नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …
राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले.

बाळू शिंदे, हुसेन आणि मटकर हे त्रिकूट पोलिसांच्या दफ्तरात नोंदलेलं होतं.
तिघेही लहान सहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवास भोगून आले होते.
तिथेच त्यांची दोस्ती झाली होती.
त्रिकूट आता मोठे दरवडे घालायला मागेपुढे पहात नसे.
मटकर हा खरं तर इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअर.
तो आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या चोऱ्यांची आंखणी आणि अंमलबजावणी दोन्हीसाठी करत असे.
तिघे बाईकवरून फिरत असत.
इंग्रजी बोलता येत नाही शाळेत आणि कॉलेज मधील ऍव्हरेज मार्क्स आणि डिग्रीला मिळालेला एक वर्षाचा ड्रॉप आणि आठही सेमिस्टरना लागलेल्या केट्या यामुळे जिथं काम करावं लागेल तिथं अडजस्टमेंट करावीच लागणार होती.

“ती” .. लहानपणापासून मुंबईतच वाढलेली .. घरची परिस्थिती तशी बेताची .. जेमतेम शिक्षण संपलं आणि वेळीच लग्न करून दिलं घरच्यांनी .. सासर मात्र अगदी लांब होतं .. कोकणातल्या एका छोट्याश्या गावात

मुंबईतील घाटकोपरच्या पूर्वेला असलेला गारोडिया नगर हा भाग पहिल्यापासूनच उच्चभ्रू गुजराथी समाजाचा. प्रामुख्याने केमिकल्स चे कारखानदार , हिरे , किंमती खडे याचे व्यापारी यांची निवासस्थाने असलेला. फेब्रुवारी १९९० मधे या परिसरातील इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याला राहत्या घरात लुटल्याची घटना घडली.
माझ्या आयुष्यातून ‘बाबू’ या नावाच्या व्यक्तींना वजा केलेतर, हाती बावांच्याच राहील! इतके ‘बाबू’ माझ्या भूतकाळात ठासून भरलेत. बहुदा गेल्या जन्मी एक जुलमी राजा असेन, आणि माझ्या अत्याचाराला बळी पडलेली जनता, या जन्मी ‘बाबू’ होऊन, बदला घेत असावेत अशी शंका मला येऊ लागली आहे.
“अरे तुमच्या औषधांनी मिस्त्रीशेट चांगला बरा झाला. करसनची मात्र झाली ” पंचाईत. त्याचे सर्व रंगढंग बंद पडले. बापाची अफाट संपत्ती आणि हे दिवटे एकुलते एक चिरंजीव. अत्यंत उधळ्या. त्यात पोरी फिरवणे, पाटा, जुगार आणि कसले कसले नाद. बाप लेकाची रोज भांडणे व्हायची. खूप आरडाओरडा व्हायचा. अख्ख्या ससेक्स रोडचा तो एक चर्चेचा विषयच झाला होता. शेवटी कंटाळून कंटाळून शेटनी करसनला इस्टेटीचा अर्धा वाटा काढून दिला आणि करसन वेगळा राहू लागला. पण त्याच्या सारख्या कर्मदरिद्री माणसाला कितीही पैसा कसा पुरावा? काही वर्षातच कफल्लक होऊन तो परत आला. शेटनी त्याला घराबाहेर काढला. पण त्याची आई मधे पडली म्हणून शेटनी त्याला परत घरात घेतला. थोडे दिवस बरे गेले आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ”
माशाने अचानक विचारले .
याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ?
असं त्याला विचारावं , असं वाटलं .
पण काही बोललो नाही . एक म्हणजे उपयोग झाला नसता आणि दुसरे म्हणजे माझ्या मनातला विचार त्याला अगोदरच कळत होता .
तसा तो मनकवडाच होता .

विजयच्या आयुष्यात काय ? कोणाच्याच आयुष्यात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही ! यावर विजयचा ठाम विश्वास होता. विजयचा पाय दुखणे ! तो ही सलग चार महिने ! कोणत्याच उपचारालाही प्रतिसाद न मिळणे . ही विजयला एक सामान्य घटना नक्कीच वाटत नव्हती… या चार महिन्यात विजयासह अनेकांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्या चार महिन्यांमुळे अनेक घटना घडणार होत्या. विजयला सध्या तो जी नोकरी करत होता ती नोकरी त्याला सोडायचीच होती पण ती सोडायला काही ठोस कारण मिळत नव्हते.
Copyright © 2025 | Marathisrushti