जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
"बोला अमृत बोला...‘, "आला खुशीत समिंदर...‘ "क्षण आला भाग्याचा...‘ यांसारख्या मधाळ गीतांनी एकेकाळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणार्या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. त्यांचा जन्म दि ११ मे १९१४ रोजी झाला. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती. ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला. ज्योत्स्नाबाईंना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती.
वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी प्रथम ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकात भूमिका केली. या नाटकाचा प्रथम प्रयोग दि. १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. या नाटकात त्यांनी नायिकेची म्हणजेच बिंबाची भूमिका केली.या नाटकाचे मुंबई व पुणे येथे शंभराहूनअधिक प्रयोग झाले. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. विवाहानंतर १९३३ साली त्यांचे पती केशवराव भोळे यांनी ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था काढली. या संस्थेने अनेक नाटकांचे प्रयोग केले. ‘अलंकार’ नाटकात वत्सलेची, ‘आराधना’त देवकीची, ‘आशिर्वाद’मधील सुमित्रा, ‘एक होता म्हातारा’तील उमा, ‘कुलवधू’ मधील भानुती, ‘कोणे एके काळी’ मधील कल्याणी, ‘धाकटी आई’ मधील वीणा,‘भूमिकन्या सीता’मधील सीता, ‘रंभा’तील सुगंधा, ‘राधामाई’ मधील राधा तर‘ विद्याहरण’ मधील देवयानी अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. या नाटकातील पदे त्यांनी गाऊन अजरामर केली.
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी शिवाजीपार्क येथे झालेल्या कार्यक़्रमात त्यांनी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रियअमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीत गाऊन एक इतिहासच रचला. यागीताला शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केले. या गीताने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण भारावले.ज्योत्स्नाबाईंना अभिनय, गायन याबरोबर साहित्याचीही आवड होती.त्यांनी ‘आराधना’ या नाटकाचे लेखन केले. त्या अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कल्चरलसेंटर’च्या अध्यक्षा होत्या. १९९९ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘लतामंगेशकर पुरस्कार’ तर पुणे महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’असे अनेक पुरस्कार मिळाले. अनुबंध प्रकाशन या संस्थेने त्यांचे आत्मचरित्र ‘तुची ज्योत्स्ना भोळे’ हे प्रकाशित केले आहे. मा. ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ज्योत्स्ना भोळे यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=ytNtDJ9Yq38
जगातील केवळ चारच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले आहे. पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत हे त्यापैकी एक होऊ शकले असते. मात्र वयाचे १११ वे वर्ष पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना त्यांचे निधन झाले.
श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; मा.श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते,ठाकरे कुटुंबीय म्हणजे कलेच्या प्रांगणात रममाण असणारे, सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेतलेले आणि सृजनशील; अर्थात हे संस्कार प्रबोधनकार मा.ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक आपत्यांवर केले.
संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे व्हॉयोलीन वादनात निपुण होते, सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या मनात रुंजी घालत आणि यामुळे सुरेल गाण्यांची निर्मिती त्यांच्या हातून झाली.
ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांना मराठी गाण्यांची संधी श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मिळाली. मा.श्रीकांत ठाकरे संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत यामध्ये “अगं पोरी सवाल दर्याला तुफान”, “नको आरती की नको पुष्पमाला”, “तुझे रुप सखे गुलजार”, “प्रभू तू दयाळू”, “शोधीसी मानवा राऊळी मंदिरी” सारखी अवीट भक्ती, भाव आणि कोळी गीतांचा समावेश, मराठी संगीत विश्वात मा.श्रीकांत ठाकरे आणि मा.मोहम्मद रफी ही संगीत-गायक जोडगोळी म्हणजे “कानसेनांसाठी” पर्वणीच आहेत; तसंच “गझल” हा गाण्यांचा प्रकार मा.श्रीकांत ठाकरे यांच्या मुळे मराठीत रुजला. उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, शोभा गुर्टू, पुष्पा पागधरे सारख्या गायकांनी मा.श्रीकांत ठाकरे यांच्या संगीताची सुरेलता वाढवली; “शूरा मी वंदिले”, “सवाई हवालदार”, “महानदीच्या तीरावर” सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील श्रीकांत ठाकरे यांनी केली.
संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले.
श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीत्वाचे पैलू आणि चरित्र पट “जसे घडले तसे” या आत्मचरित्राच्या माध्यमातून वाचक आणि रसिकांना वाचायला मिळाला. श्रीकांत ठाकरे यांचे १० डिसेंबर २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / सागर मालाडकर
जिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १८९० रोजी मुरादाबाद येथे झाला.जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला मा.जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे मा.जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी नायडू यांनाच मिळाली होती. मुशायर्याणत मद्यपान करून येणारे, आल्यावर गझल म्हणणार्या कवीला ढकलून स्वत: गझल गाणारे मा.जिगर चांगले कवी म्हणून लोकांनी सहन केले होते. मद्यपान सोडल्यावर ते अधिक प्रिय झाले.
१९५८ मध्ये भारत सरकारनेही त्यांच्या ‘आतिशे-गुल’ या काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार देऊन राजमान्यताही दिली होती. आपल्या चित्रपटसृष्टीला मजरुह सुलतानपुरी आणि शकील बदायूँनी हे हिरे देण्याचे काम जिगर मुरादाबादी यांनी केले. अशा अनेक कवींना त्यांनी पुढे आणले. जिगर मुरादाबादी यांच्या गाजलेल्या पुस्तकामध्ये में दाग़-ए-जिगर, शोला-ए-तुर आतिश-ए-गुल, दीवान-ए-जिगर रहीं समावेश आहे. जिगर मुरादाबादी यांचे निधन ९ सप्टेंबर १९६० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / समीर गायकवाड
जिगर मुरादाबादी यांची शायरी.
यूही दराज़ खोला एक पुरानी मॅगज़ीन हाथ लग गयी,जिस में
जिगर मुरादाबादी जी पर मिलन जी का बड़ा ही दिलकश लेख था |
.वह लिखती है के जिगर जी की शायरी जैसे शहद में घुले हुए अल्फ़ाज़ ,
जिस में ओस के बूँदों की मुलायमता है,अपनी महबूबा से मिलने का वादा,
उनके देखे ख्वाब,आकांक्षा,कल्पना,उनकी प्रतीक्षा,हसीना का शबाब,
उनकी मुस्कुराहट,उनसे वियोग के लम्हे,मिलन की बेला,उनका हुस्न,जवानी,
मदहोशी ,ज़िंदगी ,ये सब कुछ बयान करती मखमली शायरी है |
डॉ.श्रीराम लागू यांचे पूर्ण नाव डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला. नटसम्राट' हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.
त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले. शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता. पुण्यातील पी. डी. ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात कामे करायला सुरुवात केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानियायेथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. एम.बी.बी.एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसायात जम बसत असतानाही केवळ नाटकाच्या ओढीने कलावंत म्हणून केलेले काम डॉक्टरेट मिळविण्याइतके महत्त्वाचे आहे. डॉ.लागूंनी रंगभूमीवर कलावंत म्हणून प्रवास सुरु केला.
पी.डी.ए, रंगायन, थिएटर युनिट, कलावैभव, गोवा हिंदू, रूपवेध, आविष्कार, आय.एन.टी. ह्या मान्यवर नाट्यसंस्थांच्या नाटकातून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. अभिनयाशिवाय त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. त्यात गुरु महाराज गुरु, गिधाडे, हिमालयाची सावली, गार्बो, उद्ध्वस्त धर्मशाळा, कस्तुरीमृग, एकच प्याला, शतखंड, चाणाक्य विष्णुगुप्त, किरवंत इत्यादी. कांती मडिया या अनुवादित गुजराथी नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. तसेच एक होती राणी आणि अॅन्टीगनी या दोन नाटकांचे नाटककार श्रीराम लागू होते. वसंत कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर हे दोघेही नाशिककर नाटककार लागूंना जवळचे. त्या दोघांच्याही नाटकांतल्या आव्हानदायी चरित्रभूमिका त्यांनी समर्थपणे हाताळल्या. गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्यापासून तो प्र. ल. मयेकर, प्रेमानंद गज्वी आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या आजकालच्या नाटककारांच्या 'प्रायोगिक' कृतीही त्यांनी उत्साहाने हाताळल्या.
मोहन तोंडवळकर, सुधीर भट आणि मोहन वाघ यांच्यापासून तो गोवा हिंदू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरसारख्या संस्थांतही त्यांनी निष्ठेने काम केले. सत्यदेव दुबे यांच्या प्रागतिक संस्थेसाठी डॉक्टरांनी तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केले आणि त्यात स्वत: एक मध्यवर्ती भूमिकाही केली.
डॉ.श्रीराम लागूच्या रंगभूमीवरच्या एकाहून एक सरस भूमिका गाजल्या त्यातही नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेने अभिनय कारकिर्दीला हिमालयाची उंची गाठून दिली. पत्नी दीपा श्रीराम यांनी निर्मिती केलेल्या 'झाकोळ' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’तल्या अभिनयाने इतिहास घडवला. सामना’, सिंहासन’, ‘मुक्ता’ या सारख्या चित्रपटांमुळे डॉ. लागू आणि राजकीय चित्रपट हे समीकरण जुळले. 'पिंजरा'तली भूमिका आव्हानात्मक होती. एकाच चित्रपटात लागूंनी दुहेरी अभिनय केला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला एका संस्कारक्षम, जीवनातील सर्व मूल्य सांभाळून असणारा शिस्तप्रिय शिक्षक, तर चित्रपटांच्या उत्तरार्धात सर्व संस्कार लयाला गेलेली एक असहाय, केविलवाणी, स्वत:चं सर्व अस्तित्व घालवून बसलेली व्यक्ती. एकाच चित्रपटातली आपली ही दोन रुपं अभिनयाच्या ताकदीवर लागूंनी इतकी अप्रतिम साकारलीत की आजही भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास वर्णन करताना तो ह्या भूमिकेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. निळू फुले आणि श्रीराम लागूंचा ‘सामना’ ही चांगलाच रंगला. आणि लागूंच्या ‘सिंहासन’लाही रसिकांनी दाद दिली. आणि सुगंधी कट्टा, देवकीनंदन गोपाला, चंद्र आहे साक्षीला, आदी यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली.
हिंदीतही श्रीराम लागूंनी अभिनयाच्या उंचीने चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली. मराठीत काम करताना त्यांना हिंदीतही ऑफर आल्या. लागू हिंदीत गेले खरे पण त्यात ठसा उमटू शकेल अशा भूमिका त्यांच्या वाट्याला क्वचितच आल्या. हिंदीत चरित्र अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. 'सौतन' चित्रपटातील वडिलांची भूमिका त्यांच्या कसदार अभिनयामुळे लक्षात रहाते. अनेक मालिकांमधूनही त्यांनी काम केले. व्यावसायिक चित्रपटांच्या या दुनियेत कामाच्या समाधानापेक्षा लोकांना काय आवडते हे जास्त पाहिले जाते. शांतारामबापूंच्या दिग्दर्शनात सुरु झालेला श्रीराम लागूंचा चित्रपट प्रवास एका एखाद्या सुंदर स्वप्नासारखा आहे, श्रीराम लागूंच्या अनेकविध भूमिकांमधले वैविध्य अचंबित करणारे आहे. लागूंनी पु. लं.च्या 'सुंदर मी होणार' मधूनही काम केले. सॉक्रिटिसच्या विचारांवर आधारीत ' सूर्य पाहिलेला माणूस' हे नाटकही वैचारीक वर्तुळात गाजले. शिवाय 'मित्र' मधूनही वेगळे लागू पहायला मिळाले. लागू निरिश्वरवादी म्हणून प्रसिद्ध आहेत. 'देवाला रिटायर करा' या त्यांच्या विधानाने एकेकाळी खळबळ उडवली होती.
विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्त्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्त्व देणारे मा.श्रीराम लागू अनेक सामाजिक, राजकीय बाबींवर परखड प्रतिक्रिया नोंदवतात. सांस्कृतिक व्यासपीठावर ते चौफेर विषयांवर अभ्यासपूर्ण विधाने करतात. सूक्ष्म निरिक्षण व विश्लेषण क्षमता याचा उत्कृष्ट संयोग त्यांच्या व्यक्तीमत्वात झाला आहे. त्यांच्या एकूण कर्तृत्वाचा सन्मान संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन करण्यात आला. मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. तसेच भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरविले आहे. मराठी रंगभूमी आणि हिंदी मराठी चित्रपटांमधल्या अनेक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारा रंगकर्मी, ‘रूपवेध’ ही नाट्यसंस्था सुरू करून चाकोरीबाहेरची अनेकानेक उत्तम नाटके रंगमंचावर आणणारा दिग्दर्शक, निर्माता, नाटकांबरोबरच साहित्य, संगीत अशा कलांमध्ये गती असणारा रसिक, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन, विचारस्वातंत्र्याची चळवळ अशा समाजोपयोगी चळवळींशी जोडलेला सामाजिक कार्यकर्ता असे डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे पुस्तक आहे ‘रूपवेध’.
तसेच "लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांनी लिहीलेले स्वताःचे आत्मचरित्र आहे.
'लमाण' म्हणजे मालवाहू कामगार. वि. वा. शिरवाडकरांच्या ज्या 'नटसम्राट' या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका डॉ. श्रीराम लागूंनी प्रथम साकार केली त्याच भूमिकेतील त्यांचे वाक्य आहे : ''आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे.''
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
श्रीराम लागू यांचे नटसम्राट नाटक
https://www.youtube.com/watch?v=yTFPT7-v-Ws&feature=youtu.be
श्रीराम लागू यांचा पिंजरा चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=W-WzNiN9Tms
श्रीराम लागू यांचा सामना चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo&t=20s
https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM&t=3662s
श्रीराम लागू यांचा सिंहांसन चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=nQoh1HGlxdY
डॉ. मोहन आगाशे हे अभिनेत्यांच्या वनश्रीतला वटवृक्ष, मराठी रंगभूमीवरचे भीष्म पितामह, काटकोन त्रिकोणातला ९० अंशाचा कोन म्हणून ओळखले जातात.
आठवणीतील माणसं हे सदर लिहिताना अनेक चेहरे डोळ्यासमोर आले अन रेखाटले गेले पण काल घोडपदेव नाक्यावर लागलेला भाऊ यांचा फलक पाहिला आणि श्याम हुले नावाचं व्यक्तिमत्व अलगद अंत:चक्षूसमोर उभं राहिलं. त्यांच्या स्मृतीगंधाची दरवळ मनात रेंगाळू लागली. काळाच्या ओघात आपण अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली पाहतो आणि विसरून जातो. फक्त आजूबाजूच्या आणि रोज च्या जीवनातील व्यक्ती लक्षात राहतात आणि अशा अनेक वल्ली काळाच्या उदरात गडप होऊन जातात. अशीच एक व्यक्ती श्याम हुले मनाला भावलेल्या या व्यक्तीबद्दल लिहावे आणि चार लोकांना सांगावे, अगदी मनापासून वाटले.
रांगोळी किंवा रंगावली आणि भारतीय संस्कृतीचे अतूट समीकरण. कुठल्याही शुभ प्रसंगी रांगोळीला स्थान असतं या कलेने व्यावसायिक रूप धारण केलं नसलं तरी या रांगोळीत नांव कमावलेल्या पैकी श्याम हुले हे एक आपल्या विभागाला लाभलेले स्नेहशील सौहार्द. त्यांचा *जनजागृती* उदघाटन प्रसंगी रांगोळीतून साकारलेला वाघ शिवसेनाप्रमुखांना जागच्या जागी खिळवून ठेवतो. दाताच्या जबड्यात गुलाबाची पाकळीच्या लाल छटेमागील कारण काय....? असं शिवसेनाप्रमुखांनी विचारल्यावर भाऊंनी दिलेले उत्तर ‘वाघ म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे वाघ.जो पर्यंत वाघ शांत आहे तो पर्यंत शांत आहे.पण कोणी आडवा आला तर त्याला फाडून खाल्याशिवाय राहणार नाही.ही लाल छटा म्हणजे रक्त दर्शविते. आजही किती तरी तत्कालीन कार्यकर्त्यांना आठवत असेलच. शिवसेनेला वाघ कोणी दिला असेल तर या भाऊंनी.‘ त्याशिवाय त्यांनी कॅनव्हास पेपरवर बाळासाहेबांचे रेखाटलेले चित्र सर्वश्रुत आहे. त्यामुळे या उत्तम गुणी चित्रकाराचे नांव दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या मुखातून घेतले गेले तेव्हा या माणसाची पत काय होती ते आपल्या लक्षात येईलच. गुणवंत मांजरेकरांच्या रांगोळी प्रदर्शनात भाऊंच्या दोन रांगोळ्या असायच्या. भाऊंच्या पाण्यावर काढलेल्या रांगोळी लक्षवेधी ठरत असत. प्रदर्शनात कमलाकर गोंजीसारख्या प्रतिभावंत रांगोळीकारांच्या सोबतीला रांगोळी हा एक बहुमानच. ही एक अशी कला आहे की, रांगोळीत जमीन आणि बोटं यांचा स्पर्श होत नाही.त्यामुळे ती अस्पर्शित राहिली. शासकीय स्तरावर उदासीनता या अर्थाने अस्पर्शित राहिली त्यामुळे यांचा गौरव कधी झाला नाही.
आम्ही लहान असताना या व्यक्तीला आणि ते रेखाटत असलेल्या कलेल्या अगदी जवळून पाहिले आहे. त्याचा नेत्रसुखद आनंद घेतलेला आहे.पालनजी रतनजी चाळीतून जाता येताना नेहमीच दर्शन घडले. साधा माणूस हातात ब्रश घेऊन आपल्या कलेला तंत्र,मंत्र आणि मर्म यातून प्रत्यक्षात उतरविणारा .... रंग आणि रेषा यांच्या माध्यमातून कला साकार करणारा चित्रकार एक ख्यातकीर्त व्यक्तिमत्व श्याम हुले ( भाऊ) यांच्या रूपातून सहवास लाभणे हे आमचे भाग्य समजतो. त्यांच्या कलेतील तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन थोडेही ढासळू न देता त्यांनी केलेली कल्पनारम्य, उत्कृष्ट प्रतिमा मोहित केल्याशिवाय राहत नव्हती. भाऊ या कलेत इतके रमून गेले की, त्यांना कुणाशी सवडीने बोलायला देखील वेळ मिळत नसे. पण व्यवस्थितपणा आणि व्यावसायिकपणा त्यांना कधी जमलाच नाही. अगदी लोक देतील त्या पैश्यावर कामे केली. सेनेचे काम करताना पैसे कधी मागितले नाही. वाजवून पैसे कधी घेतलेच नाही. कोणी दिले नाही त्याचे दु:ख त्यांनी मानले नाही. मुळात ते मृदुभाषी आणि कमी बोलणारे. कुणावर कधी हुकुमत गाजविणे किंवा अधिकारवाणीने बोलण्याची सवय कधी जडून दिली नाही.त्याला ते तरी काय करणार....!
शिवसेना स्थापन झाली तेव्हा आपल्या विभागात काही मोजून कार्यकर्ते होते. तेव्हा स्थानिक सत्ताधारी आणि त्यांच्या गुंडासमोर उघडपणे काम करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. त्याकाळी श्याम हुले,दत्ता घाग, दत्ता चव्हाण ( पालनजी रतनजी चाळ ) , शिवसेनेचा ढाल म्हणून संबोधले गेलेले संभा घाडगे ( वाणी चाळ,), गोविंद शिंदे ( बुवाची चाळ ) गंगाराम साळुंके ( खोजा चाळ ) अनंत मारणे ( मारुती माळी चाळ ) अन्य काही मंडळींनी सेनेची बीजे ह्या घोडपदेव सभोवतालच्या परिसरात रोवली. ही नांव आजच्या पिढीला माहित नसतीलच. ह्या छान्दिष्टांच्या मळ्यातून एकेक मोती जोडले गेले. ते आजतागायत गुंफण्याचे काम आजची पिढी करते असं आपण समजू. आता मोती मिळत नाहीत. मोत्यांनी माळेत गुंफून घेण्याऐवजी कुणाच्या तरी करंगळीत शोभिवंत म्हणून जगणे पसंत केले आहे.
तत्कालीन नगरसेवक विजय लोके यांनी अनेकांच्या जीवनगौरवार्थ महापालिकेत सर्वाधिक नामकरण प्रस्ताव मंजूर केले होते. पण पाट्यांचे अनावरण केले नव्हते.महापालिकेने पाट्या लावल्या पण त्या काळाच्या ओघात गडप झाल्या. घोडपदेव नाक्यावर कै.बाबुराव मेटकरी चौक असाच तिष्ठत आहे. त्यांची साधी पाटी देखील आजतागायत लावलेली नाही. असंच श्याम हुले चौक विषयी घडले. मला श्याम हुले चौक विषयी झालेल्या राजकारणात पडायचे नाही. एखादा फलक पाहिला की,आम्ही श्याम आर्टची ती बारीक अक्षरे शोधीत असायचो. कारण ती वळणदार अक्षरातून त्या त्या पेंटरची प्रतिमा दिसून येत होती. आज त्या वळणदार सुंदर अक्षरांचा जमाना गेला पण खंत अशी की,श्यामभाऊ पेंटरच्या निमुळत्या बोटातून साकारलेला अविष्कार आज पाहायला मिळत नाही. काही म्हणा त्या काळात गुंफलेल्या माळेतील गडप झालेल्या या मोत्याविषयी आम्हाला आजही आदर आहे.
*अशोक भेके*
इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ रोजी झाला.
इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. भोर संस्थानात त्यांचे आजोबा कारभारी होते. तर सरकारी नोकरीमुळे वडिलांचे वास्तव्य उत्तर भारतात होते. त्यामुळे न. र. फाटकांचे शिक्षण उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
१९१५ मध्ये ते बी. ए. झाले. त्यावेळेस त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांची वाङ्मयीन कारकीर्द मुंबईच्या ‘इंदूप्रकाश या दैनिकात वृत्तपत्र संपादन करण्यापासून झाली. नंतर नवाकाळ मध्येही त्यांनी काम केले. महिला विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्ययन केले आणि त्यानंतर रुईया महाविद्यालयात ते शिकवू लागले.
प्रचलित विचार प्रवाहाविरूद्ध मत मांडून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचे वैशिष्ट्य ‘अंतर्भेदी’ या टोपणनावाने त्यांनी व्यक्तिचित्रे लिहिली. फाटकांनी चरित्रपर लेखनाला सुरुवात केली ती ‘न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे’ या ग्रंथापासून. त्यानंतर ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’, ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’, ‘श्री एकनाथ ः वाङ्मय आणि कार्य’ ही संतचरित्रे तर लोकमान्य, आदर्श भारत सेवक, नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर यांची चरित्रे ही फाटकांनी लिहिली. त्यांचा पिड खरा तर इतिहासकाराचा. त्यांच्यासमोर गिबनचा आदर्श होता. त्यामुळे त्या व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ह्या जाणिवेने फाटकांनी ही चरित्रे लिहिली आहेत. न. र. फाटक हे जसे स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच ते इतिहासाचे दृष्टी ठेवून इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेण रे विचारवंत, भाष्यकार होते. त्यावरून फाटकांच्या वैचारिक आणि बौद्धिक पातळीची जाणीव होते. न. र. फाटक यांचे २१ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
Copyright © 2025 | Marathisrushti