लक्षात असे येत आहे, की दररोज जेवताना मनात एकच विचार असतो,
हा घास मी चुकीचा तर घेत नाही ना ?
याने माझे काही नुकसान तर होणार नाही ना ?
मी आहाराचा कोणता नियम चुकवत तर नाही ना ?
एवढे नियम पाळूनही ही दररोजची औषधे काही कमी होत नाहीत.
एवढी औषधे खायची तर जेवायचे तरी कशाला ?
मी एवढे नियम पाळतो, पण माझा काहीच फायदा होत नाहीये.
मोहरीचे तेल हे बंगाल,व उत्तर भारतामध्ये स्वयंपाका करिता वापरले जाते.हे तेल चवीला कडवट,उष्ण असते व ते भुक वाढविते,पचायला हल्के,तीक्ष्ण गुणाचे,कफ व वातनाशक,पित्त वाढविणारे,संडासला बांधुन ठेवणारे अर्थातच घट्ट करणारे,लघ्वीचे प्रमाण कमी करणारे आहे.हे तेल शरीरातील मेदाचा नाश करते.ह्या तेलाचा गरजे पेक्षा जास्त वापर केल्यास शरीरातील शुक्रधातू नष्ट होतो.
त्वचेला खाज येणे,कोड,तसेच काही कफ वात प्रधान त्वचाविकारात ह्या तेलाचा आपण वापर करू शकतो.
मोहरीचे तेल हे अत्यंत उष्ण असल्याने थंड हवामान असलेल्या प्रदेशांत हे तेल लोकांना सहज पचते.पण हेच मोहरीचे तेल जर आपण देशावर किंवा कोकण गोवा प्रांतात वापरू लागलो आपणच काय पण बंगाली किंवा युपी स्थित लोक जरी ह्याच तेलाचा वापर भरपूर प्रमाणात आपल्या स्वयंपाकात करू लागले तरी त्यांच्या अंगात पित्त दोषाची फाजील वाढ होऊन त्यामुळे पित्ताचे व रक्ताचे विकार त्यांना सतावतील ह्यात दुमत नाही.
म्हणूनच कोणतेही तेल वापरताना देश अर्थात आपण रहात असलेल्या प्रदेशाचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.शक्यतो तेलाचा वापर करत असताना आपल्या प्रदेशात कोणत्या तैल बिया पिकतात ह्याचा विचार करूनच त्यांच बियांचे तेल वापरावे.कारण त्या तेलबियांचे पासुन काढलेले तेल आपल्याला आपल्या प्रदेशाचा वापरायला चांगले असते.जसे कोकण,गोवा खोबरेल,देशावर शेंगदाणा,उत्तर भारत,बंगाल सरसों का तेल अर्थात मोहरीचे तेल.
मोहरीचे तेल वापरण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास वाढेल.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हाडांच्या डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला तर्हेतर्हेचे एक्स-रे काढायला सांगितले जाते. यामध्ये फ्रॅक्चर असल्यास त्या-त्या भागांचे एक्स-रे येतात. परंतु पडल्यावर रुग्ण परस्पर चांगल्या एक्स-रे क्लिनिकमध्ये त्वरित जाऊनही हे एक्स-रे काढू शकतो. डॉक्टरांच्या चिठ्ठीसाठी अडून न राहता क्ष-किरण तज्ञाला दाखवून योग्य एक्स-रे होऊ शकतात. परंतु दुसरी दुखणी उदा.- सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासाठी शक्यतो हाडांच्या डॉक्टरकडून आधी तपासून घ्यावे व मगच एक्स-रे काढावे.
झोप येते आहे, पण झोपायचे नाही, भूक लागली आहे, पण जेवायचे नाही.
मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.
सुरुवातीला काही वर्षे सी.टी. स्कॅन मशिन्स ही फक्त डोक्याचेच स्कॅन करीत असत; परंतु विज्ञानातील व मुख्यत: संगणक शास्त्रातील प्रगतीमुळे पूर्ण शरीराचे स्कॅनिंग होऊ लागले.
गणपती बाप्पाचा सकाळच्या महापूजेचा नैवेद्य पंचपक्वान्नाचे भरलेले ताट असते. पण सायंपूजेचा नैवेद्य काय असतो ? तर वाटीभर पंचखाद्य किंवा एखादा लाडू.
कशासाठी ?
जे जे देवासाठी, ते ते देहासाठी. या न्यायाने देवाच्या भोजनाचा नियम आपल्यालादेखील तसाच लागू होतो. सकाळचे भोजन आणि सायंकाळचे भोजन याच प्रमाणात घ्यावे, असे आपली संस्कृती पण सुचवते.
कमळ कधी उमलते ?
कमळ कधी मावळते ?
सूर्योदय झाला की उमलते, आणि सूर्यास्त झाला की मावळते. सूर्यफुलाचे नावच मुळी सूर्यावरून ठेवले आहे. त्यांच्याकडे कोणतेही घड्याळ नाही, तरीदेखील त्याला बरोबर कळते, दिवस आणि रात्र. कधी कसे वागायचे, कधी कसे फुलायचे, कधी कसे वळायचे ते !
सूर्योदयाला सुरू झालेला आपला दिवस सूर्यास्ताला संपतो. (निशाचर प्राणी अपवाद आहेत.)
मनुस्मृतिमधील निद्रा प्रकरणामधे देखील "सूर्यामुळे दिवस होतो आणि सूर्यामुळे रात्रही होते, असे सांगितलेले आहे. रात्र ही झोपण्यासाठी, विश्रांतिसाठी. तर दिवस हा दैनंदिन कामे करण्यासाठी आहे.
केवळ आपली पृथ्वीच नव्हे तर सर्व ग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्यापासूनच शक्ती, उर्जा मिळवित असतात. सूर्याच्या अस्तित्वामुळेच आपले अस्तित्व आहे, याचे ज्ञान आमच्या ऋषीमुनीना होते. आणि ते त्यांनी लिहूनदेखील ठेवले आहे.
सगुणरूपातील एकमेव देवता म्हणजे सूर्य. रामदास स्वामीनी सर्व तरूणांना सूर्यनमस्काराचे, व्यायामाचे महत्व पटवून दिलेलेच होते.ते स्वतः दररोज शेकडो समंत्र सूर्यनमस्कार घालीत असत.
भोजनाच्या संदर्भात आणखी एक श्लोकात सांगितले आहे,
सायंकृते प्रभाते जीर्यती,
प्रभातकृते सायं जीर्यती.
सकाळी जेवलेले अन्न सायंकाळी पचते, तर सायंकाळी घेतलेले अन्न सकाळी पचते.
सायंकाळी आणि सकाळी असेच शब्द या श्लोकामधे आहेत. दुपार आणि माध्यान्ह असे शब्द नाहीत. याचा अर्थ जेवायचे कधी तर सकाळी आणि सायंकाळी.
काही जण म्हणतील, या जेवायच्या वेळा त्याकाळात ठीक होत्या. आजच्या काळात त्या सुसंगत नाहीत. काळ बदलला आहे, त्यानुसार आपण बदलायला नको का ?
ज्या ठिकाणी सूर्य सहा सहा महिन्यात दिसतंच नाही, अशा ठिकाणी रहाणाऱ्या लोकांनी कोणता नियम पाळायचा ?
जिथे सूर्य नाहीच दिसत त्याठिकाणी अन्य नियम वापरू शकतो. पण जिथे सूर्य दिसतोय तिथे तर या जेवणाच्या वेळा पाळायला सुरवात करूया. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आम्ही पहिल्यांदा शंका घेणार. "कसं शक्य होणार ? हे असं लवकर जेवणं जमणारच नाही." सुरवातीलाच नकारघंटा वाजवली की पुढे सगळं चुकतंच जात ना. मग काही करावसं वाटत नाही.
या वेळा पाळणे तर्कसंगत नाही, व्यवहार्य नाहीत. हे एकवेळ मान्य करूया. पण पचन होण्यासाठी लागणारी उर्जा कुठुन आणणार ?
विज्ञानाने बाकी सगळी सोंग आणता येतील पण सूर्याचा प्रकाश आणि त्याची शक्ती तर आणू शकणार नाही ना. शेवटी कुठेतरी निसर्गाला शरण जायलाच हवं ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.03.2017
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौवीस
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आळस मोठ्ठा देऊ नये
"आलस्यंही मनुष्याणां महारिपु" सर्वात मोठा शत्रू आळस आहे. कारण तो दिसत नाही. जो आपल्या आतमधेच आहे तो बाहेरून कसा दिसणार ? हाच मधुमेहाचा सर्वात फास्ट फ्रेंड आहे.
आपण कुठे कुठे आणि कधी आळशी होतो, ते एकदा तपासून पहावे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या यंत्रांनी आपल्याला एवढे आळशी बनवले आहे, हे कधी लक्षातही आले नाही. स्कूटरच्या जमान्यात गाडीला कीक मारून ती स्टार्ट करणे हा मोठाच व्यायाम होता. त्यात ती बजाजची स्कूटर सुरू असली तर वेगळ्या व्यायामाची गरजच नव्हती. कारण बजाज स्कूटर सकाळी सुरू करणे हे सगळा आळस घालवायचे मस्त साधन होते. तिला अगदी जमिनीवर आडवी पडून पुनः उभी केल्याशिवाय सुरुच होत नव्हती. तसंही करून सुरू झाली नाही तर चढावावर उलटी ढकलत न्यायची, आणि उतारावरून सेकंड गियर मधे गडगडत सोडून द्यायची. आणि गाडी सुरू झाल्याचा सगळ्यात जास्ती आनंद, ती ढकलण्यात घामाघूम होईपर्यंत, मदत करणाऱ्याला व्हायचा. (म्हणजे ढकलण्याऱ्याच्या कॅलरीज जाळायला देखील बजाज किती मदत करीत होते ना ! केवढा व्यायाम व्हायचा ? आता हा व्यायाम देखील संपला.
एक बटन दाबले की चक्क गाडी सुरू होते.
एक बटन दाबले की घरात विहीरीचे पाणी येते.
एक बटन दाबले की धान्याचे चक्क पीठ होते.
एक बटन दाबले की देवाकडे दिवा पण लागतो आणि
एक बटन दाबले तर चटणी वाटून तयार.
एक बटन दाबले की ताकावर लोणी पसरते.
एक बटन दाबले की कणिक तिंबून मिळते.
एक बटन दाबले की मेसेज सेंड.
एक बटन दाबले की पैसे ट्रान्स्फर
आणि एवढे श्रम वाचवून उरलेला वेळ जिममधे खर्च करायचा, त्यासाठी परत पैसे मोजायचे.
पूर्वी दहा रूपये वाचवण्यासाठी दहा मिनीटे चालायचे श्रम घेतले जायचे. एक स्टाॅप अगोदर उतरायचे. आता दहा मिनिटे वाचविण्यासाठी दहाच काय शंभर रूपये सुद्धा खर्च करायची तयारी !
किती बदललो ना आपण ?
कधी बदलत गेलो कळलं देखील नाही.
आळस द्यायचाच नाही का ? द्यावा.
चारचौघात आळस दिला की आई ओरडणारच.
तोंडाचा आऽ करू नको असंही आई म्हणायची. तोंडात माशी जाईल असंही सांगायची.
आळस द्यायचाच झाला तर तोंडावर हात ठेवून आळस द्यावा. जांभई द्यावी. आपल्या तोंडातील सर्व जीवजंतु आपल्याच तोंडातील दुर्गंधीसह बाहेर पसरतात. जशी जांभई तशीच ढेकर, तशीच शिंक. शिंकेचा वेग तर जबरदस्त असतो. तो हाॅर्स पाॅवरमधे देखील मोजला जातो. एवढ्या जोरात खोकलो, शिंकलो तर केवढा जंतुसंसर्ग आपण करत असतो ना !
तसं जांभई देणं ही शरीराकडून निर्माण होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आयुर्वेदानुसार एक वेग आहे. आणि वेगाचा अवरोध कधी करू नये हा नियम. वेग निर्माण झाला की पूर्तता करायचीच. म्हणजे जांभई आली तर ती द्यायचीच. पण तोंडावर हात, रुमाल ठेवून द्यावी. अगदी पाश्चात्य पद्धतीने साॅरी असे देखील म्हणावे.
पण मोठ्ठा आऽऽ करून सर्वांसमक्ष आपले किडक्या बत्तीशी दातांचे समग्र दर्शन बाहेरच्या विश्वाला कशाला द्यायचे ना ?
एक तो कान्हा होता, ज्याने मुखकमल उघडल्यावर यशोदेला विश्वरूप दर्शन झाले होते. ......
आपण "तो" कान्हा नाही एवढे लक्षात ठेवले तरी पुरे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
पंगतीत ढेकर देऊ नये
मधेच पंगतीतून उठून जाऊ नये
"सहनाववतु सहनौ भुनक्तु" या श्लोकाने सुरवात झालेली असताना या सर्वांमधून एकट्यानेच उठून कसे जायचे ?
असे मधेच उठून जायचे नसते.
एकतर आपणाला जेवण आवडलेले नाही, अशा प्रकारचा संदेश यजमानांना दिला जातो. नाहीतर आपले काहीतरी चुकले असावे असे यजमानांना वाटते.
खरंतर ढेकर हा वेग आहे. आयुर्वेदात सांगितलेले आहे, वेगान् न धारयेत. मग आई असं चुकीचं कसं सांगते ?
चुकीचं मुळीच नाही.
पंगतीमधे आपण जेव्हा मोठ्याने आवाज करत, विचित्र आवाजात ढेकर देतो, तेव्हा इतरांना ऐकायला थोडे अवघडल्यासारखे वाटते.
पंगतीमधे मधेच उठून जाणे हा यजमानांचा आणि अन्नपूर्णेचा अपमान समजला जातो. जर काही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जसे डाॅक्टरना आत्ययिक अवस्थेतील एखाद्या रुग्णाला तपासायला जायचे असते, किंवा एखाद्याला (एक करंगळी) लघुशंका किंवा (दोन नंबरी व्हिक्टरी) बृहतशंका असते तेव्हा, बाजूला बसलेल्याची परवानगी घेऊन उठावे असा अलिखित अघोषित नियम आहे. जो नियम आईला तिच्या आणि त्याच्या आई आणि बाबांनी सांगितलेला असतो.
पंगत हा प्रकार पूर्णपणे भारतीय. याच धर्तीवर पाश्चात्य देशात जे होते त्याला पार्टी म्हणतात.
पंगत म्हणजे डिसीप्लीन- शिस्त.
पार्टी म्हणजे धांगडधिंगा.
पंगत म्हणजे सहभोजन.
पार्टी म्हणजे स्वभोजन.
पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.
पार्टी म्हणजे उभ्याउभ्यानेच हादडावे.
पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार
पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार.
पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.
पार्टी म्हणजे हवंतर जेवा.
पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.
पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट.
पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई
पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई
पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली
पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली
पंगत म्हणजे ताटाला काढलेली रांगोळी
पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई
पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची
पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची
कोल्ह्याला बाटलीतून दिलेल्या खीरीची
पंगत म्हणजे हर हर महादेवा
पार्टी म्हणजे डान्सचा जलवा
पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ
पार्टी म्हणजे डीजे नाय तर सगळं व्यर्थ
पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची
पार्टी म्हणजे भीती उपाशी राहाण्याची
पंगत म्हणजे सत्व रजाची आरास
पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास
पंगतीमधे यजमानी पाहुण्यांना शोधतात.
तर पार्टीत पाहुणे यजमानांना हुडकतात.
पंगत म्हणजे काय काय सांगू !!!
पार्टी म्हणजे आणखी काय सांगू ???
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१२.०८.२०१७
आजच्या भाषेत बाजारी टिकावू खाद्यान्न, बेकरी फूड, हाॅटेलचे खाद्य, डबाबंद खाद्यपदार्थ, अर्धतयार अन्न, म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं तर किंडर, जेम्स सारखी चाॅकलेटस्, लेज, कुरकुरे, दो मिनट नूडल्स, पेप्सीकोक, मॅक आणि पिझ्झा हट्टचे अन्न इ.इ. हे सर्व तयार करताना कसली तेलं, पीठं पाणी वापरतात, कसं समजणार ? हे सर्व परान्न.
Copyright © 2025 | Marathisrushti