जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. इन्साफ का मंदिर चित्रपटातून लेखक म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ३४ चित्रपटांपैकी बहुतेकांचे लेखन त्यांनीच केले होते. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. इशारा यांनी चित्रपटसृष्टीत "बोल्ड‘ विषय आणले. कोणीही हाताळले नाहीत, अशा विषयांवर त्यांनी चित्रपट तयार केले.
"चेतना‘मध्ये त्यांनी वेश्यां्च्या पुनर्वसनासारखा विषय घेतला. हा चित्रपट २५ दिवसांत पूर्ण झाला होता. बंगल्यात चित्रीकरण करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी "प्रेम शस्त्र‘, "औरत और इंतकाम‘, "वो फिर आयेगी‘, "हम दो हमारे दो‘, "जरूरत‘, "मिलाप‘ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चेतना, हम दो हमारे दो, एक नजर, मिलाप, लोग क्या कहेंगे, सौतेला पती, औरत का इन्तेकाम, घर की लाज असे विविध वादग्रस्त विषयांवरील सिनेमे त्यांनी केले. अभिनेत्री परवीन बॉबीला रूपेरी पडद्यावर झळकवण्याचे श्रेय इशारा यांनाच जाते.
त्याशिवाय रेहाना सुल्तान, राकेश पांडे, विजय अरोरा या कलावंतांनाही त्यांनीच पहिला ब्रेक दिला.चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या. ज्येष्ठ कलाकार रेहाना सुलतान ह्या बी. आर. इशारा यांच्या पत्नी होत.मा.बी.आर.इशारा यांचे २५ जुलै २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
साष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक खूप गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले.
व्हिक्टर चेनोमिर्दिन हे रशियामध्ये आणि रशियन भाषा बोलल्या जाणाऱ्या देशांमध्ये ओळखले जायचे ते त्यांच्या भाषेच्या बेधडक वापरामुळे! त्या भाषेचे व्याकरण, त्याची सुबोधता आणि त्याची शैली या सर्वांना ओलांडून ते बोलत राहायचे. बऱ्याचदा अनाकलनीय वाटणारे, कानावर सहसा न पडणारे असे शब्दप्रयोग ते वापरत, त्यामुळे ते आता काय बोलणार, असा प्रश्न पडे. तथापि ते लोकप्रिय बनले ते त्यांच्याकडे असणाऱ्या कनवाळू आणि मानवतावादी दृष्टिकोनामुळे! कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर ते रशियाचे पंतप्रधान बनले. बोरिस येल्त्सिन रशियाचे अध्यक्ष बनले आणि चेर्नोमिर्दिन त्यांच्यासमवेत काम करायला लागले. नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेकडून खुल्या अर्थव्यवस्थेकडे रशियाला घेऊन जाण्याची किमया साधली म्हणून त्यांची आता इतिहासात नोंद होईल. 'आम्हाला अधिक चांगले काही करायचे होते, पण ते नेहमीसारखेच झाले, ' असे ते नेहमी म्हणत. त्यामुळे त्यांनाही 'नेहमीसारखेच' ओळखले जात असे. व्हिक्टर चेर्नोमिर्दिन हे एका मजुराच्या घरात १९३८मध्ये जन्माला आले. त्यांना पाच भावंडे होती. त्यांनी आपले शालेय शिक्षण १९५७ मध्ये पूर्ण केले. ऑर्कमध्ये एका तेलाच्या शुद्धीकरण प्रकल्पामध्ये ते पाच वर्षे राबले. त्यानंतर त्यांनी क्युबिशेव्ह इन्स्टिट्यूटमध्ये नाव दाखल केले.
प्रवेश परीक्षेत त्यांना अतिशय बेताचे गुण मिळाले. गणिताच्या चाचणीत तर ते अनुत्तीर्ण झाले. त्यांची परीक्षा इंडस्ट्रियल पुन्हा घेण्यात आली. त्यात त्यांना 'सी ग्रेड' मिळाली. १९७२ मध्ये ' त्यांनी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून पत्रव्यवहाराद्वारे आपला अभ्यासक्रम पुरा केला. १९६७ ते १९७३ या दरम्यान त्यांनी ऑर्कमध्ये असतानाच रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यात लक्ष घालायला सुरुवात केली. ओरेनबर्गमध्ये त्यांना नैसर्गिक वायूच्या शुद्धीकरण प्रकल्पामध्ये संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. १९७८ ते १९८२ या काळात अवजड उद्योगात त्यांना नियुक्त करण्यात आले.
१९८२ मध्ये सोव्हिएत युनियनच्या मंत्रिमंडळामध्ये ते नैसर्गिक वायू खात्याचे उपमंत्री तर १९८५ ते १९८९ या काळात ते कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली या उद्योगाचे सरकारीकरण करण्यात संचालकपदावर आले. १९९१च्या उत्तरार्धात सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले तेव्हा 'गॅझप्रॉम' या सरकारी कंपनीच्या असणाऱ्या चेर्नोमिर्दिन यांना नव्या रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी पंतप्रधानपदी नियुक्त केले.
१९९० च्या दशकामध्ये 'गॅझप्रॉम' ही कंपनी सोव्हिएत युनियनच्या चेर्नोमिर्दिन अर्थकारणाचा कणा मानली जात होती. तथापि याच दशकामध्ये ही कंपनी अपेक्षेला उतरू शकली नाही. मात्र ती २००० मध्ये सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्खनन करणारी कंपनी बनली. १९९५ च्या एप्रिलमध्ये त्यांनी आपला एक स्वतंत्र गट 'अवर होम-रशिया' या नावाने सुरू केला. त्यानंतर लगेचच म्हणजे जूनमध्ये शामिल बसायेव्ह या दहशतवाद्याने बुदियोनोव्हस्की येथे पंधराशे जणांना ओलीस ठेवले तेव्हा त्याच्याबरोबरची बोलणी यांनीच केली.
चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरच्या समझोत्यापायी रशियन सरकारने चेचेन्यामध्ये हाती घेतलेली लष्करी कारवाई थोपवावी लागली. बोरिस येल्त्सिन यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा ते २३ तासांसाठी रशियाच्या अध्यक्षपदीही होते. १९९८ मध्ये वानक बडतर्फ केले जाईपर्यंत ते पंतप्रधानपदी होते. त्याच वर्षी रशिया भयानक आर्थिक संकटात सापडला तेव्हा चेर्नोमिर्दिन यांना येल्त्सिन यांनी पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्त केले. त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणूनही त्यांनी घोषित केले, पण 'ड्यूमा'ने त्यांची ही निवड दोनदा फेटाळून लावली.
तिसऱ्यांदा ती फेटाळली गेली असती तर 'ड्यूमा'लाच विसर्जित करावे लागले असते. तो धोका न पत्करता येल्त्सिन यांनी येव्हगेनी प्रिमाकोव्ह यांना पंतप्रधानपदावर नियुक्त केले. जून २००१ मध्ये व्लादिमिर पुतिन जेव्हा रशियाचे अध्यक्ष झाले तेव्हा चेर्नोमिर्दिन यांना युक्रेनमध्ये रशियाच्या राजदूतपदी नियुक्त करण्यात आले होते. युक्रेनबरोबर रशियाचा वाद इरेला पेटला तेव्हा चेर्नोमिर्दिन यांनी युक्रेनबरोबर चर्चाच होऊ शकणार नाही असे जाहीर केले. त्या वेळी युक्रेनने चेर्नोमिर्दिन यांना 'अनावश्यक व्यक्तिमत्त्व' असे जाहीर करायची तयारी चालवली होती. अखेरीस चेर्नोमिर्दिन यांना माघार घेणे भाग पडले. ११ जून २००९ रोजी चेर्नोमिर्दिन यांना रशियन अध्यक्ष दमित्री मेदवेदेव यांनी अध्यक्षांचे खास सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.
चेर्नोमिर्दिन यांचे ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते.
माणुसकी, हलाहल, तिखट मिरची घाटावरची, हिंदी चित्रपट ‘कानून का शिकार’ या चित्रपटातून राजाभाऊ मोठ्या पडद्यावरही झळकले. त्यांचे चिरंजीव राजेश चिटणीस व त्यांची नात राजसी राजेश चिटणीस यांना देखील आजोबांच्या कलेचे बाळकडू मिळाले आहे.
निवृत्तीबुवा सरनाईक जयपूर-अत्रौली घराण्याचे मराठी गायक होते. त्यांचा जन्म ४ जुलै १९१२ रोजी झाला. निवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व सवाई गंधर्व यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक अल्लादिया खान साहेब यांचा होता. पुढे त्यांनी त्याच शैलीत आपले गायन विकसित केले. बुवांनी आपल्या कसदार गायनाने अनेक मैफिली गाजवल्या व अनेक मानाचे समजले जाणारे पुरस्कार प्राप्त केले. ते कोल्हापूर संस्थानाचे दरबार-गायक होते. १९७० चे दरम्यान ते मुंबई विद्यापीठात संगीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९७८ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत निवासी संगीत गुरू म्हणून काम बघण्यास सुरुवात केली. १६ फेब्रुवारी १९९४ रोजी निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. ‘जंजीर’नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली.
आशा पोतदार यांना आत्माराम भेंडे यांच्यामुळे ‘नरो वा कुंजरो वा’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचा उपयोग त्यांना अनेकानेक नाटके मिळण्यासाठी झाला. पुढे त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या व्यावसायिक नाटकांतही कामे केली. नंतर १९७१ साली रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘विसर्जन’ या नाटकाचा अनुवाद असलेल्या ‘माते तुला काय हवंय’ या नाटकात त्यांनी काम केले. या नाटकात नानासाहेब फाटक यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. हे नाटक लोकप्रिय झाले आणि या नाटकातील त्यांची भूमिका पाहूनच दिग्दर्शक ना.बा. कामत यांनी ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६२) या चित्रपटाची नायिका म्हणून त्यांची निवड केली.
मराठीतील सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक.
बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही शेकडो रहस्यमय कादंबऱ्या लिहील्या. त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी संपूर्ण पिढीला वेड लावले होते.
दर महिन्याला ते सरासरी शंभर पानांच्या ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत.
१९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्या आहेत.
गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा तसेच कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.
# Gurunath Naik
जिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १८९० रोजी मुरादाबाद येथे झाला. जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी नायडू यांनाच मिळाली होती. मुशायर्याणत मद्यपान करून येणारे, आल्यावर गझल म्हणणार्या कवीला ढकलून स्वत: गझल गाणारे जिगर चांगले कवी म्हणून लोकांनी सहन केले होते. मद्यपान सोडल्यावर ते अधिक प्रिय झाले.
१९५८ मध्ये भारत सरकारनेही त्यांच्या ‘आतिशे-गुल’ या काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार देऊन राजमान्यताही दिली होती. आपल्या चित्रपटसृष्टीला मजरुह सुलतानपुरी आणि शकील बदायूँनी हे हिरे देण्याचे काम जिगर मुरादाबादी यांनी केले. अशा अनेक कवींना त्यांनी पुढे आणले. मा.जिगर मुरादाबादी यांच्या गाजलेल्या पुस्तकामध्ये में दाग़-ए-जिगर, शोला-ए-तुर आतिश-ए-गुल, दीवान-ए-जिगर रहीं समावेश आहे. जिगर मुरादाबादी यांचे निधन ९ सप्टेंबर १९६० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / समीर गायकवाड
जिगर मुरादाबादी यांची शायरी.
यूही दराज़ खोला एक पुरानी मॅगज़ीन हाथ लग गयी,जिस में
जिगर मुरादाबादी जी पर मिलन जी का बड़ा ही दिलकश लेख था |
.वह लिखती है के जिगर जी की शायरी जैसे शहद में घुले हुए अल्फ़ाज़ ,
जिस में ओस के बूँदों की मुलायमता है,अपनी महबूबा से मिलने का वादा,
उनके देखे ख्वाब,आकांक्षा,कल्पना,उनकी प्रतीक्षा,हसीना का शबाब,
उनकी मुस्कुराहट,उनसे वियोग के लम्हे,मिलन की बेला,उनका हुस्न,जवानी,
मदहोशी ,ज़िंदगी ,ये सब कुछ बयान करती मखमली शायरी है |
Copyright © 2025 | Marathisrushti