(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाद देवस्थानांच्या संपत्तीचा

    अलीकडे समाज शिक्षित होत चालला आहे त्याबरोबर त्याची धार्मिक वृत्तीही वाढीस लागली आहे. त्यातून आर्थिक संपन्नता, वाहतुकीच्या सोयी आणि मिळणारा वेळ यामुळे देवस्थानला आवर्जून भेटी देणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्याबरोबरच देवस्थानकडे देणग्यांच्या रुपाने येणाऱ्या पैशांचा ओघही वाढला आहे. पण या संपत्तीचा मूठभर पुजारी आणि मोजक्या विश्वस्तांकडून मनमानीपणे केला जाणारा विनियोग चिंताजनक आहे.

  • इंदौर

    जन्माला यावं आणि एकदा तरी इंदौरला जाऊन सराफा आणि ५६ दुकानांच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा... ते जर जमलं नाही तर आपलं आयुष्य फुक्कट वाया गेलं असं समजावं आणि धोकटी खांद्याला अडकवून वाट चालायला सुरुवात करावी...

    पैलं म्हणजे इंदौरी पोहे... कोथिंबीर, बारीक इंदौरी शेव, ओलं खोबरं आणि डाळिंबाचे दाणे पसरलेले...

    नंतर विकास स्वीट्सची टमटमीत फुगलेली एक दाल कचौरी आणि एक आलू कचौरी खावी आणि तिथंच भल्यामोठ्या लोखंडी कढईत असं झक्कासपैकी ऊकळत असलेले, वरुन असं लालबुंद केशर तरंगत असलेले, बदाम, पिस्ते, काजू भरपूर असलेले, चार चमचे दाट केशरी साय ग्लासात वरुन पांघरलेले केसरिया दूध ग्लासभर प्यावे...

    जोशींचा हवेत फेकून परत झेललेल्या दहिवड्याला मोक्ष द्यावा...

    हे जोशी, एकाच हाताच्या प्रत्येक बोटाची चिमूट करुन त्या पाच चिमूटीत पाच प्रकारचे मसाले पकडून... एकेक करत दह्यावर सोडतात आणि अशी मस्त नक्षी बनवतात... (जसं सीसीडी मधे कॉफीवर नक्षी बनवतात ना तसं)... जोशी दह्यावर मसाला सोडताना बघून आपण असं स्वतःला विसरुन जातो की बास्स यार... विचारायचंच नाही... फक्त तिथं ऊभं राहून तो अनुभव घ्यायचा...

    गराडू खावं...

    खुसखुशीत तळून लाल रंगाच्या साखरेच्या पाकातून निथळून काढलेली जिलेबी खावी...
    ती निथळणारी जिलेबी बघितली की आठवतंय बघ... न्हाऊनिया ऊभी मी....

    नंतर दहा स्वादांची पाणीपुरी खावी... रेग्युलर, शाही रेग्युलर, पुदिना, जिरा, प्याज, लसणी... वगैरे वगैरे दहा टेस्ट्स आणी सगळं झाल्यावर दोन गोड मसाला पुरी... नांकावरुन येणारा घामाचा थेंब सावरत सावरत... सुर्र सुर्र करत ते उरलेले पाणी पिऊन घ्यावे...

    नंतर पुढं यावं आणि भुट्टे का कीस... कीस म्हणजे अक्षरशः किसचा अनुभव देणारा हा कीस ! दिसायलाच एवढा आकर्षक तर मग चवीला तर अतिशय भन्नाट !

    जरा अजून इच्छा असेल तर फरियाली साबुदाणा खिचडी... एकदम खल्लास...

    जरा पुढं आलं की नेमा आईस्क्रिम... फक्त केशर मलई पिस्ता कुल्फी खायची आणि तोपर्यंत फालुदा बनवायाला सांगायचा... कुल्फी संपवायची आणि फालुद्याला सामोरं घ्यायचं... अतिशय मन लावून, अंतर्मन शांत करत करत हळूवारपणे फालुद्याचा एकेक घास नमामि फालूदा म्हणत स्वअर्पण करायचा...

    हे सगळं झाल्यावर तृप्त होतंय सगळं... विलक्षण समाधान येतंय चेहेऱ्यावर... या संपूर्ण साधनेचं तेज चढतेय सर्वांगावर... आपोआपच समोरची वाट स्पष्ट होते... अंतिम विश्रांतीचं ठिकाण स्पष्ट दिसायला लागतं...

    बाहेर यायचं तिथून... गाडीत बसायचं आणि चालकाला गाडी हायकोर्ट समोरच्या पार्श्वनाथ पान सदनकडे घ्यायला सांगायची...

    दादा तिथे बसलेले असतातच...
    कड्डक असं कलकत्ता प्युअर १२०/३००, प्युअर नवरतन किवाम आणि चटणी, थोडीशी खूश्बू, एकदम बारीक सुप्पारी (भाजलेली) एकच चिमूट, दोन वेलदोडे आणि लवंग त्यात उभी करुन जाळून... लवंग जळतानाच पानाची अलगद् घडी करुन घ्यायचे आणि त्याला आपल्या तोंडात डावीकडे सिंहासनावर विराजमान करायचे... तीनेक मिनीटे तिथंच थांबायचे... घोळवायचं असं गारशार तोंडात... आजिबात चावायचं नाही, गिळायचं नाही, इकडून तिकडे तोंडात फिरवायचं निही... घेतला वसा टाकायचा नाही... ऊतायचं नाही... मातायचं नाही... शांत बसायचं... आपोआप ब्रह्मानंदाशी आपला परिचय होतो... दाट ओळख होते... समाधिस्थ हलकेपणा येतो आपल्याला कवटाळून घेतो...

    हलकेच गाडीत येऊन बसायचं...

    सारथ्याला खूण करायची...

    गाडी मुक्कामाच्या दिशेने निघालेली असते... आपण आपलं अन्नदाता सुखी भव म्हणत ब्रह्मानंद समाधीत भान विसरलेलो असतो...

    अशी आहे इंदौरी खाऊ गल्ली
    आणि
    इंदौरी मेहमान नवाजी़...

    खरंखुरं अतिथी देवो भव हे तत्त्व जपणारं इंदौर ...!!!

    आपल्यावर प्रेम करणारी आणि आपल्याला प्रेम करायला लावणारी...

    उमेश कुलकर्णी.

  • दारु

    विषय जरी दारु असला
    तरी कविता सुंदर आहे।
    न घेणाऱ्याला देखील हसवेल
    ____

    पिऊन थोडी चढणार असेल
    तरच पिण्याला अर्थ आहे
    एवढी ढोसून चढणार नसेल
    तर आख्खा खंबा व्यर्थ आहे

    मी तसा श्रध्दावान
    श्रावण नेहमी पाळतो
    श्रावणात फक्त दारू पितो
    नॉनव्हेज मात्र टाळतो

    ज्याची जागा त्याला द्यावी
    भलती चूक करू नये
    पिताना फक्त पीत रहावं
    चकण्यानं पोट भरू नये

    वेळच्या वेळी आपण ओळखावी
    आपली आपली आणिबाणी
    लाज सगळी सोडुन देऊन
    ग्लासात घ्यावं लिंबुपाणी

    पिऊन तर्र झाल्यानंतर
    काय खातोय ते कळत नाही
    खाल्ल्यानंतर बिलामधली
    टोटल कधी जुळत नाही

    आपला ग्लास आपण सांभाळावा
    दुसर्‍याला घेऊ देऊ नये
    दुसर्‍याचा ग्लास उचलण्याची
    वेळ आपल्यावर येऊ नये

    अशीही वेळ असते जेंव्हा
    कोणीच आपला नसतो
    म्हणून आपण प्यायला जातो
    तर नेमका ड्राय डे असतो

    आपला पेग आपण भरावा
    दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये
    आपला ग्लास, आपली बाटली
    दुसर्‍याच्या हातात देऊ नये

    असं उगीच लोकांना वाटतं
    की दुःख दारूत बुडून जातं
    दुःख असतं हलकं हलकं
    अल्कोहोलसोबत उडून जातं!

    एकदा प्यायला बसल्यानंतर
    तुझं-माझं करू नये
    तुझी काय, माझी काय
    नशा कधी सरू नये

    तुला जायचंच असेल तर निघून जा ,
    जाण्यासाठी भांडू नकोस
    प्यायची नसेल तर पिऊ नको ,पण दारू अशी सांडू नकोस

    स्कॉच प्यावी कोरी, कच्ची
    बर्फ नको, सोडा नको
    उंच आभाळी उडण्यासाठी
    पंख हवे... घोडा नको!

    फॉरीन लिकर कितीही प्यावी
    काही केल्या चढत नाही
    देशी आपली थोडीशीच प्यावी
    दोन दोन दिवस उतरत नाही

    पिणं असतं आगळा उत्सव
    त्याचा उरूस होऊ नये
    प्यायला नंतर आपला कधी
    वकार युनूस होऊ नये

    घरी बसून दारू प्यायचे
    खूप सारे फायदे असतात
    हॉटेलमधे, बिल भरायचे
    काटेकोर कायदे असतात

    आम्ही कधीच दारूमधे
    दुःख आमचं बुडवत नाही
    दारू नेहमी शुध्दच ठेवतो
    भेसळ आम्हाला आवडत नाही
    B
    हवा तसा मी चालतो आहे
    कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
    माझ्या मित्रा, माझ्या इतकी

  • दोज व्हू आर एट सी

    पुर्वी जहाजं पोर्ट मध्ये गेली की दहा दहा दिवस थांबायची परंतु आता टाईम इज मनी, जहाज पोर्ट मध्ये कार्गो लोड किंवा डिस्चार्ज करण्यासाठी गेल्यावर चोवीस तासात बाहेर पडून पुढल्या सफरीवर निघतात. वेळेचे आणि त्याहीपेक्षा नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे लागते.

  • विज्ञान आणि अध्यात्म

    साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असावा असे शास्त्रज्ञ सांगतात. सुरुवातीला हे जीव अगदी प्रथमावस्थेत, जीवाणू, बुरशी, आणि एकपेशीय प्राणी यांच्या स्वरुपात निर्माण झाले. पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झालेत याबद्दलची माहिती अनेक पुस्तकांतून आणि माहिती जालावर मिळते. या नंतर कोट्यवधी पृथ्वीवर्षांचा काळ लोटला. आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन प्राणी आणि वनस्पतींच्या लाखो प्रजाती निर्माण झाल्या. सरतेशेवटी सुमारे ७० लाख पृथ्वीवर्षांपूर्वी, कपिंच्या काही प्रजातीत उत्क्रांती होऊन मानव निर्माण झाला.

    मानवी मेंदूची अध्यात्मिक सुरुवात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी झाली. त्या काळापासून आजपर्यंत, मानवी शरीररचनेत आणि पृथ्वीच्या पर्यावरणात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्या काळी विचारवंतांनी केलेली निरीक्षणे आणि घेतलेले अनुभव आपण आजही घेऊ शकतो. त्याकाळी असलेली बुद्धिवान माणसे आजही जन्म पावू शकतात. त्याकाळी केलेल्या निरीक्षणांचे आणि अनुभवांचे स्पष्टीकरणे, त्यांच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि त्या काळी उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार त्यांनी दिले. ते गेली शेकडो वर्षे उपयोगी पडले, मार्गदर्शक ठरले.

  • इच्छापत्राचे प्रोबेट करणे भविष्यात गरजेचे आहे का ?

    सर्व सामान्य नागरिकांना कायद्यातील तरतुदींच्या समजापेक्षा, गैरसमजच अधिक असतात. अशा चुकीच्या समजुती भविष्यात त्यांना मोठया अडचणीत आणू शकतात. तेव्हा योग्यवेळी कायदेशीर सल्ला घेतल्यास मौल्यवान वेळ वाचण्यास नक्की मदतच होईल.

  • बाबासाहेब

    बाबासाहेब

  • सटाणा युवक महोत्सव (नशायात्रा – भाग २९)

    बिटको कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे कॉलेजच्या समूहगीताचा समूह प्रमुख पदवीधर होऊन नाशिक शहरात एन.बी .टी लॉ कॉलेजला पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला आणि मग अनुभवी म्हणून आपोआप समूह प्रमुखाचे पद माझ्याकडे आले . मी अतिआत्मविश्वासाच्या जोरावर यावेळी स्वतच गाणे लिहायचे, त्याला चाल देखील स्वतःच लावायची असे ठरवले होते ,

  • वक्तव्ये आणि मिडिया

    कुमार केतकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वादात माध्यमाच्या भूमिकेची चर्चा….

  • एस.एम.एस.बॉम्ब (वात्रटिका)

    अतिरेक्यांनी जे करायचे

    तेच धर्मांध करायला लागले.

    अफवांचे एस.एम.एस.बॉम्ब

    मोबाईले पेरायला लागले.