(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • याला जीवन ऐसे नाव भाग ३०

    पाणी शुद्धीकरण भाग दहा

    ज्या भागातील पाणी पचायला खूप जड असते, अशा भागात पाणी खूप उकळावे लागते. एक सोळांश करावे. देश ऋतु, रोग यानुसार पाण्याची शुद्धी किती करायची हे ठरवून पाणी एक अष्टमांश, एक चतुर्थांश, किंवा तीन भागातील एक भाग आटवून दोन शिल्लक ठेवावे, वा निम्मे आटवावे.
    या प्रकारे शुद्ध केलेले पाणी वेगवेगळ्या गुणाचे असते.

    पाणी आटवत असताना त्या फेस आला तर समजावे त्यात अशुद्धी आहेत. त्या अशुद्धी जाईपर्यंत म्हणजे फेस नष्ट होईपर्यंत पाणी उकळावे.

    पाणी उकळून गाळून लगेच गरम गरम प्यायल्याने पचनशक्ती लगेचच सुधारते. आम नाहीसा होतो. म्हणून असे पाणी पिणे, हे कफामुळे होणारे अजीर्ण आणि वाता मुळे होणाऱ्या अजीर्णावरील मुख्य औषध आहे.

    केवळ याच दोन आजारात तहान लागली नसेल तरीदेखील असे गरम पाणी सांगितले आहे. पण ते देखील एवढेच प्यावे की खाल्लेल्या अन्नाचा पोटात ओलसर गोळा होईल. त्यापेक्षा जास्ती पाणी क्लेद म्हणजे चिकटपणा निर्माण करते.

    दगड, लाख, कोळसा, गारगोटी, सोन्या चांदीचा गोळा, ( किंवा असेल बिस्कीट पण चालेल.) लाल होईपर्यंत तापवून त्या पाण्यात विझवली तरी देखील पाणी शुद्ध तर होतेच पण या द्रव्यांचे गुणधर्म पण पाण्यात येतात.

    गर्भिणीला डोहाळे काळातील उलटी थांबत नसेल तर मातीचे घट्ट ढेकुळ किंवा मातीचा गोळा, लाल होईपर्यंत तापवून पाण्यात विझवावा. ते पाणी गाळून तिला चमचा चमचा द्यावे. खूप फायदा होतो.

    लहानपणी लोखंडी पळीत फोडणी करून ती ताकावर ओततानाचा आणि नंतर ती पळी ताकात बुडवतानाचा चुर्रऽऽऽऽ हा आवाज ऐकायला किती मज्जा यायची नं ! धावत स्वयंपाकघरात यायचो.

    या लोखंडी पळीतील लोखंडाचा औषधी अंश फोडणीतून ताकात कधी आणि कसा उतरायचा, हे आजीला आणि आईला पण कधी कळलेच नसेल.....

    "फोडणी" ही फक्त भारतातच ! पाश्चात्य तंत्रात फोडणी कुठली नि कुठलं काय. त्यांचे मुख्य अन्न काय तर शिळा पाव त्यात मासाचा तुकडा किंवा शिळ्या मासाचा तुकडा आणि त्याच्याबाहेर पाव ! आत्ता आत्ता त्यांना समजतंय कोशिंबीर वगैरे खावी ते ! रोजच्या रोज जेवण बनवणं, विविध चविष्ट प्रकार बनवणं, आणि मुख्य म्हणजे सर्व आरोग्यदायी बनवणं हे फक्त आजी नि आईच करू शकते. मम्मी नाही. जाऊदे, मोठा विषय नंतर येईल चर्चेला....

    उकळून गार झालेले पाणी (शृतशीत जल ) परतपरत गरम करू नये. ते नीट झाकून ठेऊन, दिवसभरात संपवावे. परत गरम केले तर त्यातील औषधी गुण संपतात. तसेच हे पाणी रात्र उलटून गेली तर हे पाणी नंतर पित्तासह अन्य दोषांना वाढवणारे होते. अजिबात वापरू नये.

    पाण्याच्या शुद्धिकरणाचे एवढे सखोल आणि शास्त्रीय ज्ञान देणारा आयुर्वेद शासन स्तरावर मात्र दुर्लक्षिला जातोय, आणि सामान्यापर्यंत पोचतोय तो विकृत पाश्चात्य स्वरूपात.

    भगिरथाने तप करून पृथ्वीवर आणलेली ही "गंगा" ही शुद्ध होती, तिला आम्ही वैद्यच शुद्ध करणार, त्यात मिसळलेली पाश्चात्य तंत्राची भेसळ, आम्हीच भगिरथाचे वंशज, काढून टाकणार !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    06.01.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग पंधरा

    उकीडवे ( हिंदी मे उकुडू बैठकर ) बसून मलविसर्जन केल्यामुळे मल सहजपणे बाहेर पडायला मदत होते. दोन्ही मांड्या पोटावर विशेषतः पोटाच्या खालच्या भागावर दाबल्या गेल्याने पक्वाशय, मलाशय अधिक कार्यरत होतात. पोटऱ्या दाबल्या जातात. त्यामुळे मलविसर्जनाची सर्वात आदर्श पद्धत म्हणजे उकीडवे बसण्याची आहे, असे संशोधन आंग्ल भाषेतील पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकामधे नमूद केलेले आहे.

  • विडा घ्या हो नारायणा – भाग ६

    पानाला चुना लावून कात घातल्यावर त्यावर सुपारी टाकावी. सुपारी दोन प्रकारे वापरली जाते. ओली आणि सुकी. ओली सुपारी सवय असणाऱ्यांनीच खावी. नाहीतर गरगरल्यासारखे वाटते, म्हणजेच “लागते”. ओली सुपारी मद निर्माण करणारी आहे. पक्व सुपारी तशी “लागत” नाही. सुपारी जर वाळूत भाजून घेतली तर वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शांत करणारी आहे. जर भाजली नसेल तरीदेखील कफ आणि पित्ताला कमी करणारी आहे.

  • किचन क्लिनीक – तमालपत्र

    किचन क्लिनीक – तमालपत्र

    हि मध्यम उंचीच्या सुगंधी व्रुक्षाची पाने असतात.ह्यांचा उपयोग आपल्या स्वयंपाकात तसा पुष्कळ होतो असे नाही पण काही खास व्यंजनांमध्ये हटकून ह्याचा वापरहोतो.पुलाव,बिर्याणी,मसालेभात,तसेच गरम मसाला ह्यात ह्याचा वापर होतो.ह्याच्या विशिष्ट सुगंधाने हे पदार्थ जास्त खमंग लागतात ह्यात वादच नाही.

    गोड,तिखट,कडू अशी ह्याची मिश्र चव असते आणी हि उष्ण असतात.ह्यास बोलू भाषेत तेजपत्ता असे ही म्हणतात.ह्याचे देखील काही औषधी उपयोग आहेत ते आता आपण पाहूयात.

    १)१/२ चमचा तमालपत्र चुर्ण+४ चमचे लिंबाचा रस + १/२ ग्लास कोमट पाणी हे मिश्रण जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे घेतल्यास अन्नपचन नीट व्हायला मदत होते.

    २)ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांनी १/२ चमचा तमालपत्र पूड +१/४ चमचा हिंग+ २ चमचे लिंबाचा रस+१ चमचा आल्याचा रस हे मिश्रण गरम पाण्या सह घ्यावे.

    ३)वारंवार जुलाब होत असल्यास १/२ चमचा तमालपत्र चुर्ण+१/२ चमचा सुंठ पूड गरम पाण्यासोबत घ्यावी.

    ४)ज्या स्त्रीयांना वारंवार गर्भपात होण्याची सवय असते त्यांनी १/२चमचा तमालपत्र पूड + ६ चमचे केळफूलाचा रस हे मिश्रण सलग तीन महीने घ्यावे पण क्रूपया वैद्यांचा सल्ला देखील घ्यावा हि विनंती.

    ५)सर्दी,डोकेदुखी,नाक चोंदणे ह्यात तमालपत्र पूड हुंगावी कफ पातळ होऊन पडतो.

    तमालपत्र अधिक मात्रेत घेतल्यास पित्ताचा त्रास आणी शरीरातील धातू क्षीण होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहारसार भाग ३

    भरपूर जेवल्याने भरपूर ताकद येते हा जसा गैरसमज आहे, तसा कमी जेवल्याने ताकद कमी होते, हा पण गैरसमजच आहे. विशिष्ट वयात विशिष्ट आजार होणं, हे सर्वसामान्य आहे पण, तरूणांचे अकाली आजार आणि अकाली मृत्यु चटका लावून जातात. वृद्धत्व आणि मृत्यु लवकर येऊ नये असे प्रत्येकाला वाटते. हे चुक नाहीच. वृद्धत्व सुद्धा अनुभवले पाहीजे.

  • देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग ३ 

    हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव.

  • प्रमुख आहारसूत्र – भाग ११

    आयुष्यभर औषधे घ्यावी लागू नयेत, असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यासाठी जे करावं लागतं ते करायची तयारी मात्र नसते.

    आणि असा समज करून दिला जातो, की एकदा डायबेटीस झाला की कायमचा चिकटला. ही निराशा मनातून काढून टाकली पाहिजे. हा आजार जर मनोशारिरीक असेल तर औषध फक्त शरीरात जाऊन काय करणार ? जर रोगाचे एक मूळ मनात असेल तर तिथपर्यंत पोचायला नको का ?
    मन कुठे आहे ते अजून माॅडर्न (?) मेडीसीनला समजलेलंच नाही. मन ह्रदयात आहे. आणि आज शोधलं जातंय मेंदूमधे. कसं सापडणार ?
    जाऊदे !

    प्रमेह होण्याचं मुख्य कारण दूध, दही, पाणी, अति, गोड, कफ वाढवणारे पदार्थ खाणे, हे तर आहेच पण यापेक्षादेखील खाल्लेलं पचवता न येणं किंवा पचवण्यासाठी काहीही कष्ट न करणे हे प्रमुख कारण आहे. मेहनत करा. म्हणजे मेह म्हणजे प्रमेह म्हणजे मधुमेह नत म्हणजे नाहीसा होईल.

    प्रमेह वाढण्याचं मुख्य कारण बदललेली जीवनशैली आहे. बैठे काम वाढलंय, सुखाचा अतिरेक झालाय. आम्ही खातोय खूप. खाऊन खाऊनच अशक्तपणा येतोय. मग पचवणार कधी ? त्यात कफ वाढवणारे सर्व पदार्थ निसर्गनियमाने मधुर रसाचे आणि पचायला जड असणारेच असतात.

    आमची वृत्तीच अशी झालीय की, आता दूध बंद करायचं, मग अशक्तपणा येणार, त्यासाठी परत टाॅनिक घ्यायला हवं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण असा विचार करू लागलोय, की अमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय माझं रक्त वाढणारच नाहीये, तमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय प्रोटीन्स मिळणारच नाहीत. कॅल्शियमसाठी हे खाल्लंच पाहिजे. ह्रदयासाठी हे, किडनीसाठी ते. असा विचार करणं योग्य नाही.

    शरीराचे तुकडे करून तपासणारी वैद्यकीय यंत्रणा कार्यरत असल्यावर प्रश्न पडतो. संपूर्ण शरीराचा, मन आत्मा, इंद्रियासह विचार कोण डाॅक्टर किंवा वैद्य कधी करणार ? पायाला काटा लागल्यावर डोळ्यातून पाणी येणारं आपलं शरीर, प्रत्येक डाॅक्टरनी शरीर असं काही वाटून घेतलं आहे की, काही वर्षांनी वरच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा आणि खालच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा शोधावा लागेल. उजवा डोळा एक जण तपासेल, तर डावा डोळा दुसराच !
    जोक अपार्ट. चिकित्सा करताना संपूर्ण शरीराचा विचार करावा, असं आयुर्वेद मानतो.

    एवढे व्हिटॅमिन्स हवेतच, एवढे कॅल्शियम हवेच, हे नियम बनवले की कायदे आले. कायदा बनला की, पुरावे आले. पुरावे दाखवायची वेळ आली तर मन कसं दाखवणार ? आणि इंद्रियांचं काय करणार ? मग त्याला कोण विचारणार ? त्याला म्हणजे आत्म्याला !

    आयुर्वेद शास्त्र शरीराचे असे तुकडे पाडून विचार करतच नाही. अखंड शरीर, मन, इंद्रिय आणि आत्म्यासह चिकित्सा करण्यासाठी घ्यावे, असे शास्त्रकार म्हणतात.

    ही प्राथमिक माहिती समजल्याशिवाय प्रमेहाविषयी आयुर्वेदात सांगितलेली सूत्रे नीट लक्षात येणार नाहीत, म्हणून हे आधी आणि परत परत सांगावे लागत आहे. कारण आज आरोग्य हे चौकटीतल्या नियमांना बांधले गेले आहे. रक्तदाब एवढाच पाहिजे. रक्तातील साखर एवढीच हवी. वजन एवढेच हवे, कॅल्शियम एवढे हवेच ! कमी पडत असेल तर सरळ लेबल चिकटवले जाते, तू रोगी !
    ....... आणि आयुर्वेद म्हणतो.....
    ........ इथे प्रत्येकाचे नियम वेगळे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.01.2017

  • याला जीवन ऐसे नाव भाग ८

    संदर्भ - वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय

    तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय पाहूया.

    जांभळाची किंवा आंब्याची कोवळी पाने चघळून खाल्ली असता, अति तहान कमी होते.
    सर्व प्रकारची तहान कमी होण्यासाठी पावसाचे वरच्यावर धरलेले पाणी मध घालून प्यावे अथवा मातीचे ढेकूळ किंवा कौल किंवा वाळू तापवून पाण्यात विझवून ते पाणी गाळून साखर घालून प्यावे किंवा दर्भ नावाचे गवत पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.
    लाह्यांचे पीठ करून साखर आणि मध घालून खीर करून प्यावी.
    साळीच्या लाहयांची कण्हेरी करून प्यावी.
    थंड पाण्याने स्नान करून, थंड गुणाच्या औषधांनी शिजवलेल्या दुधाबरोबर मध साखर घालून जेवावे.
    किंचीत आंबट आणि मीठ घालून मुगडाळीचे तुपाची फोडणी देऊन केलेले कढण जेवणात ठेवावे.
    दुधापासून दही ताक लोणी बनवून काढलेल्या तुपाचे सहा थेंब नित्य नियमाने दोन्ही नाकपुड्यात घालावे.

    याबरोबरच मनाची प्रसन्नता राखावी. नदी, तलाव, डोह अशा शांत थंड जागी जावे. किंवा त्याचे कल्पनाचित्र तयार करून त्यात रमावे.

    जेणेकरून तहान शमली जाईल. असे काही शारीरिक आणि मानसिक उपाय करावे. पण उगाचच पाणी पिऊ नये.

    काही ठिकाणी युक्ती वापरून लेपन चिकित्सा करता येते. जायफळ, वेखंड, हळद अशा उष्ण औषधींचा लेप थंड पाण्यातून केला असता, दोषांचे पाचन होऊन तृषा कमी होते. किंवा काही वेळा उसाचा रस मध वेखंड अशा औषधी पिऊन उलटी करून टाकल्याने देखील तहान कमी होते.

    पाणी सुद्धा पचावे लागते, ते पचण्यासाठी त्यात औषधी घालून पाणी प्यावे. कोणत्याही संस्काराशिवाय पाणी पिणे हे मधुमेह, रक्तदाबवृद्धी सारख्या आजाराचे कारण ठरू शकते.

    आयुर्वेदाचे माहेरघर केरळमधे हाॅटेलमधले पाणी देखील मुस्ता, चंदन, सुंठ घालून उकळवून दिले जाते. केरळमधे आयुर्वेद दैनंदिन जीवनात पाण्यातदेखील कसा मुरवलाय, हे हाॅटेलच्या या उदाहरणावरून लक्षात घ्यावे.

    नैसर्गिकरित्या लागलेली तहान साध्या पाण्याने कमी होते. पण साध्या पाण्याने तहान कमी झाली नाही तर असे औषधी पाणी प्यावे. सर्वसाधारणपणे मधुमेहात अशी तहान लागते. ही तहान कमी होण्यासाठी साध्या पाण्याऐवजी औषधी पाणी प्यावे. म्हणजे पाण्यापासून वाढणारा क्लेद, म्हणजे चिकटपणा कमी होऊन तहान कमी होते आणि साखरदेखील नियंत्रणात रहाते.

    म्हणजेच लागलेली तहान, काही वेळा औषधांनी पण कमी करावी लागते, प्रत्येक वेळी ही तहान फक्त पाण्यानेच भागते, असा गैरसमज नसावा.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    15.12.2016

  • किचन क्लिनिक – आले आणि सुंठ

    किचन क्लिनिक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेत आहोत. मग सुरूवात झणझणीत मसाल्यांपासून करायची का? आज आपण आले आणि सुंठीची वैद्य ही नवी ओळख पाहूया तर !

    आपण सर्वच जण सुंठीचा वापर चहात आणि आल्याचा वापर चहा,चटण्या आणी आपल्या गोव्यात माशांचे सुके बनवण्यासाठी केला जातो. हा कंद जमीनी खाली उत्पन्न होतो, ओला असताना आले आणि वाळवलेली ती सुंठ. पण दोघांचे ही गुण वेगळे बरंका. सुंठ आणि आले दोन्ही चवीला तिखट आणि उष्ण गुणाचे पण गंमत बघाना आले अधिक प्रमाणात खाल्ले तर एॅसीडीटी वाढते तर सुंठ मात्र अपचनाने झालेली एॅसीडीटी कमी करते.

    आले:

    १)भुक लागत नाही का मग दररोज जेवणापुर्वी साधारणपणे १/२ तास आल्याचा छोटा तुकडा सैन्धव मीठासोबत खा आणी मग बघा पोटातील आगीचा वणवा कसा पेटतो ते.

    २)सुका खोकला येत असल्यास एक चमचा आलेरस +२ च ओल्या हळदीचा रस+१ च मध हे मिश्रण घ्यावे.

    ३)आल्याच्या रसापासून घरगुती आलेपाक बनवा हा सर्दी,खोकला,भुक न लागणे,तोंडास रूचि नसणे ह्यावर रामबाण उपाय.

    ४)वाढलेले काॅलेस्टरोल सतावतेय का मग सकाळी उपाशी पोटी आल्याचा छोटा तुकडा आणि एक लसूण पाकळी नियमीत खा आणी ह्रूदयाचे आरोग्य चांगले ठेवा.

    सुंठ:

    १)सुंठी वाचून नाही पण सुंठीने खोकला घालवायचा असेल तर सुंठीची राख मधासह चाटणे खोकला दमा पळालाच म्हणून समजा.

    २)शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सुज,मुरगळणे,मार लागणे,ह्यावर सुंठ आल्याच्या रसात उगाळून त्याचा गरम लेप त्या भागावर लावणे.

    ३)गळू पिकत नसेल तर सुंठपूड आणि खोबरेलतेल एकत्र शिजवा आणी सोसवेल एवढे निवल्यावर त्या गळूवर बांधा.

    ४)पोटात वात धरणे अथवा वारंवार आव पडणे ह्यावर घरी केलेला सुंठवडा उत्तम काम करतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आजचा आरोग्य विचार – भाग एकतीस

    मी पाश्चात्य संस्कृतीच्या एवढा विरोधात का, असा प्रश्न माझ्या काही मित्रांना, नातेवाईकांना पडला आहे. हा बदल राजीवभाईनी दिलेल्या दृष्टीकोनाचा आहे. प्रत्येक गोष्ट शिकायची असेल तर ती भारतीयत्वाच्या दृष्टीने अभ्यासायची सवय त्यांनीच लावली. आयुर्वेद देखील अशाच पद्धतीने शिकलो. नाहीतर आज आयुर्वेद देखील पाश्चात्य बुद्धीने शिकवला जातोय, त्याचा मी पण एक भाग झालो असतो.