(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • किचन क्लिनीक – कच्चे केळे व केळफूल

    आपल्या पैकी ब-याच मंडळींना कच्च्या केळ्याची भाजी व केळफूलाची भाजी नक्कीच आवडत असणार.कच्च्या केळीचे काप,भाजी,भजी,चिप्स अगदी छान लागतात तर केळफूलाची भाजी,कटलेट देखील रूचकर लागतात बरं का.

    जसे ह्या दोघांचा स्वयंपाकात उपयोग होतो तसाच ह्याचा युक्तीपुर्वक वापर केल्यास आपण ह्याचा घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो.

    कच्चे केळे हे तुरट गोड थंड गुणाचे असून शरीरातील कफ पित्त कमी करते तर केळफूल हे चवीला कडू तुरट असून उष्ण असते व हे शरीरातील वात कफ हे दोष कमी करते.

    आता ह्यांचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)जुलाब होत असल्यास कच्च्या केळीचा चीक तांदुळाच्या पेजेसह प्यावा.

    २)संडासमधून आव पडत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून द्यावा.

    ३)अपचन,अम्लपित्त ह्यात कच्च्या केळीच्या पिठाच्या चपात्या कोरड्याच खाव्यात

    ४)मधुमेही रूग्णांना कच्च्या केळीची व केळफूलाची भाजी पथ्यकर आहे.

    ५)कच्च्या केळीच्या सालीची राख एरंडेल तेलात मिसळून पायाला पडणा-या कात्र्यांवर लावावे.

    ६)मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून खायला द्यावा.

    कच्ची केळी व केळीचे बोंड खायचा अतिरेक केल्यास संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – कंदभाज्या – सुरण

    सुरण हा कंद पुष्कळ जण आहारात वापरतात व ब-याच जणांच्या हा आवडीचा कंद आहे.सुरणाची भाजी,सुरणाचे कटलेट,सुरणाचे काप अशा अनेक पद्धतीने आपण सुरण खाऊ शकतो.हा अगदी भला मोठा कंद असून ह्याचे दोन प्रकार असतात एक खाजरा व गोड.त्यातील गोड सुरण हा खायला उत्तम.

    सुरणाचे झाड हे २-३ हात उंच असते व ह्याच्या कोवळ्या पानांची व मधल्या बुंध्याची भाजी करतात.तर सुरण हा जमिनीखाली उगवणारा वाटोळा असा तसेच बरेचदा आकाराने भला मोठा असा कंद असतो.ह्याला राक्षसी कंद म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

    हा खरोखरच अत्यंत पौष्टिक असून चवीला हा तुरट,तिखट व उष्ण असून हा शरीरातील कफ व वात हे दोन्ही दोष कमी करतो.जसा ह्याचा उपयोग स्वयंपाकात होतो तसाच ह्याचा औषधी उपयोग देखील आहेत.

    चला मग ते पहायचे ना आपण:
    १)मुळव्याधी मध्ये सुरणाच्या कापट्या तुपात तळून खाव्यात.

    २)संडासमधून आव पडत असल्यास सुरणाचा कांदा वाळवून त्याचे चुर्ण तुपात तळून खावे.

    ३)खोकला,पिवळाचिकटकफपडणे,बरगड्यांमध्ये वेदना होणे अशा तक्रारी मध्ये सुरण पाण्यात उकळून त्या पाण्यात मध घालावा व त्याचे चाटण करून वारंवार चाटून खावे.

    ४)तोंडास रूची नसल्यास सुरण उकडून त्यावर आल्याचा रस व काळेमीठ लावून खावे.

    ५)पुष्कळ जुन्या आजारातून बरे झाल्यावर आलेल्या अशक्तपणा मध्ये सुरणाची खीर करून खावी.

    सुरण अतिप्रमाणात खाल्ल्यास भुक मंदावते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 24-दीपं दर्शयामी-भाग एक

    जो स्वतःच दीपक आहे, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो दुसऱ्यांना योग्य मार्गाने नेतो, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो मार्गदर्शक आहे, त्यालाच मार्ग सांगण्या सारखे आहे. मग देवाला दिवा का दाखवायचा ?

    सातच्या आत घरात नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला, त्यात एक सुंदर संवाद आहे. " आमच्याकडे कापसाची शेतं लावली आहेत, आणि घरात तेल जास्ती झालंय म्हणून नाही दिवा लावत आपण. तर जे अनाकलनीय आहे, ते तुझ्या दिव्यत्वाच्या प्रकाशानं उजळून जाऊ दे ! अज्ञानाचा जो अंधःकार आमच्या मनात आहे, तो तुझ्या प्रकाशाने निघून जाऊ दे, अशी प्रार्थना असते दिव्याकडे ! "

    आपल्याकडे अजून तरी देवघर नावाचा, कोनाडा का होईना, शिल्लक असलेल्या जागेत थोडी जागा राखीव ठेवलेली असते. त्यात रात्री मधेच उठल्यानंतर आपल्याला दिसावे, म्हणून देवाच्या डोक्यावर एक दिवा टांगून ठेवलेला असतो. इलेक्ट्रीक झिरोचा किंवा आता एलईडीचा ! न जाणो रात्री देव आलाच तर ? म्हणून म्हणायचं दिवा लावला देवापाशी......

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी, असा विषय आपण बघत असल्याने या दिव्याचा देहरक्षणासाठी काय उपयोग आहे ? बरं हे इलेक्ट्रीकचे दिवे आत्ताचे ! त्यापूर्वी काय होते ? तेलाचे दिवे आणि तूपाचे निरांजन. काय एवढा फरक आहे इलेक्ट्रीकच्या दिव्यात आणि तेल तूपाच्या दिव्यात ?

    आता हेच पहा ना, रस्त्यावर रात्रभर जळणारे जे हायमास्क दिवे आहेत, त्यावर किती छोटे छोटे किटक पिंगा घालत असतात ? पिंगाच तो. नुसते गोल गोल फिरत राहायचे. काम काही नाही. फायदा शून्य.

    या किटकांना प्रकाशाचे प्रचंड आकर्षण असते. जिथे प्रकाश दिसेल तिथे अक्षरशः झडप घालतात. झोकून देतात. हा निसर्गाचा नियम आहे. पतंगाला ओढ प्रकाशाची. हे छोटे छोटे किटक घरात आले तर नुसता उच्छाद असतो. डोक्यात, कानात, डोळ्यात, नाकात, टीव्ही च्या स्क्रीनवर, ट्यूबलाईटवर, बेडवर, पिण्याच्या पाण्यात, आमटी भाजीत, जेवणाच्या ताटातसुद्धा ! काही केल्या जात नाहीत. आला असेल अनुभव प्रत्येकाला कधी ना कधीतरी ! ह. हेच तर मला सांगायचंय. हे किटक या दिव्यांवर मस्त खेळत असतात. आणि आपल्याला छान खेळवत असतात.

    या किटकांचा त्रास घालवण्यासाठी एक जालीम उपाय आहे. देवापुढे दिवा लावणे. हा दिवा इलेक्ट्रीकचा नको. तेलाचा किंवा तुपाचा हवा. काय होईल ? या दिव्याच्या पेटत्या ज्योतीकडे हे क्षुद्र किटक आकर्षित होतात. आणि या ज्योतीत जळून जातात. चक्क मरतात. हा निसर्ग आहे. किटक मरणे ही चांगली गोष्ट झाली ना. नाहीतर त्यांचा बल्बवर चाललेला पिंगा बघत रहाण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही.

    जे आपण करू शकत नाही, ते छोटी पेटती पणती करते. उपद्रवी किटकांना मारते. कायमचे !

    जसे हे काही उपद्रवी किटक डोळ्यांना दिसतात, तसे काही सूक्ष्म जीवही असतात, जे डोळ्यांनाही दिसत नाहीत, ते सूक्ष्म जीव देखील या पेणत्या पणतीच्या ज्योतीवर जणुकाही आत्महत्याच करतात. काम तमाम ! वातावरण शुद्ध ! निर्जंतुक !

    दिवा देवासाठी, आरोग्य आपल्यासाठी !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    17.06.2017

  • आहाररहस्य १०

    जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी
    भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी,
    प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण,
    आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन.

  • जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 9

    ऋतुनुसार, दिनमानानुसार सर्वसाधारणपणे सकाळी 6 ते 10 हा काल कफाचा, 10 ते 2 पित्ताचा आणि 2 ते 6 हा वाताचा काळ येतो. असेच सायंकाळ पासून सकाळ पर्यंत समजावे.

    जेवण हे भूक लागेल तेव्हा घ्यावे. भूक असेल तेवढेच घ्यावे. परंतु सूर्य असेपर्यंतच घ्यावे. म्हणजे सर्व साधारणपणे दिवसा जेवावे. रात्रौ जेवू नये.

    व्यवहारात, नियम करायचाच झाल्यास, जेवणाच्या मुख्य वेळा दोन सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात.

    पण आपण समजा दुपारी बारा वाजता पोटभर जेवलो तर पुनः चरचरीत भूक किती वाजता लागेल ? रात्री 8 वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? आठ तास. दुपारचे जेवण पचायला फक्त आठ तास.

    समजा, रात्री 8 वाजता पोटभर जेवलो तर पुनः भुक कधी लागते ? पित्ताची प्रकृती असलेल्यांना सकाळी नऊ दहा वाजता. आणि इतरांना चरचरीत भूक कधी लागेल? चरचरीत भूक लागेल, दुपारी बारा वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? सोळा तास. रात्रीचे जेवण पचवायला सोळा तास ?????

    दिवसाचे जेवण पचायला फक्त आठ तास आणि रात्रौचे जेवण पचायला तब्बल सोळा तास जातात. एवढा वेळ का लागतो ?

    उत्तर सोपं आहे, दिवसा सूर्य असतो म्हणून आणि रात्रौ सूर्य नसतो म्हणून.

    आपण हे पाहिलंय की सूर्य म्हणजे अग्नि.
    पचन घडवणारा तो सूर्यनारायण. हजर असला तर पचन होणारच ना ! त्यात विशेष ते काय ?
    प्रश्न येतो तो, रात्रीचं पचन घडवणार कोण ?

    पचन घडवणे म्हणजे नेमके काय हे पण आपण अन्नपचन कसे होते ? या लेखमालेतून पाहिले आहे. पचन म्हणजे रूपांतरण. एका बाह्य घटकद्रव्याचे रूपांतर शरीराला योग्य होईल अशा अवस्थेत बदलवून घेणं. त्याचे शरीरातील वेगवेगळ्या विकरकामार्फत ( एन्झाईम्स) विघटन घडवून आणणे, त्याचे चांगल्या ( उपयुक्त) आणि वाईट (टाकाऊ) भागात विभागणी करणे, चांगल्या भागातून शरीराचे पोषण करवणे, टाकाऊ भाग जवळच्या मलमार्गापर्यंत आणून ठेवणे, इ. कामे करवून घ्यायला, शरीरातील काही उर्जा संपून जाते. म्हणजे पचन घडवून आणायला, रूपांतरण घडवायला, उर्जा निर्माण करायला उर्जा संपून जाते.

    या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता एक रूपक पाहू. हे उदाहरण ग्रंथात लिहिलेलं नाही. पण समजून घेण्यासाठी थोड्या वेळ पुरतं विचारात घेऊ.

    आपल्या शरीरात एक बॅटरी आहे. जी सोलर एनर्जी वर चालते. सूर्योदय ते सूर्यास्त असं हिचं चार्जिंग सुरू असतं. जोपर्यंत चार्जिंग सुरू असतं, तोपर्यंत सगळी हेवी ड्यूटी कामे करून घ्यावीत. चार्जिंग संपल्यावर जर बॅटरीकडून काम जास्ती करून घेतलं तर बॅटरी लवकर संपून जाईल, अगदी तस्सच होतं पचनाचं.

    सूर्यास्तानंतर या शरीरातील बॅटरी, बॅकअप वर जाते. पचनासाठी लागणारी उर्जा संपू नये असं वाटत असेल तर बॅकअपवर कमीत कमी काम करायचे. म्हणून सूर्यास्तापूर्वी जेवून घ्यावं. जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत पचन पूर्ण करून घ्यावं आणि पुढील महत्वाच्या कामासाठी ही बॅटरी रिझर्व्ह ठेवावी. सकाळपर्यंत नो प्रॉब्लेम. पचन पूर्ण. उठल्या उठल्या दोन नंबरचा काॅल येणार. आणि संपूर्ण दिवस चांगला जाणार.

    सायंकाळी एवढ्या लवकर जेवणार म्हणजे सकाळी लवकर जाग येणार. भूक लागूनच जाग येणार. किंवा कदाचित झोपच लागणार नाही. कारण तशी सवयच नाही ना. गेल्या चाळीस वर्षातील चुका दुरूस्त करायच्या असतील तर थोडा त्रास तर होणारच. काहीजणांची थोडी अॅसिडीटी वाढणार.
    हा पोटात पडणारा खड्डा सुखासाठीच असल्याने त्याचं दुःख मानायचं नाही, ( देहे दुःख ते सुख मानीत जावे ) असं आपलं आधीच ठरलं आहे.
    कुछ बडा पाने के लिए कुछ छोटा खोना तो पडता ही है दोस्तो !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    04.03.2017

  • प्रमुख आहारसूत्र – भाग १६

    सुखाच्या कक्षा वाढवित जाणे, सुखाचा हव्यास वाढवित नेणे, हा प्रमेहाचा हेतु आहे. यालाच आस्यासुख असे ग्रंथकार म्हणतात. कुठुनही शरीरातील कफ वाढण्यासाठी मदत करणे हा प्रमेहाचा हेतु आहे. असे ग्रंथकार म्हणतात.

    आस्या सुख म्हणजे हालचाली करू नयेत, दोन्ही हात हलवत काम करण्यापेक्षा, एकाच हाताने काम करावे, असे वाटणे, हे आस्यासुखच!

    अहो, कंप्युटरचा माऊस एकाच हाताने हलवित बसण्यापेक्षा केवळ डोळ्यानीच तो ऑपरेट करणे, असे अॅप सुद्धा आले आहे, एका हाताचे एक बोटसुद्धा हलवायला नको. फक्त डोळे फिरवायचे की कर्सर हलतो. हे आस्यासुख.!

    उभे राहून काम करण्यापेक्षा किंवा फिरत फिरत काम करण्यापेक्षा बसून काम करावे असे वाटणे. बसताना सुद्धा खाली जागा नीट समतल असावी, एखादी बैठक असावी, असे वाटणे. सतरंजी मिळाली की सतरंजीपेक्षा आणखी मऊ आरामशीर आसनावर बसावे, एकदा बसले की उठू नये असे वाटणे, बसलो तर टेकून बसावेसे वाटणे, टेकून बसलो तर टेकायला मऊ तक्क्या असावासा वाटणे, तक्का मिळाला तर उशी हवीशी वाटणे,बसायला जागा मिळतेच आहे तर खुर्ची का नको ? मग ही खुर्ची काटकोनीच कशाला, त्यापेक्षा विशालकोनी बरी. हे आस्यासुख !!

    आरामखुर्चीवर बसल्यावर पुढे पाय समांतर टेकण्यासाठी टेबल हवे, असे वाटत रहाणे, पण मागे काय चालले आहे हे समजत नाही, त्यासाठी ही आरामखुर्ची गोल फिरणारी हवी ..... आरामखुर्चीवरच बसायचे मग नुसतीच कापडवाली आरामखुर्ची कशाला, फोमचीच वापरूया..... हे आस्यासुख !

    चालण्यापेक्षा सायकल बरी, सायकल पेक्षा स्कूटी बरी, स्कूटीपेक्षा स्कूटर, त्यापेक्षा बाईक, ही बाईक एक पाय झाडून सुरू करण्यापेक्षा एक बोट दाबून सुरू झाली तर बरी !!!!! हे आस्यासुख !!

    कमरेत वाकून जमिनीवरचा केर केरसुणीने काढण्यापेक्षा उभे राहून व्हॅक्युम क्लीनरने केर ओढून घेणे, उकीडवे बसून लादी पुसण्यापेक्षा माॅबने किंवा दांडा लावलेल्या स्पंजने लादी अलगद पुसुन घेणे, किंवा आपण काम न करता, चक्क त्या कामासाठी बाई लावणे, हे आस्या सुख !!!

    सुख हे केवळ बसण्यामधूनच मिळते. बसण्यामधले पुरेपुर सुख मिळवण्यासाठी धडपड सुरू होणे असाही आस्यासुखचा अर्थ आहे.

    सुखार्था सर्व भूतानाम् मताः सर्वा प्रवृत्तयः, असे वाग्भटजी म्हणतात. सर्व प्राणी मात्रांची सुखाकडेच प्रवृत्ती असते, पण प्रमेहामधे, ती जरा जास्तच या कॅटेगरीमधे मोडते.

    याचा अर्थ असा नव्हे की सुखाची कामना, इच्छा करूच नये. सुख मिळावेसे वाटणे, ही अगदी नैसर्गिक भावना आहे. पण आणखी आणखी, त्यापेक्षा जास्ती सुख मलाच मिळावे. हा हावरटपणा किंवा सुखाचा अतिरेक हे दुःखाचे कारण ठरू नये.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.02.2017

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 11

    "आम्हाला हे असं लवकर जेवणं अजिबात शक्य नाही, हो!" असं सांगणाऱ्या करीता खास टीप....

    सक्काळी सकाळी उठायचं, भराभरा आवरायचं डब्बा बनवायचा, पोरांना शाळेत हाकलायचं, नवरा कामाला पाठवलं की कसाबसा चहात पाव बुचकळून खायचा, म्हणजे झाला नाश्ता. वर पाणी ढोसायचं, आपला डबा करायचा, धावधाव करीत ऑफीस गाठायचं, बाॅसची बोलणी खायची, परत घरी येताना मार्केट मार्गे खरेदी करून, येऊन कंबर कसून परत कामाला लागायचं, टीव्ही समोर बसलेल्यांना तिथे नेऊन चहा बिस्कीट खायला द्यायची, कपबशासुद्धा आपणच घरात न्यायच्या. रात्रीच्या जेवणाचं बघायचं, हे करत असताना, तू आज कशी चुकलीस, हे समोर खुर्चीवर ढेंग टाकून निवांत बसलेल्याकडून निमूटपणे ऐकून घ्यायचं. तोंडातून एकही अवाक्षर न काढता, जेवणाचा कार्यक्रम पार पाडायचा, आपणच डाॅक्टरकडे जाऊन आणलेल्या गोळ्या आपणच घ्यायच्या आणि कधी एकदा पडता येतंय याची वाट बघायची ......
    हे सर्व कशासाठी करताय ?

    दोन घास सुखानं खाता यावेत म्हणून ना.....
    खाल्लेलं अंगाला लागण्यासाठीच ना.....

    पण जरं या व्यस्त दिनचर्येतून जर शेवटच्या दोन ओळी साध्य होणार नसतील तर ? सगळा खटाटोप कशासाठी करताय ?
    कशासाठी ? पोटासाठी !

    एकच बदल करून पहा,
    फक्त जेवणाची वेळ बदला...

    आता असं करता येतं का बघा.
    सकाळचा नाश्ता कॅन्सल.
    नाश्त्याऐवजी थेट पोटभर जेवण.
    दुपारचं जेवण / डबा कॅन्सल.
    सायंकाळी घरी आल्यावर पोटभर जेवण.
    ( जे सातला घरी पोचू शकत नाहीत, त्यांनी सायंकाळचा डबा सोबत न्यावा.)
    दोन वेळा जेवण बनवायचंच नाही. फक्त सकाळी एकदाच जेवण बनवण्यात वेळ खर्च करायचा. एक पदार्थ फक्त सायंकाळी नवीन करायचा. बाकीचे तीन प्रकार सकाळचेच.

    सूर्य असल्यामुळे सकाळचे तयार अन्न सायंकाळ पर्यंत नासत नाही. सायंकाळी बनवलेले मात्र सकाळी फुकट जाते.

    दुपारचा डबा अगदी भुकेपुरताच. सायंकाळच्या भूकेची जाणीव ठेवणारा.
    दुसरे मुख्य जेवण सायंकाळी सात वाजता.

    बाकी जेवणात कोणतेही पथ्य करायचे नाही.
    सूर्योदय ते सूर्यास्त सगळं खायचं, पोटभर खायचं, मनसोक्त खायचं.... कावळ्यासारखं !

    पथ्य एकच ....
    खाताना भीती न बाळगता खायचं. आणि खाल्ल्यानंतर खाल्लेलं सगळं विसरून जायचं. खाल्लेलं आठवायचं नाही, मनात साठवायचं नाही.

    बायकांचा स्वयंपाकघरात जाणारा आणि "रांधा वाढा उष्टी काढा" मधे खर्च होणारा वेळ वाचेल.
    सायंकाळी साडेसातनंतर स्वयंपाकघर बंद.
    सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी शाॅपिंग, देऊळ, बाग.... थोडं मोकळे वाटेल.
    स्वयंपाकघरातला वेळ वाचेल,
    फॅमिली लाईफ एन्जाॅय करता येईल, हौस, मौज करता येईल.... आणि बरंच काही...
    मुख्य म्हणजे निरर्थक औषधांशिवाय, निरामय जीवन जगत सगळं जेवण घेता येईल.

    नाहीतर......
    डोंबिवली फास्ट पकडत, दिवसभर धांगड धिंगा करत, ज्या पोटात आहार टाकल्यानंतर त्याचे रूपांतर उर्जेमधे होते, त्याऐवजी, त्याच पोटात रोज न चुकता, जन्मभर पुरणारी औषधं टाकायची आहेतच...
    आणि डाॅक्टरच लिहून देतात हल्ली...
    वरील सर्व औषधे पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सुरू ठेवावीत......

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.03.2017

  • मायफळ / मायाफल

    ह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे.

  • आधुनिक एक्स-रे आणि प्रतिमाशास्त्र

    काही वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या “मेडिकल इमेजिंग” या मराठी पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला. या विषयावरील ते पहिलेच मराठी पुस्तक होते. मात्र छापील पुस्तकाच्या मर्यादांपासुन दुर होउन जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी या पुस्तकाला लेखमालेच्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इंटरनेटचा मोठा उपयोग होईल हे पटल्यामुळे ही लेखमाला सुरु करत आहे. “मराठीसृष्टी”सारख्या लोकप्रिय पोर्टलवरुन या लेखमालेतील लेख इंटरनेटशी जोडलेल्या हजारो मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यास उपयोग होणार आहे.

  • वदनी कवल भाग १

    वदनी कवल घेता
    नाम घ्या श्रीहरीचे
    सहज हवन होते
    नाम घेता फुकाचे
    जीवन करी जिवित्वा
    अन्न हे पूर्ण ब्रह्म
    उदर भरण होणे
    जाणिजे यज्ञकर्म

    हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया.

    मुखी घास घेता करावा विचार.
    कशासाठी हे अन्न मी सेवणार
    घडो माझे हाती नित्य देशसेवा
    म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा

    असा परिवर्तित श्लोक देखील म्हटला जातो. हे श्लोक सामुहीकरीत्या म्हटले जातात.
    समुहाने किंवा एकत्रितरीत्या हे श्लोक म्हणण्याचा एक वेगळा अर्थ अपेक्षित आहे.

    आपण सारे एक आहोत,
    सहनाववतु सहनौ भुनक्तु
    यामधे देखील तोच अर्थ अभिप्रेत आहे.
    एकत्र बसून भोजन करणे, हे एकमेकांची शक्ती वाढवणारे आहे.

    आजकालच्या प्रथेनुसार एकत्र जरी आलो तरी, बसून भोजन काही होत नाही. ते यथाकालोद्भव उभ्याउभ्याच होते. डाव्या हाताने कधीही वाढू नये, वाढून घेऊपण नये. पण डाव्या हाताने घेतल्याशिवाय बुफेभोजन होतच नाही. याकरीता, ( फार फार वर्षा) पूर्वी (सौ.) अन्नपूर्णा सर्वांना वाढून नंतरच आपण जेवायला बसत असे. जे काही हवे ते एकदाच घेऊन नंतरच ती जेवत असे. वाढपी लोकांची संगत हीच तिची पंगत. पण तिच्या चेहर्‍यावर इतरांना वाढण्याचे समाधान झळकत असे.

    सर्व पदार्थ वाढून पूर्ण झाल्यावर, अन्नशुद्धी वाढली जाई.
    अन्नशुद्धी म्हणजे लोणकढे तूप.
    हे तूप (आडव्या चमच्याने) वाढून झाले की, आता आणखी पदार्थ ताटात येणे शिल्लक नाही, असा जणुकाही इशाराच जेवणार्‍यांना मिळत असे.
    म्हणजे अन्नशुद्धी वाढून होईपर्यंत, समोर वाढलेल्या ताटाला हातही लावायचा नाही. असा अलिखित नियमच होता त्यावेळी.

    कोशींबीर वाढून होईपर्यंत लोणचे संपलेले, भाजी येईपर्यंत कोशींबीर संपवलेली. याला सहभोजन म्हणत नाहीत.

    आता पंगतही कालबाह्य झाली आहे.

    एका ओळीत मांडलेली केळीची हिरवीगार पाने, त्यावर रंगीबेरंगी पदार्थांनी सजलेलं आणि गच्च भरलेलं ताट, उदबत्यांचा सुवास,
    एका सुरात, एका तालात म्हटलेले श्लोक, हा सर्व माहोल पाहून आधीच अग्निनारायण अवतीर्ण झालेले असत. आणि वाट बघत बसलेले असत फक्त गजराची !

    जय जऽय रघुवीर समर्थ ऽऽऽ
    हरऽऽहर महाऽऽदेव

    आणि नंतर आक्रमणाला जी सुरवात होई, ती अग्निनारायणाने अगदी तथास्तु म्हणेपर्यंत.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    04.09.2016