(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – बडीशेप

    हिला नओळखणारी व्यक्ती भारतात तरी सापडणे नाही.आपण हाॅटेल मध्ये गेलो जेवून आटपले की बिल देताना (कदाचित त्याची चुटचुट लागू नये म्हणून असेल)प्रत्येक हाॅटेल मध्ये मुखशुध्दी करिता सुंदर प्लेट मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात (भाजून,साखरेचे रंगीत कवच असणारा,सुवासिक इ)हिला समोर ठेवले जाते.

    तर अशी हि सुंदर सुवासीक बडीशेप गरम मसाला बनवताना त्यात देखील वापरली जातेच.शिवाय मुखशुध्दीकरीता देखील उपयुक्त आहेच.तसेच ब-याच घरांमधून काढा बनवताना त्यात देखील हिचा उपयोग केला जातो.त्यामूळे हिचे देखील घरचा वैद्य म्हणून उपयोग ब-याच जणांना माहीत असणार हे नक्की.

    बडीशेपेचे लहान क्षूप असते आणी त्याला उगवणारी फळे म्हणजे बडीशेप होय.ह्याची चव गोड,कडू,तिखट अशी मिश्र स्वरूपाची असते.आणी हि गुणाने थंड असते.म्हणूनच ती शरीरातील वात आणी पित्त दोष कमी करते.

    आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूया:

    १)सुज आली असता बडीशेपेचा पोटीस सूज आलेल्या ठिकाणी बांधावा सूज उतरते.

    २)वारंवार खोकला येत असल्यास बडीशेप चुर्ण खडीसाखरे सोबत मिसळून खावे आराम पडतो.

    ३)संडासला आव पडत असल्यास सुंठ व बडीशेप समप्रमाणात घ्यावी व तूपात भाजावी आणी बारीक पूड करून दिवसातून तीन वेळा गरम पाण्यासोबत घ्यावी त्वरित आराम मिळतो.

    ४)उल्टया होत असल्यास बडीशेप चूर्ण मोरावळयाच्या पाकासोबत चाटावे.

    ५)लघ्वीला जळजळ होत असेल तर बडीशेपेचा काढा करून घ्यावा.

    ६)पोटात वारंवार जंत होण्याची सवय असेल व त्यामुळे त्रास होत असेल तर बडीशेप चुर्ण मधात मिसळून सकाळी व रात्री रिकाम्या पोटी घ्यावे .

    बडीशेप जास्त खाल्ल्यास संडासला साफ होणार नाही तसेच बडीशेप अतीप्रमाणात खाणा-या व्यकतींच्या शरीरातील धातूंना क्षीणता येते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – काकडी

    किचन क्लिनीक – काकडी

    हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी.
    हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो.

    हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व थंड असते.त्यामुळेच हे शरीरातील पित्तदोष कमी करते व वात व कफ दोष वाढविते.

    आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:

    १)अंगाची जळजळ होत असल्यास काकडीचा लेप लावावा व हिच्या बिया थंडाई मध्ये घालून देतात.

    २)लघ्वी कमी होत असेल तर काकडीचे बी, जिरे व साखर पाण्यात घालून केलेला काढा प्यावा फायदा होतो.

    ३)अंगावर पांढरे जात असल्यास १ ग्राम काकडी बी मधला गर + १ ग्राम पांढ-या कमळाच्या पाकळ्या वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून ७ दिवस खावे.

    ४)उन्हाळयात उष्णता कमी करायला काकडी चिरून त्यात खडीसाखर व लिंबाचा रस घालून खावी.

    ५)छातीत जळ जळ होत असल्यास ४ चमचे काकडी रस+खडीसाखर हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावे.

    ६)गव्हाचे पदार्थ खाऊन जर अजीर्ण झाले तर त्यावर उतारा म्हणून काकडी खावी.

    अतिमात्रेत काकडी खाल्ल्यास सर्दी होते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अडतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

    कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग तीन

    काही वेळा काही विषय परत परत येणार आहेत. कारण त्याविषयाचे गांभीर्यच तसे आहे.

    विश्रांती घेताना आपल्या शरीरातील उर्जेवर आतली महत्त्वाची कामे शरीर पूर्ण करून घेत असते. बाहेरचे दार बंद केले तरच बॅकेला आतील कामे उरकता येतात. नाहीतर आव जाव सुरू असेल तर नीट लक्ष देऊन आतली कामे करता येत नाहीत. आणि सारखं आत बाहेर आत बाहेर करावं लागलं की, उगाच शक्ती फुकट जाते.
    एखादी मातेला जर काही महत्त्वाची कामे करायची असतील तर बाळाला कसं ती जरा लवकर झोपवते. बाळ झोपले की कसं छान मन लावून काम करता येतं तसं !

    फक्त ग्रीष्म ऋतुमधेच दुपारी झोप सांगितलेली आहे. अन्य ऋतुमधे दुपारी झोप निषिध्द आहे. असे का ?

    ग्रीष्म ऋतुमधे निसर्गतः शरीरशक्ती कमी असते. सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर येतात. वातावरणात प्रचंड उष्णता असते. अशा उष्ण वातावरणात जर बाहेर राहून काम केले तर शरीरातील स्निग्धत्व कमी होईल, रूक्षत्व वाढेल. तेज महाभूताचूया ऊष्णतेमुळे शरीरातील जलमहाभूताचे प्रमाण, स्निग्धत्व, गरजेपेक्षा कमी होईल. असे होऊ नये म्हणून दुपारच्या वेळी घरीच सावलीत विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे.

    जेव्हा आपण झोपतो, तेव्हा सर्व अवयव आपल्या कामातून निवृत्त होतात. काम कमी होते. श्रम कमी होतात. घाम कमी येतो. उर्जा वाचते. शक्यी वाचते. ही उर्जेची बचत ही ग्रीष्मात उर्जा मिळवण्यासारखेच आहे. पैसे मिळवण्याबरोबरच पैसे वाचवणे ही पण एक मोठी बचत आहे तसे !

    ग्रीष्म ऋतुमधे ही उर्जा बचत करण्यासाठी विश्रांती सांगितली आहे. केवळ ग्रीष्म ऋतुमधेच ताकद कमी असते म्हणून या ऋतुमधे जशी दुपारी विश्रांती घ्यायची असते, तशीच विश्रांती ज्यांची ताकद कमी आहे अशा, बाल, वृद्ध, गर्भवती आणि आजारी माणसांनी देखील घ्यावी.

    जागे असताना काही ना काही तरी काम सुरू असते. जेव्हा काम सुरू असते, तेव्हा श्वासगती देखील जास्ती असते. त्यामधे देखील उर्जा संपत असते. आजारी पडल्यावर विश्रांती यासाठीच सांगितली जाते, की ज्यामुळे उर्जेची बचत व्हावी. आणि ही उर्जा अन्य महत्त्वाच्या अवयवांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी वापरता यावी.

    मोबाईलची बॅटरी संपत आली की, आपण कसे मोबाईल कमीत कमी हाताळतो, व्हिडिओ पहाणे बंद, ऑडीयो ऐकणे बंद, डाटा कनेक्शन ऑफ, वायफाय बंद. ब्राईटनेस लो, अननोन नंबरचे काॅल कट करणे, तरच असलेल्या दोन चार टक्के बॅटरी साठ्यावर अत्यंत महत्त्वाचे काॅल करण्यासाठी मोबाईल "स्लीप" मोडला टाकतो, म्हणजेच बॅटरी शिल्लक ठेवतो.

    हं आता कळले. आमच्या भाषेत आम्हाला समजावनू सांगितले की पटकन कळते, ती पंचमहाभूते वगैरे डोक्यावरून जाणारे विषय !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.05.2017

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौवीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौवीस

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आळस मोठ्ठा देऊ नये

    "आलस्यंही मनुष्याणां महारिपु" सर्वात मोठा शत्रू आळस आहे. कारण तो दिसत नाही. जो आपल्या आतमधेच आहे तो बाहेरून कसा दिसणार ? हाच मधुमेहाचा सर्वात फास्ट फ्रेंड आहे.

    आपण कुठे कुठे आणि कधी आळशी होतो, ते एकदा तपासून पहावे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या यंत्रांनी आपल्याला एवढे आळशी बनवले आहे, हे कधी लक्षातही आले नाही. स्कूटरच्या जमान्यात गाडीला कीक मारून ती स्टार्ट करणे हा मोठाच व्यायाम होता. त्यात ती बजाजची स्कूटर सुरू असली तर वेगळ्या व्यायामाची गरजच नव्हती. कारण बजाज स्कूटर सकाळी सुरू करणे हे सगळा आळस घालवायचे मस्त साधन होते. तिला अगदी जमिनीवर आडवी पडून पुनः उभी केल्याशिवाय सुरुच होत नव्हती. तसंही करून सुरू झाली नाही तर चढावावर उलटी ढकलत न्यायची, आणि उतारावरून सेकंड गियर मधे गडगडत सोडून द्यायची. आणि गाडी सुरू झाल्याचा सगळ्यात जास्ती आनंद, ती ढकलण्यात घामाघूम होईपर्यंत, मदत करणाऱ्याला व्हायचा. (म्हणजे ढकलण्याऱ्याच्या कॅलरीज जाळायला देखील बजाज किती मदत करीत होते ना ! केवढा व्यायाम व्हायचा ? आता हा व्यायाम देखील संपला.
    एक बटन दाबले की चक्क गाडी सुरू होते.
    एक बटन दाबले की घरात विहीरीचे पाणी येते.
    एक बटन दाबले की धान्याचे चक्क पीठ होते.
    एक बटन दाबले की देवाकडे दिवा पण लागतो आणि
    एक बटन दाबले तर चटणी वाटून तयार.
    एक बटन दाबले की ताकावर लोणी पसरते.
    एक बटन दाबले की कणिक तिंबून मिळते.
    एक बटन दाबले की मेसेज सेंड.
    एक बटन दाबले की पैसे ट्रान्स्फर

    आणि एवढे श्रम वाचवून उरलेला वेळ जिममधे खर्च करायचा, त्यासाठी परत पैसे मोजायचे.

    पूर्वी दहा रूपये वाचवण्यासाठी दहा मिनीटे चालायचे श्रम घेतले जायचे. एक स्टाॅप अगोदर उतरायचे. आता दहा मिनिटे वाचविण्यासाठी दहाच काय शंभर रूपये सुद्धा खर्च करायची तयारी !

    किती बदललो ना आपण ?
    कधी बदलत गेलो कळलं देखील नाही.

    आळस द्यायचाच नाही का ? द्यावा.
    चारचौघात आळस दिला की आई ओरडणारच.
    तोंडाचा आऽ करू नको असंही आई म्हणायची. तोंडात माशी जाईल असंही सांगायची.
    आळस द्यायचाच झाला तर तोंडावर हात ठेवून आळस द्यावा. जांभई द्यावी. आपल्या तोंडातील सर्व जीवजंतु आपल्याच तोंडातील दुर्गंधीसह बाहेर पसरतात. जशी जांभई तशीच ढेकर, तशीच शिंक. शिंकेचा वेग तर जबरदस्त असतो. तो हाॅर्स पाॅवरमधे देखील मोजला जातो. एवढ्या जोरात खोकलो, शिंकलो तर केवढा जंतुसंसर्ग आपण करत असतो ना !

    तसं जांभई देणं ही शरीराकडून निर्माण होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आयुर्वेदानुसार एक वेग आहे. आणि वेगाचा अवरोध कधी करू नये हा नियम. वेग निर्माण झाला की पूर्तता करायचीच. म्हणजे जांभई आली तर ती द्यायचीच. पण तोंडावर हात, रुमाल ठेवून द्यावी. अगदी पाश्चात्य पद्धतीने साॅरी असे देखील म्हणावे.
    पण मोठ्ठा आऽऽ करून सर्वांसमक्ष आपले किडक्या बत्तीशी दातांचे समग्र दर्शन बाहेरच्या विश्वाला कशाला द्यायचे ना ?
    एक तो कान्हा होता, ज्याने मुखकमल उघडल्यावर यशोदेला विश्वरूप दर्शन झाले होते. ......

    आपण "तो" कान्हा नाही एवढे लक्षात ठेवले तरी पुरे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सहा

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल
    कालचा भाग 1 आजचा भाग 2

    ज्या लॅबोरेटरीच्या रिपोर्टस् वर आपण अवलंबून रहातो, त्या लॅब रिपोर्ट च्या मागील छापील बाजू कधी वाचून बघीतली आहे ? किंवा काही वेळा रिपोर्ट च्या खालीच अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं.( सिगरेटच्या पाकिटावर कसं दिसेल न दिसेल अशा अक्षरात लिहिलेलं असतं.... "सिगरेट स्मोकिंग इज इन्युरस टु हेल्थ")

    मुद्दाम वाचा.
    मला त्यांचं कायम कौतुक वाटतं. सगळी कार्डस अगदी ओपन असतात. लपाछपीचा व्यवहार नाही. जे सत्य आहे ते अगदी लेखी लिहूनच देतात. नंतर मागाहून कोणी गडबड नको करायला, आम्हाला सांगितलेच नाही, माहितीच नव्हतं वगैरे.....

    आपले जे रक्त लघवी वगैरेचे रिपोर्टस दिले जातात, त्या रिपोर्टवर जे काही लिहिलेलं असते, ते फक्त ती चिठी लिहून देणाऱ्या डाॅक्टरसाठीच असते. त्याचा रूग्णाशी खरंतर काहीच संबंध असत नाही. रूग्ण हा त्या कागदाचा केवळ वाहक असतो. तो रिपोर्ट काय आहे, कसा आहे, बरोबर आहे की नाही, हे त्या पॅथाॅलाॅजीच्या असिस्टंटनी कधीही रूग्णाला सांगायचे नसते. सल्लेही द्यायचे नसतात. त्यामुळे त्या कागदावर खाली काही वाक्ये असतात...
    जसे,
    The analysis results are only answer to corrosponding sample.
    The reported results is for information and for interpretation of referring doctor only.

    याचा अर्थ असा होतो की, हा केवळ वैद्यकीय व्यावसायिकासाठी समजेल अशा वैद्यकिय भाषेत लिहिलेला कागद आहे. त्यात रूग्णांनी आपले डोके खर्च करू नये. त्याचा अभ्यास ज्यांना आहे, अशा वैद्यकिय जाणकारांनी त्या रिपोर्ट चे अर्थ नीट समजतील अशा भाषेत लावावेत, आणि आपल्या रुग्णांना सांगावेत. त्यासाठी योग्य तो मोबदला रूग्णांनी, त्यांना दिलेला असतो. (काही वाक्यांचे विस्तृत अर्थ खरंतर कंसातील आहेत, पण कंस न टाकता लिहिले आहेत.)

    Referring doctor.......who understand the meaning of reporting units, reference ranges, and limitations of technologies should interpret the results.

    "त्यांनीच याचे अर्थ लावावेत, ज्यांना या रिपोर्टमधील युनीट, रेफरन्स रेंज यांची पूर्ण माहिती, पूर्ण अभ्यास, ज्ञान आहे. तसेच रिपोर्ट करण्यासाठी जी मशीनरी वापरली गेली, त्या विशिष्ट कंपनीच्या मशीनरीचे, त्या मशीन मधील रिपोर्टींग करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीमधील त्रुटींचे, अंतिम निष्कर्षावर जे परिणाम होतात, ते समजून घेऊन तसे रुग्णाला सांगितले जावे."

    हे सर्व ज्यांना माहिती नाही, त्यांनी जर, गलत तरीकेसे, अपने अंदाज से, इस रिपोर्ट को पढा और अपने तरीके से यदी समझ लेने की कोशीष की, और अगर गलतीसे कुछ उल्टा पुल्टा हो गया, तो इसके जिम्मेदार हम नही रहेंगे ।

    बरोबरच आहे ना. मोबाईल जरी आपल्या मालकीचा असला तरी, त्याचा बिघाड बघण्यासाठी, अतिहुशारी करून, नेट वरून वाचून, मोबाईल खोलून, दुरूस्ती करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का ?

    आणि इथे तर प्रत्यक्ष स्वतःच्या जीवाशी खेळ असतो. म्हणून पॅथाॅलाॅजीचे तज्ञ डाॅक्टरदेखील या रिपोर्टचा योग्य तो अर्थ लावू शकत नाहीत, कारण त्यांनी रुग्णाला काही वेळा बघितलेला पण नसतो.

    अशा अर्धवट ज्ञानावर आरोग्याचे निष्कर्ष काढणे तर फार धोक्याचे असते.
    ना रे बाबा ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.02.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचाहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 32

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग सहा

    देवासाठी पान वाढले. देवासमोर ठेवले. पान बाजूला सरकवून पानाखाली पाण्याने एक मंडल (भरीव वर्तुळाकार जागा ) काढले. पुनः मंडल काढलेल्या जागेवर पान सरकवून ठेवले. आता पान पुनः हलवायचे नाही. वाढलेल्या पानाला स्थिर करून घेतले. आता जेवून पूर्ण होईपर्यंत आसन सोडायचे नाही किंवा पान सोडायचे नाही. हा दंडक.
    कशासाठी?
    वाढलेल्या पानावरून उठून जाणे, हा अन्नदेवतेचा साक्षात अपमान असतो. ( हे समजावणे आस्तिकांसाठी ! नास्तिक उघडपणे देवच मानत नाहीत, त्यांना अन्न ही देवता असते हे पटणारेच नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे प्रोटीन्स, व्हिटामिन्स, फॅटस आणि कारबोहाड्रेटस ! बाकी अंधश्रद्धा, विषय संपला. )

    एकदा वाढलेल्या पानावरून उठल्यानंतर त्या पानावरचा आपला हक्क संपला, आता उरलेले अन्न कृमी किटकांना सोडले.
    असे करू नये. आपण वाढलेल्या पानासमोर बसलेलो असताना, आपले लक्ष पूर्णपणे पानावरच असते. ( तसे असावे. ) म्हणजे पानामधे जमिनीवरुन येणारे काही किडामुंगींसारखे किटक, किंवा आकाशमार्गे पानामध्ये उतरु शकणारे कोळ्यासारखे विषारी किटक, अन्नामधे पडू नयेत, ही घेतलेली दक्षता म्हणा हवंतर ! ( हे समजावणे नास्तिकांसाठी ! )

    सांगायचं काय तर, कोणत्याही कारणाने एकदा जेवायला सुरवात केली की, पान किंवा आसन हलू नये. एवढा संयम मनावर हवाच. आजकाल तर जेवायला सुरवात केली की, दहा वेळा उठणार. मोबाईल दुसरीकडे राहिला, दरवाज्याची बेल वाजली, बेसिनचा नळ सुरू राहिला, टीव्ही चा रिमोट घ्यायला... अश्या कारणानी जेवत असताना सतरा वेळा उष्ट्या हातानी उठतो. असे मध्येच उठल्यामुळे आपल्या हाताला लागलेले आपले उष्टे दुसऱ्याच्या पानात पडू शकते, किंवा आपल्या अंगाखांद्यावरील सूक्ष्म जीवजंतु, कचरा इकडे तिकडे दुसऱ्याच्या पानातही जाऊ शकतो. ही कृती जंतुसंसर्ग पसरवणारी असते. आणि किती डिसगस्टींग वाटते ना !

    अन्न हे कोणत्याही कारणांनी दूषित होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे.
    काय चुकीचे सांगितलेले ? आता ज्यांना हे मनुवादी विचार वाटतात, त्यांना खुशाल म्हणू देत. पण जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, ते योग्यच आहे. हेच नियम जर एखाद्या मॅकडो ने अथवा डाॅन्कीडोने किंवा नाचोपाचो ने सांगितले असते तर ? डोक्यावर घेऊन नाचले असते. "पण हे आमच्याच भारतीय ग्रंथात सांगितलेले आहे, फक्त आता पुनः एकदा लक्षात आणून देतोय" असे म्हटले तरी काही जणांना ते अन्नाचे "भगवेकरण" वाटेल. कोणाला काय कश्या शंका येतील सांगता येत नाही. अशा शंकासूरांची संख्या हल्ली वाढते आहे. यांच्यापासून सावधान !

    बाहेरचा किटक वाढलेल्या पानात येऊ नये म्हणून पानाभोवती देखील पाणी वर्तुळाकार फिरवायचे असते. आणि या किडा मुंगीसाठी, आपण जेवायला सुरवात करण्या अगोदर, अन्न उष्टे करण्यापूर्वी, पाच सहा अन्नाचे कण ताटाबाहेर काढून ठेवायचे. याला काय म्हणायचे ? "भूतदया" म्हणू !

    काही महाभाग तर वाढलेले पान जणुकाही कुशीत घेऊन जेवतात ! वाढलेले ताट मांडीवर, अंगावर घेऊन जेवणे ही तर राक्षसी कृती आहे. वाढलेले पान हलवत हलवत फिरत फिरत खाल्ले तर नकळतपणे चंचलपणा निर्माण होतो.

    चंचलपणा म्हणजे साक्षात वाताचा प्रकोप. मुलांमधला चंचलपणा, आपल्या विचारातील चंचलपणा, कमी होण्यासाठी, जेवण पूर्ण होईपर्यंत, आपले आसन पृथ्वीला धरून ठेवणारे, दृढ हवे. स्थिर हवे. तरच खाल्लेल्या अन्नाने शरीराची पुष्टी होईल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.06.2017

  • आहाररहस्य १५

    जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे.

  • अॅंजिओग्राफी आणि डी. एस. ए.

    रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष-किरण शास्त्र करीत असे.

  • सी.टी. स्कॅन (बॉडी)

    सुरुवातीला काही वर्षे सी.टी. स्कॅन मशिन्स ही फक्त डोक्याचेच स्कॅन करीत असत; परंतु विज्ञानातील व मुख्यत: संगणक शास्त्रातील प्रगतीमुळे पूर्ण शरीराचे स्कॅनिंग होऊ लागले.

  • वदनी कवल भाग २

    नाम घ्या श्री हरीचे......

    गजर करणे, जयजयकार करणे म्हणजे देवाचे नाव घेणे, त्याला हाक मारणे, आणि त्याला आपली सतत आठवण करून देणे.

    या अन्नप्रार्थनेमधे खूप मोठा अर्थ सामावलेला आहे.

    तू दिलेल्या वाचेने, तुझे नाम अगदी सहजपणे मी घेतोय, त्यासाठी कोणतेही मोल मला द्यावे लागत नाही. तुच दिलेले अन्न सेवन करतोय, पोटात ढकलतोय, आता पुढची जबाबदारी हे दयाघना, आता तू स्विकार !
    कारण भगवंता, तूच गीतेमधे सांगितले आहेस,
    अहं वैश्वानरो भूत्वां
    प्राणीनां देहमाश्रितम ....
    "*मीच* जठराग्नि आहे. चारही प्रकारचे अन्न मीचपचवतो. (तुम्ही फक्त माझ्यापर्यंत आणून पोचवा.) तुमच्या कर्मसिद्धांतानुसार मीच त्याचे योग्य ते फळ, योग्य त्या वेळी देणार आहे. आणि या मिळणार्‍या फळाची आसक्ती न ठेवता, तू तुझे कर्म केवळ कर्तव्य म्हणून करीत रहा."

    तुझ्याशिवाय हे अन्न पचवणारा कोण आहे ? हा भाव मनी ठेवावा.
    हे खरेच आहे.

    आपण फक्त अन्न खातो. त्यापासून लाल रंगाचे रक्त तयार करणे, घट्ट असलेले मांस हाडे यांची निर्मिती करणे, मातृस्तनी पांढरे दूध निर्माण करणे, पाण्याच्या रंगाचे मूत्र बाहेर काढणे, इ. सर्व नियंत्रित करणारी एक शक्ती आहे,
    (तिलाच आध्यात्मिक भाषेत ईश्वर आणि आयुर्वेदीय भाषेत अग्नि असे म्हणतात.)
    आणि हे सर्व आपल्याच पोटात चालले आहे, याची साधी जाणीव सुद्धा आपल्याला नसणे हेच, त्याच्या अस्तित्वाचे लक्षण आहे. अदभुत यंत्र आहे हे शरीर ! म्हणूनच तर समर्थ म्हणतात, "या शरीरासारीखे दुसरे यंत्र नाही "

    हे शरीर त्याने एवढे गुंतागुंतीचे बनवले आहे, पण प्रत्येक स्पेअर पार्टचे काम अगदी चोख.

    कशासाठी हे अन्न मी सेवणार? याचा विचार अन्न घेत असताना व्हायला हवा. माझ्या आहाराने मला शक्ती मिळते आहे, आणि ही देहशक्ती मला देशभक्ती वाढवण्यासाठी वापरायची आहे, हेच माझ्यासाठीचे जीवन कर्म असेल,

    उदरभरण नोहे म्हणजे केवळ पोट भरणे नाही, तर ही देवाला दिलेली जणुकाही आहुतीच आहे, माझ्या मीपणाची, अहंकाराची, आहुती मी या यज्ञात हवन करतोय, असा भाव निर्माण करणारी बुद्धी, याच अन्नातून निर्माण होणारी आहे, ती उत्तम गुणी बुद्धी फक्त तू मला दे ! हा देणारा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतःच अन्नरूप ब्रह्म आहेस !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    05.09.2016