वकील जातचं लय चतूर
प्रसंग - काल सकाळी...
स्थळ - सांगली स्टेशन...
फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच.
कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी...
एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली...
"तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!"
वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन काढला...
त्यावर लिहीलं...
"मी मुकबधीर आहे...मला बोलता येत नाही ;ऐकू येत नाही... तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते या कागदावर लिहून द्या.."
बाई जे बोलली ते तिनं लिहून दिलं...
त्या वकीलांनी ते वाचलं...
कागदाची घडी करुन खिशात ठेवला आणि म्हणाले..
"हं...
बोंबला जोरात आता कि मी तुमची छेड काढली म्हणून,
माझ्याकडे तुमच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी आहे पुरावा म्हणून "
बाई पळाली ना सैराट !!!!
वकिलांचा नाद करायचा नाय !
एकदाची आमची गाडी मलकापूर कडे निघाली , वाटेत एकदोन वेळा चहा पाणी घेण्यासाठी थांबलो तेव्हा मी लघवीच्या निमित्ताने थोडे दूर जाऊन बिडी ओढत होतो . ( अगदी सुरवातीला मी जेव्हा ११ वी ता असतांना धुम्रपान सुरु केले होते तेव्हा आधी एकदम भारी भारी सिगरेट्स ओढत होतो , डनहिल , रोथमन्स , ५५५ , मोर छाप , अवंती चिरूट वगैरे सगळे प्रकार ओढत झाले होते .. धुम्रपान हे व्यसन बनल्यावर मग विल्स , ब्रिस्टॉल . फोरस्क्वेअर , विल्सफ्लेक , वगैरे पुढे मग पिवळा हत्ती ,कुल , चारमिनार असा उतरता प्रवास करत शेवटी मी आर्थिक परिस्थितीमुळे गणेश बिडी , संभाजी बिडी यावर येऊन स्थिरावलो ) .अर्थात मी जरी दूर जाऊन लपून बिडी पीत असलो तरी बिडीचा उग्र वास काही लपत नाही म्हणून त्यामूळे मी बिडी ओढली की हळूच गुपचूप येऊन गाडीत बसत होतो , मनात सारखी धास्ती असे की गाडीतील कोणाला आपण बिडी ओढतो हे समजायला नको , सकाळी सकाळी ब्राऊन शुगर चा डोस भरपूर घेतल्यामुळे आता एकदम मलकापूर ला पोचल्यावरच रात्री पुन्हा ब्राऊन शुगर घ्यायची हे ठरवले होते . रात्री साधारणतः १२ वाजता आम्ही मलकापूरला पोचलो , गाडीच्या व्यवस्थापकाने नेहमीच्या लॉजवर मुक्काम करण्यासाठी २ खोल्या बुक केल्या होत्या .
सगळे सामान खोलीत नेल्यावर आधी मी लॉजच्या संडासात शिरलो आणि माझा चेसिंगचा कार्यक्रम सुरु केला . ( आधी ब्राऊन शुगर मी चीलीमित थोडी टाकून ओढत असे , मग सिगरेट मध्ये तंबाखू बरोबर मिसळून पीत होतो आणि नंतर जास्त नशा येते म्हणून चेसिंग सुरु केले होते , चेसिंग म्हणजे सिगरेटच्या पाकिटात जो बेगड किवा चांदीचा कागद येतो त्यावर ब्राऊन शुगरची तपकिरी पावडर टाकून मग त्या ठिकाणी चांदीच्या खालून काड्यापेटीची काडी पेटवून त्याला आंच द्यायची की त्या पावडरचे काळ्या रंगाच्या घट्ट पण प्रवाही अश्या द्रवात रुपांतर होते मग तो चांदीचा कागद ज्याला पन्नी म्हणतात तो हळू हळू वरखाली करत जायचे व त्या काळ्या द्रवातून जो धूर बाहेर पडतो तो तोंडात ठेवलेल्या कागदाच्या पुंगळीतून तोंडात ओढायचा , मग तो धूर तसाच छातीत भरून ठेवून वर ऐक बिडीचा झुरका मारून छातीतच दोन्ही धूर मिसळायचे आणि मग ते एकत्र बाहेर सोडायचे , खूप किचकट प्रकार होता पण त्याने लगेच नशा येत असे व नंतर सवयीने ही प्रक्रिया एकदम सोपी झाली होती ) झटपट चेसिंग करून मी परत रुमवर आलो आणि मग इस्माईल भाईशी गप्पा मारत झोपी गेलो .
दुसऱ्या दिवशी पण सर्वांच्या आधी उठून मी चेसिंग केले आणि मग स्नान वगैरे उरकून आम्ही बाहेर पडलो , आम्हाला जेवण , नाश्ता वगैरे साठी रोज २५ रुपये इतका भत्ता मिळत असे हे पैसे रोज सकाळी व्यवस्थापक आमच्या हातात ठेवत असे मग त्यात आम्हाला जे हवे ते आम्ही खाऊ पिऊ शकत होतो . मी पहिले की ते सगळे लोक सकाळीच भरपूर नाश्ता करून घेत होते व मग रात्री एकदम जेवण करत होते , मी देखील तेच केले . मग आम्ही जवळच्या एका गावी पोचलो , जसे गाडीने गावाची वेस ओलांडली तसे इस्माईल भाईनी स्पीकर वरून बोलण्यास सुरवात केली ' आला आला आला , उंट आला , बक्षीस घेऊन आला , चला चला लवकर चला , बक्षीस घ्यायला चला , ' बोलताना ते एफ एम रेडीओ वर जसे रेडीओजॉकी बोलतात तसे आवाजात सुंदर चढ उतार करत होते , मध्येच ' जो वादा किया वो निभाना पडेगा, हेव इतर गाणी गुणगुणत होते स्पीकरवरून येणारे हे आवाज आणि आवाहन एकूण गाडी भोवती लहान मुले त्यांचे पालक अशी गर्दी जमत असे मग लगेच इस्माईल भाई ती बक्षिसाची योजना जाहीर करून १ रु . ला १ बिडी बंडल विक्रीला सुरवात करत जमलेले लोक बिडीबंडल घेतला की तो फोडून त्यातील चिठ्ठी काढून त्यातील नंबर सांगत आणि इस्माईल भाई त्यांच्या जवळ ठेवलेल्या वस्तूंमधून जो नंबर असेत ते बक्षिश त्या व्यक्तीला देत .
खूप झुंबड उडत असे गाडीभोवती व या गर्दीत सर्वाना बरोबर गाडीच्या खिडकीतून बिडी बंडल विकणे , सुटे पैसे परत देणे , आणि बक्षिश देणे हे सगळे झटपट करावे लागत असे , इस्माईल भाई १० वर्षापासून हे काम करत असल्यामुळे ते अगदी सराईत पणे हे करत , त्यांनी मला आधीच सांगून ठेवले होते की मी त्यांच्या कडे पाहून हे सगळे शिकायचे आहे .त्या मुळे मी बारकाईने त्यांचे निरीक्षण करत होतो व त्यांना जमेल तशी मदतही करत होतो . पुढच्या गावात गेल्यावर त्यांनी माईक माझ्या हाती दिला व म्हणाले आता तू बोल स्पीकरवरून मी देखील लगेच सुरु केले ' आला आला आला , उंट आला .." वगैरे ते खुश झाले माझ्यावर .माझी ग्रहणशक्ती चांगली असल्याने मला ते काम शिकण्यास वेळ लागला नाही .
दिवसभर आम्ही एकूण ५ गावे फिरलो , मध्ये एका मोठ्या गावात आम्ही चहा पाणी केले होते . दिवसभर मिळून एकूण २०० बंडल्स ची विक्री झाली होती अर्थात दिवसभरात कोणालाही बादली बक्षीस मिळाली नाही . रात्री परत लॉजवर आल्यावर मी आधी संडासात शिरलो चेसिंग करायला , परत आल्यावर इस्माईल भाईनी मला विचारले ' आपका पेट खराब हुंवा है क्या ? आप जैसे ही मौका मिलता है टॉयलेट जा रहे हो " मी त्यांना हो असे उत्तर दिले . मला या सगळ्या लोकांसमोर सभ्य मुलासारखे वागणे कठीण जात होते ,प्रत्येक वेळी बिडी ओढताना दूर जावे लागे तसेच चेसिंगच्या वेळी जास्त वेळ संडासात बसावे लागे ही कसरत अवघडच होती पण ते करणे भाग होते कारण माझ्या सोबत असलेल्या कोणालाही कसलेही व्यसन नव्हते आणि तो माझा प्रशिक्षणाचा कालावधी होता त्यामूळे माझ्याबद्दल सगळ्यांचे मत चांगले व्हावे असा माझा प्रयत्न होता .
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
डोंगरदर्यामधून वस्ती करणारा, आधुनिक, नागरी-शहरी संस्कृतीपासून दूर राहून निसर्गाच्या कुशीत रमणारा आदिवासी समाज. निसर्ग हीच त्याची देवता.
प्रत्येक व्यक्ती ही कुटुंब, गाव / शहर व देश यांची घटक असते. आपले दैनंदिन जीवन व्यतित करीत असताना आपण काही नियमांनी या तिन्ही पातळींवर बांधलेले असतो. आयुष्यात संधी तसेच समस्या, अडचणी प्रकट होत राहतात. परिस्थितीचे आकलन करून आपण संधीचा वापर करतो तर अडचणींचे निराकरण करतो. हे करत असताना नियमांच्या चौकटीत राहावे लागते. कुटुंबाचे नियम असतात, शहर व देश यांचे कायदे असतात. स्वतः व कुटुंब या पातळीवर, बाधित घटक व निर्णय घेणारे घटक मर्यादित असतात. पण गाव / शहर आणि देश या पातळीवर जेव्हा समस्या उद्भवतात, तेव्हा अनेक अंगांनी विचार करावा लागतो. उपायांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करावी लागते.
समस्यांचे निवारण करताना आपण योग्य तेथून मदत घेतो. उदाहरणार्थ, आजार, दुखणे यासाठी डॉक्टरांची मदत, दुरुस्तीसाठी तंत्रज्ञाची मदत आपण घेत असतो. दृष्टीदोष बारा करण्यासाठी आपण हृदयरोगतज्ञाकडे जात नाही, तो डॉक्टर असला तरी. आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही ही समस्या वैयक्तिक पातळीवर ओळखणे सोपे असते. पण शहरापुढील अडचणींचे मूळ कशात आहे हे सहजासहजी समजू शकत नाही. व्यापक विचार करून ते शोधावे लागते. एकदा ही निश्चिती झाली की उपाय ठरविता येतात. आपल्या देशात समस्या अगणित आहेत. त्यामुळे गुंतागुंत जास्त आहे. काही बाबतीत समस्येचं मूळ शोधणं सोपं नाही. जिथे समस्या व तिचे मूळ सुस्पष्ट आहे तिथे तरी उपाय लागू पडल्याचे दिसले पाहिजे. पण पुष्कळ ठिकाणी अंमलबजावणी तोकडी पडते. कारणे काहीही असोत. उत्तरदायीत्व न जुमानणारे हे अशा उपायांना बाधा आणतात.
जिथे समस्या व तिचे मूळ याविषयी संदेह असतो तिथे, थातुरमातुर उपायांची मलमपट्टी केली जाते. काहीतरी कृती घडते आहे असे भसविले जाते. यामुळे अशी परिस्थिती काही काळाने पुन्हा उद्भवते. मराठी पत्रकारितेत याची, "... प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे" अशी बातमी बनते. ही ऐरण अनेक प्रश्नांना आपल्या पाठीवर वागवीत असते. रंगमंचावर जसा संवाद म्हणणार्या कलावंतावर प्रकाशझोत पडतो, तसा वेगवेगळा प्रश्न प्रकाशझोतात येत राहतो. आपली भूमिका झाली की कलाकार मंचावरून 'Exit' घेतो. पण ऐरणीवरच्या प्रश्नांना 'Exit' चा दरवाजा सहसा दिसत नाही.
'ऐरण' या शब्दाचा जोडीदार आहे 'घण'. हे दोघे एकमेकावाचून निरुपयोगी. ऐरणीवर असलेल्या प्रश्नावर योग्य जागी घण पडला तर उपाय यशस्वी होऊ शकतो. पायाला गँगरीन झाले असताना हात कापणे हा उपाय असु शकत नाही. तसे झाले तर घाव भलत्याच ठिकाणी पडला असे म्हणावे लागेल. 'आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी’ हा वाक्प्रचारही पत्रकारितेत खूप प्रसिद्ध आहे. आपल्या देशात या दोन वाक्प्रचारांचा वापर करता येण्यासारखी परिस्थिती वारंवार उद्भवते. उदाहरणार्थ, '... घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे', '... बुडून झालेल्या मृत्यूंमुळे जलपर्यटन पुन्हा ऐरणीवर आले आहे', '... पेपरफुटीमुळे बोर्डाच्या क्षमतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे'. अशा असंख्य घटना सर्व क्षेत्रांना स्पर्शून जातात. घण व ऐरण यांची जिथे भेट होते तिथे समस्येचं योग्य कारण असलं तरच उपयोग असतो. समस्या तशीच राहण्याची कारणं पुढीलप्रमाणे असु शकतात.
१. समस्येचं मूळ समजलेलं नाही, त्यामुळे घावही नाही (अज्ञानात आनंद).
२. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपाय शोधण्याची इच्छा नाही (वैचारिक दारिद्र्य).
३. समस्येचं मूळ समजलेलं आहे, उपाय करण्याची इच्छा आहे, पण घाव वर्मी बसत नाही (सदोष अंमलबजावणी).
४. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपायाचं नाटक करायचं आहे. समस्या ऐरणीच्या एका बाजूला व घाव दुसरीकडे पडत आहे (उपायाचा आभास).
पावसाळ्यात मुंबईत ठराविक ठिकाणी पाणी साचणे, रेल्वे रुळ पाण्याखाली जाणे या गोष्टी दरवर्षी घडाव्याच लागतात. बोअरवेलमधे लहान मूल अडकणे, सेलिब्रिटीजना विशेष सवलती मिळणे यांची बातमी व्हावीच लागते. त्यांना ऐरणीवर यावेच लागते. काही प्रश्न सोडविण्यासाठी नसतात. तसे झाले तर काम काय राहील घण मारणाराला?
अव्यवस्था दूर केली तर सामान्याचे जीवन सुखी होईल, पण अव्यवस्थेमुळे ज्यांना रोजगार मिळत होता ते बेकार होतील. गुटका खाउन कितीही मेले तरी चालतील, पण गुटक्याचा कारखाना बंद झाला तर जे बेकार होतील त्यांचे काय? रस्ते चांगले झाले तर गॅरेज कशी चालतील? गाडीचे सुटे भाग बनविणारांनी काय करायचं? शाळेतच शिक्षण मिळालं तर क्लासवाले उपाशी राहतील त्याचं काय? अशा प्रकारे एक प्रश्न सोडवताना दुसरा उद्भवेल. म्हणजे प्रश्न आहेच. ‘मग आहे तो प्रश्न तसाच राहिला तर काय बिघडले’ ही वृत्ती बळावते आहे. अशा परिस्थितीत गळ्याशी आल्यावर धावाधाव करणे आले. आपल्या देशापुढील समस्या कोणत्या क्रमाने व कशा सोडवायच्या हा मोठा प्रश्न आहे. सुजाण नागरिकत्व अंगी बाणल्याशिवाय कोणतेही उपाय निरुपयोगी ठरतील, आणि हेच सर्वात कठीण आहे.
खूप वर्षांपूर्वी ‘साधी माणसं’ या मराठी चित्रपटातील एक गीत प्रसिद्ध झाले, ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे ...’. पण आता, ‘ऐरण, घण व समस्या’ यांचा समन्वय साधता आला नाही तर म्हणावे लागेल, ‘ऐरणीच्या देशा तुला प्रश्न प्रश्न पडू दे ...’.
- रवि गांगल
जगभरातील निवडक लोकांना जगबुडीच्या संधर्भात विचारलेल्या निवडक प्रश्नांची आलेल्या उत्तरा वरून काढलेला हा निष्कर्ष.
आतापर्यंत होळी आणि रंगपंचमी कशी साजरी होत आली आहे ते आपण बघत आलो आहोत. पण सध्या राज्यात दुष्काळ आहे पाण्यासाठी गावागाडील लोकांना वण वण भटकावे लागत आहे म्हणून त्यावर एक विचार कवितेतून.
26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यामुळे समाजाची झोप उडाली नाही. आज समाजाचे व्यवहार प्रचंड अर्थकेंद्री बनले असल्याने आजूबाजूला घडणार्या दुर्दैवी घटनांची नोंद एका मर्यादेपर्यंतच घेतली जाणार असेल तर एकसंघ समाज म्हणून आपण देशापुढील समस्यांना कधी आणि कसे सामोरे जाणार याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
मुली कशा खूप बडबड करतात, हक्काने राग, लोभ, प्रेम व्यक्त करतात. पण मुलांना हे जमत नाही तर आपण त्यांना गृहितच धरू लागतो ……म्हणून मुलग्यांचं कौतुक करण्यासाठी ही खास पोस्ट.
निर्भया, कोपर्डी, कठुवा, उन्नाव, सुरत ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अशा अनेक घटना सातत्याने देशभर घडत असतात. यातील बहुतांश प्रकरणामधील आरोपींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. म्हणजेच त्यांनी आधी देखील छोटेमोठे गुन्हे केले होते परंतु त्यांना तेव्हाच कठोर शिक्षा होऊन अद्दल घडली नाही. आणि म्हणून ते शिरजोर होत गेले. अश्या छोट्याछोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा जेव्हा कठोर शिक्षेची हमी निर्माण होईल, तेव्हा गुन्हेगारीला आळा बसणं सोपं होईल.अर्थात ही प्रक्रिया सोपी नाही. परंतु बलात्कार थांबवायचे असतील तर…”व्यवस्थापरिवर्तन”साठी मेहनत तर घ्यावीच लागेल..!!!
देशाची फाळणी झाली व सन १९४७ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीर राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली .त्यांनी अमानुष अत्याचार, सामुहिक हत्याचे सत्र घडविले संपूर्ण काश्मीर खोऱ्यात दहशतीचे वातावरण पसरविले
Copyright © 2025 | Marathisrushti