वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात.
क्रिकेट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा खेळ. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी हा खेळ भारतात रुजवल्यानंतर इथल्या स्थानिकांनी त्याला चांगलेच आपलेसे केले. सुरुवातीच्या काळात मोठ्या महानगरांतून या खेळाचा जास्त प्रसार झाला. त्यामुळे मुंबईच्या गल्ल्यांमधूनही क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागली. या खेळासाठी फार साधनसामुग्री लागत नसल्याने एखादी लाकडी फळी आणि रबरी चेंडू घेऊन मुले मिळेल त्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळू लागत. यातूनच पुढे राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण होत. मुंबईतील गल्ली क्रिकेटची अशीच एक भारताीय संघाला देणगी म्हणजे अस्सल मराठी मातीतले ‘दत्ताराम धर्माजी हिंदळेकर’.
हाडांच्या डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला तर्हेतर्हेचे एक्स-रे काढायला सांगितले जाते. यामध्ये फ्रॅक्चर असल्यास त्या-त्या भागांचे एक्स-रे येतात. परंतु पडल्यावर रुग्ण परस्पर चांगल्या एक्स-रे क्लिनिकमध्ये त्वरित जाऊनही हे एक्स-रे काढू शकतो. डॉक्टरांच्या चिठ्ठीसाठी अडून न राहता क्ष-किरण तज्ञाला दाखवून योग्य एक्स-रे होऊ शकतात. परंतु दुसरी दुखणी उदा.- सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासाठी शक्यतो हाडांच्या डॉक्टरकडून आधी तपासून घ्यावे व मगच एक्स-रे काढावे.

समाजजीवनात किंवा वैयक्तिक पातळीवरसुध्दा या नियमाचा प्रत्यय आपण घेतच असतो. आता हेच बघा, भौतिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानात मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गेल्या शे-दीडशे वर्षात आपण विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यास शे-दीडशे वर्षापूर्वीचे जग आणि आताचे जग यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, विकासाचे घोडे वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने चौखूर उधळत असताना विरोध विकास बलाने नेमके कोणत्या दिशेने कार्य केले असावे? या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही.


लाहोरमध्ये एक रात्र काढून पेशावरकडे जायचं असल्यानं हॉटेल शाहताजवर सामानाची उचकाउचकी करत बसलो नाही. खालच्या मजल्यावर असलेल्या हॉटेल व्यवस्थापकाकडे पेशावरला कसं जाता येईल, या संदर्भात माहिती घ्यायला मी गेलो. तो मला म्हणाला, ‘आत्ता रात्री आठनंतर पेशावरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस पलीकडून सुटतात. त्यांपैकी कोणतीही घेतलीत तरी पेशावरला जाता येईल. तथापि माझा मित्रत्वाचा सल्ला आहे, की ‘तुम्ही आत्ता न जाता सकाळीच जाणं चांगलं. रावळपिंडीच्या पलीकडे घाटात गाड्या अडवून नेहमीच लुटालूट होत असते. तुम्ही भारतीय आहात.

आइन्स्टाइन यांचं म्हणणं आज अचूक ठरलं आहे. माणूस ज्या संवेदनांचा वापर करू शकतो, त्याशिवाय इतर प्रकारच्या संवेदना सजीवांकडे असल्याचं त्यानंतर काही काळातच सिद्ध झालं. या इतर संवेदना म्हणजे, पृथ्वीचं चुंबकत्व, विद्युतक्षेत्र, वगैरे, ओळखण्याची क्षमता. यातील काही प्रकारच्या संवेदनांचा वापर विविध सजीव हे दिशा शोधण्यासाठी करत असल्याचे पुरावे गेल्या शतकाच्या उत्तरार्धातच सापडले आहेत.
शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रात्री ज्ञानाचा अखंड नंदादीप तेवता ठेऊन ज्ञानरूपी घटातच ती साधना करते, शक्तीसंचय करते आणि झळाळत्या ज्ञानाने व मूर्तिमंत पौरुषाने निघते जग जिंकायला!


सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही.
आजकाल संस्काराची लक्ष्मणरषा सगळेच पाळत नाहीत. संस्कार करणारी माणसे जरी कमी झाली तरी चित्रपट, वाहिन्यांची ही जबाबदारी ठरतें की त्यांनी त्या माध्यमातून संस्कार करावेत. पूर्वीच्या चित्रपटांनी आम्हाला हसविले, आम्हाला रडविले त्यातून सामाजिक आशय दिला, करमणूक, वैचारिक प्रबोधन केलं ते आज कुठे गेल? विषय आणि आशय नसलेल्या माध्यमातून विषयांची सध्या चलती आहे. कुटुंबासमवेत आज काही पाहताच येत नाही. कुटुंबाकडे, प्रत्येकाच्या समस्ये कडे ही आज पाहता येत नाहीं.जो तो आपल्यात मग्न आहे.

भारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणारे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकण-कारवार, कर्नाटक, आंध्र, तामीळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti