(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • कुलूप

    पन्नास वर्षांपूर्वीचा पहिलीचा वर्ग. मुलांचा वर्गात चिवचिवाट चाललेला. बाई वर्गात येतात आणि मोठ्या आवाजात मुलांना सांगतात, ‘हाताची घडी, तोंडाला कुलूप!’ एका क्षणात मुलं हाताची घडी घालतात व गप्प बसतात. तेव्हा त्या लहान मुलांच्या मनात पहिला धडा गिरवला जातो की, ‘कुलूप’ याचा अर्थ ‘बंद’!

  • वारसा…

    आरतीचं ताम्हन धरायला जड जाईल असा विचार करणाऱ्या बाबांना आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं देखील जड जाऊ लागलंय. त्यांचा तो जोर वाढत्या वयामुळे कधी ओसरला ते कळलंच नाही.

  • जमवा–जमव

    सुंदर कथा…पहिल्या रात्री पर्यंतच्या न केलेल्या प्रवासाची.

  • अलाकान

    आजपर्यंत १८० चित्रपट करणाऱ्या या रेखा नावाच्या ‘खुबसूरत’ अभिनेत्रीने काही अविस्मरणीय चित्रपटही दिले, ज्या चित्रपटांची निर्मिती जणू काही तिच्यासाठीच केलेली होती.. ‘खुबसूरत’ चित्रपटात तिने अल्लड तरुणीची, हलकीफुलकी भूमिका केली. ‘उत्सव’ मधील तिची वसंतसेना कुणीतरी विसरु शकेल का? ‘उमराव जान’ चित्रपटात तर तिने ‘जान’च ओतली आहे.. ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील जोहराबाईला, खुद्द लंबूही विसरला नाही, मग आपली काय पत्रास?

  • कथा काळोखाची !

    महाराज कृष्णकुंभांनी राजकुमारी कृष्णाकडे नजर टाकली. आज काहीतरी बिनसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना काय समस्या आहे हे त्यांनीच विचारावे हि महाराजांची अपेक्षा होती. म्हणून ते वाट पहात होते. कृष्णा उद्याच्या, या महाकाय सामराज्याच्या एकमेव उत्तराधिकारी होत्या. त्याना तीक्ष्ण बुद्धीचे वरदान मिळालेले होते. पण अजून पोर वयाचं. अनुभव नगण्यच होता. 

  • माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)

    माझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला “तेंडोलकर युनिव्हर्सिटी” म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज नव्हते, त्यामुळे कोंकण, सातारा, इथले सर्व विद्यार्थी तिथेच येत. महाविद्यालयीन अभ्यासाबरोबरच कसं रहावं, कसं वागावं, ह्याचे धडे त्यांना तेंडोलकरांच्या घरी मिळत. त्यामुळे ते आपलं शिक्षण तेंडोलकर युनिव्हर्सिटीत झालं आहे असं अभिमानाने सांगत. पहिली गोष्ट तिथे शिकवली जाई ती म्हणजे काम करणे महत्त्वाचे. तिथे राहिलेल्याला पुढे आयुष्यात कधीही कोणतेही काम करायला लाज वाटायची नाही. आजोबा स्वतः श्रमप्रतिष्ठा आचरणारे होते. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च न करणे. छानछोकीवर पैसे वाया न घालवणे. तिसरी गोष्ट निर्व्यसनीपणा. कोणतेही व्यसन लावून घ्यायचे नाही.

  • हे माझ्या सदैव लक्षात राहील

    माझे जीवन असंख्य अनुभवांनी घडलेले आहे. मला लिहिण्याची (लिखाणाची) सवय नव्हती. परंतु कित्येक घटना अशा अनुभवल्या की त्यांना शब्दात उतरविण्याची इच्छा झाली. एका छोट्याश्या गावामधून राज्याच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याच्या माझ्या प्रवासात मला आलेले अनुभव की ज्यापासून मी काही शिकले, प्रेरणा मिळविली व त्याचप्रमाणे माझे व्यक्तिमत्व घडले, त्यांना पुस्तक स्वरुपामध्ये गोष्टीरूपात मी प्रसिद्ध करीत आहे.

  • वो भारत देश है मेरा

    आज सकाळीच सोसायटीच्या मैदानावर, झेंडावदनाची तयारी चालू झालेली दिसली. ते पाहून मला माझे शाळेचे दिवस आठवले. पहिली ते चौथी, मी सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेत होतो. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला, सकाळी सात वाजता गणवेशामध्ये झेंडावंदन होत असे. कार्यक्रम संपल्यावर मुलांना चाॅकलेट्स वाटली जात असत. शाळेच्या फाटकातून बाहेर पडताना. झेंडे, खिशाला लावायचे बॅज, झेंड्याची भिरभिरं विकणारे उभे असायचे. घ्यायची इच्छा असूनही खिशात पैसे नसायचे. मन खट्टू व्हायचं.

  • मुंबईचा हवालदार

    मुंबईतील गर्दी हीच सुरक्षिततेचा विश्वास देते. पूर्वी मुंबईचा पोलीस हे नागरिकाना सुरक्षेच प्रतीक वाटायच. पण आता काय झालंय कुणास ठाऊक, पण मुंबईच्या पोलिसांचा ताल बदललाय.

  • “मन’मोहना’ऽऽ, तू राजा ‘मनोरंजना’तला”

    मोहनच्या वडिलांचं, मनोहर (अण्णा) कुलकर्णी यांचं विजय थिएटरच्या तळघरात ‘मनोरंजन पब्लिसिटी’चं आॅफिस होतं. मनोहर कुलकर्णी, डॅडी लोणकर व नाना रायरीकर या तिघांनी मिळून ‘मनोरंजन’ची स्थापना केली. नाटकांसाठी थिएटर बुकींग, नेपथ्य, जाहिरात, लायसन्स अशा सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारं पुण्यातील हे एकमेव ठिकाण होतं.