न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
वाग्भट सूत्रस्थान 5-5/6
"चिखल, शेवाळ, गवत, व पाने यांनी व्याप्त व गढुळ झालेले, ऊन, चांदणे, व वायु यांचा जेथे कधीही प्रवेश झाला नाही अश्या ठिकाणचे, पावसाचे पाणी, नुकतेच मिळाल्यामुळे राड झालेले, जड, फेस आलेले, कृमीयुक्त, तापलेले, व दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गार अशा प्रकारचे पाणी कधीही पिऊ नये."
हा झाला ग्रंथातील एक श्लोक आणि त्याचा शब्दशः अर्थ. छापील उत्तरासारखं. आता ग्रंथकारांना नेमकं काय म्हणायचंय ते पाहू.
अशा ठिकाणचे पाणी पिऊ नका, ज्या जलाशयामधे तळात खूप चिखल, गाळ साठलेला आहे. अशा जलाशयातील झरे या चिखलामुळे बंद झालेले असतात. झरे बंद झाल्यामुळे पाण्याचा पाझर आणि पुनर्रभरण नीट होत नाही, पाण्याचा उसपा आणि साठा याचे संतुलन बिघडते. आणि पाणी पचायला जड होते. हा चिखल किंवा गाळ जलाशयाच्या तळामध्ये असतो आणि शेवाळ, पाने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असतात. पाण्याचा पृष्ठभाग जर पूर्णपणे झाकला गेला असेल तर सूर्याचे प्रकाशकिरण तळागाळापर्यंत पोचू शकत नाहीत. सूर्याचे औषधी किरण जर पाण्यात पडले नाहीत तर पाण्यातील अशुद्धी दूर होत नाही, म्हणून असे आच्छादन असलेले पाणी देखील पचायला जड होते.
खालून चिखल वरून शेवाळ, पाण्यात पडलेल्या पानासारख्या कचऱ्याचे आच्छादन आणि मधे वाढणाऱ्या काही तृण वनस्पती यामुळे पाणी साठून रहाते. पाण्याचा नैसर्गिक वाहाणे हा गुण कमी होतो. पाणी गरजेपेक्षा जास्ती स्थिर होते. जिथे स्थिरपणा ( स्टॅग्नेशन)येते, जिथे गती कमी होते, तिथे पाण्यातील बुळबुळीतपणा वाढतो. शेवाळ जास्ती वाढते. पाण्यातील हालचाली मंद होतात. पाण्याची गुरूता, घनता हे गुण आणखीनच वाढतात.
गाळातील चिखल आणि वरील आच्छादन यामुळे पाण्याची घनता बदलते. आजच्या वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास पाण्याची पीएच बदलते. त्याची अम्लता किंवा क्षारीयता बदलते. असे पाणी पचायला घन आणि गुरू होते. श्लोकातील दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दांकडे विशेष लक्ष दिले की शास्त्रकारांची सूक्ष्म दृष्टी लक्षात येते.
पाण्यात हा बदल नैसर्गिक स्थितीमुळे झालेला असतो. त्याच्या इच्छेनुसार झालेला असतो.
जरूरी नाही, कि प्रत्येक वेळी मानवाच्या हस्तक्षेपामुळेच प्रदूषण होते. आणि जे जे सर्व नैसर्गिक म्हणजे निसर्गदत्त, निसर्गाने दिलेले आहे, ते सर्व उत्तम गुणाचे आणि मानवाच्या आरोग्याला हितकरच असेल !!??
यासाठी त्याने मानवाला बुद्धी दिली आहे. ही बुद्धी, योग्य ठिकाणी वापरून आपले कल्याण कशामधे आहे, याचा विवेक मानवाने करावा अशी त्याची इच्छा असते. त्याच्या इच्छेनुसार, आपली बुद्धी हवी तिथे वापरता येणे, याला विवेक म्हणतात, सारासार विचार करणे !!!
हे योग्य हे अयोग्य असा विचार करणे ज्याला जमले तो निरोगी राहिलाच म्हणून समजा !
सूत्रस्थान 5-5/6 भाग एक. ( क्रमशः )
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.12.2016
आपण प्रत्येक जणच बदामाचे फॅन आहोत.अगदी लहान पणा पासूनच आपले नाते ह्याच्याशी जोडले जाते.लहान मुलांना बदाम पाण्यात भिजत घालून दुधात उगाळून देतात.परिक्षेच्या काळात अभ्यास चांगला लक्षात रहावा म्हणून आई मुलांना बदाम खायला देते.
बदामाचा शीरा,बदाम खीर,बदाम तेल,बदाम पाक असे बरेच प्रकारे बदाम आपण वापरतो.मिठाई मध्ये सजावटी करिता देखील ह्याचा वापर केला जातो.
चला मग बदामाचे गुणधर्म पाहूया:
बदाम चवीला गोड,तुरट,उष्ण,स्निग्ध,बलकारक,वातनाशक,
कफपित्तवाढविणारे,पौष्टिक,सारक,बुद्धिवर्धक,
पचायला जड,शुक्रवाढविणारे आहे.
आता बदामापासून बनविलेल्या व्यंजनाचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:
१)बदामखीर/मिठाई:
गोड,पौष्टिक,उष्ण,पचायला जड,झोप आणणारी,शुक्र धातूवाढविणारी,बुध्दिवर्धक,
वातपित्तनाशक,बलकारक आहे.
२)बदामाचे तेल:
गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातपित्तनाशक,
कफकर,मेंदूलाशांतकरणारा,वृष्य,उष्ण,
पोषक,डोकेदुखी कमी करते.हे तेल कानाच्या रोगात देखील उपयुक्त आहे.
बदामाचे अतिसेवन केल्यास पित्तवाढून जुलाब देखील होऊ शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
निरोगी रहाण्यासाठीचे हे पथ्यापथ्य मोजक्या दिवसासाठी नसून कायम स्वरूपी आहे, हे लक्षात घ्यावे.
आपण नेहमी निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते सोडून आमच्या धारणाच आम्ही बदलून टाकल्या आहेत. आयुष्य हे अनमोल आहे, हे विसरून आयुष्य हे चुलीवरच्या कांद्यापोह्या एवढे स्वस्त करून टाकले आहे. गॅसपेक्षा चुलीवरचे जरा खमंग लागतात, एवढेच काय ते !
निरोगी रहाण्यासाठी अमुक पथ्य पाळा, असे सांगितले की, रुग्णाच्या कपाळावर डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत आठ्याच आठ्या दिसू लागतात.
बंधनात रहायला कुणालाच आवडत नाही. आणि जर ते बंधन दुसऱ्याने घातलेले असेल तर अजिबात नकोसे वाटते.
मी मला हवे तसे वागेन, मला कोण अडवणार ? अशा बेगुमान मनाला लगाम तर हवाच. हा लगाम आप्तांनी घातला तर त्याला तप म्हणतात. आई वडीलांनी सांगितले तर शिस्त म्हणतात, आणि डाॅक्टरनी सांगितले तर पथ्य म्हणतात. आणि दुसऱ्या कुणीतरी सांगण्यापेक्षा स्वतःचे स्वतःला आवरणे आणि सावरणे आवश्यक आहे.याला संयम म्हणतात.
हे कुणा दुसऱ्यासाठी नसून स्वतःच्या भल्यासाठी आहे, एवढे तरी लक्षात ठेवावे. शरीर मन आणि आत्मा या तिघांच्या चिरंतर कल्याणासाठी हे करावेच लागेल.
पहिल्या ओळीतील हितकर असा आहार विहार हा शरीरासाठी. दुसरी तिसरी ओळ मनावरील संयमासाठी आणि चौथी ओळ आत्मरक्षणासाठी आहे. हे भान असावे. असे ग्रंथकार सांगतात.
या संयमाची सवय पहिल्यापासूनच लावून घेतली तर लागते. संयम आतून यावा लागतो. संयम येण्यासाठी मनाला मुरड कशी घालावी, आवर कसा घालावा, हे समर्ध रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात लिहून ठेवले आहे.
मना वासना दुष्ट कामा नये रे,
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना धर्मता नीती सोडू नको हो,
मना अंतरी सार विचार राहो ।।
संत असो वा आप्त. सर्वजण आतून एकच विचार करीत असतात, हेच यावरून सिद्ध होते. आयुष्य असो वा आरोग्य. ते नीट सांभाळायचे असेल तर काही पथ्य तर करावेच लागणार.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०७.०८.२०१७
।।गणधिपाय नम: भृंगराजपत्रं समर्पयामि।।
भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का!हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते.
औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.
आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :
जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो.
केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.
केस व हाडांचा आयुर्वेदा मध्ये जवळचा संबंध आहे. केस हा अस्थिधातूचा मल मानला जातो. त्यामुळे जर माका केस बळकट करतो तर त्याचे कार्य हे आपल्या हाडांची बळकटी करायला देखील होणारच ना!
माका हा यकृत, प्लिहा ह्या अवयवांचे कार्य सुधारतो त्यामुळे रक्ताची कमतरता, भुक न लागणे, अजीर्ण, ह्यात ह्याचा चांगला उपयोग होतो.
त्वचा रोगात ज्या मध्ये स्त्राव येतो जसे गजकर्ण, इसब, ह्यात देखील ह्याच्या सेवनाने लाभ होतो.
ज्यांची दृष्टी क्षीण आहे त्यांनी ह्याचे नियमीत सेवन केल्यास दृष्टी सुधारते. त्यामुळेच ह्याला नेत्र्य असे म्हटले आहे.
माक्याचे बीज हे वाजीकर आहे अर्थात कामशक्ती वाढविते.
असा हा माका आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९६०६९९७०४
काही खास एक्स-रे ची माहिती
आता शहाळ्याचे काही घरगुती उपाय पाहुयात:
१)जुलाब होत असल्यास १ ग्लास शहाळेयाच्या पाण्यात १/४ कप संत्र्याचा रस ४ चमचे लिंबू रस व १/४ चमचा सैंधव घालून प्यावे हे मिश्रण ओ.आर.एस ची भूमिका बजावते.
२)लघ्वीला जळजळ होत असल्यास व लघ्वी कमी होत असल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे.
३)लहान मुलांना जंतांचा त्रास होऊन उल्टी होत असल्यास १/४ कप शहाळ्याचे पाणी+१/२ चमचा ओवा व १ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण पाजावे ह्याने वारंवार होणाऱ्या उल्ट्या थांबतात.
४)कर्करोगा सारख्या आजारात जेव्हा तीक्ष्ण औषधे दिली जातात तेव्हा शरीरातील विषार लघ्वी मधून बाहेर टाकण्यासाठी शहाळ्याचे पाणी उत्तम.
५)मानसिक श्रम अधिक होत असल्यास १ ग्लास शहाळेयाच्या पाण्यात २ चमचे मध घालून ते मिश्रण संध्याकाळी घ्यावे.
६)१ कप शहाळ्याचे पाणी त्यात १/२ चमचा हळद व ४ चमचे चुन्याची निवळी घालून त्या मिश्रणाच्या घड्या भाजलेल्या त्वचेवर ठेवाव्या.
७)कोवळ्या शहाळेयाची मलई चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात व चेहऱ्याच्या मांसपेशींना बळ मिळते.
८)मोठी शस्त्रक्रिया होऊन जेव्हा प्रथमच आहार सुरू करतात तेव्हा रूग्णाला आधी शहाळ्याची मलई द्यावी.
९)पोटात जळजळ होऊन भुक लागते त्यावेळेस शहाळ्याची मलई खावी फायदा होतो.
१०)सर्दी होण्याची सवय नसल्यास लहान मुलांना शहाळ्याची मलई पातळ करून भरवावी ती शक्तीर्धक असते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

पाषाणभेद चवीला तुरट,कडू असून थंड गुणाची व हल्की स्निग्ध व तीक्ष्ण असते.हि त्रिदोष शामक असून प्रभावाने अश्मरीभेदन आहे.ह्याचे उपयुक्त अंग मुळ आहे.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग चार !
एक माणूस सोडला तर कोणी पशुपक्षी सहसा आजारी पडत नाहीत, हे कटु सत्य आहे. इतर प्राणी आणि माणूस यात एक धर्म सोडला तर बाकी आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी समान आहेत. या अर्थी एक सुभाषित पण शिकल्याचे स्मरते.
या सगळ्या पशुपक्ष्यांना नियत आयु मिळाली आहे. निसर्गाचे वरदान आहे. निसर्गच त्यांना शिकवत असतो. प्रत्येकाचा आहार ठरवून दिलेला आहे, त्यात ते बदल करीत नाहीत. गाई म्हैशीला कितीही उपाशी ठेवले तरी मांस भक्षण करणार नाही, वाघसिंहाला कितीही उपाशी ठेवले तरी ते गवताला तोंडही लावणार नाहीत. यामुळे की काय त्यांचे आरोग्य चांगले रहाते. शिकार करून पोट भरलेले असले तर समोर हरीण फिरले तरी सिंह त्याच्याकडे बघत सुद्धा नाही,
पोपट फक्त झाडावरचाच पेरू खातो, शिळा पेरू अजिबात खात नाही. शिळा म्हणजे झाडावरून जमिनीवर पडलेला सुद्धा खात नाही. कावळ्याला मात्र किडे पडलेला उंदीर सुद्धा चालतो, किंवा विष घालून मारलेला उंदीर देखील चालतो. गटारात पडून मेलेला पण चालतो, अपघाताने गाडीखाली सापडून मेलेला उंदीर ही त्याची जणुकाही फीस्टच !
प्रत्येक पशुपक्ष्याच्या नवीन पिल्लांसाठी प्रत्येक वेळी नवीन घरटे बांधले जाते. जुन्या घरट्याचा वापर कुंभारमाशीदेखील करत नाही. फळांनी लगडलेल्या झाडावर पक्ष्यांचे घरटे दिसत नाही, छोटे पक्षी छोट्या झाडांवर तर, गरूडासारखे मोठे पक्षी मोठ्या झाडाच्या अगदी वर घरटे बांधतात. ही यांची जीवन वैशिष्ट्य दिसतात. स्वतः जगण्यासाठी किंवा त्यांचा वंश वाढण्यासाठी असे करणे त्यांना निसर्गाने शिकवलेले असते.
जाती वर्ण भेदानुसार हे वरवर दिसणारे फरक असले तरी सूर्यास्त झाल्यावर मात्र कोणीच खात नाही, हे मात्र वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
माणसाने पाळलेल्या प्राण्यांमधे मात्र ही वैशिष्ट्ये बदललेली दिसतात. माणसाप्रमाणे, माणसाने पाळलेल्या पशुपक्ष्यांनीही आपली जीवनपद्धती बदलली आणि माणसांप्रमाणे त्यांनाही डाॅक्टरांची गरज भासू लागली.
निसर्गात आढळणारे प्राणी आणि माणसाच्या अवतीभवती वावरत असले तरी, माणसाने ज्यांना पाळलेले नाहीत, अश्या पशुपक्ष्यांनी मात्र आपली जीवनपद्धत बदललेली नाही.
त्याचाच परिणाम म्हणून असेल, पण सर्व कावळे एकाच आकाराचे दिसतात. एक जाड, एक बारीक, असे दिसत नाही. जसा कावळा तशीच चिमणी, तसाच पोपट, तसेच कबुतर.
निसर्गातील सर्वच प्राणी आहेत त्या आकारामधे बंदिस्त आहेत....
.
.
.
.
.
.
फक्त माणूस सोडला तर !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.05.2017
आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला.
पान खाणे या प्रकारात, पानातील हे सर्व मिश्रण चावणे आणि चघळणे या दोन क्रिया महत्त्वाच्या !
पान तोंडातल्या तोंडात घोळवल्याने जीभेला उत्तम व्यायाम होतो. वर खाली, डावीकडे उजवीकडे,व तिरपी जीभ वळल्याने जीभेला जोडले गेलेले सर्व छोटे मोठे स्नायु अगदी स्वरयंत्रापर्यंत, ताणले जातात. आणि शब्दोत्पत्तीला मदत होते. गळ्यापासून टाळूपर्यंत जीभेला फिरावेच लागते. टाळू शकतच नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti