नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

गेल्या ५/६ दिवसात मौशुनी भूतान देशातील विविधता पाहिली, रीन्पोंची बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास, आदराची भावना या सर्व गोष्टींचा खोल परिणाम तिच्या मनावर झाला होता. तिला एक वेगळेच जग पाहण्यास मिळाले होते, पण मनाच्या दुसऱ्या कप्प्यातून तिचा भूतकाळ उलगडू लागला होता.

तशी ती काही लहान नाही आणि मोठीही नाही परंतु तिला मात्र आपल्या शरीरात बदल होत आहे हे मात्र जाणवत होते. तिचे वावरणे मला जाणवत होते , मलाही गम्मत वाटत होती कारण तिचा अभ्यास , तिचे पाठांतर सगळे काही उत्तमच होते. एक वेगळाच बुरखा घेऊन ती वावरत असे मला वाटत असे .
“सकाळी मला जाग आली ती दारावर कुणीतरी जोरजोरात धक्के मारत होते त्या आवाजाने. मी जागी झाले आणि मनात पहिला विचार आला तो ह्यांचा. आम्हा दोघांना एकत्र पाहिले तर आमची धडगत नाही या विचाराने माझा थरकाप झाला. मी चटकन शेजारी सूर्यकांत राजेंना उठवावे म्हणून पाहते तर तिथे कुणीच नाही! या सगळ्या विचारात एखादा क्षण गेला असेल नसेल तो पर्यंत दरवाजा आता मोडतोय की काय असे प्रचंड धक्के बसू लागले. मी घाईघाईने उठून दरवाजा उघडला तो समोर राणीसाहेब, म्हणजे माझ्या सासूबाई! त्यांनी एकदम हंबरडा फोडला आणि माझ्या अंगावर खेकसून ओरडल्या, “ही! ही! चांडाळीण, पांढऱ्या पायाची अवदसा! हिने खाल्ले माझ्या पोराला. चल चालती हो माझ्या घरातून!” असे म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि मला ओढू लागल्या. लोकांनी त्यांना आवरले. खाली दिवाणखान्यातून प्रचंड रडारडीचा आवाज येत होता. मी अगदी भांबावून गेले. मला कळेना हा काय प्रकार आहे? जिन्यावरून धावत धावत खाली आले तर हॉलमध्ये पांढऱ्या चादरीत सूर्यकांत राजेंना झाकून ठेवलेले! आसपास शिकारीला गेलेली सगळी मंडळी माना खाली घालून उभी!
माझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो.
१९९० च्या सुमारास एक पंधरा सोळा वर्षांचा खेडवळ तरुण मुलगा आमच्या ऑफिसमध्ये आला. त्याला ‘मनोरंजन’च्या मोहन कुलकर्णीने डिझाईसाठी, आमचा पत्ता दिला होता. अत्यंत साध्या कपड्यामधील त्याला पाहून, हा कोणत्या कामासाठी आपल्याकडे आला असेल? याचा विचार मी करु लागलो.
तो मी नव्हेच’ नाटकामध्ये, ‘लखोबा लोखंडे’ची आपण अनेक रूपं पाहिली. त्यामध्ये व्यक्ती एकच होती, त्यानं बदलली होती ती, स्वतःची रूपं… तसंच आपल्याला आत्ताच्या पावसाबद्दल सांगता येईल.. पाऊस तोच, मात्र त्याचं पडण्याचं ठिकाण बदललं की, त्याची रूपंही बदलत जातात..
कल्पनाचं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. किशोरनं तिला पाहताक्षणीच पसंत केलं होतं. किशोरचे आई-बाबा दोन वर्षे त्याच्यासाठी मुली पहात होते. प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने लग्न काही ठरत नव्हतं. किशोर चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याला शिकलेली आणि गृहकृत्यदक्ष अशी पत्नी हवी होती. त्याच्या आईचा तो लाडका असल्याने आईने त्याच्याच पसंतीला महत्त्व देण्याचे ठरविले होते. किशोरचे बाबा मात्र दोघांच्या समाधानातच स्वतःचा आनंद मानणारे होते. कल्पनाला किशोरने पसंत केले. रितीरिवाजानुसार लग्नकार्य पार पडले. चौघे आनंदाने राहू लागले. वर्षातील सणवार परंपरेनुसार पार पडले. काही दिवसांनी नव्याची नवलाई संपुष्टात आली आणि घरातील वातावरण पहिल्यासारखं राहिलं नाही. कामापुरतंच एकमेकांशी बोलणं होऊ लागलं. कल्पना हुशार होती. तिनं एका रविवारी किराणा दुकानातून एक छोटं रिकामं खोकं आणलं. त्यावर रंगीत कागद चिकटवून ते पॅकबंद केलं. त्याच्या वरच्या बाजूला एक काॅईन बाॅक्ससारखी दोन इंचाची चीर पाडून ठेवली.

आरूने गेल्या दोन दिवसांत नीलला अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडले होते. पण ‘आज तुला डॉ. जोशींकडून योग्य ती सर्व उत्तरे मिळतील’ असे नीलने तिला सांगितले. अर्धा तासाने सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले.
आपल्या सामर्थ्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देणारा, खूप जवळचा तरीही तटस्थ, कटू असलं तरी सत्य तेच सांगणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती’ च्या पलीकडचं नातं असणारा…निर्मळ आरसा! असा किमान एक तरी आरसा प्रत्येकाला हवाच!!
पूर्वी पावसाळा सुरु झाला की, माळ्यावर ठेवलेल्या छत्र्यांचा शोध घेतला जायचा. त्या नादुरुस्त असतील तर त्यांची दुरुस्ती केली जायची. प्रत्येक पेठेतील एखाद्या चौकात छत्री दुरुस्ती करणारा दिसायचाच. काही फिरते छत्री दुरुस्ती करणारे गल्लीतून ‘ए छत्रीऽऽवाला’ असं ओरडत जाताना दिसायचे. जुन्या काळ्या छत्र्या, मोठ्या आणि दणकट असायच्या. तिची मूठ लाकडी असायची. कापडही चांगल्या दर्जाचं असायचं. दहा वीस वर्षांचे पावसाळे त्या आरामात सहन करायच्या.
Copyright © 2025 | Marathisrushti