ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सलमान, शहारुख बरोबरच मेधा पाटकरांचाही समाचार घेणारा हा लेख….
प्रकाशन दिनांक :- 21/11/2004
असे म्हणतात की, विश्वातील जेवढ्या काही गोष्टी शक्यतेच्या कोटीतील आहेत त्या सर्व साध्य करणे मानवी मेंदूला शक्य आहे. सर्वसाधारण जीवन जगणारा माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यात मेंदूच्या केवळ 20 टक्के क्षमतेचा वत्र्र.उपयोग करतो, हे वैज्ञानिक पाहणीतून सिद्ध झाले आहे.
लाखोळी डाळीच्या विक्रीवर गेल्या 43 वर्षांपासून असलेली बंदी अखेर राज्य सरकारने संपुष्टात आणली. सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करावे की तब्बल 43 वर्षे चुकीचा निर्णय कायद्याच्या स्वरूपात लागू करून राबविल्याबद्दल सरकारला जाब विचारावा,असा प्रश्न पडला आहे. सरकार लोकनियुक्त असते.
राष्ट्रीय सुरक्षा पथकावर सरकार दरवर्षी 600 कोटी खर्च करते. हा खर्च अर्थातच सर्वसामान्य करदात्यांच्या पैशातून होतो. इतका प्रचंड खर्च करून ज्यांना सांभाळले जाते, त्या एनएसजी कमांडोजना एखाद्या चौकीदारासारखे कुण्याही आलतूफालतू नेत्यांच्या बंगल्यावर नियुत्त* करून करदात्यांच्या पैशाची अशी उधळपट्टी करण्याचा अधिकार सरकारला आहे का?
प्रकाशन दिनांक :- 04/01/2004
सध्या संपूर्ण जग समस्यांचे माहेरघर बनले आहे, यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. आपल्या देशाच्या संदर्भात तर हे विधान कायम सिद्ध आहे. खरं तर मानवाच्या विकासाला या समस्याच कारणीभूत ठरल्या आहेत.
“काश्मीर पर्यटना साठी नको!” अशी मागणी जर काश्मीर मधल्या नागरिकांनी केली तर..? ही चळवळ मला थोडी अशीच वाटली, कारण जे ‘गंगा’खेड गंगेवरच्या “विधी” साठी ओळखले जाते, गंगाखेडची ४०% इकॉनॉमी ही ‘गंगे वरच्या विधी’ वर अवलंबून आहे तिथेच देहदान चळवळ फोफावत आहे! एखादे देहदान झाले की त्या घरचे लोकं गंगेकडे फिरकणार सुद्धा नाहीत.!!!!
खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे मिळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
लोकसभा निवडणूक आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. बहुतेक सगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित झाले आहेत.
आपल्या राज्यकर्त्यांच्या, धोरणकर्त्यांच्या कल्पनाशत्त*ीचा विकास फारच कुंठित झाला आहे. कुठलाही नवा म्हणून जो विचार हे लोक समोर मांडतात मुळात ती कुठलीतरी उचलेगिरी असते. सध्या भारतात चिनी वस्तूंचा बराच बोलबाला आहे.
नद्या विकल्या जात आहेत, जमिनीची उत्पादकक्षमता स्वत:च्या हाताने संपविली जात आहे, आपण खात असलेल्या अन्नात रासायनिक खताच्या माध्यमातून विष मिसळलेले आहे, हे माहीत असूनही आनंदाने आपण ते ग्रहण करीत आहोत; मात्र आपण काही चूक करीत आहोत किंवा कोणी आपल्याला जागवत आहे, याची जाणीवच आपण हरवून बसलो आहोत. आपल्या संवेदनाच संपल्या आहेत.
सामना नावाचा अत्यंत ज्वालाग्रही पेपर आहे. त्याचे संपादक संजय राउत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि पेपरहुन अधिक ज्वालाग्रही लेखक. मध्यंतरी त्यांनी बिहारी आणि उत्तरप्रदेशी लोकांबद्दल अत्यंत ज्वालाग्रही लेख लिहिला. संसदीय समितिसमोर त्याची चौकशी झाली आणि नेमक्या त्या दिवशी ” संजय राउतांची संसदिय समितिसमोर माफी ” अशी ब्रेकिंग न्युज वाहिन्यांनी फ्लैश केली. त्यावर लगेचच संजय राउत समोर आले आणि त्यांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते, ” मी मा्फी मागितली नाहि. फक्त खेद व्यक्त केला. शिवसैनिक किंवा आम्ही माफी मागित नसतो. माफी आणि खेद यातिल फरक समजावुन घेतला पाहिजे. “
आम्ही ही बातमी बघितली आणि विचारात पडलो. अरे खरोखरच की ! माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक आपल्यालाही माहित नाहि. तसे आम्ही स्वतःला मराठीच समजतो. आम्ही मराठी घरात जन्मलो. आमच्याआधी आमच्या किमान दहा पिढ्या मराठी. मराठवाड्यात बालपण आजुबाजुला इतर भाषांचा संबंध नाही . इथुनतिथुन सर्व मराठीच. त्यात आमचे दहावीपर्यंत पुर्ण शिक्शण मराठी शाळेत झाले. त्यानंतर मात्र बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमातुन आणि वैद्यकिय शिक्शण ( मनसेचा जन्मच तोपर्यंत झाला नसल्याने ) नाइलाजाने इंग्रजी माध्यमातुन झाले. या गोष्टीमुळे ” आम्ही पक्के मराठी ” असा आम्हाला आत्मविश्वास होता , तो मात्र ढासळायला सुरुवात झाली, आणि आम्ही ” माफी मागणे आणि खेद वाटणे “ यातील फरक शोधायच्या मागे लागलो.
बराच विचार केल्यावर आम्हाला एक आयडीया सुचली. महाराष्टातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत , आपले प्रश्न ते बरोबर सोडवतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राजकारण्यांकडेच सापडेल असा आम्हाला लगेच विश्वास बसला आणि राजकारण्यांची भेट घेण्याचे आम्ही ठरवले. मराठीचा विषय आल्याबरोबर राजसाहेबांचे नाव लगेच आठवले आणि त्याना भेटण्यासाठी आम्ही आमचे मनसेचे नगरसेवक गंपुशेटना भेटलो. त्यांनी जे सांगितले ते ऐकुन आमची पाचावर धारण बसली. त्यांच्यामते राजसाहेबांशी बोलताना मराठीचा वापर अनिवार्य आहे. कारण राजसाहेबांकडे चाबुक आहे , आणि आपण बोललेल्या वाक्यातील प्रत्येक अमराठी शब्दासोबत तो ते चालवतात. आता आम्ही मराठीवादी असलो तरी आमच्या बोलण्यात काही अमराठी शब्द येतात. उगीचच राजसाहेब आपल्याला विचारायाचे ” कसे आलात ? ” , आपण सांगायचो , ” रेल्वेने आलो . “ आणि “ रेल्वेने ” हा शब्द उच्चरताच सप्पकन चाबकाचा आवाज यायचा , या कल्पनेनीच आम्ही राजसाहेबांना भेटायचा विचार सोडुन दिला.
महाराष्ट्रातील दुसरे अत्यंत हुशार राजकारणी म्हणजे शरदरावजी. आपले क्रुषिमंत्री . राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष असल्याने आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादीत असल्याने मराठी भाषेशी संबंधित आपला प्रश्न ते सहज सोडवु शकतील असा आम्हाला विश्वास वाटला आणि लगेचच आम्ही त्यांची भेट घेतली , आणि आमची शंका विचारली.
“ शरदरावजी , खेद वाटणे आणि माफी मागणे यात नेमका फरक काय हो ? “ शरदरावजी लगेच उत्तरले , ” बाळा , डाळींचे भाव तुला माहित आहेत काय ? साखर काय भाव आहे ? भाज्या काय भाव आहेत ? ” आम्ही सांगितले , “ नाही. कारण किराणा बायकोच आणते. आम्ही फक्त पिशव्या उचलतो. पण हल्ली ती फारच कटकट करायला लागली आहे. महिन्याला पैसे पुरत नाही म्हणते. “ शरदराव म्हणाले, “ मी कारण सांगु ? कारण डाळ शंभर रुपये किलो झाली आहे. साखर चाळिस रुपये आणि भाजी दहा रुपये पाव . मिळते . “ मी विचारले , ” पण माझ्या प्रश्नाचा आणि या उत्तराचा काय संबंध ? मला माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक हवा आहे. “ शरदराव उत्तरले , “ सांगतो. संबंध सांगतो. एवढी महागाई वाढली असताना , घरी पैसे पुरत नसताना , प्रत्येकाला दिवसा नोकरी झाल्यावर रात्री पार्टटाइम नोकरी करणे घर चालवण्यासाठी आवश्यक आहे. ती नोकरी शोधायचे सोडुन तुम्ही अशा फालतु प्रश्नात आपला वेळ फुकट का घालवता , हेच मला कळत नाही. आज प्रत्येक भारतीयाची ही गरज आहे . ”
आमचे डोळे खाडकन उघडले. असल्या फालतु प्रश्नाच्या नादी लागायला आमच्यासारख्या सामान्य माणसांना वेळ नाही. संसारपण चालला पाहिजे. पार्टटाइम नोकरी शोधायच्या आम्ही मागे लागलो. एक गोष्ट मात्र पटली , की महाराष्ट्रातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत. आपले प्रश्न ते बरोबर सोडवितात.
--निखील मुदगलकर
Copyright © 2025 | Marathisrushti