(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

  • छोटीशीच; पण… खूप महत्त्वाची!

    प्रकाशन दिनांक :- 21/09/2003
    राघोबा दादांनी नारायणराव पेशव्यास 'धरावे' असा लिखित आदेश गारद्यांना दिला. तो आदेश गारद्यांच्या हाती पडण्यापूर्वी आनंदीबाईनी 'ध' चा 'मा' केला आणि शनिवारवाड्याच्या भिंतींनी अनुभवला क्रौर्याचा भीषण थरार! नारायणरावांच्या प्राणांतिक किंकाळ्यांनी अवघी पेशवाई हादरली.

  • आंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा

    हिचे हळदीप्रमाणे दिसणारे वर्षायू क्षुप असते.ह्याची पाने ६० सेंमी -१मीटर लांब असतात व कंद गोल,स्थूल आल्याच्या कंदा प्रमाणे दिसणारा व रूंदिला बारीक व अधिक पांढरा असतो.ह्या कंदाला कैरी सारखा वास येतो.

    ह्याचे उपयुक्तांग कंद असून हि चवीला कडू,गोड व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.आंबेहळद कफपित्तशामक व वातकर आहे.

    चला आता आपण हिचे काही औषधी उपयोग पाहुयात:

    १)शरीराचा कुठला हि अवयव मुरगळला असता आंबेहळदीचा लेप लावल्यास सुज कमी होते.

    २)त्वचा रोगा मध्ये खाज व पुरळ आला असता आंबेहळदीचा लेप लावतात.

    ३)आंबेहळद रक्त शुद्ध करते म्हणून रक्ताच्या विकारात उपयुक्त आहे.

    ४)चेहऱ्यावर मुरमांचे डाग अथवा मुरूमे आली असता आंबेहळदीचा लेप लावतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©️ Dr Swati Anvekar

    English Name: Mango Ginger

  • एक खांबी तंबू – एक विचार

    गेल्या ५० वर्षात, वेळोवेळी अनेक सूक्ष्म आणि लघू उद्योजकांच्या सहवासातून जी एक जाणीव प्रकर्षाने निर्माण झाली त्याबद्दलचे हे विचार.

    सातत्याने वाजणाऱ्या फोनच्या घंटीमुळे मी जरा त्रासिक पणे जागा झालो. घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजले होते. जगदीशचा फोन होता हे स्क्रीन वरील नाव आणि चेहेरा बघून समजले. एवढ्या अवेळी फोन आला की नाही म्हंटले तरी पोटात थोडे धस्स होतेच. डोळे चोळत मी विचारले, “कायरे जग्या, तुला झोप येत नाही का? अरे ज्यांना येते त्यांना तरी शांत झोपू दे ना.”

    थोड्या विलंबानंतर गंभीर स्वरात आवाज आला, “अरे शर्माची बातमी समजली का?”

    “का, काय झाले ? काल संध्याकाळी तो बडोद्याला परत जायच्या आधी तर त्याच्याशी बोललो ”

    “अरे, आत्ताच त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला होता. हायवे वर त्याची मोटार एका ट्रकला धडकून एका क्षणात सर्व काही संपले आहे. तुझे त्याच्याशी घनिष्ट संबंध होते म्हणून एवढ्या अपरात्री कळवतो आहे.”

    एका क्षणात खाडकन पूर्ण जागा झालो. शर्माशी माझा संबंध गेल्या सहा महिन्यांचा. डोळ्यासमोर एखाद्या चित्रफीतीप्रमाणे आमच्या भेटी तरळू लागल्या. चाळीशीतला शर्मा एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार उद्योजक होता. त्याने अक्षरशः शून्यातून जवळपास तीस कोटींचा धंदा उभा केला होता.

  • प्रॉब्लेम आहे ? मग त्यावर हसा

    असा कोणता माणूस नाही ज्याला प्रॉब्लेम नाही, आणि असा कोणताही प्रॉब्लेम नाही जो सुटत नाही….
    नाही, नाही…हे कोणत्याही ज्योतिषाचं किंवा काउन्सेलरच वाक्य नाही. कारण प्रॉब्लेम सुटतो की नाही, माहित नाही. पण त्याच्याकडे तटस्थपणे पाहून थोडा वेळ हसू शकता.
    एक माणूस सिनेमा थिएटरमध्ये मोठी पगडी घालून बसला होता. मागच्या माणसाला प्रॉब्लेम झाला. कारण सिनेमा दिसत नव्हता. त्याने प्रॉब्लेम कसा सोडवला पहा?
    पुढे पगडी घालून बसलेल्या माणसाला सांगितलं. अधून मधून सिनेमात काय चाललं आहे मलाही सांगा!! पगडीवाल्याला त्या बोलण्याचा अर्थ काळला आणि त्याने पगडी काढली.

  • देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो

    देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे. …… फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.

  • आत्मा हरवलेली पत्रकारिता !

    मराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. मराठी पत्रकारितेची ही थोर परंपरा पुढे लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निळकंठ खाडिलकर, ह. रा. महाजनी, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, माधवराव गडकरी, कुमार केतकर यांनी पुढे सुरू ठेवली. या पवित्र व्यवसायाचा धंदा न करता एका समर्पित भावनेने सुरू असलेली पत्रकारिता आता तशी उरली आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    माझी पत्रकारिता तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळीत प्रथम दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ आणि नंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांचे मला भरभरून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. लोकसत्ताचे तत्कालिन सहसंपादक चंद्रशेखर वाघ हे ऋषितुल्य पत्रकार माझे पत्रकारितेतील गुरु ! हाताने लिहिलेल्या बातम्यांचे कागद रोज सकाळी त्यांच्या घरी नेऊन द्यायचे आणि नंतर बँकेत कामावर हजर व्हायचे असा रोजचा दिनक्रम होता. लिहिलेल्या बातम्या, वृत्तांत ते वाचून काढायचे आणि मला समोर बसवून त्यातील चुका आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. त्यातूनच पुढे पत्रकारितेचा प्रवास उलगडत गेला आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा अनेक कुप्रथांवर कोणाचीही भिडभाड न बाळगता बिनधास्तपणे उजेडात आणायचे नैतिक बळ मिळत गेले.

  • ‘सप्टेंबर’चे सरदार (‘सप्टेंबर’महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

    ‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्म झलेल्या व्यक्ती ह्या बहिर्मुख, कार्यतत्पर, आणि परिपूर्णतेचा ध्यास घेणाऱ्या असतात असे मानले जाते. ‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

  • ‘थंड’ कापड

    शरीरातून उत्सर्जित झालेले बहुतांश अवरक्त प्रकाशकिरण, शोषले न जाता या कापडातून पार होत होते. यामुळे कापडाच्या आतलं तापमान कमी राहात होतं. मात्र या कापडाच्या वापराला एक मोठी मर्यादा होती. अवरक्त किरण न शोषता पार होण्यासाठी या कापडाची जाडी मिलीमिटरच्या विसाव्या भागापेक्षाही कमी असणं गरजेचं होतं.

  • पावसाळ्याचे सोबती

    आला पावसाळा… असं म्हणत असतानाच विविध आजारही सोबतीला येतात. या आजारांना वेळीच रोखायचं, तर आहारात काही पदार्थांचा वापर वाढवायला हवा. यात आलं, सुंठ आहेत. आणि गवती चहा हे पदार्थ महत्वाचे आहेत.

    डॉ. अर्पिता काजरेकर यांचा लेख 

  • नाईलचा बाहू

    नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती.