(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गुंतवणूक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर

    दिवाळीच्या निमित्ताने चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची प्रथा श्रद्धेने पाळली जाते. सोने, शेअर्स, मालमत्ता यातील गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देतेच, पण सोन्यातील गुंतवणुकीकडे भावनिक दृष्टीकोनातून पाहणे बंद करायला हवे. या बरोबरच अलिकडे चांगल्या कलाकृतींमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड येऊ घातला आहे. या ट्रेंडचाही विचार करायला हरकत नाही.

  • सुखकर्ता दुखहर्ता ः आरती

    सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।

  • भगवा……

    सद्या होणार्या बेताल वक्तव्याचा घेतलेला एक वेध किवा त्याचा एक उत्तर

  • माणसाला प्रेरणा अधिक सुंदर जगण्याची …

    थोरो म्हणतो त्याप्रमाणे तत्त्वज्ञानी होणे म्हणजे सूक्ष्म विचार जवळ असणे नव्हे किंवा एखादा पंथ किंवा संप्रदाय स्थापणे नव्हे! तर ज्ञानावर अपार प्रेम करणे व तद्‌नुरूप वागणे. साधे, स्वतंत्र उदार श्रद्धेचे जीवन जगणे होय. बेकन म्हणतो, प्रथम मनाच्या मंगल गोष्टी शोधा. त्या मिळवल्या म्हणजे उरलेसुरले आपोआपच मिळेल किंवा ते मिळाले नाही तरी त्याची खंत राहणार नाही. सत्य आपणास श्रीमंत करणार नाही; परंतु मुक्त मात्र करील. परंतु, कवी किट्‌सचे म्हणणे मात्र वेगळे आहे. सौंदर्यच सत्य आणि सत्यच सुंदर आहे. जीवनाचे रहस्यमय सौंदर्य नष्ट करण्याचे काम तत्त्वज्ञान करते. जीवनात सौंदर्य कशात आहे, तर त्याच्या रहस्यमयतेत आहे. म्हणून तर रामायण, महाभारत, होमरचे इलियड यांतील सौंदर्य कमी झाले नाही. शेक्‍सपियरने तर सर्व जगाला कवेत घेतले. पलीकडल्या झाडीत जो पक्ष्यांचा जीवनोत्सव चालला आहे, त्यात मला भाग घेता येत नाही, म्हणून मी कितीतरी वेळा अस्वस्थ झालो आहे. याला सुखवाद म्हणावे, कष्टवाद

  • भारतमातेच्या वीरांगना – ३१ – ननीबाला देवी

    एक क्रांतिकारी श्री रामचंद्र मजुमदार एकदा तुरुंगवासात होते, अटक झाली तेव्हा ते आपल्या जवळचे पिस्तुल कुठे लपवले आहे हे आपल्या सहकाऱ्यांना सांगू शकले नाही. ननीबाला देवींने प्रवाहा विरुद्ध जायचे ठरवले. त्यांनी श्री रामचंद्र मजुमदार ह्यांची पत्नी बनून त्यांना भेटायला जाणे सुरू केले. हळूच बोलण्यातून त्यांनी माहिती पुरवली आणि ननीबाला देवींनी ती माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोचती केली.

  • करलो दुनिया मुठ्ठिमेचा अर्थाअर्थी अर्थ

    ज्येष्ठ दादा अंबाणी चिकन बिझिनेसमध्ये उतरल्याने ज्या अभिजनांना सारं काही ब्रँडेडच हवं असतं आणि जे त्यांचं स्टेटस सिम्बॉल असतं त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. पुण्यातल्या अभिजनांसाठी खाईन तर चितळेंचीच बाकरवडी अन्यथा नो वे. म्हणजे असं की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी,अशी ब्रँडेडच हवं असं वाटणाऱ्यांची किमान चिकनच्या बाबत तरी (दाखवण्यापुरती )सध्यस्थिती आहे.

  • डॉ. बच्चन यांचा ‘मॅक्बेथ

    अशाच एका वाढदिवशी डॉ. बच्चन व तेजी बच्चन इंदिराजींना भेटायला आली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. हरिवंशराय बच्चन यांचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेला येई. त्यांनी २७ तारखेला इंदिराजींना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.

  • सासू सून संवाद (३)

  • अधिष्ठान

    काढून टाका ताई ते चाफ्याचं झाड...पार वठून गेलंया !
    घरामागच्या मोकळ्या जागेत, वाढलेलं गवत काढायला आलेले वयस्कर काका म्हणाले.आता काय ते पुन्यांदा फुटणार नाही...उगाच बोडक्या अंगाने उभय झालं कवाधरनं!
    गेल्या येळेस तुमाला म्हणलो हुतो मी...ते काय पुन्यांदा फुटायचं नाही.

    उगा आळं आडवून ठेवलया. खिडकीतून बघणाऱ्या सासूबाई ऐकतच होत्या...अरे बाबा,तू गेल्या वर्षीपासून म्हणतोयस,आम्ही गेली चार पाच वर्षे झाली तिला सांगतोय...पण ऐकेल तर खरं!त्यांनी फणकाऱ्याने मला सुनावलंच.
    ते काढून दुसरं लावलं असतं तर एव्हांना फुलं येतं झाड झालं असतं.पण त्या वठलेल्या झाडाला पाणी घालणाऱ्यास न बोलणंच बरं.उगाच वाद होतात मग...त्या खिडकीपासून बाजूला होत बोलल्या.

    वठलंय काका ते झाड,मलाही दिसतंय...कळतंय...पण मुळापासून त्याला काढवत नाही...का कुणास ठाऊक...मला वाटतं ते कधीतरी परत नव्याने फुटणार...पांढरा चाफा नव्याने बहरणार...दादांनी (माझे सासरे) लावलय ते...मला चाफा आवडतो म्हणून!ते अचानक गेले अन् फुलं येतं झाड आपलेआप वठत गेलं.त्यांनीच लावलेले आंबा,जांभूळ जास्वंद, मोगरा जोमात वाढले फळं फुलं ही भरपूर आली/येतात...

    ते मला नेहमी म्हणायचे...आंबा जांभूळ काढशील तेंव्हा माझी आठवण काढ बरं...आजोबांनी झाड लावावं आणि मुला नातवंडांनी फळ चाखावीत!
    त्यांची आठवण मागच्या बागेत गेलं की येतेच...
    पण वठल्या चाफ्यावरुन हात फिरवताना एक उसासा निसटूनच जायचा...
    एखादा चाफा लावा दादा मागं! मला फार आवडतो.आणि माझ्या साध्या साध्या इच्छांचा सन्मान करणं,त्यांना जमूनच गेलं होतं.इतके दिवस दोन मुलांचा बाप होतो...आता एका मुलीचा पण बाप आहे मी...!असं म्हणत त्यांनी चाफ्याचे कलम आणून लावले होते.
    त्यांनी माझ्या स्त्रीत्वाचा सून,मुलगी,गृहलक्ष्मी म्हणून अनेक मार्गांनी सन्मानच केला.त्यातील एक सन्मान म्हणजे हा चाफा....
    साध्या सोप्या रंगगंधाचे ते पंचपाकळीचे फूल
    चार चार दिवस झाडावर टवटवीत राहतं.फारशा देखभालीची अपेक्षा न करता.उनपावसात एकलाच ,आपल्यातच मग्न चाफा...पानगळीत भग्नता ही अगदी सहज *सुखदुःखे समकृत्वा* च्या अविर्भावात पेलणारा चाफा,मला फार जवळचा वाटतो.
    तुला पुन्हा फुटायचंय...मी चाफ्याला मनोमन बजावायचे.ते चाफ्याचे झाड म्हणजे माझ्या हट्टीपणाची निशाणीच झाले जणू!
    जवळपास सात आठ वर्षे,माझ्या उंचीएवढा, तो एकदांडीचा भुंडा चाफा व्रतस्थ योग्यासारखा मोगऱ्याच्या शेजारी उभा होता.ना फांद्या ना पानं...फुलं तर लांबचीच गोष्ट...
    आणि...आणि... एक दिवस...मोगऱ्याची फुलं काढताना...
    त्या एकदांडीच्या टोकावर...हिरवट पांढुरकं बोंड फुटल्यासारखं जाणवलं....ओंजळीतली मोगऱ्याची फुलं मोगऱ्यावरच टाकून...मी चाफ्या जवळ गेले...अन् विश्वास बसणार नाही...पण अगदी नखाएवढं किरमिजी पालव त्या शेंड्यावरुन डोकावत होतं.माझ्या डोळ्यात पाणीच आलं...माझी आंतरिक इच्छा जाणणाऱ्या त्या चाफ्याच्या ओबडधोबड देहावरुन मी हात फिरवला, परत पानाफुलात बहर रे...!मी अजिजीने त्याच्यावर झुकले.जिथं इतक्या वर्षांची माझी इच्छा त्याला समजली तिथं हा स्पर्शही त्याच्या वठलेल्या देहमनास समजला असणार.फुटू लागलेल्या कोवळ्या पालवाचे बाल्य ते पान हा प्रवास मग हळूहळू घडतच गेला...अजूनही दोन चार पानं त्या वठल्या कुडीस फुटली. अन् थंडीची चाहूल लागली...शिशिराच्या पानगळीत आलेली पानं ही गळून गेली...!
    परत सडाफटिंग चाफा आपला एकला उभा! पण आशेचा एक किरण मनात उगवला...दोन तीन पानात फुटला म्हणजे पुन्हा नव्याने फुटणार...संपून गेलेल्या चैतन्यांत नव्याने जागे झालेले चैतन्य, मनाला फार गुंतवते.
    मग मात्र त्या चाफ्याच्या वर मी रोजच लक्ष ठेवून राहू लागले.फक्त इतर झाडांबरोबर घातलं गेलेलं पाणी आणि माझ्या मनात खोलवर असलेला चाफ्यावरचा विश्वास... इतक्या भांडवलावर...पाच सहा वर्षांनंतर चाफ्यात हळूहळू नवचैतन्य जागं झालं आणि पानं,फांद्या...चक्क फुलंसुद्धा वर्ष दीडवर्षात येऊ लागली.आताशी चाफा गच्च पानाफुलात बहरता असतो...

    हा चाफ्याचा वठणं ते बहरणं प्रवास म्हणजे मला माझा सन्मान च वाटतो....
    *तुमच्या इच्छा आकांक्षा,कर्मांना चांगल्या,निर्मळ हेतूंचे अधिष्ठान असेल तर...चराचरात कुठेतरी त्याची नोंद मग आपोआप होत असतेच...आणि कधीतरी इच्छापूर्ती देखील होऊन जाते.* फक्त अधिष्ठान सकारात्मक हवे...
    इतकंच...!

    -सौ विदुला जोगळेकर
    आम्ही साहित्यिक या फेसबुक वरुन...

  • भारतीय लोकशाहीस आता हवे आहे द्वीपार्टी चे राजकारण …….!

    भारताला स्वातंत्र्य मिळून आज ३६ वर्षे झाली आणि ह्यापैकी सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने भारतावर राज्य केले . स्वातंत्र्य पूर्व काळापासून कॉंग्रेस ही चळवळ होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती राजकीय पक्ष झाली कालांतराने अनेक बऱ्याच पार्ट्या ( पक्ष ) मतदानाच्या रिंगणात आल्या त्यापैकी जनसंघ ( आताची भारतीय जनता पार्टी ) डावे, उजवे कामुनीस्ट व ढीगारयानी प्रादेशिक पार्ट्या कुत्र्याच्या छत्री प्रमाणे उगवल्या .