(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

  • रूट कॅनल एक माहिती 

    जगभरातील सगळ्यात जास्त म्हणजे ९० टक्के लोकांना पायोरिया हा आजार होत असतो. पायोरिया हा आजार शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हिरड्या खराब होणे, दातांची स्वच्छता न राहणे या कारणांमुळे होतो. किडलेला दातांसाठी रूट कॅन वरदान ठरत आहे. कारण त्यामुळे दात वाचला जातो.

  • आडनावाचा वारसा

    कुटुंबाला आणि पर्यायाने व्यक्तीला आडनाव असतेच असते. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी, कुटुंबांच्या आडनावांची प्रथा, मुळात रूढ झाली असावी. परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होअून विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणी, भयानक आणि हास्यास्पद आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालूही राहिली.

  • अति तिथं माती

    भारतीय पुराणातील भस्मासुराची आणि युरोपियन लोकसाहित्यातील मिडास राजाची कथा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. भस्मासुराची प्रवृत्ती आणि आताच्या अतिरेक्यांची प्रवृत्ती यामधील साम्य लक्षात घेतल्यास भस्मासुराला आद्य क्रांतिकारकाच्या धर्तीवर आद्य अतिरेकी म्हणून संबोधण्यास हरकत नाही. तर अशा या भस्मासुराने भगवान शंकराला वर मागितला होता की, तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू भस्मसात होऊन जाईल. भोळा सांब म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराने परिणामांचा विचार न करता तथास्तू म्हणून टाकलं. आता आपलं कोण काय वाकडे करु शकतो, या विचाराने उन्मत झालेल्या भस्मासुराने सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. आणि शेवटी तो साक्षात भगवान शंकराच्याही मागे लागला.

    दैनिक देशोन्नती मध्ये पूर्वप्रकाशित हा लेख ४ ऑगस्ट २००२ रोजी मराठीसृष्टीवर अपलोड करण्यात आला.

  • हरितकी/हरडा

    हा २०-३०मीटर उंच वृक्ष आहे.ह्याची त्वचा गडद तपकिरी रंगाची व खडबडीत असून हिरड्याचे लाकूड अत्यंत कठिण व घट्ट असते.ह्याची पाने ७-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद व टोकदार असून पत्र शिरांच्या ६-८जोड्या असतात.फुले २.५-५ सेंमी लांब असून फळ २.५-५ सेंमी लांब व अण्डाकार असते आत कठिण मगज असतो व पृष्ठभागावर पाच पन्हाळी सारख्या उभ्या रेषा असतात.फळ कच्चे असता हिरवे व पिकल्यावर धुरकट पिवळे असते.प्रत्येक फळात एक कठिण बी असते.

    हरितकीचे उपयुक्तांग आहे फळ.ह्याची चव लवण अर्थात खारट सोडुन पाच हि चवी असलेली असते व प्रमुख चव तुरट असते.हरडा उष्ण गुणाचा असतो व हल्का,कोरडा असून त्रिदोषनाशक असतो.

    चला आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग पाहुयात:

    १)जखम झाली असता ती हरड्याच्या काढ्याने धुवून साफ करतात.

    २)बाळ हरडे चावून खाल्ल्याने भुक वाढते.

    ३)कफज अर्शामध्ये हरितकी हि गुळ व ताका सोबत देतात.

    ४)हरड्याचे चुर्ण मनुका व खडीसाखर सह देतात ह्याने अम्लपित्तामध्ये फायदा होतो.

    ५)हरडा दुषित कफ व मेद यांचा नाश करून बुद्धि व इंद्रियांचा जडपणा घालवून मेध्य कार्य करतो.

    ६)हरडा डोळ्यांच्या आरोग्यास देखील हितकर आहे.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • पहिले घोडेस्वार?

    घोडा हा आपलं जंगली स्वरूप सोडून माणसाच्या घनिष्ट संपर्कात सर्वात प्रथम सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी आला असावा. हे घडून आलं ते बहुधा काळ्या समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरेशिआ स्टेप या गवताळ पठारी प्रदेशाच्या पश्चिम भागात. घोडा माणसाळला गेल्यावर त्याचा उपयोग प्रथम दुधासाठी आणि मांसासाठी केला गेला असावा.

  • सुरेश भट यांच्या गाजलेल्या मराठी गझल

    सुरेश भट यांच्या गाजलेल्या मराठी गझल

    तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
    एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
    अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
    अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
    सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
    उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
    बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
    रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
    उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
    तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
    (सुरेश भट)


    मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
    राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
    त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
    हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
    दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
    सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
    गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
    मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
    ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
    सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
    काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
    बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
    (सुरेश भट)


    आताच अमृताची बरसून रात गेली
    आताच अंग माझे विझवून रात गेली
    मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
    मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
    उरले जराजरासे गगनात मंद तारे
    हलकेच कूस माझी बदलून रात गेली
    अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
    गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
    (सुरेश भट)


    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
    अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
    कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
    सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
    उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
    उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
    दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
    (सुरेश भट)


    केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
    मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
    कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
    कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
    सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
    उसवून श्वास माझा ,
    स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
    मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
    (सुरेश भट)


    रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
    गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
    कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
    मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
    राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
    हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
    कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
    अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
    सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
    'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
    माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
    माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
    (सुरेश भट)


    मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
    मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
    लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
    राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
    तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
    रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
    रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
    मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
    (सुरेश भट)


    भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
    एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
    ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
    पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
    लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
    अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
    गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
    मी कशी होते मलाही आठवावे लागले !
    एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
    राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !

  • प्राचीन भारतांतील विमाने

    कोणत्याही ज्ञानशाखेचा विषय निघाला की, ही शाखा आमच्या पूर्वजांना पूर्णपणें माहिती होती असें सांगणारे कांही लोक भेटतात. तर काहींचें म्हणणे असें असतें की, भारतांत असणारें ज्ञान है परभृत आहे. भारतीयांनी त्यांत स्वतःची अशी कोणतीहि भर घातली नाही. त्यांनी स्वतः काहीहि नवीन निर्माण केलें नाही. विचारांच्या या दोन्ही टोकांपैकी एकांत भारताच्या अभिनिवेशी अतिगौरवाचा भाग असतो, तर दुसऱ्यांतून न्यूनगंडाने पछाडलेल्या दुबळ्या मनोवृत्तीचें दिग्दर्शन असतें. परंतु कोणत्याहि परिस्थितीचें वास्तव ज्ञान हें प्रगतीला पोषक असतें. या वास्तवज्ञानाचा एक भाग म्हणून आज प्राचीन भारतांत असलेल्या काही विमानांचा परिचय घडविण्याचें ठरविलें आहे.

  • केसांची निगा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

    आरशात बघितलं की सर्वप्रथम आपण आपली केश रचना ठीकठाक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. केसांच्या उत्पादनाच्या जाहिराती पेपर, टी.व्ही., वेबसाईट, होर्डिंग्ज अशा कितीतरी माध्यमातून बघायला मिळतात. अमुक तेल वापरलं तर तळहातावर पण केस येतील अशा जाहिराती काही वर्षांपूर्वी पहाण्यात आल्या. थोड्याच दिवसांत त्या उत्पादनाची वारेमाप विक्री झाली पण लवकरच त्याची हवा गेली. केसांसाठी मनुष्य काय काय करु शकतो, काय काय कमाऊ शकतो आणि काय काय गमाऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणे देता येतील. अॅडव्होकेट रत्नपारखींची “शेपटा” ही कविता वाचली की लक्षात येईल की एस.एस.सी.ला बसलेल्या एकाचं आयुष्य शुभदा जोशीच्या (काल्पनिक नाव) केसांमुळे कसं उध्वस्थ झालं. तिच्या काळाभोर केसांचा शेपटा बघत अख्खा पेपर बिचार्‍याने कोरा ठेवला.

    “एस एस सीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेशपेपर पहिला, घंटा पहिली, क्षण उत्सुकतेचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा

    मानेला ती देऊनि झटका नकळत सवईने, लिहू लागली पेपरमधली पानावर पाने

    मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार, तिचा तत्क्षणी येऊनि पडला माझ्या बाकावर

    तीन ताशी एकचित्त मी तिच्या शेपटात, एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात

    शेवटचीती घंटा झाली आलो भानावरी, कळले आता अपुले जीणे गावी खेड्यावरी

    शेतीवरती मोटेवरतो माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका

    केसानी त्या गळा कापला अलगदजी माझा, परि बैलांचा पिळुनि शेपटा जगतो हा राजा”

    . . . . . . . . कवी - अॅडव्होकेट रत्नपारखी

    बायकांना टक्कल का पडत नाही?

    शंभरात तीस टक्के पुरुषांना टक्कल पडलेले दिसते. पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. केस गळतात अशी तक्रार बायका करतात खर्‍या पण केस जसे गळतात तसे नवीनही येतात. म्हणून पूर्णपणे कॅरम बोर्ड झालेल्या स्त्रिया सहसा दिसत नाहीत. पित्त वाढल्यामुळे केस पातळ होणे, तांबूस रंगाचे होणे, अकाली टक्कल पडणे ही लक्षणे होतात. पित्त हे रक्तामध्ये निवास करते. मासिक पाळीच्या माध्यमाने दर महिन्यात थोडे रक्त शरिरातून बाहेर पडते. त्यामुळे शरीरातील पित्त दोष चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्याची निसर्गाची ही किमया स्त्रियांमध्ये आपोआप घडत राहते. ह्या उलट पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन नावाचे हॉर्मोन असते. हे हॉर्मोन उष्ण जातीचे असल्यामुळे शरीरात पित्त वाढवण्याचे कार्य करते. ह्या टेस्टोस्टिरॉन चे प्रमाण वाढले तर केस अधिकच गळतात. टेस्टोस्टिरॉन अधिक असल्यामुळे पुरुषांमध्ये कामशक्ती वाढते. म्हणूनच असे बघण्यात येते की टक्कल पडलेले पुरुष तुलनेने कामशक्ती मध्ये जरा अधिक सक्षम असतात. स्त्रियांमध्ये पण हे हॉर्मोन असते पण त्याचे प्रमाण अतिशय अल्प असते.

    केसांचे विकार

    केस गळणे, कोंडा होणे अणि अकाली पांढरे होणे हे मुख्यत: तीन आजार केसांच्या बाबतीत पहायला मिळतात. वास्तविक ह्यांना आजार म्हणावं का इथपासुनच सुरुवात करुया. डोक्यावरचे जवळपास १० टक्के केस हे सुप्तावस्थेत असतात. ह्याला “रेस्टिंग फेज” असे म्हणतात ह्या रेस्टिंग फेजची जागा सतत बदलत असते. साधारण सहा महिने हे केस रेस्टिंग फेजमध्ये असतात. ह्या काळात त्या केसांना पोषण मिळत नाही आणि पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे थोड्याशा ताणामुळे ते केस गळून पडतात. मात्र इतर ९० टक्के भागात पोषण सुरु असते म्हणून हे केस वाढतातही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात केस गळणे हे नैसर्गिक आहे. त्याला आजार म्हणणे योग्य नाही. हे प्रमाण जर खूप जास्त असेल तर मात्र आजार समजला पाहिजे आणि त्याचे कारण शोधून मग इलाज केला पाहिजे.

    दुसरी तक्रार म्हणजे कोंडा होणे, कोंडा हा मुळात केसांचा आजार नसून केसांच्या खालची त्वचा (Scalp) ह्या भागाचा आजार आहे. फंगस नामक जिवाणूंमुळे हा त्वचेचा आजार होतो. अकाली केस पांढरे होणे हा आजार म्हणावा का? हा पण एक समजून घेण्यासारखा विषय आहे. केसांचा मूळ रंग पांढराच असतो. मिलेनिन नावाचे एक काळे रंजक द्रव्य केसाला काळा रंग देते. वय वाढत गेल्यावर हे मिलेनिन निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते आणि म्हणून केसांचा रंग पांढरा होऊ लागतो.

    केसांच्या समस्या – प्रमुख कारणे

    वर बघितल्याप्रमाणे ‘केस गळणे, कोंडा होणे आणि अकाली पांढरे होणे’ हे केसांचे तीन प्रमुख विकार आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केस हा आपल्या हाडांचा मळ आहे. हाडे चांगली सशक्त व सुदृढ असतील तर केस चांगले राहतात. हाडांचा काही आजार झाला किंवा अपघातामुळे फ्रॅक्चर वगैरे झाल्यास केस भरपूर गळू लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. हाडांच्या आजारावर उपचार करुन ठीक झाल्यानंतर केसांची वाढ पूर्ववत सुरु होते. शरीरात हाडांमध्ये वात दोष प्रामुख्याने असतो आणि वातासाठी सर्वात श्रेष्ठ औषध म्हणजे तेल. अशा प्रकारे केसांचा आणि तेलाचा अप्रत्यक्ष संबंध आहे. केसांना नियमित तेल लावणार्‍यांचे पण केस गळून टक्कल पडते तर काहीजण आजिबात तेल लावत नाहीत तरीपण केस गळत नाहीत. याचे कारण म्हणजे हाडांचे आरोग्य. शरीरात एक दोष वाढला की तो दुसर्‍या दोषाला कमी करतो. केसांच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो.

    केशस्वास्थ्याचा विचार करतांना आहारातील काही घटकांचा परिणाम होतो का हे समजणे पण आवश्यक आहे. शरीरातील हाडा-मासापासून तर नख-केसांपर्यंत सर्व गोष्टी आपल्या आहारातूनच तयार होत असतात. त्यामध्ये काही कमी जास्त झाले तर शरीरातील धातूंमध्ये त्याचे परिणाम आजाराच्या स्वरुपात दिसू लागतात. केसांना पोषण मिळते आपल्या आहारतूनच. आहारात काही घटक कमी-अधिक होत असतील तर केसांच्या गळण्याला निमित्त होऊ शकते. केसांच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ. मीठ म्हणजे केसांचा एक नंबरचा शत्रू. ज्यांच्या खाण्यात मीठ थोडे वरचढ असते त्यांचे केस तुलनेने कमजोर असतात व गळू लागतात. म्हणून केसांची खरोखर काळजी घ्यायची असेल तर किंचित वरचढ मिठापेक्षा थोडे अळणी अन्न घेणे आवश्यक आहे. लोणची, पापड ह्यांसारख्या पदार्थांमध्ये मुळातच मीठ भरपूर असते. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो टाळावेतच. आहारात मीठ जास्त घेण्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे वाढते.

    केसांच्या सुयोग्य पोषणासाठी आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांची व कॅल्शियमची नितांत आवश्यकता आहे. दूध, मांसाहार, द्विदल धान्य, सोयाबीन अशा पदार्थांमध्ये सकस प्रथिने असतात. तीळ, पालेभाज्या, केळी, संत्री, बदाम, कोबी, फ्लॉवर सारख्या अनेक गोष्टींमध्ये प्रचुर प्रमाणात कॅल्शियम असते. संपूर्णपणे शाकाहारी असणाऱ्यांनी ह्यांचे सेवन आहारात नियमितपणे केले पाहिजे.

    अनुवांशिकता हे केसांच्या विकारांचे एक प्रमुख कारण आहे. केस हा पित्रुज भाव असल्याने वडिलांच्या गुणसूत्रानुसार ह्याचे स्वास्थ्य असते. अनुवंशिकतेचा विचार केला तर वडिलांचे केस ज्या विशिष्ट वयात गळू लागले त्याच वयात मुलांमध्येही केस गळती सुरु होऊ शकते.

    मानसिक ताण, चिंता, क्रोध हे केसांच्या समस्यांचे महत्वाचे कारण आहे. अशा मानसिक असंतुलनामुळे कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन ह्यांची वाढ होऊन केसांना धोका संभवतो. आयुर्वेदात वर्णन केलेल्या काही वनस्पतींच्या सेवनाने ह्या गोष्टीवर नियंत्रण मिळवता येते.

    प्रदूषण हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा. पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरिनेशन करण्याची पद्धत आहे. ह्या पद्धतीत क्लोरिनचे प्रमाण अधिक झाले व केस धुण्यासाठी असे पाणी वापरले तर केस गळती झपाट्याने होऊ लागते. ह्यावर सोपा उपाय म्हणजे स्नानासाठी वापरावयाचे पाणी २ – ३ तास बादलीत काढून ठेवावे. ह्याने त्यातील अतिरिक्त क्लोरीन उडून जाते व केसांना होणारी इजा टाळता येते. प्रदूषित हवा, त्यातील कमी झालेले प्राणवायूचे प्रमाण व वाढलेले इतर घातक वायु हे असंतुलन रोखणे जवळजवळ अशक्यच आहे. निसर्ग संगोपन, वृक्षारोपण व संवर्धन हे ध्येय प्रत्येकानेच पाळणे नितांत गरजेचे आहे.

    केसांची निगा – समज / गैरसमज

    केसांच्या चिकित्सेबद्दल विचार करताना शांपू आणि तेल ह्याशिवाय काही उपचार असू शकतो असे सर्वसामान्यांच्या मनातही येत नाही. ह्याचे मुख्य कारण आहे जाहिरातींचा भडिमार. ह्या उत्पादनांच्या इतक्या जाहिराती रोज बघायला मिळतात की नेमकं काय योग्य आहे हेच कळेनासं होतं.

    “कोणता शांपू चांगला?” अशी विचारणा बरेच लोक करतात. मुळात शांपूचा उपयोग काय हे लक्षात घेतले पाहिजे. शांपू हा फक्त केस धुण्यासाठी वापरला जाणारा फेसाळणारा साबणासारखा (इमल्सिफायर) पदार्थ आहे. केसांवरील तेलकट अंश ह्यात विरघळतो आणि पाण्याने धुवून टाकला जातो. शांपूचा संपर्क केसांशी फक्त काही सेकंद असतो. तेवढ्या थोड्या वेळात त्याचा कोंड्याशी काय म्हणून संपर्क होणार? कोंडा हा एक त्वचा रोग आहे आणि त्वचारोगावर इलाज करायचा असेल तर जे काही औषध त्वचेवर लावाल ते निदान तासभर तरी त्या ठिकाणच्या त्वचेवर राहिले पाहिजे. शांपूचा परिणाम फक्त कोंडा वाहून नेण्यासाठी होऊ शकतो. कोंडा निर्माण होण्याची क्रिया त्याबे थांबू शकत नाही.

    हर्बल शांपू प्रकाराचे प्रस्थ सध्या फार वाढलेले दिसते. ह्या हर्बल शांपूमध्ये वनस्पतींच्या अर्काचा फक्त थोडासाच अंश असतो, बाकी सर्व रसायनेच असतात. रासायनिक घटक असल्यामुळे ते वाईट असे म्हणणे नक्कीच चुकीचे ठरेल. परंतु हर्बल म्हणण्यासारखे त्यात वास्तविक काहीच नसते. केसांना मुलायम (हेअर सॉफ्टनिंग) करणारे, चकाकी (ग्लॉस) देणारे शांपूही आजकाल मिळतात. ह्या शांपुंमध्ये मुख्यतः रासायनिक स्निग्ध पदार्थ असतात, जे केसांना मुलायम करतात, गुंतागुंत होऊ देत नाहीत व चकाकी देतात. तरीदेखील हा कृत्रिमपणा केसांच्या स्वास्थ्यासाठी कितपत सुरक्षित आहे हा वादाचा मुद्दा आहे. शांपूचा दर्जा ठरतो त्याच्या pH वरून. शांपू हा अॅसिडिक किंवा अल्कलाईन नसावा, तो न्युट्रल असावा हे सर्वात महत्वाचे.

    केसांसाठी तेल आवश्यक आहे खरे, पण ते केवळ केसांना वर वर लावून उपयोगी नाही, तर ते मुळाशी शोषले जाणे गरजेचे आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार तेल नाकात टाकावे म्हणजे त्याचा परिणाम केसांच्या मुळांपर्यंत होतो. आयुर्वेदाच्या तत्वानुसार नाक हे शिरोभागाचे द्वार आहे. त्यातील यंत्रणा व श्लेष्मल स्तरांमधून द्रव्याचे शोषण होते.

    पुढचा महत्वाचा भाग आहे औषध पोटातून घेण्याचा. पोटात घेतलेल्या औषधी द्रव्यातील कार्यकारी घटक रक्ताद्वारे केसांच्या मुळांमार्फत केश संरक्षण व वर्धन करून अस्थि धातु पोषणाचेही कार्य करतात. झाडांच्या पानांवर पाणी किंवा खत शिंपडून उपयोग नाही तर ते पोषक घटक झाडाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. केसांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो. आयुर्वेदात काही विशिष्ट वनस्पती व औषधी द्रव्ये ह्यासाठी वर्णित आहेत. ह्यांच्या सेवनाने अगदी ५ - ६ दिवसांतच फरक दिसू लागतो असे अनुभव प्राप्त झाले. साधारण दोन ते तीन महिन्यांत केसांची लक्षणीय वाढ दिसून येते. ही औषधे ३ महिने सातत्याने घेतल्यावर १५ ते २० दिवस बंद करुन पुन्हा चालू करावीत. एकच एक औषध सतत चालू ठेवण्यामुळे शरीर प्रतिसाद देणे बंद करते. म्हणून ही गॅप ठेवावी.

    केशप्रभा – केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी प्रभावी गोळ्या

    गेल्या २५ वर्षांपासून अक्षय उद्योग समूह आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रात विक्रमी वाटचाल करीत आहे. वनौषधींची लागवड, आयुर्वेदीय औषधांची निर्मिती, विपणन, आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन, संशोधन व विकास अशा अनेक लोकोत्तर कार्यात मनाचे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय, औषधनिर्मिती शास्त्र, कायदा, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील व्यासंगी तज्ञ ह्या उपक्रमात सहभागी आहेत.

    केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी शारीरिक, मानसिक, आहार, विहार व औषधी घटकांचा सखोल अभ्यास करून अक्षय उद्योग समूहाने ‘केशप्रभा’ नावाचे एक अभिनव उत्पादन वटी स्वरुपात सादर केले आहे. ह्यातील प्रत्येक औषधी द्रव्याच्या कार्मुकतेबद्दल आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या संशोधनाचे सारांश स्वरुपात संदर्भ देऊन विषयाला परिपूर्णता देण्याचा प्रयत्नही केला आहे. केसांच्या स्वास्थ्यासाठी केशप्रभा गोळ्यांमधील प्रत्येक औषधी कशी कार्य करते ते आता पाहूया.

    प्रत्येक विलेपित गोळीतील घटक द्रव्य व प्रमाण

    कृष्णसारिवा, माका प्रत्येकी ८० मिलिग्रॅम, ब्राह्मी, गुडुची प्रत्येकी ७० मिलिग्रॅम, गोखरू, शतावरी, वटजटा प्रत्येकी ६० मिलिग्रॅम, सुवर्णमाक्षिक भस्म, मौक्तिक पिष्टी प्रत्येकी ३० मिलिग्रॅम; भावना वटजटा क्वाथ.

    कृष्णसारिवा : शारीरिक पेशींच्या जडणघडण प्रक्रियेत काही विषारी घटक सतत उत्पन्न होत असतात. त्यांना काबूत ठेवण्यासाठी शरीर आपणहून प्रयत्नशील असते. तरीदेखील सदोष आहार, उग्र रासायनिक घटकांचा संपर्क, चुकीची जीवनशैली अशा कारणांमुळे चयापचयातून अतिरिक्त विषारी घटक निर्माण होतात. ह्यांना पेशीविघातक (फ्री रॅडिकल्स) म्हणतात. ह्या फ्री रॅडिकल्समुळे केसांच्या स्वास्थ्यावर घातक परिणाम होतात, केस झपाट्याने गळू लागतात, पांढरे होतात. कृष्णसारिवा वनस्पतीमध्ये फिनाइलप्रोपेनॉइड नामक पेशीरक्षक घटक असतो. हा घटक फ्री रॅडिकल्सना उत्तमप्रकारे काबूत ठेवून केस गळणे थांबवतो.

    माका : केसांसाठी निर्मित उत्पादनात ही वनस्पती आवर्जून असतेच. माक्याचे केशवर्धक गुण विविध संशोधातून सिद्ध झाले आहेत. ह्याचा उपयोग बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन्ही प्रकारे होतो. दोन्ही प्रकारात ह्यातील घटक रक्तात शोषले जाऊन केशवर्धनाचे अपेक्षित कार्य करतात.

    गुडुची : केसांच्या स्वास्थ्यासाठी गुडुची विविध प्रकारे उपयुक्त ठरते. रसायन असल्यामुळे शरीराच्या सर्वच धातूंना बळ देते. यकृताचे कार्य उत्तम राखण्यामुळे बाकीच्या अन्तःस्रावी ग्रंथींवर नियंत्रण राखून हॉर्मोन्सचे संतुलन उत्तम राहते. हॉर्मोन्सचा संबंध केसांच्या स्वास्थ्यासाठी सर्वमान्य आहेच. सीबम हा त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक असलेला स्निग्ध पदार्थ आहे. केसांचे पोषणही त्वचेच्या माध्यमातूनच होत असल्याने गुडुचीचे गुण केसांच्या स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरतात. गुडुची ही अस्थि पोषणासाठी एक उत्तम वनस्पती आहे. अस्थिधातूचा केसांशी असलेला संबंध लक्षात घेता गुडुचीचा उपयोग अस्थिपोषणासाठी व परिणामी केसांच्या स्वास्थ्यासाठी सिद्ध होतो. फंगसच्या नियंत्रणासाठी प्रभावी असल्याने केसातील कोंड्यासाठी देखील ह्याचा विशेष उपयोग होतो.

    गोखरु : केसांच्या व त्वचेच्या काळ्या रंगासाठी कारणीभूत असणारे रंजकद्रव्य म्हणजे मेलॅनिन. गोखरु सेवनाने मेलॅनिन स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (MSH) प्रेरित होते. शिवाय त्याने मेलॅनिन निर्मिती, त्वचेमध्ये पसरण्याची क्रिया व सुप्त मिलॅनोसाईट कोशिकांवर उत्तेजक क्रिया होते. केसांच्या कृष्ण वर्णासाठी ह्याच्या सेवनाने उत्तम लाभ होतो.

    शतावरी : इस्ट्रोजिन नामक हॉर्मोनचे संतुलन बिघडले तर केस गळण्याचे प्रमाण वाढते. मासिक रजःस्राव नियमित होणे हे इस्ट्रोजिनचे संतुलन योग्य असल्याचे निदर्शक आहे. ज्या स्त्रियांमध्ये रजःस्राव अनियमित असतो त्यांना केसांचे विकार अधिक संभवतात. शतावरीमध्ये फायटो इस्ट्रोजिन्स असल्याने रजःस्रावाचे संतुलन राखले जाते व केस गळणे आटोक्यात राहते. पुरुषांमध्ये अल्प प्रमाणात असलेले इस्ट्रोजिनचे प्रमाण वाढले तर टेस्टोस्टेरॉन घटू शकते. शतावरीमुळे इस्ट्रोजिन्सचे संतुलन चोख राहते व पुरुष असो वा स्त्रिया, दोघांच्याही केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते.

    वटजटा : वडाच्या पारंब्यांचा उपयोग केसाच्या वाढीसाठी होतो. प्राप्त निष्कर्षानुसार केसांची जाडी ३१ % वाढते, १५ % नवीन केसांची निर्मिती होते तर संख्या सुमारे ४६ % वाढते.

    सुवर्णमाक्षिक भस्म : रस – रक्त – मांस – मेद – अस्थि – मज्जा व शुक्र असे सात धातु शरीराच्या धारणासाठी निसर्गाने निर्माण केले आहेत. सुयोग्य पोषण मिळाले तर सर्व धातु, उपधातु आणि मल सुदृढ राहतात. रक्त धातुमधील लोहाचे प्रमाण उत्तम राखण्याचे कार्य सुवर्णमाक्षिक भस्मामुळे होते. अर्थात पुढे त्यापासून निर्माण होणारे धातु-उपधातु सुस्थितीत राहून केस झडण्याची शक्यता कमी होते.

    मौक्तिक पिष्टी : अस्थि धातूचे परिपूर्ण पोषण करणारे सागराच्या कुशीतून निर्माण होणारे हे द्रव्य आहे. मौक्तिक म्हणजे मोती. ह्यामध्ये ८२ ते ८६ % एवढ्या मोठ्या मात्रेत कॅल्शियम आढळते. मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी १० % कॅल्शियम हे रक्त संवाहनात असते तर ९० % अस्थिधातुमध्ये असते. म्हणून अस्थि पोषणासाठी कॅल्शियमची गरज सर्वात अधिक असते. निसर्गनिर्मित मोत्यांमध्ये असलेले कॅल्शियम उत्तम दर्जाचे असून मानवी शरीरात सहज शोषले जाते. अस्थींच्या पोषणाने अर्थातच केसांचे स्वास्थ्य उत्तम राहून हाडांनाही बळकटी मिळते.

    ब्राह्मी : मानसिक ताण, चिंता, भय अशा कारणांमुळे केसांचे विकार संभवतात. ह्या गोष्टींमुळे कॉर्टिकोस्टिरॉन आणि नॉरअॅड्रिनलीन नावाची हॉर्मोन्स वाढून केसांची गळती सुरु होते. ब्राह्मी सेवनाने कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन नियंत्रणात राहून केसांची गळती रोकण्यास हातभार लागतो. केस गळण्याच्या कारणांमध्ये थायरॉइड मधील T4 जातीच्या स्रावांची कमतरता हेदेखील महत्वाचे कारण आहे. ब्राह्मी सेवनाने ह्या T4 स्रावांची हळुवार वाढ होते व केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्राव जरुरीपेक्षा अधिक वाढत नाहीत, फक्त योग्य मात्रेत वाढ होईपर्यंतच ह्याची क्रिया घडते.

    केशप्रभा सेवन करण्याची पद्धत

    २ – २ गोळ्या दिवसातून दोन वेळा, सकाळी रिकाम्यापोटी व रात्री झोपतांना.

    वैद्य संतोष श्रीनिवास जळूकर

    संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई

    फोन - +917208777773

    Email: drjalukar@akshaypharma.com

  • एन् डी स्टुडिओ: प्रतिभावंताचे सत्य-स्वप्न !

    प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई! एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणार्‍या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओंमध्ये या स्टुडिओची गणना होते.

  • आनंदाची अनुभूती

    सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं.