत कार्यरत असतात. सुरेश वाघधरे हे नावसुद्धा शेतीत प्रयोग करणाऱयांमधील एक प्रमुख आहे. म्हणूनच त्यांच्या प्रयोगाची माहिती देणाऱया `केशर : सेंद्रियातून संजीवनी’ या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे प्रयोग केले प्रामुख्याने वीजनिर्मिती, शेण, गोमूत्र, स्लरी, खतनिर्मिती, सिंचनाची किफायतशीर पद्धत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून जे आपल्याला समजले ते दुसऱयाला सांगावे यानुसार शेतकऱयांसाठी माहिती त्यांनी अत्यंत खुलेपणाने उपलब्ध करून दिली आहे.

  • हसावेसे वाटले म्हणून

    तुम्ही शेवटचे मनमुराद,खळखळून ,मोठ्याने कधी हसलाय ?गेल्या आठवड्यात ? गेल्या महिन्यात ? आठवतंय ?
    मी काल रात्रीच हसलो. निमित्त होते “शहेनशहा ” सिनेमाचे. सवयीने चॅनल सर्फिंग करता करता अचानक, जगदीप मिनाक्षी शेषाद्रीच्या मसाज पार्लरमध्ये गेल्याचा प्रसंग सुरु असल्याचे माझ्या नकळत माझ्या डोळ्यांनी माझ्या बोटांना सांगितले आणि ते बेटे पुढे सर्फिंग करायचंच विसरले.

  • राहुल गांधींची स्टंटबाजी

    राहुल गांधींना उत्तर प्रदेशात अटक म्हणजे, राजकुमार आता प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कशी करायची याचे प्रॅक्टीकली धडे गिरवीत आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसे पाहायला गेले तर राजकुमारांना आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे राजकीय गुरु दिग्विजयसिंह आणि रीटा बहुगुणा, राजबब्बर या हाय प्रोफाइल राजकीय नेते मंडळीना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्येबाबत किती कळवळा आहे?