(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • लेखक आणि ग्रामीण कथाकार शंकर पाटील

    यत शिक्षण शाळेत ते मुख्याध्यपक होते. त्यांचा त्यावेळच्या अनेक साहित्यकांशी मैत्री होती.

  • भास्कर पाळंदे

    ठाणे शहराचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पुर्वीपासून येथे साहित्यिक, नाटयकर्मी, संगीतकार, शिक्षणतज्ञ, संशोधक, व इतर कलाप्रेमी रथी महारथींची रेलचेल आहे. या शहराचा सांस्कृतिक व साहित्यिक ज्ञानबिंदू उंचवण्यात जुन्या काळातील म्हणजे साधारण १९ व्या शतकाच्या पुर्वार्धातील, प्रसिध्द कवी भास्कर दामोदर पाळंदे यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

    मूळ ठाण्याचे रहिवाशी असलेल्या भास्कर पाळंदे आपल्या परिसरातील स्थानिकांना आपल्या रसभरित व जातीवंत कवितांनी मंत्रमुग्ध करून, रसिकतेचा दरवळणारा पारिजात आपल्या वाचकांच्या सामुहिक मनांमध्ये दीर्घकाळ फुलवून ठेवला होता. इंग्रज राजवटीत ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. भास्कर पाळंदे यांनी “विक्रमोर्वशीयम्” या संस्कृत नाटकाचे गद्यपद्यात्मक व गीतेचे ओवीबध्द भाषांतर केले आहे. त्यांनी लिहीलेल्या “रत्नमाला” या प्रसिध्द भक्तीपर पद्यग्रंथाचे वाचन करताना सर्वसामान्य व्यक्ती गहिवरून जातो.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • दत्ताराम मारुती मिरासदार

    मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला.

  • माणसामधला देवमाणूस कर्मयोगी शिवशंकरजी पाटील

    माणसामधला देवमाणूस कर्मयोगी शिवशंकरजी पाटील शेगांव संस्थानचे प्रमुख आणि निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ - शिवशंकरभाऊ म्हणजेच माणसामधला देवमाणूस आहे. त्यांना भेटल्याशिवाय ते कळणार नाही. श्री गजानन महाराज संस्थानचा भव्यपणा तिथली टापटिप व्यवस्था आणि निष्ठेने काम करणार्याची तनमयता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. त्या मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो प्रतिक्षा यादी आहे. भाऊंची ही कमाल आहे. तीन हजार सेवेकरी त्या मंदिराच्या परिसरात* तुम्हाला ते सगळे श्रध्देने काम करणारे आहेत. भाऊंनी हे परिवर्तन घडविले. संस्थानच्या कारभाराची सुत्रे भाऊंच्या हातात येण्यापुर्वी या संस्थानची वार्षिक उलाढाल पंचेचाळीस लाख रुपयांची होती. भाऊंनी ही उलाढाल आता १३७ कोटी रुपयापर्यंत आणली त्यातूनच महाराष्ट्रातले सर्वात्कृष्ठ इंजिनिअरिंग कॉलेज तिथे उभे राहिले. त्यातूनच आनंदसागर सारखे जागतिक किर्तीचा नंदनवन ठरेल, असा भव्य बगिचा उभा राहिला.

    शब्दामध्ये वर्णन न करता येण्यासारखा काही विषय सांगून समजत नाही . ते प्रत्यक्ष पाहावे लागतात ऐकण्याचा आनंद वेगळाच. शिवशंकरभाऊ कोणालाही मुलाखत देत नाही. प्रसिद्धी त्यांना नको आहे. शरद पवारांसारखे जेष्ठ नेते भाऊंना माणतात. मला असे वाटते की, शरद पवार एकाच व्यक्तीला वाकुन नमस्कार करतात ते म्हणजे आमचे शिवशंकरभाऊ. अमेरिकेतल्या सिटी बॅंकेचे विक्रम पंडित हे गजानन महाराजांचे भक्त ते नेहमीच येतात. भाऊंचे काम पाहून ते असे थक्क झाले की त्यांनी भाऊंना सांगितले या सगळ्या प्रकल्पासाठी किती कोटी हवे तेवढे सांगा विक्रम पंडितांनी त्यांच्या बॅंकेमार्फत किती कोटी द्यावेत ? तब्बल ७०० कोटी, कोण येवढे पैसे देईल, देणार्याची दानत मोठी असेल, पण घेण्याराचा प्रामाणिकपणा आणि सचोटी माहीत असल्याशिवाय ऐवढी प्रचंड रक्कम कोणती बॅंक देऊ शकेल ? लिखापढी नाही, जमीन नाही , कोणती मालमत्ता बॅंकेकडे गहान नाही, आणि एक भक्त आपल्या बॅंकेचा ऐवढा प्रचंड पैसा भाऊंच्या विश्वासावर देतो. विक्रम पंडितांनी ७०० कोटी रुपये दिले. आमच्या विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला की किती पैसे लागतील याचा हिशोब केला किती पैसे परत फेडू शकू ते गणीत बसवले आणि अस ठरवलं की ७०० कोटी आपल्याला नकोत फक्त ७० कोटी रुपये घ्यायचे. महाराजांचा असा संदेश असायचा की गरजे पुरते घ्या आणि जे घ्याल ते परत करा. आम्ही विचार केला गरज ऎवढीच आहे . आणि फक्त ७० कोटी घेतले त्यांची परतफेड केली. गजानन महाराज यांच्या प्रेमापोटी विक्रम पंडितांनी ही रक्कम दिली, त्याचा विनियोग कुठेही चुकीचा होणार नाही, याची काळजी घेतली आणि म्हणूनच त्यांचा विश्वास बसला.

    भाऊ म्हणाले मी कोणालाही मुलाखत देत नाही पद्मश्री, पद्मभूषण काही घेत नाही, शरद पवार म्हणाले मी शिफारस करतो. भाऊ म्हणाले अजिबात नको आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे पण भाऊंना भेटायला आल्या होत्या त्यांनी काम पाहिले आणि थक्क झाल्या आनंदसागर बघून आल्या, इंजिनिअरिंग कॉलेज पाहिलं , सगळे प्रकल्प पाहिले अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाल्या, भाऊ तुम्हाला तर भारतरत्न दिले पाहिजे , भाऊ म्हणाले मला कशाला ज्यांना भारतरत्न मिळाली त्यातही काही मंडळी साबणाच्या जाहिराती करत आहात, अहो काय भावनेने तुम्हाला ऐवढा मोठा सम्मान दिला आणि तुम्ही काय करीत आहात ? मला कशाचीही हाव नाही, महाराजांनी सेवा करायला सांगीतली न बोलता सेवा करायची, मी संस्थानचे पाणी , चहा घेत नाही घरून पाणी घेऊन येतो. ही महाराजांची शिकवण आहे, आपण देण्यासाठी आहोत घेण्यासाठी नाही, त्यामुळे कसला लोभ नाही. आपण चेतन आहोत, कशाचा लोभ करायला हवा ? पैशाने माणसाची कधी किंमत होत नाही आणि तशी वस्तूने पण होत नाही, माणसाला नाचवणारी माया आहे, आणि मायेला नाचवणारी भक्ती आहे श्रध्दा आहेत, आम्ही माया स्वीकारत नाही, आम्ही श्रध्दा स्वीकारतो. ते सुत्र आम्ही पाळले. विक्रम पंडितांनी जेंव्हा ७०० कोटी रुपये देऊ केले तेव्हा त्यांना हे सांगितले जेवढे लागतील तेवढे घेऊ ७० कोटी घेतले, त्यांनी पण जाहिरात केली नाही, आणि आम्हीही जाहिरात केली नाही हा भक्तीचा व्यवहार आहे. लोक मला सांगत आहे भाऊ, आनंदसागर पाहण्याची फी ३०० रुपये करा लोक आनंदाने देतील , मी सांगितले नाही, अशा पध्दतीने पैसा मिळवायचा नाही आणि मिळाला तरी टिकायचा नाही आम्ही १५ रुपये ठेवली. आज १३७ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहेत. त्यात १३ टक्के पैसे मानवसेवेवर खर्च करतो रुग्णालये आहेत , औषधे आहेत १० टक्के रक्कम बाजुला काढुन नवीन बांधकामासाठी ठेवतो.

    भक्त निवास कशी बांधली आहेत बघा बाबा आमटे कुठेच जाऊन राहत नव्हते ते फक्त इथेच यायचे देऊळातही जात नाही म्हणायचे आपला उद्देश स्वच्छ असेल तर लोकांना तो समजतो, काम श्रध्देने करा, प्रामाणिकपणे करा, आमच्या शेगांव नगरपालिकेकडे पाणी योजनेला पैसे नव्हते शेगांव शहरात कमालीची अडचण स्वच्छ पाणी मिळेना, पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळायचे , नगर परिषदेचे अधिकारी पाटणकर माझ्याकडे आले, म्हणाले की पाणी योजना करायला केंद्र सरकार ४२ कोटी रुपये देत आहेत पण नगर परिषदेचा वाटा ७/८ कोटी रुपये द्यायलाही पालिकेकडे पैसा नाही, काय करायचे ? मी म्हटले चिंता करू नका. संस्थानच्या सर्व विश्वस्थांना सांगून त्यांच्या मान्यतेने नगर परिषदेला हवे असलेले ७ कोटी ७७ लाख रुपये आम्ही देऊन टाकले, महाराजांच्या आदेशानेच हे केले, आज शेगांवला जे पाणी मिळत आहे त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. आया - बहिणीचे कष्ट वाचले आहेत त्यांच्या समाधानात आम्ही आमचे समाधान मानतो, तुम्ही त्याला नाव द्या सामाजिक बांधीलकी आम्ही म्हणतो आमचे कर्तव्य .

  • पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी

    सध्या झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात होती. त्यात एक गुरुजी कथेच्या सुरुवातीचा भाग विस्तार स्वरूपात सांगत असत. या मालिकेचे सूत्रसंचालन भगरे गुरुजी करत असत. या अगोदर झी मराठी वाहिनीच्या “राम राम महाराष्ट्र” च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून भगरे गुरुजी ‘वेध भविष्याचा’ या सेगमेंटमधून राशी भविष्य सांगताना दिसले. त्यामुळे भगरे गुरुजी सर्वांच्याच परिचयाचे आहेत.

  • कलामहर्षी बाबूराव पेंटर

    दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते.

  • डॉ. सुलभा हेर्लेकर

    सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या निधनाने निखळला. नवोदित कवयित्रींना ‘अभिव्यक्ती’ च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे काम डॉ. हेर्लेकरांनी केले होते. आशा बगे, जयश्री रुईकर, सुनीती आफळे, डॉ. आशा सावदेकर आणि डॉ. सुलभा हेर्लेकर या विदर्भाच्या पंचकन्या.. वैदर्भीय साहित्य क्षेत्रात प्रत्येकीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. यात कवयित्री म्हणून डॉ. सुलभा हेर्लेकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.

    कवितेवर मनस्वी प्रेम करणारी ही प्रगल्भ कवयित्री पु.शि. रेगे आणि इंदिरा संत यांच्या साहित्याची मोठी चाहती. इंदिरा संतांवरचा अभ्यास, कविता व समीक्षेच्या क्षेत्रातील मुशाफिरी आणि कविता वाचनाच्या प्रयोगांच्या निमित्ताने त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. कवी अनिलांनी हेर्लेकर यांचे वेगळेपण एकेकाळी हेरले होते. ‘पहाटपक्षी’, ‘नितळाई’ सह अनेक काव्यसंग्रहांतून पुढे त्यांनी हे स्थान टिकवले. शासकीय सन्मानासह अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. दर्जेदार कवयित्री म्हणून स्वत:चा आब राखतानाच नवोदित लेखिका व कवयित्रींना तेवढीच सन्मानाची वागणूक देण्याचा कटाक्ष त्यांनी बाळगला.

    जुन्या आणि नव्या कवयित्रींचे सख्य जुळविण्याचे अवघड काम त्यांनी अगदी सहज पार पाडले. राम शेवाळकरांनी लेखिका संमेलनासाठी स्थापन केलेल्या ‘अभिव्यक्ती’तून हेर्लेकरांच्या प्रगल्भतेचा खऱ्या अर्थाने परिचय घडला. त्या व्यासपीठावरून नव्या कवयित्रींना समोर आणण्याची त्यांची धडपड शेवटपर्यंत राहिली. विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ त्रमासिकाच्या पाच वर्षे केलेल्या संपादनातून त्यांची साहित्यिक जाण व दर्जा स्पष्टपणे जाणवला. संशोधन, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि संस्थात्मक कार्यातील त्यांचा सहज वावर प्रत्येकालाच हवाहवासा वाटे. जवळजवळ चार दशके त्यांनी कवी संमेलने गाजवली.

    शालीनता, सुसंस्कृतपणा, सभ्यता यांची सांगड घालून देतानाच घर-दार आणि जिव्हाळ्याचा वाङ्मयीन गोतावळा जपणाऱ्या डॉ. सुलभा हेर्लेकरांनी गंभीर आजारपणाची खबरबात कोणापर्यंत पोचू दिली नव्हती. त्यामुळे हेर्लेकरांचे अचानक जाणे वाङ्मयीन गोतावळ्याला चटका लावून गेले आहे.

  • अभिनेता डॉ. गिरीश ओक

    आणखी काय हवे? हे नाटक गिरीश ओक यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरले आहे. तसेच ती फुलराणी मधील त्यांचे संस्मरणीय आहे.

  • विनोदी अभिनेता जॉनी वॉकर

    जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.

  • विनायक जनार्दन कीर्तने

    थोरले माधवराव पेशवे हे त्यांचे नाटक मराठीतले पहिले इतिहासाधारित नाटक आणि मराठीतील पहिली शोकांतिका मानले जाते. या दोन नाटकांनी नाट्यसृष्टीत त्यांना मानाचे पान देण्यात आले.