हे फोटो काढण्यास क्ष किरण तज्ञांना आधी भेटणे जरुरीचे आहे कारण यासाठी पुन्हा उपाशी पोटी जावे लागते. व आदल्या दिवशी जुलाबाचे औषधही घ्यावे लागते. जर बेरियम टेस्ट फक्त पोटासाठी (स्टमक, ड्युओडेनम) असले तर फक्त १५ मिनिटेच लागतात व यात स्पेशल डबल कॉंन्ट्रास्ट स्टडी म्हणजे हवा व बेरियम मिश्रण करुन पोटाचे अल्सरसाठी फोटो काढले जातात.
मांसाहार करण्याची संयुक्तिक कारणे आणि समर्थन कितीही केले तरी ते लंगडेच होईल. कितीही शोधून काढा, माणसासाठी दररोज मांसाहार करणे हा कदापि आरोग्यदायी होणार नाही.
आपली गाडी जर पेट्रोलवर चालणारी असेल, तर ती गाडी डिझेल किंवा राॅकेलवर चालेल का ?
चालेलही.
पण किती दिवस ? आणि चालवली तरीही आतमधे काहीतरी, कुठेतरी दोष उत्पन्न होणारच ना !
अगदी हाच नियम वापरून बघा, जर माणसाचे शरीर निसर्गाने शाकाहाराला पूरक केले असेल तर त्यातील केवळ इंधन बदलले तर गाडीचे अॅव्हरेज वाढेल का ?
कधीही नाही.
शाकाहारी प्राण्यांची रचना आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळीच आहेत. ती मान्य करणे यातच जास्त शहाणपणा आहे.
काही व्यक्ती रोज मांसाहार करतात. काही आठवड्यातून ठराविक दिवस. तर काही जण महिन्यातून ठराविक दिवस.
पण ही मंडळी फक्त मांसाहारच करतात का ? नाही.
मांसाहाराबरोबर शाकाहार तर घेतच असतात. नव्हे तो घ्यावाच लागतो.
मांसाहारी कुटुंबात जन्म झाल्यामुळे मांसाहारी सवय लागतेच. पण त्यामुळे काय खातोय, कसं खातोय, कशासाठी खातोय, परिणाम काय होणार आहेत, यावर चिंतन अजिबात होत नाही. करू शकत नाही. जशा परंपरा चालत आलेल्या आहेत तशाच त्या पुढे सुरू रहातात. यालाच अंधानुकरण म्हणतात. संस्कार एवढे पक्के होतात, की मांसाहाराचे दुष्परीणाम समजूनही मांसाहार सोडता येत नाही. जणु काही त्याचे व्यसनच लागते. मग घरातले पुरत नाही, रवि बुध लवकर येत नाही तेव्हा बाहेरील हाॅटेलिंग सुरू होते. खाल्लेले मांस सहजपणे पचत नाही म्हणून त्यासाठी पुनः मद्य सेवनाचा दोष.
एका दोषातून बाहेर पडण्यासाठी पुनः दुसरा दोष निर्माण केल्यासारखंच नाही का ?
म्हणजे एका उष्ण औषधाचे ऊष्ण परिणाम (म्हणजे अॅसिडीटी) दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे थंड औषध ( म्हणजे अॅण्टासिड .) याचा तिसरा दुष्परिणाम मलविबंध (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन ) यावरील औषधांनी आतड्यांचा फ्लोरा डिस्टर्ब होतो, म्हणून आणखी एक औषध. त्याने काही व्हिटामिन्स कमी होतात, म्हणून आणखी एक औषध. म्हणजे एक गुन्हा लपवण्यासाठी आणखी एक गुन्हा !
मग काय,
जगण्यासाठी चौदा पंधरा प्रकारची औषधे सुरू होतात.
आजन्म !
मरे पर्यंत !!
Until death !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
8.10.2016
आपल्यासाठी हितकर काय आहे आणि अहितकर काय आहे, हे एकतर वैद्यबुवा सांगतील किंवा आपले स्वतःचे शरीर सांगेल. तसंच करावं. इतर कोणाचंही ऐकू नये. याचा अर्थ मनमानीपणा नव्हे. पण बिनधास्त खावं बिनधास्त फिरावं. खाताना भीती नको, खाल्ल्यानंतर खाल्लेल्याची आठवण नको. पावसात भिजताना सर्दीची आठवण नको. सर्दी झालीच तर रडतराहूपणा नको. सतत वर्तमानातील आनंद घेत राहवे.
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 7
फार बिकट अवस्था होते, रिपोर्ट अॅबनाॅर्मल आणि पेशंट नाॅर्मल असेल तर.
नेमका काय निर्णय घ्यायचा रुग्णाला कळतंच नाही. डाॅक्टर आपली जबाबदारी टाळून मोकळे झालेले असतात. आणि रुग्णाला अगतिकपणे चुकीचा निर्णय घ्यायला भाग पडते. अशी कितीतरी उदाहरणे व्यवहारात पहायला मिळतात. मुतखडे, पित्ताशयातील खडे, युटेराईन फायब्राॅईड पासून अगदी कॅन्सर च्या गाठीपर्यंत, आणि रक्तदाबापासून, ह्रदयरोगापर्यंत साऱ्या रोगाच्या निदानासाठी यंत्रावर अवलंबून रहाण्याची वेळ आली आणि आरोग्याचे आर्थिक गणितही पार कोलमडून पडले. त्यात भर पडली ती, इन्शुरन्सची. कंपन्यांकडून परतावा मिळतो आहे, मग पैशाचा प्रश्न सुटला पण आयुष्यभर औषधांचा खेळ मात्र सुरू झाला.
रोगाच्या दुष्परिणामापेक्षा, औषधांचे दुष्परिणाम जास्त दिसू लागले. आणि आहार वाटीत आणि औषधी ताटात दिसू लागली. म्हणजे आहारापेक्षा औषधांची संख्या वाढू लागली.
पूर्वीची गाणी कशी होती, गायकाला मधे श्वास घ्यायला मिळायला वेळ मिळायला हवा, म्हणून मधेच म्युझिकचा पीस वाजवला जाई. पण आता वाजंत्रीवाल्यांना थोडी विश्रांती द्यावी म्हणून गायकांना मधे मधे तेच तेच अर्थहीन शब्द आळवायला लागतात, तसं काहीसं झालंय. सतरा अठरा औषध घ्यायची. त्यानेच पोट भरते. एवढी औषधे गिळायला परत तेवढेच पाणी पण पाजवले जाते. गरज नसताना अवयवांना अनावश्यक कामाला लावले जाते. औषधे उष्ण पडू नयेत म्हणून दर दोन चार तासांनी काहीतरी खाण्याचा सल्ला शिरसावंद्य मानला जातो आणि पोटावर अत्याचार सुरू होतो.
एवढं सगळं सोसूनही मला त्याचा विशेष त्रास होत नाहीच.
कारण "तो". आपल्यापेक्षा त्याला आपली जास्त काळजी आहे.
माझं, माझ्याकडे तरी लक्ष कुठाय ? हे सगळे अत्याचार पाहिले की खरंच "तो" आहे, याची खात्री पटते. नाहीतर एवढे सगळे अत्याचार सोसूनही मी मात्र सतत धावतोच आहे. नाॅर्मल होण्यासाठी .....
तो कस्तुरी मृग कसा सैराट होऊन धावतो, कस्तुरीच्या गंधाचा ठाव घेण्यासाठी. पण शेवटपर्यंत त्याला कळत नाही. तो सुगंध माझा मीच निर्मिलेला होता. फक्त तो मला कळत नव्हता. तसं आरोग्याचं झालंय. माझं आरोग्य माझ्यातच हरवलंय, माझ्या अज्ञानामुळे हरवलंय आणि मी मात्र माझा आयुर्वेदाचा दृष्टीकोन हरवून रानोमाळ दिशाहीन भटकतोय,
सैराट होऊन....
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.02.2017
अमुक रोग 'कमी करण्यासाठी' आयुर्वेदात काय औषध सांगितले आहे, असा प्रश्न विचारायला लागू नये, यासाठी, रोग होऊच नये यासाठी आयुर्वेद नीट समजून घेणे आवश्यक आहे.
आयुर्वेदात सांगितलेले उपाय हे प्राधान्याने रोग होऊ नयेत, यासाठी सांगितलेले आहेत, हे आधी लक्षात घ्यावे. केवळ रोगाची लक्षणे कमी केले की झाले असे नव्हे तर, जो रोग समूळ नष्ट व्हायला हवा, तो योग्य औषधोपचार आणि विशिष्ट पथ्य सांभाळले की झाले. त्यासाठी औषधे कायमची कशाला घ्यायची ?
आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे. त्यामुळे जीवन कसे जगावे, जीवन म्हणजे काय, त्याचा उद्देश काय आहे, हे अगदी सुरवातीलाच स्पष्टपणे ग्रंथकार सांगतात.
प्रमेहासारखे रोग होऊ नयेत, यासाठी ही जीवनपद्धती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेद म्हणजे कोणतीही 'पॅथी' नाही. किंवा हे सांगण्यात सुद्धा कोणताही अहंकार नाही. सुदैवाने आपल्या या संपूर्ण स्वदेशी शास्त्राचा अभ्यास करता आला, हे माझे सद्भाग्य. घेतलेल्या शिक्षणपद्धतीचा परिणाम म्हणून काही जणाना आयुर्वेद नाही शिकता आला, म्हणून वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. फक्त तो नीट समजून घ्यावा. वाग्भटजीनी आपल्या ग्रंथाची सुरवातच एका छान श्लोकाने केली आहे. त्यात ते म्हणतात, हे शास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी राग, अहंकार, अभिनिवेश, गर्व, आदि बाजूला ठेवावे. तरच ग्रंथ नीट समजून शिकता येईल. त्यासाठी पूर्वग्रह दूषित दृष्टी बदलायला हवी. अजूनही काही डाॅक्टर आयुर्वेद म्हणजे बोगसगिरी असे ( अज्ञानाने ) म्हणतात.
"देवा, त्यांना क्षमा कर, ते काय बोलत आहेत, ते त्यांचे त्यांनाच कळत नाहीये."
आणि आयुर्वेदाचे काही (ज्ञानी ) पदवीधर सुद्धा आयुर्वेदाचीच थट्टा करतात, त्यांची तर किव करावीशी वाटते.
असो.
काल परवा काही जणांनी वैयक्तिकरीत्या विचारलेल्या शंकाना सार्वजनिकरीत्या उत्तर द्यावेसे वाटले. म्हणून लिहिले.
प्रमेहामधे दही नको. या कायद्याला पळवाटीची युक्ती कशी शोधावी हे आपण पाहिले.
काही वेळा असे सांगितले जाते, की एवढी वर्षे आम्ही दही खातोय, आम्हाला काय सुद्धा धाड भरली नाही.? हे कसे ?"
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. एखाद्या व्यक्तीची काहीवेळा मानसिक ताकद जास्त असते. काहीवेळा आध्यात्मिक शक्ती त्याला मदत करत असतात, त्यामुळे रोग लगेच होत नाहीत. पण जेव्हा यापैकी एखादी ताकद कमी होते, तेव्हा लगेच किंवा कालांतराने त्रास संभवू शकतात. जे शारिरीक त्रास आज मला होत नाहीत, किंवा लक्षणे दिसत नाहीत, ते आजार किंवा रोग भविष्यात होणारच नाहीत, यासारख्या भ्रमात कोणी राहू नये. तसेच प्रमेहासारख्या रोगात कायमस्वरुपी औषध घ्यायलाच लागते, या गैरसमजात देखील कुणी राहू नये.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
30.01.2017
ह्या नवीन सदरा मध्ये आपण आयुर्वेदामध्ये वापरल्या जाणाऱ्या उपयुक्त अशा काही वनस्पतींची माहीती जाणून घेऊयात.
आपल्या पैकी बऱ्याच मंडळींना पुष्कळ वनस्पती तसेच त्याचे उपयोग माहीत देखील असतील पण काही गोष्टींची उजळणी करणे ही कल्पना देखील वाईट नाही हो ना.
हो अजून एक मुख्य गोष्ट नमूद करायचे राहीलेच की!
जरी आपण इथे काही वनस्पतींची माहीती वाचत असलात तरी त्याचा वापर कसा करावा हे ह्या सदरामध्ये सांगितले जाणार नाही अर्थात आम्ही आयुर्वेदामध्ये ज्याला आमयिक प्रयोग म्हणतो तो इथे दिला जाणार नाही ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.
हा लेख फक्त माहीती पर असल्याने इथे सांगितलेली वनस्पती ही प्रत्येक वाचकांना वैद्यांचा सल्ला घेऊनच उपयोगात आणावी हि वाचकांना नम्र विनंती.
तर मग ह्या सदराची सुरूवात श्री गणरायांना नमन करून त्यांनाच अर्पण केल्या जाणाऱ्या पत्री पासून केली तर उत्तमच नाही का?
आता काय करू?
कोकणात गहू वापरायचा नाही तर
आता काय करू ?
आता गहू खायची एवढी सवय (सात्म्यता) झाली आहे
आता काय करू ?
गहू सोडता येणार नाही.
आता काय करू ?
सुखाची एवढी सवय झाली आहे
आता काय करू?
जसा प्रदेश, तसा आहार
जसा आहार, तशी शरीरयष्टी
जशी शरीरयष्टी, तसे काम
जसे काम, तसा आहार.
ही एक साखळी आहे.
यातील एखादा दुवा बदलता येणार नाही.
जसा देश पंजाब, गहू मुख्य आहार.
गहू मुख्य आहार म्हणून मिळते बलदंड शरीरयष्टी.
पंजाबी जाट मजबूत शरीर, तसे झेपते काम.
कामच एवढे प्रचंड मेहनतीचे,
की आहार गव्हाचाच हवा
आणि
प्यायला लस्सी आणि खायला खवा.
मला गहू आवडतो, मला परवडतो, मी सात्म्य केलाय, आता मी तो खाणार, असे म्हणून कोकणाचे रूपांतर, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड प्रदेशात थोडेच होणार आहे ? समुद्र आपली जागा किंवा गाज थोडीच बदलू शकणार बदलणार आहे? ( गाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज )
किंवा एकवेळ गहू खाऊन खाऊन सात्म्य केला म्हणून आपले कामाचे स्वरूप थोडेच बदलणार आहे ?
ऊलट जेवढे कमी करता येईल, तेवढे काम आपण कमीच करत आहोत. विज्ञानाच्या सहाय्याने बौद्धिक काम वा शारीरिक श्रम कमीच करत करतोय.....
पण मनःशांती मात्र हरवतोय.
त्यासाठी कमी वेळात जास्त पैश्यासाठी धडपडतोय.. साधने मिळवतोय.
पूर्वी मधुमेह हा बुद्धिजीवी वर्गाचा आजार होता. पण आता कष्टकरी वर्गातही दिसतोय.
आज विज्ञानाने कुकर शेतकऱ्याच्या घरात आणून दिला आणि मागोमाग मधुमेह सुद्धा ! शेतकऱ्याच्या शेतात बैलजोडीच्या जोता ऐवजी टॅक्टर आला.
मागे पैसा वाढला, आणि पुढे पोटही .........
सुखाच्या जेवढे जवळ जातोय, तेवढे सुखापासून आपण लांब जातोय, एक सुख मिळवण्याच्या प्रयत्नात महत्वाचे सुख आपण विसरत जातोय. ते म्हणजे आरोग्य.
म्हणून एक सूत्र आमचे ग्रंथकार सांगतात, पळवाटा शोधू नका.
निःसुखत्वम सुखायच......
आत्ता थोडासा सुखाचा त्याग करा, जे अंतिमतः सुखकर असेल.
हे सर्व ज्याच्यासाठी करतोय ते आरोग्यच, (किंवा पुढची पिढी ) जर माझ्या हातून, अगदी देखल्या डोळा, निसटून जात असेल तर, एवढी धडपड करायची तरी कशाला ?
वेगवेगळे आजार आज अगदी दरवाज्यात रांगेत उभे आहेत. एका चुकीच्या वेळी दरवाजा उघडायची खोटी...
तो आत आलाच म्हणून समजा....
पुढच्या पिढी या बंद दरवाज्यापासून अनभिज्ञ आहे.
त्यांनी दरवाजा जवळपास उघडलेला आहे, समोर संकट दिसतंय आणि ही पिढीपण ओरडून तेच विचारतेय,
आता काय करू?
आयुर्वेद दीनपणे साजरा करण्याची वेळ न येवो, या आयुर्वेददिनाच्या शुभेच्छांसह..
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
28.10.2016
बदललं, सारंच बदललं.
ते गोरे इंग्रज काय येऊन गेले,
तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले
पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले.

ह्याचे मोठे प्रसरणशील काटेरी गुल्म असते.खोड व फांद्यावर काटे असतात.पाने ३ सेंमी लांब पक्षाकार असून फुले फिकट पिवळ्या रंगाची मंजिरी स्वरूप असतात.खालचे फूल फळात रूपांतरित होते.फळ ६ सेंमी लांब,चपटे,काटेरी व आत १-२ बिया ज्याला आपण सागर गोटा म्हणतो त्या असतात.बिया गोलाकार,निळसर करड्या व कठिण आवरण असलेल्या असतात.
ह्याचे उपयुक्तांग बीज असून ते चवीला तिखट,कडू,तुरट असून उष्ण गुणाचे व हल्के व रूक्ष असते.लताकरंज कफ व वातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)आमवात व संधिवात ह्यात लताकरंज तेल चोळल्यास फायदा होतो.
२)सागरगोट्याच्या बियाची साल तुरट असल्याने जुलाब,आव पडणे ह्यात उपयुक्त आहे.
३)सुजेवर सागर गोटा,रूई,एरंडाची पाने एकत्र वाटून गरम करून लेप करतात.
४)सागरगोटा चुर्ण ओव्या सोबत दिल्यास मासिक पाळी नियमीत येण्यास मदत होते.
५)जखमेवर सागरगोटा पाण्यात उगाळून त्याचा लेप लावावा.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
आधुनिक प्रतिमाशास्त्रात जवळजवळ सर्वच प्रतिमा कृष्णधवलच असतात; कारण निदानातील सूक्ष्मता ओळखण्यास मानवाचे डोळे कृष्णधवलातच सर्वात जास्त कार्यक्षम असतात.
Copyright © 2025 | Marathisrushti