(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • वीजनिर्मिती – एक वेगळा विचार

    “महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात नवीन वीजनिर्मिती झाली नाही.”

    “महाराष्ट्र २०१२ पर्यंत लोडशेडींगमुक्त होणार- ऊर्जामंत्री”

    “२०१६ पर्यंत लोडशेडींग चालू ठेवावे लागणार- महाजेनको”

  • ‘भजी आणि ती’

    पहिला पाऊस....,
    काव्य ही सोय असते
    भिजणं ही पण सोय

    भिजत भजी खायची
    की,
    भिजत ‘ती’ बहरायची...

    ही, लज्जतदार सोय!
    काव्य ही सोय असते
    भिजणं ही पण सोय
    भिजत भजी खायची
    की,

    भिजत ‘ती’ लाजायची...
    ही तर बहारदार सोय!

    लेखक - श्री घनश्याम परकाळे

    श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
    हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
    https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/

    किंमत : रु.१५०/
    सवलत किंमत : रु.७५/-

  • Hair 360 – शुद्ध हर्बल केसांचे तेल

    marathi

  • प्रेमा काय देऊ तुला

    १९५९ साली प्रदर्शित झालेल्या शिकलेली बायको या चित्रपटातील हे गीत. या गाण्याचे स्वर होते लता मंगेशकर यांचे. संगीत होते वसंत प्रभू यांचे तर हे गीत शब्दबद्ध केले पी.सावळाराम यांनी. चला तर मग ऐकुया हे गाणे..

  • तो ताठ मानेने गेला म्हणून

    क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाबाहेर क्रिकेटबाह्य कारणांसाठी गाजलेल्या खेळाडूंची संख्या काही कमी नाही.
    एक दिवसीय सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावा हव्या असताना,कर्णधार व आपला वडीलभाऊ ग्रेग चॅपलच्या आदेशावरुन (मी माझ्या दिड वर्षाच्या नातवाला टाकतो तसा) ट्रॅव्हर चॅपलने फलंदाजाला सरपटी चेंडू टाकला होता.

  • रांगोळी घालताना पाहून – कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत

    होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,

    बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;

    तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;

    रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

  • वेळेचा अपव्यय

    जनता केंद्रातील सरकारला उबगलेली आहे. अशा वेळी त्या लाटेवर स्वार होऊन दिल्ली काबीज करण्याची तयारी करण्याऐवजी पंतप्रधानांच्या राजीनाम्याचा विषय टोकापर्यंत ताणून धरणे हितकारक नाही.

  • दिल्लीतील मराठी पाऊलखुणा

    दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर १७०७ सालापासून १८०३ सालापर्यंतचा सलग कालखंड डोळयासमोर येतो. शहेनशहा औरंगजेबच्या मुत्युनंतर येसूबाई व इतर २०० जण दिल्लीत डेरेदाखल झाले आणि हेच दिल्लीचे पहिले मराठी निवासी होत. १७०८ ते १७६९ या काळातील अंतोजी माणकेश्वर, महादेव हिंगणे, महादजी अशा चतुर, मुत्सद्दी सरदारांनी पेशव्यांच्यावतीने दिल्लीत अंमल केला. मराठी वकिलातीचे हे पहिले पाऊल म्हणावयास हरकत नाही.

  • लक्षात न घेतलेला बाप

    पूर्वी वडिलांच्या अंगावरील जुने कपडे पाहून, मी त्यांना कित्येकदा "ओरडलो" असेल कि, नवीन कपडे शिवून घ्या, फाटेपर्यंत घालायचे असतात का ?

    पण ते "हो" म्हणून वेळ मारून नेत असतं...

    तसा दिवाळीचा आणि आपला काही संबंध नाही पण, "स्त्रीहट्ट" आणि "बालहट्ट" सांभाळून घेताना, कोणाला कपडे, कोणाला मोबाईल... वगैरे वगैरे अशी खूप मोठी प्लांनिग केली, अचानक लक्षात आले "स्वत:साठी" काहीच ठरवले नाही.... तोच समोर "वडिलांचा चेहरा" समोर आला, वडील तेव्हा का जुने कपडे घालत असतं, ते कळून चुकले,

    मात्र... मी स्वत "वडील" झाल्यावर.... कपड्याने दरिद्री दिसणारे वडील... पैश्याने मोजता येणार नाही असे "धनवान" असतात...

    कुटुंबाच्या सुखातच स्वतचे सुख शोधतात...

    आदर असतोच, पण.... आणखीच वाढला... अन... न कळत डोळ्याची किनार पाणावली....

    बापाची चप्पल आपल्या पायात आली कि, आपण कधी वडिलांना लक्षात घेतंच नाही... कित्येकदा उद्धटासारखेहि वागतो...

    पण आपण "लक्षात न घेतलेला बाप"... लक्षात येतो... मात्र आपण स्वत आई किंवा बाप झाल्यावरच...

  • मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?