(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतरत्न धोंडो केशव कर्वे

    कोकणातील मुरूड या छोट्याशा खेडेगावात 18 एप्रिल 1858 ला त्यांचा जन्म झाला. ते एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. सत्ताविसाव्या वर्षी गणित विषय घेऊन पदवीधर झाले. तर एकतिसाव्यावर्षी प्राध्यापक झाले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली ती समाजसेवेची, समाजसुधारणेची. अण्णा सुधारक होते पण फक्त शाब्दिक सुधारणा नव्हती तर ते क्रियाशील सुधारक होते. पुण्याच्या फर्ग्यसन महाविद्यालयात ते 22 वर्षे प्राध्यापक होते. त्यावेळेस 1899 साली त्यांनी `अनाथ बालिकाश्रम’ काढला

  • डॉ. प्रकाश आमटे

    आदिवासी क्षेत्रात काम करणारे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसुधारक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात.

  • गं. बा. देशपांडे

    “कर्नाटकसिंह” या नावाने असलेले प्रसिद्ध लेखक.

  • पन्नासच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शीला रमाणी

    शीला रमाणी यांनी देवानंद आणि गुरुदत्त यांच्यासोबत भूमिका केल्या होत्या. शीला रमाणी यांचा पन्नासच्या दशकात “मिस सिमला‘ हा किताब जिंकल्यानंतर १९५२ मध्ये “बदनाम‘ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले.

  • श्रीराम बाळकृष्ण मनोहर

    निवृत्त प्रमुख, रेडिओ केमिस्ट्री विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र

  • हस्ताक्षर महर्षी लक्ष्मण नारायण ऊर्फ अप्पासाहेब गोवेकर

    जन्म. ३० मे १९१५ बांदे सावंतवाडी संस्थान येथे.

    अप्पा गोवेकर यांचे शिक्षण बांदा येथेच झाले. १९३० ते मिडल स्कूल, बांदा येथून प्राथमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले.
    १९२८ साली सावंतवाडी संस्थानच्या आंतरशालेय क्रीडास्पर्धेत १५ वर्षाखालील गटात पाच मैल धावस्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी पटकावले. १९३० साली या गटात सर्वोच्च बहुमान प्राप्त केला.

    त्यांचे वडील नारायणराव गोवेकर हे बांदा मिडल स्कूलचे मुख्याध्यापक होते.त्यांचे १नोव्हेबर १९२८ रोजी आकस्मिक निधन झाले आणि गोवेकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले. पण मोठ्या जिद्दीने हे कुटुंब सावरले.
    १९३० ते १९३३ या काळात ओटवणे, सातोसे, होडावडे या ठिकाणच्या प्राथमिक शाळात रजेवरील शिक्षकांचे जागी अंश- कालिक' शिक्षक म्हणून अप्पा काम करू लागले.

    याच काळात पत्रादेवी येथील दारूदुकानांवरील यशस्वी आंदोलन, त्याचप्रमाणे प्रभातफेऱ्या, हरिजन शिक्षण यामध्ये प्रामुख्याने भाग ते घेऊ लागले. १९३४ मध्ये सावंतवाडी मोती तलावात झालेल्या पहिल्याच पोहोण्याच्या शर्यतीत पहिला नंबर मिळवून त्यांनी विक्रम केला. त्यापूर्वी १९३३ मध्ये शिक्षक म्हणून बांदा येथील मिडल स्कूलमध्ये नेमणूकही झाली होती. त्यानंतर १९३५ ते १९४३ या कालखंडात डेगवे, निगुडे, उगाडे, कोनाळ व आरोस या गांवी खात्यातर्फे बदल्या झाल्या, पण अप्पानी शिक्षक म्हणून आपली भूमिका उत्तम प्रकारे निभावली.

    १९४० साली एक पोस्टकार्डवर एका बाजूने ६००० शब्द लिहून केलेला सूक्ष्म हस्ताक्षराचा जागतिक विक्रम त्यांनी केला होता.' सुंदर हस्ताक्षर कसे बनवाल ?'

    यावर ते अधिक विचार करू लागले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु लागले. एक माहिती पत्रक त्यांनी तयार केले होते आपले व्याख्यान संपले की ते विद्यार्थ्यांना वाटत असत.

    हस्ताक्षरमहर्षी अप्पानी पाठवलेली सुंदर सूक्ष्म हस्ताक्षरांतील सुमारे २० पोस्टकार्डे लळीत यांच्या कडे आहेत. विशेष म्हणजे त्यातील एक पोस्ट खात्याला 'चकवा' देऊन छापील समजून 'नाॕटपेड 'झाले. तेव्हा अप्पानी त्यांना सांगितले होते. 'अरे पत्र आले तर दंड भरून लगेचच घे.'

    १९४३ साली उजळ माथ्याने सामाजिक व राजकीय आंदोलनांत भाग घेता यावा हेतूने शिक्षण खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन सावंतवाडीला आले. काळात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पोकळे-विडी कारखान्यात मुनीम म्हणून नोकरी ते करु लागले.१९४५ मध्ये सावंतवाडी शहरातील मलेरियाच्या उपसर्गाने सेवानिवृत्ती स्वीकारून स्वग्रामी बांदे येथे पुन्हा गेले. बांदा येथे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून १९४७ पर्यंत स्वार यांचेकडे मुनीम म्हणून नोकरी सुरू केली.

    १९४७ च्या ऑक्टोबरच्या सुमारास आबासाहेब वालावलकर यांच्या निमंत्रणावरून पुन्हा सावंतवाडी येथे ते आले व सावंतवाडी 'प्रजा परिषदे'चे चिटणीस म्हणून सुमारे ६ महिने सवेतन सेवा केली. फेब्रुवारी १९४८ सावंतवाडी संस्थान-विलीनीकरण आंदोलनात सहभागी झाले.

    अप्पानी एक निवडणूकही लढवली कारण ती बिनविरोध होणार होती. अर्थात ते निवडणूक हरले, पण त्यांनी सायकलवर फिरून प्रचार केला..'लोकशाही जीवंत ठेवली' म्हणून बॕ. नाथ पै म्हणाले,'पराभवाला प्रतिष्ठा मिळवून दिलीत अप्पा .!
    अप्पानी १९४८ ते १९५३ या काळात सुमारे सहा वर्षे साप्ताहिक वैनतेय' कचेरीत व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वीकारली. या काळातच व पुढे १९७८ पर्यंत दै.लोकसत्ता, लोकमान्य, सकाळ अशा दैनिक वृत्तपत्रांसाठी वार्ताहर म्हणून काम करू लागले. मध्यंतरी सुमारे २॥ वर्षे सावंतवाडी येथील खादी भांडाराचे कार्यवाह म्हणून विनावेतन सेवा त्यांनी केली.
    सा. 'वैनतेय कचेरीतून सेवानिवृत्तीनंतर कुटुंब निर्वाहाचे दृष्टीने वार्ताहर, विविध प्रकारचे लिहिण्याचे काम, रबरीशिक्के, छपाईकामे यांची ते करु लागले.

    १९३५ ते १९५१ या काळातच दोन नाटके, १५-२० कथा. ५०-६० शिशुगीते यांची निर्मिती. हौशी कलावंतांच्या सहाय्याने बांदा व सावंतवाडी येथे नाट्यप्रयोगात २५-३० भूमिका व काही प्रयोगांचे दिग्दर्शन, 'मदिरा' या विमल घैसास लिखित नाटकाचे प्रयोग केले.'दारूबंदी प्रचारकार्य 'म्हणून दोडामार्ग ते कणकवलीपर्यंत अनेक प्रयोग त्यांनी सादर केले.
    १९७५ मध्ये दापोली कॉलेजचे प्राचार्य माननीय चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्याकडून' हस्ताक्षर महर्षी' हा बहुमान त्यांना देण्यात आला. १९७२ मध्ये मुंबई येथे हस्ताक्षर सुधार मोहिमेचा शुभारंभ त्यांनी केला. जी आजही चालू आहे.
    १९९०-९१ पर्यत मुंबई, पुणे,कोल्हापूर, सांगली, बेळगांव या शहरांतून, त्याच प्रमाणे गोमंतक ते रत्नागिरीपर्यंत अनेक माध्यमिक विद्यालये व अध्यापक महाविद्यालये यामधून ७००च्या वर हस्ताक्षर सुधार मोहिमेची व्याख्याने त्यांनी दिली.
    १९७८ मध्ये सावंतवाडी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा सत्कार काही तात्त्विक कारणांमुळे स्वीकारला नाही.

    अप्पासाहेब गोवेकर यांनी लिहिलेल्या कथा.. कविता व अन्य लेखन यावर डाॕ. जी. ए. बुबा यांनी एक माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. चिऊमाऊ, जादुची पेटी-रेडियो अशी गीते त्यांनी लिहिली. त्यांच्या अनेक गीतांचे संकलन झालेले नाही. बालसन्मित्र,आदर्श ,वैनतेय,किरात अशा अनेक साप्ताहिकांतून त्यांच्या पंधराच्या वर कथा प्रकाशित झाल्या आहेत. म्हटले तर सहज उपलब्ध होतील. त्यांचा कथासंग्रह प्रकाशित व्हायला हवा. 'बंड्याचे लग्न 'ही त्यांची कथा वाचली की आजही ताजेतवाने वाटते. 'आसुरी आकांक्षा ' या त्यांच्या नाटकाची संहिता प्रकाशित केली तर कोकणातील हौशी नाट्य मंडळे त्याचे आजही प्रयोग करतील. त्यांचे साहित्य संकलन होऊन प्रसिद्ध व्हायला हवे अशी इच्छा जी.ए. बुवा सरांसारखे साक्षेपी समीक्षक व्यक्त करतात; त्या अर्थी ते लेखन नक्कीच लक्षवेधी असणार यात मला तरी शंका वाटत नाही.
    ' मनस्वी' व अक्षरप्रपंच' ही पुस्तके विकास गोवेकर यांनी प्रकाशित केली.

    अप्पासाहेब गोवेकर यांचे २३ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले. अप्पांनी सुरू केलेली 'हस्ताक्षर सुधार मोहिम' आजही सुरु आहे. त्यांचे चिरंजीव विकास गोवेकर ती चालवतात व दरवर्षी अप्पांच्या स्मृतीप्रित्यर्थ हस्ताक्षर स्पर्धा व अन्य उपक्रम करतात त्यात प्रकाश,उल्हास व अन्य नातेवाईक (बिले, भिसे ,टोपले,पावसकर इ.) सहभागी होतात.

    -- डॉ.बाळकृष्ण लळीत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी

    दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी

    दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे मराठी कवी व साहित्य समीक्षक आहेत. दभि कुलकर्णी या संक्षिप्त नावाने ते प्रसिद्ध आहेत. पुणे येथे २०१० साली झालेल्या ८३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.

  • हिंदी पार्श्वगायक कुमार शानू

    १९९० मध्ये आलेल्या आशिकीमुळे कुमार शानू यांच नशीब फळफळलं. महेश भटच्या या सिनेमातली गाणी खूपच गाजली. कुमार शानू व टी सिरीज वाला गुलशन कुमार यांची ९० ची सहज लोकांच्या ओठावर रुळतील अशी कर्णमधुर गाणी ज्यात सिंहाचा वाटा कुमार शानू यांचा होता. आशिकी मधील गाणी प्रेमाच्या सर्व भाव व्यक्त करणारी सर्व गाणी लोकांनी डोक्यावर घेतली.

  • पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी

    १९९४ मध्ये इंद्रा नूई पेप्सिकोमध्ये सामील झाल्या त्यांना पेप्सिकोच्या दीर्घकालीन विकास धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते.

  • गायिका अमृता फडणवीस

    गायन संगीत, नृत्य, खेळ अशा अनेक कला वेगवेगळ्या स्तरांवर येत असलेल्या अमृता फडणवीस यांना फॅशन आणि लाईफस्टाईल दुनियेत प्रसिद्ध असलेल्या SAVVY या मॅगझीनच्या कव्हर पेजवर स्थान देण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी न्युयॉर्क फॅशन विकमध्ये कॅटवॉक करत खादी ग्रामोद्योगाचा प्रचार आणि स्त्रीभ्रुणहत्या थांबवण्याचा मेसेज दिला होता.