महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
साक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे.
अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आल्यानंतर त्यांनी आपला आश्रम गोदावरीकाठी बांधला. त्यानंतर अनेक ऋषी-मुनी या भागात आले. मुद्गल ऋषींच्या तपश्र्चर्येने पावन झालेले मुद्गल हे गाव, गोदावरी नदीचा किनारा, वाल्मिकी ऋषींमुळे पावन झालेले वालूर (सेलू) व पांडवांपैकी पार्थाने (अर्जुनाने) वसविलेले पाथरी(पार्थपूर)-अशा परभणी जिल्ह्यातील भागांचे उल्लेख पुराणात आहेत.
जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
जालना जिल्ह्याचे गेल्या काही वर्षात झपाट्याने औद्योगिकीकरण झाले आहे. मनमाड-काचीगुडा हा रुंदमापी लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.
आळंदी अर्थात संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी, व देहू हे संत तुकारामांचे गाव ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. अष्टविनायकांपैकी पाच गणपती महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे.
सायप्रसचे प्रजासत्ताक (ग्रीक: Κυπριακή Δημοκρατία; तुर्की: Kıbrıs Cumhuriyeti) दक्षिण युरोपामधील एक हा द्वीप-देश आहे. सायप्रस भूमध्य समुद्रात ग्रीसच्या पूर्वेला, तुर्कस्तानच्या दक्षिणेला, सिरिया व लेबेनॉनच्या पश्चिमेला व इस्रायलच्या वायव्येला एका बेटावर वसला आहे. सायप्रसला युरोप व आशिया ह्या दोन्ही खंडांत गणले जाते. सायप्रस १ मे २००४ पासून युरोपियन संघाचा सदस्य आहे. निकोसिया ही सायप्रसची राजधानी आहे.
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-देश आहे. व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम शहरामध्ये वसले आहे व पोपचे अधिकृत निवासस्थान आहे.
अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल व डाळ बनवणाऱ्या मिल आहेत.
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) या जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो.
महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti