लेखांक ५
मृगशीर्ष वा मृगशिरा वा मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीवर चंद्राचा आणि चंद्र कलांचा कमी-कमी होत जाण्याचा अन वाढत वाढत जाण्याचा परिणाम हा होतोच होतो. राशिचक्रातील वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींचा जन्म मृग नक्षत्रावर झालेला असतो. जलाशय, नदीकाठ, समुद्रकाठी या व्यक्तींचा उत्कर्ष होतो. शितल रंगाच्या चंद्रप्रकाशात या व्यक्तींनी रहावयास म्हणजे जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला पाहिजे. चंदेरी रंग, रंग चक्रातील शीतरंग, पांढरा रंग हे सर्व रंग या व्यक्तींचे लाभ देणारे रंग होय.
खैराचं म्हणजे काताचं झाड हे या नक्षत्राचं जवळचं असल्यामुळे या झाडाची पंचांगे म्हणजे मूळ-खोड-पान-फुलं आणि फळ तसेच या नक्षत्राचा स्वामी चंद्र किंवा सोम यांसह या नक्षत्राच्या मुहूर्तावर जन्मलेल्या व्यक्तींचा राशी, वृषभ आणि मिथुन यांपैकी जी ज्याची असेल तिचा आकारआणि ओम सोमाय नमः किंवा ओम चंद्रमसे नमः ही जपाक्षरे या सर्वांचं त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून, विशिष्ट चरणात म्हणजे चरण काळात बनविलेल्या त्या रंग आकारांच्या अचूक आणि सुचक रचनात्मक मांडणी द्वारा पेंटिंगला पूर्वाभिमुख दिशेला म्हणजेच पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवर सदर पेंटिंग लावले की, त्या व्यक्तीस आणि त्या वास्तूस अनेक सुखद अनुभव येऊ लागतात. यात काळजी काय घ्यायचीय? तर विशिष्ट वेळेला पेंटिंगमध्ये केलेल्या अर्थात उल्लेखिलेल्या स्वामींचा जप, जप सुरू असतानाच विशिष्ट दिशेला तोंड करूनच ते पेंटिंग चितारायला लागते.
हे सर्व झाल्यानंतर राहुकाळ तपासून तो टाळून पेंटिंग दिलेल्या म्हणजे सुचविलेल्या भिंतीवरच्या जागी लावावे.
या लेखात एक प्रतिकात्मक पेंटिंग दिलेले आहे. त्याचा आकार, त्या पेंटिंग मधील आकार यांना महत्त्व आहे. जप देखील कॅलिग्राफीच्या पद्धतीने चित्र घटक विषय म्हणून रंगविला आहे.
बऱ्याचदा खैर वृक्षउपलब्ध झाला नाही तर अडुळसा शेवरी या वनस्पती वृक्षांचा पंचांगांसह पेंटिंगमध्ये उपयोग केला जातो. रंग, आकार, जपाक्षरे, आणि व्यक्तीनुरूप पेंटिंग मधील घटकांची रचना या चतुसूत्रींवर पेंटिंग त्या वास्तूशीअन वास्तुमधील व्यक्तींशी ते बोलू लागते.
शुभं भवतु
प्रा. गजानन शेपाळ
तो डबा घेऊन ऑफिसला गेला. मुलं आधीच school vanनी शाळेत पोहोचलेली. आता तिचा ‘personal time’ सुरु झाला.
Coffeeचा मग एका हातात, नी तिचा favorite Android partner सोबत, अशी थोडी निवांत टेकली, तेवढ्यात दारावरची bell वाजली. थोड्या नाराजीनेच तिनेदार उघडलं; पण चेहेऱ्यावर लगेच आनंदाची लकेर झळकली!
“अगं प्रिया! ये ना!” प्रियासुद्धा तिने दार उघडायची वाटच बघत होती.
“अगं काय सांगू? आज मी कित्ती कित्ती आनंदात आहे माहितीये!?” प्रिया balconyतल्या hanging झोपाळ्यामध्ये जाऊन बसली सुद्धा!
“अगं, झालं तरी काय?”
“का~ही विचारु नकोस. अस्संच झुल~त राहूदे मला.” प्रियाचे डोळे बंद होते.
“ठीक आहे, बस मग तू. मी कॉफी आणते तुझ्यासाठी”
“ए नको गं, तुझी कॉफी घेऊन इथेच बस तूही. किंवा ऐक ना! तू तुझं चालू ठेव. मला काही लागलं तर घेईन मी. मला इथे थोडावेळ बसू देत. शां~~त..
ती पुन्हा कॉफी sip करू लागली, एका वेगळ्या समाधानात, आनंदात.. हातात android होता, पण डोळे काही वेगळंच वाचत होते.. आपल्याला आपलं घर तर असतंच. पण त्याही सोबत आपल्या मैत्रिणीचं, जवळच्या शेजारणीचं, किंवा आईचं, असं एक घर, घराचा कोपरा असतो, पेक्षा असावाच! तिथे आपल्याला कुणीही काहीही विचारत नाही. आपल्याला हवा असलेला, हक्काचा pleasure break, दुःखात, संकटात, एकांतात रडायला, किंवा कोणत्याही प्रसंगी जाऊन शांत बसता यावं, अशी जागा! आपापल्या घरी तर अशी आपली खास जागा असतेच, पण ती जेव्हा आपल्या आवडत्या, विश्वासाच्या व्यक्तीसोबत न सांगता share करता येते, ती space, अगदी uniqueच ना!
निवडक लोकांनी-स्वतःसाठी व काही निवडक लोकांसाठी चालविलेले राज्य आणि केलेली सोय लोकशाही होय!
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी २०११-१२ या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केले. या वर्षीच्या अर्थसंकल्पावर पश्चिम बंगाल निवडणुकीचे सावट असणार आहे. त्यामुळे ममता या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्येही काही नवीन घोषणा केल्या. मा्त्र त्यांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या घोषणा किती प्रत्यक्षात उतरल्या किती नाही हे तुम्हीच पाहा. ममता बॅनर्जी यांनी २०१०-११ दरम्यान सादर केलेल्या बजेटमधील काही ठळक मुद्दे….
आयुष्य आणि बुध्दिबळाचा खेळ एक आशयार्थाने तुलना ? बुध्दिबळाचा डाव सुरु होतो तेंव्हा दोघां कडेही सामर्थ सारखेच असतें. जसें जसें एकमेकांकडुन चाली रचल्या जातात त्याप्रमाणे एकमेकांच्या शक्तिचा कस लागतो.
जगातील केवळ मोजक्याच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले आहे. पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत हे त्यापैकी एक होऊ शकले असते. मात्र वयाचे १११ वे वर्ष पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना त्यांचे निधन झाले.
देव म्हणजे नक्की काय ? तो कसा असतो ? कसा दिसतो वगैरे प्रश्न मला लहानपणापासून पडत व या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देखील कोणी देण्यास तयार नव्हते देव्हा-यातील मूर्ती , मंदिरीतील मूर्ती , विविध देवतांचे आकर्षक आणि तेजोवलय असलेले फोटो पाहताना मात्र निश्चितच मनात एक प्रकारचा शांततेचा भाव उमटत असे , कदाचित देवाबद्दल ऐकलेल्या दिव्य कथांचा तो परिणाम असावा ,
मागच्या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्यावर त्यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे.
आजच्या तरुणांकारिता
Copyright © 2025 | Marathisrushti