(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मदनफळ

    ह्याचा १० मीटर उंचीचा झाडीदार वृक्ष असतो.ह्याची पाने आघाड्याच्या पानांसारखी दिसणारी किंचीत गोल असतात.पानाच्या मध्य शिरेवर लांब व तीक्ष्ण काटे असतात.ह्याचे फळ पियर्सच्या सारखे दिसते व गोल,पिवळट धुरकट असून फल मज्जा विशिष्ट गंधयुक्त असते.मज्जेमध्ये कवचयुक्त काळ्या बिया असतात ह्यांना मदनफळ पिंपळी म्हणतात.

    ह्याचे उपयुक्तांग फळ असून मदनफळ चवीला गोड,कडू,तुरट,तिखट असून उष्ण गुणाचे असते हे हल्के व रूक्ष असून प्रभावाने उल्टी करवते.हे अल्प मात्रेत वापरल्यास गोड चव सोडल्यास इतर गुणांनी कफनाशक आहे व उष्ण असल्याने वातनाशक आहे.पण जास्त मात्रा वापरल्यास कफपित्त शोधन करते.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)मदनफळ साल वेदना व सूज कमी करते म्हणून वातव्याधीमध्ये अभ्यंगास ह्याचे तेल वापरतात.

    २)कफप्रधान विकारात उल्टी करविण्यास मदनफळ उपयुक्त.

    ३)अल्पमात्रेत वापरल्यास कफनिस्सारक आहे म्हणून सर्दी,दमा,खोकला ह्यात मदनफळ उपयुक्त आहे.

    ४)मदनफळ तीक्ष्ण,उष्ण,कडू,तिखट,तुरट असून
    त्वचा रोगात क्लेद व दुष्ट कफाचा नाश करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौऱ्याहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 31

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग पाच

    गणेशजी आपल्याकडे येतात. काही जणांकडे दीड दिवस, काही जणांकडे पाच, सात, अकरा, एकवीस दिवस मुक्कामी असतात. जणुकाही घरातलाच एक घटक होऊन जातात. विसर्जनाची वेळ येते तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावतात. ते (तेज) घरातून जाऊ नयेत, असे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच वाटत असते.
    गणेशजी आपल्या घरातील एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तीच बनून गेलेले असतात. सर्वगुणसंपन्न असलेली ही सगुण देवता आपल्या अवतीभवती आहे, याचा विलक्षण आनंद यावेळी आपल्या मनात असतो. केवळ एका ज्ञातीचे हे दैवत नसून समस्त समाजाला देशभक्तीच्या एका सूत्रात बांधून ठेवणारे हे सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील दैवत. जेव्हा गणेशजी येतात, मनातली सर्व सुख दुःख प्रत्येक जण त्यांना सांगत असतात. कोणावर जबरदस्ती नाही, कडक सोवळे ओवळे नाही. घरातली सर्वजण अगदी मनोभावे यथासांग, यथा मिलितोपचार द्रव्यांनी षोडशोपचार पूजा करत असतात.

    या निमित्ताने नवीन खरेदी, बाजारात खरेदीला गर्दी, एका घरातील पैसा बाहेर येतो, दुसऱ्याच्या घरात जातो. चलन हलते फिरते राहाते, पैसा फिरला तर देशाचा आर्थिक विकास होतो, हा अर्थशास्त्रातला नियम. सणांच्या माध्यमातून भारतात हा नियम केवळ पुस्तकात राहिलेला नाही तर व्यवहारात उतरवला गेलाय. त्याचा परिणाम म्हणून भारतात इंग्रज येऊन गेल्यानंतर परिस्थिती दुष्काळी असली तरी आर्थिक मंदीची लाट तशी कधी जाणवली नाही, ती या अशा सणांमुळे आणि त्यातल्या कर्मकांडामुळे !

    पाच फळं, पाच भाज्या, पाच पक्वान्न, सणाच्या निमित्ताने का होईना, खरेदी होते, सण म्हणून वेगवेगळे पदार्थ. एकत्रित भोजन, एकत्रित भजन, एकमेकांच्या सहवासात येत असतो. घराला जणुकाही देवालय बनवून टाकलेलं असतं. घराघरातील गणेशतत्व जरी एकच असले तरी प्रत्येकाच्या घरी जावून, प्रत्येक घरातील प्रत्येक गणेशाचे दर्शन होते. एक निमित्त असते, लोकसंग्रह वाढवायचे ! नातेसंबंध वाढवायचे, पौष्टिक खायचे, आरोग्य सुधारायचे !

    सकाळी लवकर उठून गणपतीची मनोभावे केलेली पूजा, आरती, शंख, घंटा यातून निर्माण होणारे ध्वनी, झांज, टाळ, तबला, पेटी, पखवाज, घुमट इ. अनेक वाद्यांचे गजर, शब्दलहरी, मंत्रलहरी, त्यांचे नाद, सूर, ताल, लय यांनी घरातील वायुमहाभूताची, आकाश महाभूताची शुद्धी होत असते.

    काही आठवतंय पहा,
    प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशजीना पहिला नमस्कार.
    आपण जेवायला बसलो की गणेशजीना नैवेद्याचे पान पहिल्यांदा. "तुमच्यामुळे आम्हाला मोदक मिळती खायाला, गणपती बाप्पा मोरया" असं म्हणत गणपतीसाठी केलेले सर्व मोदक आपणच खाऊन टाकायचे....

    हे पंचपक्वान्नाचे ताट नैवेद्य म्हणून दाखवून परत सगळ्यांनी समान वाटून घ्यायचे. कोणताही भेदाभेद नाही. कोणाशीही भेदभाव नाही.

    पण....
    हा असा भरलेल्या ताटाचा नैवेद्य फक्त दुपारी दाखवला जातो.( नाव गणेशाचे खातो आपणच ! )
    आणि रात्रीची पेटपूजा ?
    ?????
    नैवेद्याला काय असते ?
    आठवावं लागतंय ना !
    जशी षोडशोपचार पूजा सकाळी केली जाते, तशी सायंपूजा केली जात नाही. सायंकाळी केली जाते, त्या पूजेला सायंपूजा असे म्हणतात.
    सायंकाळी फक्त पंचोपचार आणि आरती ! आणि नैवेद्याला काय असतं ?

    फक्त एखादा लाडू, किंवा लाह्यांचं गुळखोबरं घातलेलं पंचखाद्य, किंवा एखादा मोदक किंवा एखादी करंजी किंवा नेव्हरी. ( गोवा, कोकण भागात करंजीला नेवरी म्हणतात.)

    बास्स बास्स बास् !
    संध्याकाळी झालेल्या या पूजेनंतर गणेशजींचा हा जो नैवेद्य असतो, इथे आरोग्य दडलेलं आहे.
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायानुसार आपणही तेवढे आणि तसेच अन्न खायचे असते.
    सकाळ दुपार भरपूर जेवायचे आणि सायंकाळी कमी, रात्रीचे तर नाहीच, हा नियम पुनः एकदा सिद्ध होतो.

    सकाळी झालेल्या पूजेनंतर पंचपक्वान्न खाल्ली तरी चालतात. आणि सायंकाळी मात्र एखादाच लाडू किंवा लाह्या सदृश्य काही तरी भाजलेलं, फुलवलेलं, पचायला एकदम हलकं असंच अन्न घ्यावं हा त्यामागील आरोग्य संकेत . समजून घेणाऱ्या समंजसांना हा समज समजतो. बाकी सगळे बुद्धीवादी, भक्ती सोडून ज्ञानाची सालपटं काढत रहातात, आणि आपण मात्र लंबोदर होतात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    24.06.2017

  • किचन क्लिनिक – मोहरी

    आपल्या स्वयंपाकामध्ये जिच्या उपस्थिती शिवाय फोडणी हि संकल्पना पुर्णत्वाला येऊच शकणार नाही अशी ही फोडणीवर स्वत:ची मोहर टाकणारी मोहरी उर्फ राई. इंग्रजीत हिला Brassica तसेच Mustard असेही म्हणतात. अमुक व्यक्तीने एखाद्या गोष्टीच्या बाबतींत राईचा पर्वत केला हि म्हण आपल्या सर्वांच्या अगदी तोंडावर असते नाही का, तशीच आहे ही राई.

    मोहरीचे लहान क्षूप असते आणि आपण वापरतो ती मोहरी ही त्याच्या बिया होय. चवीला कडू तिखट आणि बरीच उष्ण त्यामुळे शरीरातील कफ आणि वात दोष कमी करते.

    चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना.

    १) पुष्कळ खोकला येऊन कफ सुटत नसेल तर १/४ चमचा मोहरी+१ चमचा खडीसाखर हे मिश्रण तोंडात ठेऊन त्याचा रस गिळावा आराम पडतो.

    २) दात किडल्या मुळे दुखत असल्यास मोहोरीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात दात दुःखी थांबते.

    ३) मोठ्या व्यक्तींना जप कायम पोटात जंत होण्याची तक्रार असेल तप मोहरीचे चूर्ण १/२ चमचा गरम पाण्यात सोबत घ्यावे व नंतर त्यांवर ५-६ चमचे एरंडेल तेल प्यावे त्याने शौचा मधून जंत पडतात.

    ४) कुठल्याही अवयवावर सूज आली असेल तर पादेलोण अर्थात काळे मीठ व मोहरी समप्रमाणात एकत्र वाटावी व त्या मिश्रणाचा लेप सूज आलेल्या भागी करावा सूज उतरते.

    ५) जास्त चालणे अथवा एका जागी फार काळ बसून राहील्याने जर सांधे दूखुन मुंग्या येत असतील तर मोहरी एरंडेल तेलात वाटावी व ते मिश्रण त्या भागावर चोळावे रक्तप्रवाह सुधारतो आणि ही तक्रार कमी होते.

    मोहरीच्या अतिवापराने एॅसीडीटी, हातपायांची जळजळ, अंगावर पुरळ उठणे, डोके दुखणे, संडास, लघवी अथवा नाकातून रक्तस्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर

    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ५

    मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र आहे.

    आस्यासुखम् स्वप्नसुखम् दधिनी
    ग्राम्यौदक आनूपरसाः पयांसी
    नवान्न पानं गुड वैकृतम् च
    प्रमेह हेतु कफकृत्तच सर्वम् !!

    ग्रंथातील या सूत्रातील आनूप या शब्दाकडे लक्ष वेधू इच्छितो. या शब्दाचा अर्थ आहे, पाणथळ प्रदेशातील मांस.
    ज्या प्राण्यांच्या हालचाली खूप कमी आहेत, जे प्राणी भरपूर पाणी पितात, ज्यांची प्रकृती कफाची आहे, जे स्वभावतःच जाड आहेत, काहीही व्यायाम करीत नाहीत, मुद्दाम खुराक देऊन वाढवलेले, माजवलेले आहेत, अश्या प्राण्यांचे मांस खाणे हे प्रमेहाचे कारण आहे.

    प्रमेह हा मूळ रोग. त्याचे एकुण वीस प्रकार त्यातील कफामुळे होणारे दहा, पित्तामुळे होणारे सहा आणि वातामुळे होणारे चार वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील वाताच्या प्रकारातील एक प्रकार म्हणजे मधुमेह.

    हा मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे, काय सावधगिरी बाळगावी, हे सांगताना शास्त्रकारानी खूप छान संकल्पना मांडल्या आहेत. विषय फक्त मांसाशी संबंधीत असल्यामुळे त्याच संकल्पना इथे बघू.

    वर वर्णन केल्यापेक्षा वेगळे मांसाहारी प्राणी, म्हणजे जंगली प्राणी. सुक्या कोरड्या जागी रहाणारे, सतत धावणारे, म्हणजे व्यायाम करणारे, गरजेनुसार पाणी पिणारे, अंगावर कमी चरबी असणारे प्राणी. या जंगली प्राण्यांचे मांस आणि आनूप प्रदेशातील प्राण्यांचे मांस यांच्या गुणातील सूक्ष्म फरक द्रष्ट्या शास्त्रकारांनी अभ्यासला होता, निरीक्षण केले होते, कदाचित भविष्यात काय होणार हे त्यांना आधीपासूनच माहीत होते, म्हणूनच एक सावधानतेचा इशाराच जणु त्यांनी देऊन ठेवला होता.

    आयुर्वेदात मांसाहार निषिध्द सांगितलेला नाही. हे आपण आगदी पहिल्या लेखात पाहिले होते. मधे मधे पण त्याचा उल्लेख करीतच होतो,

    भविष्यात रोग होऊ नयेत, यासाठी कोणते मांस खाऊ नये, हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. हे अश्या प्रकारचे मांस खाल्ले की कोणते रोग होणार यांच्या यादीत प्रमेहाचा, मधुमेहाचा क्रमांक वरचा आहे.

    त्याकाळी सूत्र सांगून ठेवले, ते आजच्या काळानुसार अभ्यासले की कोणते मांस खावे आणि खाऊ नये हे स्पष्ट होत जाते.

    ज्या प्राण्यांना सतत कोंडून ठेवले जाते, तयार अन्न त्यांना सतत दिले जाते, स्वतःचे अन्न स्वतःच शोधायचे असते, हा नियम न पाळणाऱ्या, म्हणजेच खुराड्यात कृत्रिमरीत्या वाढवल्या जाणाऱ्या पशुपक्ष्यांचे मांस आनूप प्रकारात येते. हे मांस सतत खाल्ले की प्रमेह होण्याची शक्यता काही पटीने वाढते, हे लक्षात येते. प्रत्यक्षातही तसेच दिसते.

    या खुराड्यात वाढवलेल्या प्राण्यांचे पोषण मुद्दाम मांस खाण्यासाठी केलेले असते. म्हणून त्यांना दिवस रात्र सतत खायला दिले जाते. त्यांना लहान जागेत ठेवले जाते. जेणेकरून ती हालचाली कमी करतील, व्यायाम होणार नाही आणि नंतर त्यांचे वजनही वाढेल.
    पशुपक्ष्यांचे वजन वाढवणे, हाच एकमेव बिझनेस असल्यामुळे खुराडे मालकांना तेच करावे लागते, जे त्यांना सांगितले गेले आहे.
    मग ती ब्राॅयलर कोंबडी, बदके असोत वा, बकरे डुकरे असोत.
    त्यांचे जास्तीतजास्त वजन कसे वाढेल हेच मालक पहाणार.
    पण त्याचा परिणाम पुढे खाणाऱ्यांना भोगावाच लागणार. प्रमेह वाढणार.

    तो वाढलेला आहेच, असं जागतिक आरोग्य संघटना अगतिकपणे सांगतेय.

    पण इथे विचार करायला वेळ कोणाकडे आहे ?
    पैसा फेकला की जसे टाॅनिक विकत मिळते, तसे आरोग्यही विकत मिळते, असे वाटणारी मंडळी काही कमी नाहीत.
    सगळेच अगतिक...
    वेळेला बांधलेले....
    आयुष्याची गती कमी केलेले.....

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    5.10.2016

  • किचन क्लिनीक – चिंच

    किचन क्लिनीक – चिंच

    चिंचेचा उपयोग आपल्या स्वयंपाकात बऱ्याच प्रमाणामध्ये केलजातो.आमटी,भाजी,चटणी,
    पाक,सरबते,तसेच आता तर इमली जेली देखील मिळू लागली आहे.चाट चे पदार्थ तर चिंच खजुर चटणी शिवाय कल्पनाच केली जाऊ शकत नाही.

    अगदी बाई गरोदर असेल तर तिला देखील चिंचा खाव्याशा वाटतात का विचारले जाते.

    चिंचेचा मोठा वृक्ष असतो साधारण पणे आवळ्याच्या पानां प्रमाणे बारीक पाने असतात.तसेच त्याला लागलेली कच्ची चिंच हिरवी मातकट रंगांची टणक असते व पिकल्यावर ती पुर्ण मातकट रंगांची होते व आतील बी टणक व त्यावर कठीण आवरण असणारी होते.

    कच्ची चिंच आंबट,उष्ण,पित्त,रक्त,कफ दुषित करणारी असून वातनाशक आहे.

    पिकलेली चिंच आंबट,गोड,उष्ण,वात,कफनाशक व पित्तकर आहे.

    आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूया:

    १)तोंडास घाण वास येणे,जीभेवर साका जमणे,तोंडास चव नसणे ह्यात जेवणा सह कच्ची चिंच व सैंधव घालून केलेला ठेचा खावा.

    २)अजीर्ण होऊन मळमळ होणे,उल्टी होणे ह्यात पिकलेली चिंच सैंधव लावून तोंडात धरून चघळावी.

    ३)लघ्वीची जळजळ,पोटात वात धरणे ह्यात २ चमचे चिंचेचा कोळ+१ चमचा मध+१चमचा साखर हे मिश्रण घ्यावे.

    ४)किटक चावलेल्या ठिकाणी चिंचोका भाजून अग्र नुसता उगाळून दंश भागी लावावा.

    ५)१ कि चिंच २ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावी व सकाळी कोळून गाळून त्यात २ किलो साखर घालावी व पाक करावा.हे तयार सरबत ४ चमचे १ ग्लास पाण्यात मिसळून रात्री घेतल्यास बद्धकोष्ठाचा त्रास कमी होते.

    चिंच अतिमात्रेत खाल्ल्यास अम्लपित्त होते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग बत्तीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेअडतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग बत्तीस

    बाबा सांगतात...

    देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये. आणि कठोर शब्दांनी बोलू नये.

    राजाला योग्य तो मान दिलाच पाहिजे. जरी लोकशाही असली तरी तो लोकमान्य लोकनेता आहे. हे विसरून चालत नाही.

    दारी आलेला याचक ओळखून त्याला यथाशक्ती मदत करावी. तो किती मागतोय, यापेक्षा माझी दातृत्व शक्ती किती आहे, हे एकदा तपासून पहावे. काळाची पावले ओळखून, काहीवेळा "नाही" म्हणायलादेखील शिकले पाहिजे.

    अतिथी म्हणजे ज्याची येण्याची आणि जाण्याची तिथी निश्चित नसते. म्हणजे न सांगता येतो आणि न सांगता जातो. सांगून येतो तो "पाहुणा" !
    या दोघांचाही योग्य तो मान राखला पाहिजे.

    अतिथी आणि याचक यांच्यातही फरक आहे. अतिथी हा आपल्या परिचित असतो तर याचकाची मर्यादा दरवाज्यापर्यंतच असतो. याचक काहीतरी मागण्यांसाठीच आलेला असतो. अतिथीची अशी काही अपेक्षा असत नाही.

    वनवासामधे जाताना कोळ्याच्या घरी रामराया राहिले होते, ते अतिथी म्हणून. आणि सीता हरण करण्यासाठी रावण सीतेच्या पर्णकुटीपर्यंत आला होता, तो याचक बनून !

    सांगायचं काय तर या दोघांचाही योग्य तो मान राखला पाहिजे. बदलत्या काळानुसार यातील फरक लक्षात यावा म्हणून उदाहरण दिले.

    महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मणाने आखून दिलेल्या रेषेचा भंग होऊ नये. आजच्या काळात ही लक्ष्मणरेषा म्हणजे आपल्या बॅक अकाऊंटचा पासवर्ड म्हटला तरी चालेल.
    ही रेषा फक्त सीतेसाठीच आहे, असे नाही. तर सर्वांसाठीच आहे. या रेषेचे महत्त्व सर्वांनीच लक्षात ठेवावे, म्हणजे झाले. कारण आज समाजात रामापेक्षा रावणांची संख्या वाढली आहे. कोणाला किती जवळ करावे, हे ओळखता येणे कठीण आहे. कोण कसे फसवेल हे समजणे पण कठीण झाले आहे. सज्जन आणि दुर्जन ओळखणे कठीण झाले आहे.

    ज्या शब्दात आपण बोलतो ते शब्द कोणाला दुखावणारे असू नयेत. आपला अपमान झाला अशी भावना कोणाच्या मनात तयार होऊ नये, असे शब्द असावेत. बोलताना सूर, ताल आणि त्यामुळे बदलणारे शब्दांचे अर्थ यानी अनर्थ होतात, हे बोलण्यापूर्वीच लक्षात ठेवावे. कारण एकदा बाहेर पडलेला शब्द ( आणि वाॅटसपवरील एन्टर केल्यानंतरचा मेसेज ) काही झाले तरी मागे घेता येत नाहीत.

    आपण दुसऱ्याला कधी फसवू नये, पण आपण दुसऱ्याकडून फसवले जाणार नाही, एवढा शहाणपणा आपल्या अंगी नक्कीच बाणवावाच लागेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • पुष्करमुल

    ह्याचे ०.३३-२ मीटर उंचीचे क्षुप असते.पाने ३-६ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंदीचे मुलीय पत्र असते.पत्रवृन्त पाना इतकेच लांब असते.काण्डीयपत्र आयताकार असून काण्डास वाढणारे असते.फुल पिवळे ०.५-१ सेंमी व्यासाचे गुच्छ असते.फळ ०.४ सेंमी लांब व चमकदार व स्निग्ध असते.फळाला चिकटलेले बहिर्दल ०.७५सेंमी लांब व तांबुस रंगाचे असते.

    ह्याचे उपयुक्तांग मुळ असून पुष्करमुल चवीला कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के,स्निग्ध व तीक्ष्ण आहे.पुष्करमुळ वातनाशक आहे.

    चला आता आपण ह्याची औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)पुष्करमुला मध्ये असणारे तीक्ष्ण व विशिष्ट सुगंधी तेल जंतुघ्न कार्य करत असल्याने त्याचा वापर जखमांमध्ये करतात.

    २)पुष्करमल शोथनाशक व वेदनास्थापक आहे म्हणून सुज येणाऱ्या व वेदनायुक्त अवयवांवर ह्याचा लेप करतात.

    ३)पुष्करमुलाचे मुख्य कार्य प्राणवहस्त्रोतसावर होते ते कफाचे विल्यन करते तसेच जंतुघ्न व कफदुर्गंधीनाशक कार्य करते.म्हणून खोकला,दमा व उचकीमध्ये उपयुक्त आहे.

    ४)पुष्कर मुळ तापामध्ये स्वेदजनन व आमाचे पाचन करून ताप बरा करते.

    ५)पुष्करमुल शरीरातील क्लेदाचे घामावाटे उत्सर्जन करते व त्यामुळे त्वचारोगामध्ये स्त्राव व खाज कमी करते.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – काकडी

    किचन क्लिनीक – काकडी

    हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी.
    हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो.

    हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व थंड असते.त्यामुळेच हे शरीरातील पित्तदोष कमी करते व वात व कफ दोष वाढविते.

    आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:

    १)अंगाची जळजळ होत असल्यास काकडीचा लेप लावावा व हिच्या बिया थंडाई मध्ये घालून देतात.

    २)लघ्वी कमी होत असेल तर काकडीचे बी, जिरे व साखर पाण्यात घालून केलेला काढा प्यावा फायदा होतो.

    ३)अंगावर पांढरे जात असल्यास १ ग्राम काकडी बी मधला गर + १ ग्राम पांढ-या कमळाच्या पाकळ्या वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून ७ दिवस खावे.

    ४)उन्हाळयात उष्णता कमी करायला काकडी चिरून त्यात खडीसाखर व लिंबाचा रस घालून खावी.

    ५)छातीत जळ जळ होत असल्यास ४ चमचे काकडी रस+खडीसाखर हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावे.

    ६)गव्हाचे पदार्थ खाऊन जर अजीर्ण झाले तर त्यावर उतारा म्हणून काकडी खावी.

    अतिमात्रेत काकडी खाल्ल्यास सर्दी होते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 19

    गणपती बाप्पाचा सकाळच्या महापूजेचा नैवेद्य पंचपक्वान्नाचे भरलेले ताट असते. पण सायंपूजेचा नैवेद्य काय असतो ? तर वाटीभर पंचखाद्य किंवा एखादा लाडू.
    कशासाठी ?
    जे जे देवासाठी, ते ते देहासाठी. या न्यायाने देवाच्या भोजनाचा नियम आपल्यालादेखील तसाच लागू होतो. सकाळचे भोजन आणि सायंकाळचे भोजन याच प्रमाणात घ्यावे, असे आपली संस्कृती पण सुचवते.

    कमळ कधी उमलते ?
    कमळ कधी मावळते ?
    सूर्योदय झाला की उमलते, आणि सूर्यास्त झाला की मावळते. सूर्यफुलाचे नावच मुळी सूर्यावरून ठेवले आहे. त्यांच्याकडे कोणतेही घड्याळ नाही, तरीदेखील त्याला बरोबर कळते, दिवस आणि रात्र. कधी कसे वागायचे, कधी कसे फुलायचे, कधी कसे वळायचे ते !

    सूर्योदयाला सुरू झालेला आपला दिवस सूर्यास्ताला संपतो. (निशाचर प्राणी अपवाद आहेत.)

    मनुस्मृतिमधील निद्रा प्रकरणामधे देखील "सूर्यामुळे दिवस होतो आणि सूर्यामुळे रात्रही होते, असे सांगितलेले आहे. रात्र ही झोपण्यासाठी, विश्रांतिसाठी. तर दिवस हा दैनंदिन कामे करण्यासाठी आहे.
    केवळ आपली पृथ्वीच नव्हे तर सर्व ग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्यापासूनच शक्ती, उर्जा मिळवित असतात. सूर्याच्या अस्तित्वामुळेच आपले अस्तित्व आहे, याचे ज्ञान आमच्या ऋषीमुनीना होते. आणि ते त्यांनी लिहूनदेखील ठेवले आहे.

    सगुणरूपातील एकमेव देवता म्हणजे सूर्य. रामदास स्वामीनी सर्व तरूणांना सूर्यनमस्काराचे, व्यायामाचे महत्व पटवून दिलेलेच होते.ते स्वतः दररोज शेकडो समंत्र सूर्यनमस्कार घालीत असत.

    भोजनाच्या संदर्भात आणखी एक श्लोकात सांगितले आहे,
    सायंकृते प्रभाते जीर्यती,
    प्रभातकृते सायं जीर्यती.
    सकाळी जेवलेले अन्न सायंकाळी पचते, तर सायंकाळी घेतलेले अन्न सकाळी पचते.
    सायंकाळी आणि सकाळी असेच शब्द या श्लोकामधे आहेत. दुपार आणि माध्यान्ह असे शब्द नाहीत. याचा अर्थ जेवायचे कधी तर सकाळी आणि सायंकाळी.

    काही जण म्हणतील, या जेवायच्या वेळा त्याकाळात ठीक होत्या. आजच्या काळात त्या सुसंगत नाहीत. काळ बदलला आहे, त्यानुसार आपण बदलायला नको का ?

    ज्या ठिकाणी सूर्य सहा सहा महिन्यात दिसतंच नाही, अशा ठिकाणी रहाणाऱ्या लोकांनी कोणता नियम पाळायचा ?
    जिथे सूर्य नाहीच दिसत त्याठिकाणी अन्य नियम वापरू शकतो. पण जिथे सूर्य दिसतोय तिथे तर या जेवणाच्या वेळा पाळायला सुरवात करूया. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आम्ही पहिल्यांदा शंका घेणार. "कसं शक्य होणार ? हे असं लवकर जेवणं जमणारच नाही." सुरवातीलाच नकारघंटा वाजवली की पुढे सगळं चुकतंच जात ना. मग काही करावसं वाटत नाही.

    या वेळा पाळणे तर्कसंगत नाही, व्यवहार्य नाहीत. हे एकवेळ मान्य करूया. पण पचन होण्यासाठी लागणारी उर्जा कुठुन आणणार ?

    विज्ञानाने बाकी सगळी सोंग आणता येतील पण सूर्याचा प्रकाश आणि त्याची शक्ती तर आणू शकणार नाही ना. शेवटी कुठेतरी निसर्गाला शरण जायलाच हवं ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.03.2017

  • किचन क्लिनीक – दुधीभोपळा

    किचन क्लिनीक – दुधीभोपळा

    ह्यालाच पांढरा दुधी असे देखील म्हणतात.ह्याचे किती प्रकारची व्यंजने बनत असतील हे सांगणे जरा कठिणच आहे,पण सगळ्यांचा आवडता दुधी हलवा म्हणा,खीर म्हणा,चटणी म्हणा,भाजी म्हणा,सुप इ पदार्थ करतात हे मला माहिती आहे.

    जसा ह्याचा उपयोग भाजीमध्ये होतो तसाच ह्याचा औषधी उपयोग देखील आहेत बरं का!
    ह्याचे वेल असते जे दुरवर पसरते ह्या वेलीला हि फिकट हिरव्या रंगांचा लांबट अशी फळे लागतात.ज्याचा उपयोग खाण्याकरिता केला जातो.

    हा चवीला गोड,थंड असते व पित्तनाशक व कफकारक असतो.आता ह्याचे औषधी उपयोग पाहुया:

    १)हातापायांची आग होत असल्यास तळव्यांना रात्री झोपताना दुधीभोपळ्याचा किस बांधुन झोपावे.

    २)हातापायांना भेगा पडल्यास दुधीभोपळ्याचा रस व एरंडेल तेल मिसळून लावावे.

    ३)शौचास कधीपातळ कधी घट्ट किंवा चिकट होत असेल तर जुन झालेला दुधीभोपळा घ्यावा व त्याचे सालकाढुन तो किसुन त्याचा किस तुपावर परतावा व त्यात जीरे,मिरी,खडीसाखर व सैन्धव घालून खावा.

    ४)ज्यांना कायम संडासला साफ न होण्याची तक्रार असते त्यांनी जेवणात रोज दुधाची भाजी घ्यावी.

    ५)नियमीत ४चमचे दुधी रस+१/४ चमचे जिरे+१ चमचा मध हे मिश्रण पहाटे सुर्योदयापुर्वी रिकाम्या पोटी घ्यावे व तासभर काही खाऊ नये.हा प्रयोग ४२ दिवस करावा ह्याने शरिरातील उष्णता कमी होते व जेवणास रुची येते तसेच ह्रूदयाला देखील बळ मिळते.

    कोवळा दुधी अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात व जुन दुधी खाण्याचा अतिरेक केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४