इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
दि. 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासुन सुरु झालेली ही यू-ट्यूब मालिका, आज प्रजासत्ताक भारताच्या घटना समितीपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची नियुक्ती झाल्यादिनी म्हणजेच दि.29 ऑगस्ट रोजी लोकार्पित करीत आहोत. अमृतमहोत्सवी वर्षात विषयानुरूप अनेक उपक्रम करणं शक्य आहे. क्रांतिकथाकथन स्पर्धा, क्रांतिगीतगायन स्पर्धा, देशभावना वाढीस लागेल, या दृष्टीनं स्वतंत्र साहित्यनिर्मिती आणि कलाविष्कार शक्य आहेत. महाराष्ट्राला पोवाड्याची मोठी परंपरा आहे पण काही अपवाद वगळता शिवकाळातच रमलेल्या शाहिरांना अमृतमहोत्सवनिमित्त क्रांतिकारकाच्या कार्यावरचे उत्तम पोवाडे लिहीण्यासाठी प्रवृत्त करता येईल.
श्रीराम लागू यांचे नटसम्राट नाटक
दि. ३ एप्रिल, हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्र शासनाने पहिला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरीताईंनाच प्रदान केला होता. त्या सोहळ्यात किशोरीताईंची एक मुलाखतही झाली होती. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किशोरीताईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच पण अनेकांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
गाण्याचं सिटिंग संपलं होतं. वाद्यांची आवराआवर करणार्या प्रभाकर जोगांना एक फेकून दिलेला कागदी बोळा सापडला. त्यानी तो सहज ऊघडला आणि त्यांचं भाग्यही त्या बरोबर ऊघडलं.
सुमित्रा भावे सिनेसृष्टीतील एक जेष्ठ दिग्दर्शिका, त्यांची निर्मिती असलेले दोन लघुपट - साखरेपेक्षा गोड - फिर जिंदगी या लघुपटांना समोर ठेऊन त्यांची चित्रपट निर्मिती कला प्रक्रिया, त्यामागचे विचार, त्यासाठी केलेली तयारी असे अनेक अंग या ध्वनी फिती द्वारे डॉ. आनंद नाडकर्णी उलगडून सांगत आहेत.
आय पी एच च्या मनतरंग फिल्म कट्टा वरील हा पॉडकास्ट .
रसिकहो क्षणभर कल्पना करा की साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट समजा मराठीत निर्माण झाला असता तर, मीना कुमारी ने आपल्या अभिनयाने अजरामर केलेलं ‘न जाओ सैंयाँ छुड़ा के बैंया’ हे गीत मराठीत कस आलं असतं. हे गीत ऐकत असताना मला नेहमी आठवतं ते पारिजात संगितीकेतल गदिमांनी लिहिलेले गीत… जळते मी, हा जळे दिवा. एका चुकीची दुरुस्ती. पारिजात संगितीकेतल हे गीत रुक्मिणी च्या तोंडी नाही तर सत्यभामेच्या तोंडी आहे. चुकीबद्दल क्षमस्व.
पु.लंच्या ‘व्यक्ती आणि वल्लीमधून’ थेट पळून आल्यासारख्या भासणार्या या ‘वल्लीनं’ गदिमांच्या घरी तळ दिला आणि मग?
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणाऱ्या ‘आदिशक्तीचा धन्योद्गार!’ या पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबरमध्ये करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी या पुस्तकात किशोरीताईंच्या निमित्ताने प्रतिभावंत कलाकार, त्याची चंचलता, अस्वस्थता, प्रतिभेचं देणं सांभाळताना त्याची होणारी होरपळ यावर मुक्त चिंतन केलं आहे.
त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय राहिला.
क्रांतिकारकांचे तुकडे केल्याने क्रांती नष्ट होत नाही, याचा दाखला दिला बंगाली शेरांनी. क्रांतीचं तिसरं पर्वही बंगालातच तेव्हा सुरू झालं, जेव्हा संपूर्ण चटग्राम शहर क्रांतिकारकांनी जिंकून अस्थायी भारत सरकारची स्थापना केली. सुभाषचंद्रांनी जे स्वयंसेवकांचे जंगी पथक उभारले होते, त्यातूनच‘’बंगाल व्हॉलेंटियर्स’ या क्रांतिदलाचा उदय झाला.
विनयचंद्र बोस यांन बंगालचं सचिवालायच ताब्यात घेण्यासाठी आक्रमण केलं त्या कहाणीसह महिला क्रांतिकारकांची माहिती या भागात घेऊया. सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.
Copyright © 2025 | Marathisrushti