जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘कान्होपात्रा’ या संगीत रंगभूमीवरील सर्व महत्त्वाच्या नाटकांत अरविंद पिळगांवकरांनी भूमिका केल्या. ‘सौभद्रा’त त्यांनी सर्व प्रमुख भूमिका केल्या. ‘मानापमाना’त ते धैर्यधरही झाले आणि लक्ष्मीधरही झाले. ‘कान्होपात्रा’त चोखोबा आणि राजा अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या.
स्वातंत्रवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझे बुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे व त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र असलेल्या विक्रम सावरकर यांनी जाज्वल्य
देशभक्तीचे व्रत स्वीकारत हिंदुमहासभेसाठी कार्य केले.
आपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणारे गजानन वाटवे.
कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील उगाव या गावी झाला.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील जनता विद्यालयात उगावकर यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले.
राम उगावकर हे आदर्श शिक्षक, कवी, शाहीर, गीतकार होते. ते सेवादलातही काम करत असत. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे उगावकर यांना गुरुस्थानी होते. राम उगावकर यांना भाऊसाहेब रानडे, एस. एम. जोशी, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, कवी कुसुमाग्रज यांचे संस्कार आणि मार्गदर्शन मिळाले. शाहिरीपासून त्यांनी आपल्या कला जीवनाची सुरुवात केली. लोकनाट्य, नाटक, चित्रपट कथा, चित्रपट गीते, पोवाडे, वैचारिक लेख आदी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.
‘जिद्द’, ‘पायगुण’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मोसंबी-नारंगी’, ‘भीमगर्जना’, ‘घरंदाज’ आदी चित्रपटांसाठी तसेच ‘संत गाडगे बाबा’ या मालिकेसाठीही त्यांनी गीत लेखन केले होते. उगावकर यांनी ‘नारदमुनी मुंबईत’, ‘एक मास्तर चंदेरी दुनियेत’ हे एकपात्री कार्यक्रमही सादर केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रतीकार, संत गाडगे महाराज, हॅलो इन्स्पेक्टर, पुरुष पात्र नसलेले आज येणार पाहुणे, मुलांचा हरिजन दिन अशी त्यांची बारा नाटके रंगभूमीवर आली. तर गीतागीत सुगंध (काव्य), अंतराळ स्नेह (काव्य), मस्करी (विनोदी कविता संग्रह), शिवबाची शौर्यगाथा (पोवाडा), भारतीय स्वातंत्र्याचा पोवाडा, लोकमान्य (नाटक) जादूचा मणी, टिल्लू ही बालनाट्ये, परिताईचा मंगू असे काव्य, नाट्य व बालसाहित्य प्रकाशित आहे.
त्यांनी काव्यमय असे एका सच्चा शिक्षकाचे मनोगत, एक मास्तर चंदेरी दुनियेत या पुस्तकाद्वारे तर दाखवलेच पण त्यावर उत्कृष्ट कविता लिहून त्यांनी स्वत:चेच चरित्र काव्यातून सादर केले.
उगावकर यांनी लिहिलेली २० नाटके रंगभूमीवर सादर झाली होती. त्यांची तीन हिंदी तर सुमारे ४० मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. काही चित्रपटातूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘दलित मित्र’ या पुरस्कारानेही उगावकर यांना सन्मानित करण्यात आले होते.
संत गाडगे महाराज यांचे ते उपासक होते. त्यामुळे भगवे कपडे न घालणारे साधू म्हणूनही उगवकारांचा परिचय करून दिला जातो. परम शांतीधाम वृद्धाश्रमाचे ते विश्वस्तही होते.
राम उगावकर यांचे ५ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
पंडित उल्हास कशाळकर यांचे शिक्षण M.A.(L.L MUSIC). त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी येथे झाला.कशाळकरांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे झाले. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या त्याच्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडून मिळाले. नागेश कशाळकर हे उल्हास लहान असताना त्यांना ग्रामोफोनवर वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्याक भीमपलास, यमन, शुद्ध कल्या ण या रागांच्यार बंदिशी एकवत असत. त्याेचे संस्कार उल्हास कशाळकर यांच्याुवर होत असत. त्यांच्या वडिलांनी वेगवेगळ्या नावाजलेल्याा गायकांच्या गाण्यांशी उल्हास यांची ओळख करून दिली. सोबत त्या पैकी कुणाकडून कोणता गुण आत्मासात करावा याचे स्वातंत्र्यही दिले. मा.उल्हास कशाळकर यांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताच्या अभ्यासास सुरुवात केली. उल्हाास कशाळकर यांना 'बालगंधर्व नाट्यसंगीत स्पसर्धे'त भरघोस यश मिळाले. त्यामुळे त्यांचे नाव ज्याच्या त्याच्यां तोंडी झाले. हा मुलगा नाट्यसंगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करेल असे भाकित अनेकांनी वर्तवले. कशाळकर यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्याकनंतर त्यांची राम मराठे यांच्यांकडे आग्रा घराण्या ची तालिम सुरू झाली. राम मराठे हे उत्तम ख्यामल गायक होते. कशाळकर यांनी त्यांच्याकडे विशेष करून ख्याल गायकीचे धडे घेतले. त्या नंतर त्यांनी गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळवली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे. उल्हास कशाळकरांनी दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी १९८३ ते १९९० च्या दरम्यान काम केले. त्यांनी १९९३ मध्ये कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत आचार्यपद स्वीकारले. ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्यांची ग्वाल्हेर घराण्यासोबत आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकूमत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत ही महाराष्ट्राला अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी राम देशपांडे, ओंकार दादरकर व शशांक मकतेदार असे शिष्य घडवले आहेत. मा.कशाळकर यांना २०१० साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा.उल्हास कशाळकर यांना पाच भाऊ असून सगळे गायक आहेत. त्यामपैकी अरूण हे आग्रा घराण्या्चे सुप्रसिद्ध गायक आहेत, तर विकास हे संगीततज्ञ आहेत. कशाळकरांच्यार पत्नी संजिवनी कोलकाता आकाशवाणीत असिस्टंट स्टेशन डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. संमिहन कशाळकर हा मुलगा. तो वडिलांकडेच गाणे शिकत असून कोलकात्याला एस.आर.ए.मध्येू शिष्यवृत्ती धारक आहे. मा.उल्हास कशाळकर अखिल भारतीय पातळीवरील ‘क्रिटिक असोसिएशन’च्या मानाच्या पुरस्काराने गौरवले गेले आहेत. त्यां ना संगीत नाटक अकादमी पुरस्कार २००८ साली प्राप्ता झाला होता. त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून, ते ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात २००६ मध्ये, तर अॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात २००८ मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. मा.सुरेश तळवलकरांच्या तबलासाथीचे व उल्हास यांच्या गाण्याचे अद्वैत आहे. उल्हास याच्या गाण्याच्या प्रवासात तळवलकरांचा सहभाग मोठाच. सुरेश तळवलकर म्हणतात,“काही वर्षांपूर्वी उल्हासचे गाणे ऐकून लोक वाहवा म्हणायचे. आता आहाहा म्हणतात. दोन शब्दांतील फरक रसिकांना ठाऊक आहे. भारतीय अभिजात संगीत काळाबरोबर झेपावले आहे आणि कशाळकर हे त्याचेच निदर्शक आहेत.”
उल्हास कशाळकर यांची वेबसाईट www.ulhaskashalkar.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. थिंक महाराष्ट्र / मकरंद वैशंपायन
(१८८७-१९५९)
कोल्हापुर जिल्हयातील कुंभोज गावी (ता. हातकणंगले) एका जैन शेतकरी कुटुंबात भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेव्हिन्यू खात्यात लेखनिक म्हणून नोकरीस होते. भाऊरावांना त्यांच्या वडिलांनी कोल्हापुरला शिक्षणासाठी ठेवले. तेथे त्यांच्यावर सत्यशोधक समाजाचे संस्कार झाले. महात्मा फुले, विठठ्ल रामजी शिंदे व मुख्यत्वेकरून शाहू महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला. परंतु मतभेद झाल्याने त्यांनी कोल्हापुर सोडून सातार्यास विक्रेता म्हणून नोकरी धरली. ही नोकरी करीत असताना त्यांना ग्रामिण भागातील लोकांना शिक्षण मिळाले तर त्यांचे प्रश्न सुटतील हे त्यांच्या लक्षात आले व त्यासाठी १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेसाठी त्यांनी पैसे जमा केले. शिक्षणाच्या कार्याला वाहून घेतील अशा सहकार्यांचा संच उभा केला व खेडयापाडयातील लोकांनी त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास पाठवण्यास प्रवृत्त केले. जातीप्रमाणे वसतिगृहे असू नयेत असे भाऊरावांचे मत होते. त्यांचा स्वतःचा जैन वसतिगृहाचा अनुभव वाईट होता. म्हणून सर्व जातीधर्माच्या मुलांना खुली असणारी वसतिगृहे सुरू केली. ब्राह्यणेतर चळवळीतील इतर नेत्याप्रमाणे राष्ट्रवादी चळवळीपासून दूर न रहाता भाऊरावांनी आपल्या परीने त्या चळवळीस हातभार लावला. आयुष्यभर खादी वापरली. पण राजकीय काम करण्याऐवजी रचनात्मक कार्यास वाहून घेतले. १९४२ च्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांना मदत केली.
त्यांच्या रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात शाळा व महाविद्यालयांचे जाळे विणले. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे विद्यापीठाने त्यांना १९५९ मध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्याच वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले.
रिकी पॉन्टिंग हा क्रिकेट जगताचा एक अद्भुत आणि महान ‘एंटरटेनर’ मानला जातो. रिकी पॉन्टिंगला क्रिकेट जगतात पंटर या टोपणनावाने ओळखले जात असे.
बघता बघता आपण नकळत स्वतःला “शिक्क्यांची ” सवय लावून घेतो. उदा- टाटा इंडिका म्हणजे टॅक्सी, मारुती व्हॅन म्हणजे स्कूल व्हॅन, (आमच्या लहानपणी) भाजलेले शेंगदाणे म्हणजे चित्रपटाचा इंटरव्हल, तसेच पुण्यातील भनाम (भरत नाट्य मंदिर) वरचा शिक्का म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा अथवा एकांकिका.
नुकताच संत सोपानदेवांच्या अभंगांचा त्यांनी संगीतबद्ध केलेला कार्यक्रम स्मरणीय होता. त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता.
Copyright © 2025 | Marathisrushti