(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • अहमदनगर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) या जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो.

  • स्पेन

    स्पेन, अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत.

  • मायक्रोनेशिया

    मायक्रोनेशिया हा ओशनिया खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे.

  • इराक

    इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण, दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • ठाणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    ज्येष्ठ साहित्यिक. यांचा जन्म ठाणे येथे झाला. ”सत्यकथा’ या मासिकाचे ते काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी १९४१ साली नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली. कन्यादान, भटाला दिली ओसरी ही त्यांची काही प्रसिद्ध नाटके होत.

  • अफगाणिस्तान

    अफगाणिस्तान हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, वांशिक, भाषिक व भौगोलिक संबंध जोडले गेले आहेत. महाभारतामधील कौरवांचा मामा व गांधारीचा बंधू शकुनी मूळ ह्याच देशातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरनौबत नेताजी पालकर याला औरंगजेबाने जबरदस्तीने मुसलमान करून अफगाणिस्तानातच ठेवले होते. एकेकाळी आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संप्पन्न व प्रगत होता. पण आज हा देश दुर्दैवाने जागतिक दहशतवादाचे प्रमुख केंद्र बनला आहे. अफगाणिस्तानमधील सोव्हियेत युद्धानंतर अनेक वर्षे चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबान ह्या अतिरेकी गटाची सत्ता होती. २००१ सालच्या नाटोच्या आक्रमणादरम्यान तालिबानचा पाडाव झाला व हमीद करझाई राष्ट्राध्यक्षपदावर आला. सध्या येथे अध्यक्षीय प्रजासत्ताक आहे.

    अफगाणिस्तानची लोकसंख्या २९ दशलक्ष असून, क्षेत्रफळ ६४७,५०० वर्ग किलोमीटर एवढे आहे. आकाराच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४१ वा असून, लोकसंख्येच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४२ वा आहे. काबुल ही अफगाणिस्तानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

    अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पूर्व भागात पाकिस्तान व पश्चिमेला इराण हा देश आहे; तसेच उत्तरेला तुर्कमेनिस्तान, उझबेगिस्तान व ताजिकिस्तान हे देश आहेत.

    राजधानी काबूल अफगाणिस्तानचे सगळ्यात मोठे शहर आहे. येथे दहा लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. याशिवाय कंदहार, हेरात, मझार ए शरीफ, जलालाबाद, गझनी व कुंडुझ ही इतर मोठी शहरे आहेत.

    राजधानी व सर्वात मोठे शहर : काबुल
    अधिकृत भाषा : दारी, पश्तू
    स्वातंत्र्य दिवस : ऑगस्ट १९, इ.स. १९१९

    देश : अफगाणिस्तान
    राजधानी : काबूल
    चलन : अफगाण अफगाणी


    Country : Afghanistan
    Capital city : Kabul
    Currency : Afghan afghani
    Calling code : 93
    Country Domain : .af

    ( Source : Wikipedia )

  • पाच डोंगरांच्या समूहावर वसलेले पाचगणी

    पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे.

  • कांचिपुरम

    कांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे.

  • महाराष्ट्रातील भद्रावती वरदविनायक

    महाराष्ट्रातील भद्रावती या शहरापासून ३ कि.मी. अंतरावर वरदविनायकाचे पुरातन मंदिर आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी वरद विनायक एक गणपती आहे.

  • रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    महाराष्ट्राच्या कोंकण किनारपट्टीत नैऋत्येला रत्नागिरी जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.