नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
(जैन लोककथा)
एका कुटुंबात तीन भाऊ होते. त्यांच्या बायका आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. एके दिवशी लहान सूनेला स्वयंपाक करावयाचा होता.
शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती. त्या झोपडीत एक गरीब धनगर, त्याची बायको, व इमाम नावाचा त्यांचा आठ-दहा वर्षांचा एक लहान मुलगा, ही रहात असत. या तिघांनाही पोटाकरता संबंध दिवस राबावे लागे. धनगर व त्याची बायको पहाडावर जाऊन सरपण गोळा करीत व त्याच्या मोळ्या बांधून त्या जवळच्या शहरात नेऊन विकीत.
शाळेचा पहिला दिवस व्हता.मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.
एक खेडूत आईची भाबड प्रेमाची गोष्ट.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे. पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.
राजू नावाचा एक छोटा मुलगा. चुणचुणीत आणि गोड स्वभावाचा. सकाळी लवकर उठायचा. आंघोळ करायचा. आई वडील आणि घरातील मोठ्या माणसांच्या पायी डोके ठेवायचा. नम्रपणा हा त्यांचा विशेष गुण होता. अभ्यासातही हुशार होता. मित्रांशी सहकार्याने वागायचा. घरच्या कामाची त्याला खूप आवड होती.
त्यांचे वडील त्याला खूप जीव लावायचे. सकाळी शाळेत सोडायचे.घरी आला की नाही ते पहायचे. घरी दोन एकर जमीन होती. त्यातच हे कुटुंब राबायचे. जगण्याएवढी सालचंदी व्हायची. कष्ट करून , मोलमजुरी करून पोरांचे शिक्षण चालू होते. राजूला थोडेफार समजायला लागले. सुट्टी असली की तो आई-वडिलांना कामात मदत करत असे. वडिलांसाठी रानात भाकरी घेऊन जाई. शेळ्या सोडून चालायला नेई. कधीकधी सरपण, गवर्या वेचून आणी. कळशीने घरचे पाणी भरी.जमेल तशी मदत करी.
यासाली भयंकर दुष्काळ पडला. कोणत्याच विहीर, तलावात ,हापशाला पाणी राहीले नाही. पाणी नाही म्हणून शेती पिकेना. त्यामुळे रोजगार मिळेना.ऊसतोड, वीटभट्टी कारखाना अशा ठिकाणी लोक कामाला जाऊ लागली. काही हमालीला जात होती.काही परराज्यात जात होती. राजूच्या वडिलांनी सावकाराकडून काही कर्ज घेतले.जमीन काही पिकेना. कर्ज काही फिटेना.घेतलेले कर्ज परत करावेच लागणार होते. ते परत द्यायला काही मार्ग सापडत नव्हता. तेवढ्यात गाडीवरून पडून त्यांचा हात मोडला. राजूचे वडील अधू झाले होते. काम सुटले. खाणारी तोंडे वाढली. राजूला शाळा सोडावी लागली. परिस्थिती बिकट झाली. गुरूजी घरी यायचे. ' पोराला शाळेत पाठवा. हजेरी कमी पडतीय.
परीक्षा जवळ आलीय.' असं म्हणायचे. पण नाईलाज झाला होता.पोटापाण्याचा प्रश्न होता. एका रात्री आईवडीलांचे भांडण झाले. त्याचा अर्थ राजूला काही समजला नाही . पण वडील रागाने निघुन गेले. त्यांच्या हातात कसलातरी दोर होता. राजूच्या हे लक्षात आले. त्याच्या शाळेत वर्तमानपत्राचे वाचन व्हायचे . त्यात एक बातमी हमखास असायची. 'कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या.' सर म्हणायचे " ती नका वाचू. दुसरी वाचा चांगली." राजूच्या मनात पाल चुकचुकली.
तो ताडकन उठला. अंधारात पळाला. दगडधोंडे बघितले नाही की काट्याकुट्या. बापाला गाठलच. वडीलांसमोर धाय मोकलून रडायला लागला. विनवणी करू लागला. त्यांच्या उरात माया उत्पन्न झाली. तोपर्यंत चारदोन माणसं जमा झाली. राजूच्या वडिलांनी मनातील विचार काढून टाकले. ते घरी आले. राजूला कडकडून मिठी मारली.
विठ्ठल जाधव,शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५ (दिव्यमराठी)
परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो… फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं.. “हरवले सापडले विभाग”

विजयला राजकारण कितीही आवडत असले तरी प्रत्यक्ष राजकारणात जाण्यात त्याला रस नाही… सक्रिय राजकारणात जाण्याची संधी त्याला अनेकदा चालून आली होती. त्यावर त्याचे स्पष्ट मत असते मला गल्लीतील राजकारणात रस नाही… म्हणजे त्याला छोटा विचार करायला आवडत नाही असा आहे.
संसार म्हटले की कटकटी या आल्याच या संसारामध्ये दोन प्रकार आहेत एक छोटा संसार यामध्ये मुला मुलींची संख्या एक किंवा दोन असते. वडिलांच्या पासून काही ना श्रीमंती लाभलेली असते याला छोटा संस्था म्हणतात. मोठा संसार म्हणजे घरात दहा पंधरा माणसे त्यात मिळवणारे कमी लहान मुलांचा व मुलींचा कपडा लता. शाळेची फी पाटी पुस्तक या वस्तू आल्यास या वस्तू असल्याशिवाय शाळा शिकता येत नाही. माणूस जगायचा झाला तर त्याला अन्न, वस्त्र, व निवारा या तीन गोष्टी असल्या म्हणजे माणूस जगू शकतो.

तिने मला दोन-तीनदा लूक दिले, तिसऱ्यावेळी तिने केसावरुन हात फिरवला .. अर्थात तिच्या … ती कोण हे मला अजून उमजत नव्हते
Copyright © 2025 | Marathisrushti