नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
पंधरा-वीस दिवसांनी एके दिवशी पहाटे पाच वाजताच राहुल आणि विभा येतात. विभा जीन्स आणि टॉपमध्ये, बॉबकट, तिचे स्वागत जरा नाराजीनेच होते. दोघेही चहा घेतात. थोडा आराम करून नऊ वाजता सगळे डायनिंग टेबलवर जमतात. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर राहुल म्हणतो,
“आई-बाबा ही विभा. विभावरी कुलकर्णी आमच्या ऑफिसमधली माझी कलिग नुकतीच आमच्या कंपनीत जॉईन झाली आहे. हिचे आई बाबा बंगलूरला असतात. आज संध्याकाळी येतील तिला न्यायला.”

उत्तम मैत्र हे भाग्याने लाभते ! खरी श्रीमंती तीच असते ! त्या बाबतीत मी भाग्यवंतच. मागील एका भागात मी ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य प्राचार्य डॉ. द. ता.भोसले या अत्यन्त विद्यार्थीप्रिय अशा आमच्या कॉलेजच्या मराठीच्या प्राध्यापकांचा उल्लेख केला आहे. ते सध्या पंढरपूरला स्थायिक आहेत.


नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली .
बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .
मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो...
बसमध्ये सीटवर बसलेला बस आपल्या बापाची समजतो ...
सारखेच पैसे देऊनही एक आरामात आणि
दुसरा धक्के बुक्के किव्हा प्रसंगी शिव्याही खात असतो ...
कंडक्टर सारखा आगे बढो म्हणत असतो
शेवटी उतरणाराही दरवाज्यात पोहचत असतो...
मुंबईतील बसचा प्रवासी बऱ्याचदा चुकून
झालेल्या चुकीचाच दंड भरत असतो...
त्या चुका करण्यालाही कधी - कधी
त्याचा नाइलाज कारणीभूत असतो...
बस मध्ये पुरुषाला स्त्रीचा धक्का
लागला तर तो माफ असतो...
पण पुरुषाचा चुकूनही स्त्रीला लागला
तरी तो नालायक ठरतो...
बसमध्ये राखीव जागा मिळविण्यासाठी
जो तो धडपडत असतो ...
त्या धडपडीचा त्रासही विनाकारण निमूट उभ्याने
प्रवास करणाऱ्यांनाच सहन करावा लागतो...
म्हणूनच म्हणतो मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो ...
याच बसमध्ये कित्येकदा नवीन भांडणाचा ,
भानगडीचा आणि प्रसंगी प्रेमप्रकरणाचा जन्म होतो ...
माझ्या सारखा चुकून एकादा लेखकही या बस मुळेच घडतो ...
जो या बसमध्येच कित्येक कावितांसह
कथाही जन्माला घालतो ...
- निलेश बामणे

रवींद्र च्या मनात विचार आला की या सूर्याने कित्येक युगांतरे पाहिली असतील तरी याचा स्थितप्रज्ञ पणा अजूनही तसाच आहे. पण आज माझ्या आयुष्यात युगांतर होतंय आणि तरीही मी असा भेदरलेला, दबलेला का आहे, नाही मलाही या सुर्यासारखं स्थितप्रज्ञ, अभेद्य व्हायलाच हवं, व्हायलाच हवं.
मलेशिया, गेंटींग, थायलंड, पटाया, सींगापूर ही आम्हा मध्यमवार्गीयांच्या स्वप्नातील वारी २००७ मधे उरकली आणि अंतरराष्ट्रीय प्रवासाला चटावलो. शारजा-दुबई तर द्वीवार्षिक वहीवाटीनी आमचीच वाटायला लागलीत. मधेमधे भारतातले बरेचसे भाग पहात पहात जवळपासचे भूतान वगैरेही पादाक्रांत केल. नवीन एखाद्या डेस्टीनेशनचा विचार करता करता, अजुन खूप जग बघायच राह्यल असल तरी अचानक सिकंदर सारखा उगाचच जग जिंकण्याच्या ईर्षेनी पेटुन उठलो आणि पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आता युरोपवर स्वारी करायची असा मनसुबा जाहीर केला.
खंडाळ्यासारख्या प्रसिद्ध हिलस्टेशनमध्ये एका अत्यंत सुंदर जागी, उंच डोंगरमाथ्यावर, एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूस राजमाचीचा उंच डोंगर, समोर हिरवीगार दरी आणि चार-पाच एकरांचा विस्तीर्ण परिसर आणि त्यात एक आलिशान बंगला, अशी ही सगळी मालमत्ता कधी स्वप्नातही माझी होईल असे मला कधी वाटले नाही. कसे वाटणार? हे कसे घडले? त्याचीच तर ही गोष्ट आहे.
मी एक साधा मध्यमवर्गीय निवृत्तीनाथ! म्हणजे एक निवृत्त बँक कर्मचारी, आमच्या बँकेत निवृत्त होणाऱ्यांना निवृत्तीनाथ म्हणावयाची पद्धत. अशा आजपर्यंत निवृत्त झालेल्यात माझा नंबर होता १०८ म्हणून मला सगळे म्हणतात श्री श्री १०८ निवृत्तीनाथ! जसे जैन साधू असतात ना, श्री श्री १००८ स्वामी अमुकतमुक वगैरे, तसे. म्हणजे मी काही तसा कोणी साधू बिधू नाही बरं का.
कंडक्टर पाठीमागून एकेकाची तिकीटं काढत माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. टीव्हीचा बाॅक्स मी पायाशी ठेवला होता. मी त्याला नागठाणेचे तिकीट मागितले. त्याने सत्तर रुपये घेऊन तिकीट दिले व विचारले, ‘हा बाॅक्स कुणाचा आहे?’ मी, माझा आहे सांगितल्यावर त्याने त्याचे लगेजचे पस्तीस रुपये मागितले.

सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून तर निघाला नाही ना,याची खात्री करुन घेतली.
Copyright © 2025 | Marathisrushti