
खदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कडू, तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे.
कपाळावर मिरी वाटणे हा वाक्प्रचार तर सगळयांनाच माहीत असणार त्यात काही नवल नाही.मसाल्या मधला अजून एक पदार्थ ज्याला मसाल्या मध्ये मानाचे स्थान आहे ती म्हणजे मिरी.
आपल्या रोजच्या जेवणात आमटी मध्ये,गरम मसाला बनवताना मिरीचा सर्रास वापर केला जातो.असा हा तिखट झणझणीत पदार्थ जेवणाला एक वेगळीच लज्जत आणतो.
मिरीचा वेल असतो आणी त्या वेलीला उगवणारी ही फळे चांगली तयार झाल्यावर उन्हात वाळवून ठेवली जातात.ही चवीला तिखट असतात आणी ब-या पैकी उष्ण असतात.हि शरीरातील कफ आणी वात दोष कमी करते पण पित्त मात्र वाढवते.
चला आता मिरीचे काही घरगुती औषधी उपयोग पाहूयात.
१)घसा बसला असल्यास जेवणानंतर १/४टिस्पून मिरपुड तूपात मिसळून खावी चांगला फायदा होतो.
२)सर्दी होऊन डोके देखील जड झाले असल्यास १/४ चमचा मिरपुड मधासोबत मिसळून घेणे आराम मिळतो.
३)पोटात दुखत असल्यास १/४ चमचा मिरपुड आणी २ चिमूट भाजलेला हिंग हे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
४)मार लागून रक्त साखळले असल्यास मिरी पाण्यात वाटून त्याचा लेप त्या जागी लावला असता तिथली सूज आणी वेदना देखील कमी होते.
५)मिरीचे चूर्ण किडलेल्या दाढेत ठेवले असता तिथला ठणका कमी व्हायला मदत होते.
अतिवापराने छातीत जळजळ,पोटात आग होणे तसेच संडास,लघवी ,व नाकातून रक्त स्त्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शरीर सांगते ते सगळंच अगदी बरोबर असतं असं नाही. याचा अर्थ असाही नाही, की शरीर जे करतंय, ते सर्व माफ आहे !
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 22-धूपं समर्पयामी-भाग तीन
दृष्ट काढणे ज्यांना अगदीच गावंढळ आणि कालबाह्य वाटत असेल त्यांच्यासाठी आणखी एक शास्त्रोक्त पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे अग्निहोत्र. वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या या यज्ञ चिकित्सेने फक्त भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा प्रचंड मोठे मानाचे स्थान मिळवलेले आहे. काही देशातील कायदे देखील या यज्ञासाठी पालटण्यात आलेले आहेत. एक भारतीय म्हणून अभिमान वाटावा अशी ही अग्निहोत्र चिकित्सा.
अग्निहोत्र हा अगदी साधा सोपा विधी आहे. घरी, शेतावर, कार्यालयात, गाडीमध्ये अगदी 10 मिनिटात करता येतो. फक्त अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा पाळायच्या असतात. त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत. यावर पुणे विद्यापीठामधे प्रबंध पण सादर झालेला आहे. आणि गंमत म्हणजे हा प्रबंध सादर केलाय ऑस्ट्रीया येथील एका अभ्यासकाने !
अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे अथवा मातीचे पिरॅमिडच्या आकाराचे हवन पात्र.
२. गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप २-३ चमचे.
३. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ४-५ तुकडे.
४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे म्हणजे अक्षता. ४-५ ग्रॅम. सूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून, त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेल्या अक्षता खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात.
सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम् न मम ||
प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम् न मम ||
प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम ||
इदम् न मम म्हणजे हे माझे नाही याची मला पूर्ण खात्री आहे. हे तुझे तुलाच अर्पण. हा भाव मनात ठेवणे म्हणजे इदम् न मम ।
हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे. येत असलेल्या ज्वाळा आणि धूर याकडे शांत बसून ध्यान केल्यास खूप शांतीचा अनुभव येतो.
हा निर्माण होणारा धूर अनेक रोगावरील औषध आहे. एन्फ्लुएन्झा, काॅलरा, टीबी, इ. रोगांचे जंतु या धुराने मरतात, असे (परदेशातील सुद्धा ) प्रयोगशाळेत सिद्ध झालेले आहे. अग्निहोत्राच्या राखेचे पाणी देखील अम्लपित्त, ग्रहणी, उष्णतेचे आजार, पचन विकृती आमि अनेक मानसिक आजारांवर अतिशय प्रभावी परिणाम दाखवतात.
काळानुसार आपण बदलले पाहिजे, या तत्वानुसार मोठ्या यज्ञांपेक्षा हे छोटे अग्निहोत्र घरच्या घरी दररोज केले तर अधिक फायदा होतो.
शेतीसाठी देखील हा धूर किटकनाशक म्हणून सिद्ध झालेला आहे. अनेक देशामधे आज अग्निहोत्र शेती सुरू आहे.
अग्निहोत्रासाठी ज्या गोवऱ्या लागतात, त्या भारतीय गो वंशाच्याच लागतात. पाश्चात्य गोवंशामध्ये औषधी गुण नाहीत हे पण यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.
म्हणजे घर निर्जंतुक होण्यासाठी धूर तयार व्हायला हवा, तो औषधी हवा, त्याठी अग्निहोत्र करायला हवे. अग्निहोत्रासाठी गोवऱ्या हव्यात. त्यासाठी शेण हवे, त्यासाठी गाय हवी, ती भारतीय वंशाचीच हवी. म्हणजे तिची जोपासना व्हायला हवी. ही एक साखळी आहे. आरोग्य मिळवण्यासाठी ही साखळी पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजेच पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी "भारतीयत्व" हा एक महत्त्वाचा दुवा आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.06.2017
आपल्या अवतीभवती जे प्राणी आहेत, त्यांचे परीक्षण केले असता, असे लक्षात येते की, जगात कुठेही यांना बघीतलेत किंवा अभ्यासले तरी या प्राण्यांची वैशिष्ट्ये तीच रहातात. दक्षिण आफ्रिकेमधला कावळा काळाच असतो आणि अमेरिकन कावळा पण काळा तो काळाच ! रंगात बदल नाही, गुणसूत्रात बदल नाही, आहारात बदल नाही, की सवयी मधे. त्याचे काव काव ओरडणे सगळीकडे सारखेच ! कावळा हा एक स्वतंत्र अभ्यास करण्यासारखा विषय आहे. पुढे कधीतरी.
आपण मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली आता शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये तपासून बघूया.
सर्व शाकाहारी प्राणी जसे गाय, बैल, हत्ती, घोडा, गाढव इ.इ. पाणी पिताना ओठाने पितात, म्हणजे दोन्ही ओठांचा वापर करून पाणी ओढून घेतात व घोटतात. जीभेचा वापर नाही. जीभ फक्त अन्नाला तोंडातल्या तोंडात, इकडून तिकडे ढकलण्यासाठी, फिरवण्यासाठी वापरली जाते. आणि चव घेण्यासाठी सुद्धा ! पण यांच्या जीभेला धार नसते, खाचा नसतात. लाळ असते ती पण खूपच बुळबुळीत. एकावेळी भरपूर पाणी तोंडात ओढून घेता येते. गाय किंवा बैल पाणी पिताना आपण बघीतले आहेच.
खाल्लेले अन्न, पाला बारीक तुकडे करून पोटात गिळले जातात. यासाठी यांच्या जबड्यात दातांची एक वेगळीच रचना दिसते. यांच्या वरच्या जबड्यातील दातामधे दोन दात सुळे प्रकारातील असतात. ज्यांना थोडेसे टोक असते. घास तयार करण्यासाठी हे सुळे त्यांना उपयोगी पडतात. जे खाल्ले आहे, ते तोंडातून परत बाहेर पडू नये यासाठी पण या सुळ्यांचा वापर केला जातो. गाय बैल घोडा यांच्या जबड्यात अशीच रचना असते. मुद्दाम बघा. यांच्या खालील जबड्यात सुळे असत नाहीत.
यांना अन्नाचे मोठे तुकडे गिळता येत नाहीत. थोडे बारीक करावे लागते. रवंथ करावे लागते, पीठ करून आत ढकलावे लागते, म्हणून यांच्या जबड्यात वर आणि खाली दाढा जास्त यांच्या मधे जे काही येईल त्याचे पीठच.
यांची लाळ जास्त बुळबुळीत असते. कारण पाल्यात भरपूर प्रमाणात असणाऱ्या स्टार्च किंवा शर्करेला पचवणारे " पिट्यूलीन" हे एक एन्झाईम यांच्या लाळेत जास्त असते.
(जे एन्झाईम मांसाहारी प्राण्यांच्या लाळेमधे उपस्थित नसते. कारण त्यांना त्याची गरजच नसते. कारण मांसाहारामधे स्टार्च चे प्रमाण जवळपास नसतेच, किंवा अपवादानेपण अगदीच कमी असते. त्यामुळे त्यांच्या लाळेमधे स्टार्च पचवणाऱ्या एन्झाईमची आवश्यकताच नसते.
पण मांसामधे प्रोटीन्स जास्त असतात. हे प्रोटीन्स पचवण्यासाठी आवश्यक असलेली एन्झाईम्स, पोटात हायड्रोक्लोरीक अॅसिड सारख्या रूपात भरपूर प्रमाणात निर्माण झालेली असतात.)
चावून चावून चावून चावून गिळल्यामुळे लाळेची निर्मिती जास्त होते. हे एन्झाईम जास्त पाझरते, पचन सुलभ होते. या लाळेमुळेच गाय बैल या शाकाहारी प्राण्यांना, गिळलेले अन्न पुनः तोंडात आणणे आणि सावकाशपणे रवंथ करणे सोपे होते.
कोणीतरी मांसभक्षी आपल्याला खाईल, या भीतीने, दिवसभर बकाबका खाऊन घ्यायचे, मग निवांत सुरक्षित ठिकाणी येऊन खाल्लेले परत पचवायचे.
या दोन वेळा केलेल्या पचनामुळे या प्राण्यांना पण अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर यातले काही त्रास होत नाहीत.
भक्ष्याला पकडायचे नसल्यामुळे पायाची नखे स्थिर असतात. त्यांना आपण खूर म्हणतो. गाय बैल, यांचे खूर विभागलेले असतात, तर घोडा, गाढव यांचे खूर विभागलेले नसतात. पण यांना टोके नसतात. हलवता येत नाहीत. जर यांना टोके असली असती तर चालणे मुश्किल झाले असते, जीव वाचवण्यासाठी पळणे किंवा धावणे दूरच राहिले. म्हणजे शाकाहारी प्राण्यांची नखे आत बाहेर करता न येणे, ही त्यांच्यासाठी "त्याने" दिलेली देणगीच म्हणायची !!!
त्यांना जगवण्यासाठी केलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजेच ईश्वर !!!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
27.09.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग चार
काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर. एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे... चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. बरं पाणी कमी प्यायले तर अंगाचा भडका होईल, एवढी उष्णता वाढते. करायचे तरी काय ? आणि जेवायचे तरी कधी ?
बरं औषध बंद करायची पण भीती वाटते, न जाणो चुकुन काही झाले तर ? कोणतातरी रिपोर्ट वाढला, कमी झाला तर ? रोगाविषयी एवढी भीती निर्माण करून ठेवली जाते की, औषधांचे दुष्परिणाम झाले तरी चालतील, किंबहुना ते गृहीतच धरले जातात.
भारत सरकारने जीवनावश्यक म्हणून अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यात फक्त दीडशे ते दोनशे औषधे प्रकारची औषधे असतील. पण मार्केटमधे आज किमान पन्नास साठ हजार प्रकारची मिश्र औषधे विकली जात आहेत. ब्रुफेन सारखी काही औषधे तर प्रगत राष्ट्रामधे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच बॅन झालेली आहेत. पण भारतात मात्र ही औषधे आज भी धडल्ले से बेची जा रही है. डाॅक्टरांच्या चिठीशिवाय काऊंटरवर सुद्धा विकली जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. सावध आपणच रहायला हवे. सरकार तरी किती ठिकाणी लक्ष ठेवणार ना ?
औषधकंपन्याचा प्रचंड नफा हे या मागील खरे राजकारण आहे. जेनेरीक मेडीसीन आणि कंपन्यांनी बनवलेल्या औषधांच्या दरामधे असलेला फरक लक्षात घेतला, की समजेल किती नफा कंपन्या मिळवतात ते !
येनकेण प्रकारे औषधे विकायची त्यासाठी वाट्टेल ते प्रकार अवलंबायचे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षडयंत्र गेली कित्येक वर्षे सुरू आहे.
असो.
एक विनोद म्हणून सांगावासे वाटते. आजारी पडलो की, डाॅक्टरांकडे जायचे, त्यांची जी फी असेल ती फी कुरकुर न करता द्यायची, कारण डाॅक्टर जगला पाहिजे. सांगितलेल्या सर्व तपासण्या करायच्या, कारण पॅथाॅलाॅजिस्ट जगला पाहिजे. परत डाॅक्टरांकडे जाऊन जी औषधे लिहून दिली जातात, ती केमिस्ट कडून विकत आणायची, कारण केमिस्ट जगला पाहिजे.
आणि...
....... आणलेली सर्व औषधं तशीच ठेवून द्यायची कारण........
.....
....
...
..
.
आपण जगलो पाहिजे.
विनोदाचा भाग सोडला तर परिस्थिती फार गंभीर आहे. नवीन औषधे शोधून शोधणार तरी किती ? मुळ द्रव्ये तर तेवढीच आहेत. त्यातील मुलद्रव्यांमधे, थोडाफार तर तम भावात फरक करून नवीन औषध करण्या पलीकडे गाडी पुढे जात नाहीये. मंदी येऊ नये, यासाठी सुद्धा काही वेळा विशिष्ट रोगाविषयी "हॅवाॅक" निर्माण केला जातो. याच्यामागे देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे भीती निर्माण करायची आणि आपला माल खपवायचा !
हे लिहिलेलं सुद्धा काहीजणांना "अति" कॅटेगरीमधील वाटेल. पण शेवटी सत्य कटू असते. कुठेतरी कोणाला तरी बोचणारच !
इलाज नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.04.2017
हे कंदमुळ सर्वांचेच फार आवडीचे व लाडके.प्रत्येक शाकाहारी पदार्थात घातल्यावर तो त्या पदार्थांची लज्जत अजुनच वाढवितो.बटाट्याचेकाप,भाजी,भजी,रस्साभाजी,आमटी,वेफर्स,चिवडा,समोसा,आणी मुंबई फेम बटाटेवडा,आलुपराठा,असे एक ना अनेक प्रकारे आपण ह्याचा फोडशा पाडत असतो.
बटाटा हा कंद देखील जमीनीखाली उगवतो.हा खरे पाहता जुनाच वापरावा तसेच हिरवा बटाटा हा विषवत असतो म्हणून तो कधीच खाऊ नये.तसेच डायबेटिस असणा-यांनी,वजन कमी करायचे असल्यास हा खाऊ नये.बटाट्याच्या सालीत जीवनसत्व क असते त्यामुळे बटाटा हा सालीसकटच उकडावा.
बटाटा हा चवीला गोड,थंड व कफवात वाढविणारा व पित्तनाशक असतो.चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)बध्दकोष्ठाचा त्रास असल्यास शेगडीवर अथवा चुलीत बटाटा भाजावा व त्यावर सैंधव,काळेमीठ,जीरे,मिरी घालून खावा.
२)बटाटा भाजून जिरे,मिरी,सैंधव लावून खाल्ल्याने वारंवार होणारी सर्दी कमी होते.
३)लघ्वी कमी होणे,जळजळ होणे,पिवळी लघ्वी होणे ह्या बटाटा उकडून धणे,जीरे व सैंधव लावून खावा.
४)नवा बटाटा उकडून बाळंतीण बाईला दिल्यास अंगावरचे दुध वाढते.
बटाट अतिखाल्ल्यास वात विकार वाढतात व वजन वाढते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सात
रात्री काम करणे कधीपासून सुरू झाले ?
रात्रीचा दिवस कोणी केला ?
रात्रीची कामे कशी करावी हे कोणी शिकवले ?
रात्री काम करण्यातले अडथळे कोणी दूर केले ?
रात की नींद किसने चुरा ली ?
विज्ञानाने.
कसं काय ?
विज्ञानातील नवनवीन शोधांमधील एक अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे विद्युतीकरण !
या विद्युतीकरणामुळे अनेक कामे चुटकीसरशी होऊ लागली. जिथे शंभर माणसे कामाला लागायची तिथे दहा पंधरा माणसांमधे काम पूर्ण होऊ लागलं. वेळ वाचला. कामामधे सुबकता आली. कमी पैशात जास्ती काम होऊ लागले. आता हे चांगलं की वाईट ?
नक्कीच चांगलं.
पण,
या यंत्रांनी किती जणांचा रोजगार कमी केला ? किती जण नोकरीतून कमी झाले ? किती जणांना व्ही आर एस घ्यावी लागली ?.......
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे आरोग्य आम्ही मिळवले की घालवले ? आमची आदर्श जीवनचर्या या विज्ञानाने मुळातूनच बदलवून टाकली का ?
विज्ञानाने प्रगती नक्कीच केली, पण त्याने खरे आरोग्य मिळवले की घालवले याचा परत एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मी विज्ञान विरोधी अजिबात नाही. पण जी समीकरणे मांडत जातोय, त्यात जे समोर येतंय ते फक्त स्पष्टपणे मांडतोय.
विज्ञानाने जी देणगी दिली, त्यात मोठी देणगी विद्युतीकरण, त्यातूनच नंतर दिवाणखान्यात जन्माला आलेले दूरदर्शन, केबल, डीश, डीव्हीडी. इ.इ. स्वयंपाकघरात घुसलेल्या विज्ञानाने तर पार धुमाकूळच घातला. मिक्सर, ब्लेंडर, फ्रीज, ओव्हन, मायक्रोवेव्ह, गॅस शेगडी, इ.इ.
बाथरूममधे जागा अडवून बसलेले वाॅशिंग मशीन, गीझर, इ.इ.
बेडरूम मधील एसी, कुलर, इस्त्री, पंखे, इ.इ.
ही सर्व उपकरणे विज्ञानाची पिल्ले नव्हेत काय ? यांनी आपल्याला आरोग्य दिले की, आरोग्य हिरावून घेतले ?
या प्रत्येक यंत्राचा स्वतंत्र विचार करणे आणि लिहिणे शक्य होणार नाही, पण एक नक्कीच पारंपारिक पद्धतीने, केलेली कोणतीही गोष्ट, ही यंत्रांचा वापर करण्यापेक्षा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम प्रतीची असते. असे लक्षात येते. रवीने केलेले ताक, ब्लेंडर किंवा मिक्सरमधून केलेले ताक, लोखंडी तव्यावर केलेली भाकरी आणि ओव्हन मधे किंवा रोटी मेकर मधली भाकरी, पाटा वरवंटा वापरून केलेले वाटप आणि मिक्सरमध्ये केलेले वाटप ही अगदी मोजकी उदाहरणे आहेत.
कामे करत असताना होणारा व्यायाम कमी होत गेला म्हणूनच जिमचा आणि योगा वर्गांचा उदय झाला. दिवसाची कामे दिवसाच होत होती. विज्ञानामुळे दिवसाची कामे रात्रीच्या वेळी करणे देखील सहज शक्य झाले.
विज्ञानाने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे, पण या विज्ञानाला घरात, विशेषतः स्वयंपाकघरात किती घुसु द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
उपभोगवादी संस्कृतीने आरोग्य हिरावूनच घेतले. विज्ञानाला माणसाने गुलाम बनवण्या ऐवजी, विज्ञानाने माणसालाच गुलाम बनवले. मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या प्रत्येक प्रयोगातून आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास नुकसान होते आहे, हे अंतिम सत्य आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.05.2017
जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही.
जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये.
जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये.
आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ?
एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे गेले. दुसऱ्या बाजूने एक पाणी भरायला येणारी बाई येत होती. त्या बाईच्या मनात त्या नाण्याविषयी मोह उत्पन्न होऊ नये म्हणून साधू धावतच त्या नाण्याजवळ आला आणि त्या नाण्यावर पाय देऊन सहजपणे उभा राहिला.
ती बाई तिथून पलीकडे गेली, पुनः साधु पारावर बसला. पाणी भरून येताना ती बाई जशी जवळ आली तशी साधु पुनः उठला आणि रस्त्यावर येऊन नाण्यावर पाय ठेवून उभा राहिला. असं तीनचार झाल्यावर त्या बाईच्या मनात आलेला विचार तिने बोलून दाखवला. त्यावर प्रामाणिकपणे त्या साधूने बाईला सांगितले. तिथे एक सोन्याचे नाणे आहे, ते नाणे पाहून ते घेण्याचा मोह तुला उत्पन्न होऊ नये म्हणून, मी धावत येऊन त्या नाण्यावर उभा रहात होतो.
त्यावर ती बाई म्हणाली,
"त्यात एवढं काय आहे, ते नाणं गेले चार पाच दिवस तिथंच पडलेलं होतं. सगळ्यांना दिसतही होतं. पण पडलेलं घ्यायचं असतं हे आज प्रथमच आपण येऊन शिकवलंत महाराज. जे आपलं नाही, ते आपण घेऊ नये. हे गावातील सर्वांनाच माहिती आहे. म्हणून कुणालासुद्धा ते दिसून घेण्याचा मोह झालाच नव्हता. पण महाराज, आता मात्र आपण आलात आणि त्या नाण्यावर उभे राहिलात, तेव्हा मला शिकवलंत की, असं काहीजण घेतात ते !"
जे नाण्याचे झाले ते ग्लोबलायझेशनच्या काळात आमचे प्रत्येक वस्तू आणि अन्नप्रकाराचे होतेय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपला बिझनेस दिसतोय. चकचकीत वेष्टण आणि जाहीरातबाजीला भुलुन, सारासार विवेक बाजुला होतोय. तसं पौष्टिक भाजी भाकरी भाताऐवजी चपाती जवळची वाटू लागली आहे. कोकणातील भाकरी तांदळाची किंवा नाचण्याची आणि बाकी सर्व ठिकाणी ज्वारी बाजरी मका हे विसरू नका.
मोह निर्माण होण्याआधी वैराग्याचे धडे मिळाले तर अधिक चांगले.
निरोगी कसे रहायचे असते, ते रोगी होण्याअगोदर समजले तर सोपे होईल ना !
आपणला हे सांगत नाहीये, आपल्या पुढच्या पिढीसाठी सांगतोय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.10.2016

ह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti