(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • एकनिष्ठ मित्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३९)

    एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता.

  • मानसकोंड-मासा

    त्यांच्या हातात झेंडे होते .
    चेहरे थकलेले आणि देह रापलेले वाटत होते .
    हातातल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या ते हलवीत होते .
    त्यांची पाण्याची गरज त्यातून जाणवत होती .

  • धन लोभी राजा आणि साधू

    अवध नगरीचा राजा कुरसेन नावाप्रमाणेच अतिशय क्रूर होता. राज्यातील जनतेवर त्याने अनेक अन्याय-अत्याचार तर केलेच शिवाय शेजारील देशावर अनेकदा आक्रमणे करून तेथील राजा व प्रजेला जेरीस आणले. सत्तेबरोबरच तो संपतीचा भुकेला होता. त्यामुळे एकेका सुवर्णमुद्रेसाठी तो हिंसाचार करायला मागेपुढे पहायचा नाही. संपत्तीचे त्याचे हे वेड वरचेवर वाढतच होते. अवध नगरीच्या बाहेरच रस्त्याला लागून असलेल्या एका झोपडीत एक साधू रहात होता. अखंड ईश्वराचे स्मरण व गोरगरिबांना अडचणीच्या वेळी मदत एवढेच त्याचे ध्येयकार्य होते. त्यामुळे अनेकजण त्याच्या दर्शनाला येत व त्याचा उपदेश ऐकून जात. एके दिवशी सायंकाळी एक श्रीमंत गृहस्थ त्या साधुची कीर्ती ऐकून तेथे आला. त्याने साधूमहाराजाचे दर्शन घेतले व जाताना त्याने एक सुवर्णमुद्रा साधुच्या पुढे ठेवली.

    निरीच्छ वृत्तीचे साधू महाराज त्याला म्हणाले, मला सुवर्णमुद्रा नको. तूच कोण्या गरजू माणसाला दे. त्यावर तो श्रीमंत गृहस्थ म्हणाला की मी तुम्हाला ती श्रद्धेने दिली. त्यामुळे तुम्हीच तिचा योग्य विनियोग करा. थोड्या वेळातच रस्त्यावरून राजा क्रुरसेनाची स्वारी येत होती. बरेचसे सैनिक त्याचाबरोबर होते. राजा क्रुरसेन स्वतः हत्तीवर अंबारीत बसला होता. राजाचा हत्ती झोपडीजवळ आला तसा तो साधू झोपडीबाहेर आला व त्याने त्याला दिलेली सुवर्णमुद्रा राजावर फेकून मारली. ती राजाच्या डोक्याला लागून अंबारीत पडली. ते पाहून राजा खूपच संतापला. तो खाली उतरला व त्याने त्या साधुला त्या कृत्याचा जाब विचारला. त्यावर साधू राजाला म्हणाला, मी मुद्दामच तुला सुवर्णमुद्रा फेकून मारली. कारण धनाचा तू लोभी आहेस त्यासाठी तू अनेकांवर अत्याचार केलेस म्हणून तुला ती सुवर्णमुद्रा देत आहे. ते ऐकून राजा अधिकच संतापला व त्याने साधूला पकडून ठार मारण्याचा सैनिकांना आदेश दिला. मात्र साधू अतिशय शांत होता.

    राजाबरोबर असलेल्या प्रधानाला त्या साधुची योग्यता माहीत होती. त्यामुळे त्याने लगेच राजाला साधूमहाराजांना पकडू नये अशी विनंती केली. कारण मनात आणले तर त्या साधुची राजाचा सर्वनाश करायची तयारी होती. प्रधानाने राजाला समजावून सांगितल्यावर राजालाही साधूच्या दिव्यत्वाची प्रचिती आली व त्याने साधूचे पाय धरले. त्या वेळी साधूने त्याला संपत्तीसाठी हिंसाचार न करण्याचा सल्ला दिला व तो प्रमाण मानून राजा तेथून माघारी गेला.

  • मेडल सर

    १९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला

  • घोडे व्यापाऱ्याची मुलगी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ८)

    हॉर्स डीलर्स डॉटर ही जरी लघुकथा असली तरी ती ६५५० शब्दांची आहे. (मी रूपांतर २२४५ शब्दांत केलं आहे). औद्योगीकरणाच्या लाटेत अनेकांचे व्यापार बसले. तसा ह्या कुटुंबप्रमुखाचाही धंदा बसला. नंतर तो मरण पावला. धडधाकट पण कुचकामी तीन मुलगे आणि हिंमत न हरतां कृतीशील रहाणारी मुलगी शेवटी दारिद्र्यांत एकटी पडते, तेव्हां आत्महत्त्येचा निर्णय घेते. योगायोगाने एक तरूण तिला वाचवतो आणि ती त्यालाच जबरदस्तीने प्रेमिक करून त्याचा आधार घेते. तिचे त्याच्यावर प्रेम आहे/होते असा उल्लेखही नाही. स्त्रीची अपरिहार्यता त्यांत अधोरेखित केली आहे. इंटरनेटवर ह्या गोष्टीची अनेक परीक्षणे वाचायला मिळतील. त्यांत “रद्दी” पासून “अत्त्युत्तम” पर्यंतचे सर्व प्रकारचे मूल्यमापन आहे. ही कथा समजायला कठीण आहे. घोडे व्यापा-याशी संबंधित म्हणून अनेक ठीकाणी घोड्यांचा, घोड्यांच्या शरीराचा, हालचालींचे अनेक उल्लेख आणि माणसाचे पशुच्या स्तरावर जगणे ह्याचे उल्लेख आले आहेत. औद्योगीकरणामुळे कुटुंबातील व्यक्तींतला जिव्हाळा संपला आहे, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो आहे, हे प्राणीसदृश वर्तन दर्शवले आहे. माझ्या रूपांतरीत कथेच्या व्याप्तीत (तरी ती १५००ची मर्यादा सोडून दीडपट झाली आहे) ह्या सर्व गोष्टी तितक्या समर्थपणे दाखवणे कठीण होते. पण मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व कथा तुम्हांला सादर करत आहे.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ४६ )

    विजय कोठेही असला तरी त्याचे डोळे आणि कान सताड उघडे असतात. लोकांच्यात होणारे संभाषण हे तर त्याच्या कविता, कथा आणि लेखांचे खाद्य असते. लेखक ,कवी असो अथवा पत्रकार त्यांना सतत लोकांच्या भाव – भावनांचा विचार करत राहावे लागते. काही दिवसापूर्वी विजय बसने प्रवास करत होता. प्रवासात दोन स्त्रियांचा संवाद त्याच्या कानावर पडत होता… बायका तश्या बऱ्यापैकी सुशिक्षित दिसत होत्या म्हणजे त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या सततच्या इंग्रजी शब्दावरून ते लक्षात येत होते. त्या बायका कमीत कमी दहावी – बारावी पर्यत नक्कीच शिकलेल्या असाव्यात. त्यातील एक तर इतकी व्यवस्थित होती कि ती नक्कीच कोणत्यातरी कार्यालयात कामाला असावी अशी वाटावी.

  • चष्मा (गूढकथा)

    पंतांना नुकतीच गाढ झोप लागली होती. वयोमान प्रमाणे, त्यांची झोप कमीच झाली होती, साडेबारा एक तर निद्रादेवीच्या आगमनाची, नेहमीचीच वेळ! अचानक त्यांना जाग आली. कोणी तरी हलवून जागे केल्या सारखी! काही क्षण ते अंथरुणावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत? हि कोणती जागा आहे? कोकणातली कारली तर नाही? 

  • वेगळा (कथा) भाग १

    आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे.

  • हरवलेला भक्त

    रेल्वे गर्दीने भरून गेली होती. टी. सी ला एक पाकीट सापडते. त्यात काहीच पुरावा नसल्याने काहीच अंदाज येईना शेवटी त्याने विचारले, ही पर्स कुणाची आहे ?,तेव्हा एक आजोबा येतात आणि म्हणतात माझी आहे. टी.सी म्हणतो,खात्री कशी पटणार ? आजोबा म्हणतात त्यात श्रीकृष्णाचा फोटो आहे . त्यावर टी सी म्हणतो असा फोटो कोणाकडेही पडेल.त्यात काय विशेष ? तुमचा फोटोही नाही त्यावर आजोबा शांतपणे उत्तर देतात ,मी शाळेत असताना ही पर्स मला वडिलांनी दिली होती .थोडे पैसे खाऊसाठी दिलेले असायचे.तेव्हा आई बाबांचा फोटो लावला होता जसा कॉलेज कुमार झालो तेव्हा माझा मला फोटो आवडायचा त्यांचा फोटो काढून मग माझा फोटो ठेवायला लागलो नंतर लग्न झाल माझी बायको सुंदर होती माझा फोटो काढून मग तिचा फोटो ठेवू लागलो ,काही वर्षांनी आम्हाला एक मुल झाले . आयुष्याचा नवीन पर्व सुरु झाल . मग त्याचा फोटो ठेवू लागलो .

    मात्र हे सगळ सांगताना आजोबांचे डोळे पाणावले गेले , ते बोलतच राहिले, म्हणले काही वर्षापूर्वी माझे आई बाबा गेले नंतर माझी पत्नीही साथ सोडून गेली ,ज्या मुलाला मी वाढवलं त्यानेही मला सोडलं तो आता त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला , मला पाहायला त्याच्याकडे वेळ हि नाही . म्हणून आता माझ्या पर्स मध्ये मी श्रीकृष्णाचा फोटो लावलाय . मला कळून चुकलय की भगवान श्रीकृष्ण माझे शाश्वत साथी आहेत . माझी साथ कधीच सोडणार नाही, जर मला आधीच कळलं असत की जे प्रेम मी माझ्या कुटुंबावर केले तेच मी देवावर केले असते तर असे एकटे पडलो नसतो .

    टी. सी ने त्या आजोबांची व्यथा समजून घेतली आणि पर्स परत केली . तो टी सी पुढच्या स्टेशन ला उतरून एका पेपर विक्रेत्याकडे जाऊन विचारले "भगवान श्रीकृष्णाचा फोटो आहे का ? मला माझ्या पर्स मध्ये ठेवायचा आहे.........

    गोष्ट व्यावहारिक दृष्टीने touching असली तरी येत्या काळाची चुणुक दाखवणारी आहे. कुटूंब छोटी छोटी होत चालली आहेत, स्वयंकेंद्रित होत चालली आहेत. आपण स्वत: पुढच्या अशा परिस्थिती साठी तयार असले पाहिजे म्हणजे नैराश्य येणार नाही. ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे 'योग' आणि 'ध्यान' यांची कास आपण धरली पाहिजे.

    जय श्रीकृष्णा !!

  • स्टेशन चिरेबंदी (कथा)

    अस्ताव्यस्त पसरलेल्या या स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म आहेत हे स्टेशनमास्तरला सुद्धा सांगता येणार नाही. किती पूल आहेत तेही मोजावे लागतील. कुठल्या पुलावर चढल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरता येईल ? कुठे जाता येईल ? सांगता येणार नाही. कोण कुठे अडवील समजणार नाही. गर्दीत काहीही स्वत:च डोक न चालवता चालत राहिलात तरच स्टेशनच्या बाहेर पडू शकाल.