पुन्हा एका शिवाजीची गरज!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनप्रकाशन दिनांक :- 22/02/2004
भारतीय पुराणात सप्त चिरंजीवांचा उल्लेख आहे. बजरंगबली, अश्वत्थामा वगैरे मंडळींचा या सप्त चिरंजीवात समावेश आहे. पुराणकथांचे लेखन नेमके केव्हा बंद झाले ते माहिती नाही, परंतु ते आजतागायत सुरू राहिले असते तर त्यात आठव्या चिरंजीवी संकल्पनेची नक्कीच भर पडली असती.