वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

ह्याचा १.५-४ मीटर उंचीचे काटेरी गुल्म असते.पाने बळकट व भोवऱ्याच्या आकाराची अखंड व कडेला काटे असलेली असतात.पुष्पमंजिरी ५-८ सेंमी लांब असून फूल पिवळे व मोठे असते.फळ निळ्या तांबड्या रंगाचे व बेदाण्या प्रमाणे दिसणारे असते.काष्ठ गडद पिवळ्या रंगाचे असून पाण्यात उकळल्यावर ही पिवळेपणा टिकून राहतो.
दारूहळदिचे उपयुक्तांग काण्ड,मुळ,फळ व रसांजन आहे.ह्याची चव कडू,तुरट असून ती उष्ण गुणाची व हल्की व रूक्ष असते.ह्याचे काण्ड मुळ चवीला कडू तुरट असल्याने कफ व पित्तनाशक असून फळ पित्त शामक आहे.
चला आता आपण दारूहळदीचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)दारूहळद दीपन,यकृत्तोत्तेजक व पित्तसारक असून मळ बांधून ठेवते म्हणून भुकन लागणे,आव पडणे ह्यात उपयुक्त आहे.
२)कफनाशक असल्याने दारूहळद खोकल्यात वापरतात.
३)त्वचारोग,खाज,स्त्राव कमी करायला दारूहळद लावायला व पोटात घ्यायला देतात.
४)स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास दारूहळदीचा काढा देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©Dr Swati Anvekar
कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.

कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!

नागरिक म्हणजे कोणताही मनुष्य. एखाद्याचे नागरिकत्व तो ज्या देशात जन्मला त्या देशाच्या नियमानुसार ठरते. जसजसे मूल मोठे होते तसतसे ते मूल घडत जाते. कुटुंब व समाज यांचे संस्कार त्याच्यावर होतात. नागरिक घडण्याची प्रक्रिया सुरू राहते, अगदी शेवटपर्यंत. हे मूल पुढे वेगवेगळ्या वयोगटात ‘नागरिक’ म्हणून कोणत्या प्रकारे आविष्कृत होते? चांगल्या की वाईट? कसं ठरवायचं? कोणी ठरवायचं? सर्वांनी ते का मान्य करायचं? खूप प्रश्न पडतात.
उंच आणि चष्मिस अंशुमनचा कॉलेजमध्ये असतानाच १७ व्या वर्षी बडोद्याच्या रणजी संघात समावेश झाला. बडोदा आणि पश्चिम विभागासाठी ६ वर्षे धावांच्या राशी ओतल्यावर अखेर डिसेंबर १९७४ मध्ये अंशुमनचा वेस्ट इंडिजविरुद्ध कलकत्ता कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला.
होन्सफील्ड या शास्त्रज्ञाने संगणकाचा व क्ष किरण शास्त्राचा उपयोग करुन हाडे व फुफ्फुसे या व्यतिरीक्त क्ष-किरणांनी प्रतिमा निर्माण करुन व नुसत्प्रतिमाच नव्हे तर अतिसूक्ष्म फरक कळू शकणारे स्वच्छ व अचूक प्रतिमाशास्त्र मानव जातीला देऊन या क्षेत्रात क्रांतीच केली.

आकाशनिरीक्षणाच्या दृष्टीनं उत्तम आकाश म्हणजे कसं? हजारो ताऱ्यांनी गच्चं भरलेलं… आकाशगंगेच्या पट्ट्याचं सहजपणे दर्शन देणारं… तेजस्वी ताऱ्यांपासून ते अगदी अंधूक ताऱ्यांपर्यंत सर्वांना ‘सामावून’ घेणारं! अर्थात हे वर्णन झालं शहरापासून दूरवरच्या आकाशाचं – जिथे इतर कोणत्याही प्रकाशाचा स्रोत अस्तित्वात नाही, अशा ठिकाणचं. शहरात अर्थात असं आकाश दिसणं शक्यच नाही.

इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं!


'सामर्थ्य आहे चळवळीचे' ही समर्थांची उक्ती सर्वज्ञात आहे. निश्चितच चळवळीत सामर्थ्य असते. अशाच एका चळवळीच्या सामर्थ्यातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
भारतातील डिजिटल इकोसिस्टमची वाढ अनेक घटकांमुळे झाली आहे, ज्यात सरकारचा डिजिटलायझेशनवरचा जोर, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि ई-कॉमर्सचा उदय यांचा समावेश आहे. भारत सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या विविध उपक्रमांद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti