(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • माझा बाळ कुठे गेला

    त्या वर्षी अण्णांनी याच मैना च्यापटीत संपूर्ण धना. केला होता. त्याकाळी पाऊस भरपूर पडत होता निसर्ग हिरवागार दिसत होता. शेतीने हिरवा गार शालू परिधान केला होता इतका निसर्ग शोभून दिसत होता. कोकिळा आनंदाने झाडावर गात होती गावातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

  • अकल्पित 

    साधारण दहा अकराची वेळ असावी. रविवार सकाळ. वर निळेशार आकाश. मध्येच एखादा पांढऱ्या ढगाचा ठिपका. दोन घरी अगदी संथपणे लांब उंचावर घिरट्या घालत होत्या. एकूणच शांत वातावरण होते. वाऱ्याची एखादी मंद आल्हाददायक झुळूक मधूनच जाणवत होती. त्या झुळुकेवरून आतील कॅन्टीनमधून बनणाऱ्या आमलेटचा खमंग सुखद वास तेथील पोहोणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता.

  • सावित्रीची लेक

    १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले व पुणे शहराची अपरिमित हानी झाली. हजारो कुटुंबांचे संसार वाहून गेले. त्या पुरामध्ये डेक्कन परिसरात आपल्या आईसोबत राहणाऱ्या पारू या तरुणीचं घरही वाहून गेलं.
    स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या भिल्ल समाजातील पारूला लहानपणापासून शिक्षणाची ओढ होती. ती लहान असतानाच वडिलांचे निधन झाल्यावर आईने तिला घेऊन पुणे गाठलं. धुणी भांड्यांची कामे करुन पारूला शाळेत घातले. सातवी पास झाल्यानंतर ही पुराची घटना घडल्याने तिच्या आईने अहमदनगर मधील सुपे येथे मुक्काम हलवला. पारूचं शिक्षणही थांबलं. यथावकाश आईनं, मनाजी बर्गे याच्याशी तिचं लग्न लावून दिलं.
  • उणा आनंद…….

    टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रंगमंचावरून मानसच्या नावाची घोषणा झाली,
    “आणि आपल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे, पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत……….”
    संपूर्ण सभागृह त्याच्या रंगमंचाकडे येण्याची प्रतीक्षा करत होतं. उत्तेजनार्थ क्रमांकापासून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या घोषणेपर्यंत तो ही टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करत होता, आणि मनातून निराशही होत होता. प्रचंड रहदारीमधून बसचा दीड पावणेदोन तासाचा प्रवास करून आला होता तो बक्षीस समारंभाला. ही स्पर्धा त्याच्यासाठी फार महत्त्वाची होती. गेली तीन वर्ष , पहिल्या तीन क्रमांकात येण्यापासून या स्पर्धेने मानसला हुलकावणी दिली होती. आजवर अनेक काव्यस्पर्धांवर त्याने आपल्या काव्यरचनेची मोहोर उमटवून यश प्राप्त केलं होतं. आजही घरून निघताना, मानसने प्रत्येकाची चाचपणी करून पाहिली, आपल्यासोबत येण्यासाठी. काही ना काही कारण सांगून, प्रत्येकानेच नकार दिला होता. आणि तसंही आजवर त्याला मिळालेल्या प्रत्येक पारितोषकासोबत तो एकटाच घरी आला होता. सवय झाली होती, तरीही प्रत्येक वेळी घरच्या कुणी सोबत यावं, असं मनोमन वाटायचं त्याला. उत्तर माहीत असूनही तो प्रत्येकाला विचारायचा, आणि अखेर एकटा चालता पडायचा. आजही तो एकटाच उपस्थित होता त्या भरलेल्या सभागृहात.
  • एक परीस स्पर्श… ( भाग -२९ )

    तो रस्ता काढत काढत त्या माडीच्या  दरवाज्यापर्यत पोहचतो तो दरवाज्यात पोहचताच आपोआप माडीचा दरवाजा  उघडतो…तो आत जातो तर आत अतिशय सुंदर खोली असते…त्या खोलीत मस्त अत्तराचा सुगंध दरवळत असतो… पण त्या खोलीत कोणी नसते म्हणून तो जिना चढून पहिल्या मजल्यावर जातो तर तिथे सुंदर स्वयंपाक घर असते…तेथेही कोणी नसते…दुसऱ्या मजल्यावर देवघर असते, तिसऱ्या मजल्यावर शयन कक्ष असते. चौथ्या मजल्यावर बैठकीची खोली असते…पाचव्या मजल्यावर वाचनालय असते…सहाव्या मजल्यावर…मोकल्या  जागेत फक्त सतरंजी अंथरलेली असे पण तेथेही कोणीच नसते शेवटी तो सातव्या मजल्यावर पोहचतो तर तेथे एक दाढी वाढलेले साधू महाराज ध्यानाला बसलेले असतात. तो राजकुमार जाऊन त्यांच्या पाया पडतो…

  • मुंबईतील बसचा प्रवास

    मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो...

    बसमध्ये सीटवर बसलेला बस आपल्या बापाची समजतो ...

    सारखेच पैसे देऊनही एक आरामात आणि

    दुसरा धक्के बुक्के किव्हा प्रसंगी शिव्याही खात असतो ...

    कंडक्टर सारखा आगे बढो म्हणत असतो

    शेवटी उतरणाराही दरवाज्यात पोहचत असतो...

    मुंबईतील बसचा प्रवासी बऱ्याचदा चुकून

    झालेल्या चुकीचाच दंड भरत असतो...

    त्या चुका करण्यालाही कधी - कधी

    त्याचा नाइलाज कारणीभूत असतो...

    बस मध्ये पुरुषाला स्त्रीचा धक्का

    लागला तर तो माफ असतो...

    पण पुरुषाचा चुकूनही स्त्रीला लागला

    तरी तो नालायक ठरतो...

    बसमध्ये राखीव जागा मिळविण्यासाठी

    जो तो धडपडत असतो ...

    त्या धडपडीचा त्रासही विनाकारण निमूट उभ्याने

    प्रवास करणाऱ्यांनाच सहन करावा लागतो...

    म्हणूनच म्हणतो मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो ...

    याच बसमध्ये कित्येकदा नवीन भांडणाचा ,

    भानगडीचा आणि प्रसंगी प्रेमप्रकरणाचा जन्म होतो ...

    माझ्या सारखा चुकून एकादा लेखकही या बस मुळेच घडतो ...

    जो या बसमध्येच कित्येक कावितांसह

    कथाही जन्माला घालतो ...

    - निलेश बामणे

     

  • वश्याच ‘ क्युट ‘ लफड

    आता येथे वश्याचा अल्प परिचय करून देणे क्रमप्राप्त आहे. (जेसे जसे तुम्ही आमच्या सोबत रहाल तसे तसे त्याचा दीर्घ परिचय होईलच ! ) याचे नाव वसंत जोशी . आम्ही याला वश्याच म्हणतो. (आणि म्हणत राहणार . तो त्याच लायकीचा आहे ! ) तो भरमसाट किमतीचे कळकट कपडे घालतो. कारण तो स्वतःला आधुनिक (त्याच्या भाषेत मॉड !) समजतो. ठीगळाचे शर्ट , मुंडीछाट टी-शर्ट ,फाटक्या , विटक्या रंगाच्या जीनच्या पॅंटी , त्याच्या भाषेत ‘कूल ‘असतात ! आम्हाला, म्हणजे मला अन शाम्याला हा ‘कंट्री’समजतो . आमच्या वश्याचे (आता मित्रच कि, मग त्याला परका तरी कस म्हणायचं? ) दोन वीक पॉईंट आहेत . एक हा मोबाईल आणि ….. बाईल ! म्हणजे हा थोडासा त्या बाबतीत हा …. आहे . हा कुठेही, कोणाच्याही , अन कसाही तो प्रेमात पडू शकतो ! (आज पर्यंत तो खूपदा पडलाय ! काही वेळेला गुडघे ,कोपर सडकून निघालेत ! पण गडी ऐकत नाही !) कोणती हि ‘ती ‘ त्याला ‘क्युट’च दिसते ! याबाबतीत तो काळ ,वेळ , वय (त्याचे आणि तिचेही !), प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष कसाही प्रेमात पडू शकतो .

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार ( भाग २१)

    प्रत्येक व्यक्ती ही कवी असते! तसेच प्रत्येक व्यक्ती ही लेखक कलाकारही असते! असे मी माझ्या व्याख्यानातून नेहमी सांगत असतो. फक्त व्यक्तीला व्यक्त होता आले पाहिजे! त्यासाठी साहित्याची , वाचनाची , चिंतनाची , कलेची अभिरूची असणे ही अत्यंत अत्यावश्यक असते! सहवास आणी संगत यातून या गोष्टी जन्म घेतात.

  • डोके ज्याचे त्याचे

    झिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात. ट्रॅकटरने शेत नागरल्यासारखं दिसत ! त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस’ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच, मागे, पुढे नायतर उभे शिंगा सारखे !

  • नवे जावई आले

    कानी मोबाईल, गालात हसतेय, ताई आमची खुषीत दिसतेय
    दारापुढे स्कूटर थांबली, ताई धावत बाहेर गेली
    मिस्टरांची स्वारी आली, ताईसाहेबांची कळी खुलली
    आई-बाबा स्वागता आले, आजी-आजोबा खुष झाले
    मी पण पुढे सरसावले, भावोजींच्या कानी लागले
    जावई आले नवे जावई आले, घर-दार खुष झाले

    -- सुधा नांदेडकर