जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
यावर्षी सुब्रमण्यम यांनी चित्रपट सृष्टीतील पाच दशकांची कारकिर्द पूर्ण केली. एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांना SPB किंवा बालू असेही म्हणतात. चाळीस हजाराहून अधिक गाणी गायल्याबद्दल त्यांच्या नावाची गिनीज बुकमध्ये नोंद आहे. त्यांना सहावेळा राष्ट्रीय पुरस्कारासह पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने ही सन्माबनित करण्यात आले आहे. १९६६ मध्ये त्यांनी गायक म्हणून पदार्पण केले. एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्यासाठी मिळाला आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, उत्कृष्ट पुरुष गायकाचा सहा वेळा पुरस्कार आणि नंदी पुरस्कार मध्ये तेलगू सिनेमासाठी 25 वेळा मिळाला आहे. मेन प्यार किया, हम आपके हैं कौन, एक दूजे के लिए अशा चित्रपटातील त्यांची गाणी गाजली. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे राजदूत (ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर) म्हणून एस. पी. बालसुब्रमण्यम करत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सृदृढ देहयष्टी, स्टायलिश अंदाज, बारीक पण तीक्ष्ण डोळे, अॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, गरजणारा आवाज आणि पावरफुल स्क्रिन प्रेझेंस या जोरावर या खलनायकाने अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारलाही रुपेरी पडद्यावर तगडी टक्कर दिली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४८ रोजी सिक्किममध्ये झाला.अग्निपथचा कांचा चीना, मेरे अपनेमधला सडकछाप संजू, धुंदमधला अपंग तरीही क्रूर पती, हममधला बख्तावर, क्रांतीवीरचा चतुर सिंग चीता किंवा मग कातिया…या खलनायकाचे निर्दयी आणि बेदरकार हावभाव आणि डोळ्यातला अंगार समोरच्याचा थरकाप उडवणारा..हा तो व्हिलन आहे ज्याच्या हुकुमशाहीत ‘हर गलती की सजा मौत है’…
डॅंनींचा पडद्यावरचा खतरनाक असला तरीही त्यांच्यामध्ये एक सोफॅस्टिकेशन आणि डिग्निटी आहे. त्यांच्या कमांडिंग पर्सनॅलिटीमुळे त्यांच्या भूमिका नेहमीच लार्जर दॅन लाइफ वाटल्या.
डॅनी डेन्ग्झोपा यांना घोडेस्वारीची आवड होती. त्यांचं कुटुंब घोडे पालनाच्या व्यवसायात असल्यामुळे त्यांची घोडेस्वारीची आवड जोपासली गेली. डॅनी यांना खरंतर भारतीय सैन्यदलात सहभागी व्हायचं होतं. पश्चिम बंगालमधून बेस्ट कॅडेट म्हणून निवड होऊन त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही सहभाग घेतला होता. पण त्यावेळी चीनसोबतच्या युद्धाच्या काळात अनेक जवान शहिद झाले. हे पाहून डॅनी यांची आई घाबरुन गेली. अखेर आईच्या सांगण्यावरुन डॅनींनी सैन्यात जाण्याचा निर्णय बदलला आणि पुण्यातल्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. सिक्किमसारख्या प्रदेशातून पुण्यातल्या एफटीआयआयमध्ये आलेल्या डॅनींसाठी हा काळ उदासीचा होता. गुरखा, चायनीज, नेपाळी किंवा चिंकी अशा अनेक कुचकट कमेंट्सना त्यांना सामोर जावं लागलं. कॅम्पसमध्ये अनेकदा त्यांची खिल्ली उडवली जायची. अशा वातावरणात टिकून राहाणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. डॅनी डेन्ग्झोपा यांचे मूळ नाव त्शेरींग फिन्सो डेंग्झाँप्पा या नावाने त्यांना पुकारणं अनेकांना जमत नसे. त्यावरुन त्यांची चेष्टाही होऊ लागली. तेव्हा एफटीआयआयमध्ये त्यांचे जिच्याशी मैत्रीचे बंध जुळले त्या जया बच्चन यांनी डॅनींना नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बदललेलं नावच पुढे त्यांची ओळख बनून राहिलं. डॅनींना सहजासहजी काम मिळू शकत नव्हतं. त्याकाळी बनत असलेल्या फॅमिली ड्रामांमध्ये डॅनी फिट होत नव्हते. ‘ना तू वडिलांसारखा दिसतोस, ना भावासारखा. त्यामुळे केवळ नोकराचे रोल मिळतील’ असंही त्यांना ऐकवलं गेलं. बोलणारे खूप काही बोलायचे पण डॅनींना स्वत:वर आणि स्वत:च्या मेहनतीवर विश्वास होता. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्येही ते टिकून राहिले. डॅनींना हिरोच्या रोलमध्ये रस नव्हता कारण हिरोला नाच गाणं तर करावंच लागे. त्यामुळे डॅनी अँटी हिरो भूमिकांकडे वळले. मेहनतीशिवाय लक मिळणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे एफटीआयआयमध्ये असताना डॅनी यांनी हिंदी भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.
१९७० मध्ये काही सिनेमात त्यांनी छोट्या भूमिका केल्या. पण ‘लहू दे दो रंग’नंतर खऱ्या अर्थाने त्यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या. डॅनी यांनी बी आर इशरांच्या ‘जरूरत’ या बी ग्रेड सिनेमातून सुरुवात केली. त्यानंतर गुलजार यांच्या ‘मेरे अपने’मधून डॅनी यांना मेजर ब्रेक मिळाला. ही फिल्म करण्याचं आणखी एक कारण म्हणजे अभिनेत्री मीनाकुमारी. मीनाकुमारी या डॅनी यांची फेवरेट नायिका होती. ‘तू तो मेरा असली बच्चा है, तेरी नाक बिलकूल मेरे जैसी है’..मीनाकुमारी यांचे हे आपुलकीचे शब्द डॅनींना खूप धीर देणारे होते. मेरे अपनेनंतरची डॅनी यांच्या करिअरमधली आणखी एक महत्त्वाची फिल्म ठरली धुंद. फिल्ममधला निष्ठूर आणि निर्दयी नवरा डॅनींनी खुबीने साकारला.
‘चोर मचाए शोर’, ‘खोटे सिक्के’, ‘काला सोना’ अशा सिनेमात त्यांनी यादगार भूमिका साकारल्या. खलनायकाच्या भूमिकेत ‘अंदर बाहर’, ‘आंधी तूफान’, ‘भगवान दादा’, ‘अग्निपथ’, ‘हम’, ‘घातक’, ‘क्रांतीवीर’ अशा अनेक सिनेमांमध्ये डॅनींनी अमिताभ, धमेंद्र ते सनी देओलपर्यंतच्या नायकांना शह दिला.
‘अग्निपथ’मधला कांचा चीना किंवा ‘घातक’मधला कातिया यांच्या क्रूरपणा आणि निर्दयतेने प्रेक्षकांचा थरकाप उडवला. हिरोइतकाच भाव खाऊन गेला डॅनींना साकारलेला व्हिलन.
याच दरम्यान रमेश सिप्पी ‘शोले’ बनवत होते. ‘शोले’च्या गब्बरसाठी सिप्पींची पहिली पसंती डॅनींना होती. पण त्यावेळी डॅनी फिरोज खान यांची धर्मात्मा फिल्म करत होते. धर्मात्मासाठी आधीच तारखा दिल्यामुळे डॅनींना शोले करणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे गब्बरची भूमिका अमजद खान यांच्या वाट्याला आली. गब्बरच्या भूमिकेबद्दल विचारताना डॅनी सांगतात की,
“मी फिरोज खान यांना आधी शब्द दिला होता. मी होकार दिला असता तर इंडस्ट्रीला अमजद खान यांच्या रुपात एक आयकॉनिक खलनायक मिळाला नसता. त्यामुळे शोलेच्या यशात माझाही वाटा आहे. त्यानंतर अमजद यांनी त्यांचं मानधन वाढवलं आणि मी सुद्धा. त्यानंतर कॅरॅक्टर आर्टिस्टचं मानधनही वाढू लागलं”. जया बच्चन डॅनींची एफटीआयआयमध्ये वर्गमैत्रिण होती. बच्चन्ससोबत त्यांचे खूप चांगले संबंध होते. पण तरीही डॅनींनी तब्बल १८ वर्षे अमिताभसोबत काम करणं टाळलं. त्याच कारण म्हणजे अमिताभ यांच्यासारख्या बड्या अभिनेत्यासमोर आपली भूमिका झाकोळली जाईल असं डॅनींना वाटलं होतं. पण जेव्हा मुकुल आनंद यांनी अग्निपथची कथा ऐकवली तेव्हा डॅनींना असा विश्वास वाटला की विजय दीनानाथ चौहानसमोर कांचा चीना दुर्लक्षित राहाणार नाही आणि झालंही अगदी तसंच..डॅनींचा कांचा चीना आजही एक अजरामर व्हिलन आहे.
‘अग्निपथ’च्या सेटवरचा एक किस्सा असाही आहे की शूटिंगसाठी सारं युनिट मॉरिशसला रवाना झालं. सकाळी साडे आठ वाजता मेकअप करुन सारे कलाकार तयार झाले. पण अजून डॅनींना स्क्रिप्ट मिळाली नव्हती. मनात थोडा नव्हर्सनेस असल्यामुळे डॅनी अक्षरश: आपल्या असिस्टंटवर वैतागले. पाचच मिनिटात अमिताभ सुद्धा सेटवर पोहोचले. त्यांनी डॅनीचा चढलेला आवाज ऐकला होता. त्यामुळे अमिताभ डॅनीकडे गेले आणि म्हणाले की, मलाही आत्ताच स्क्रिप्ट मिळाली. आपण एकत्र रिहर्सल करुया. आणि इथून मैत्रीचं एक नवं पर्व सुरु झालं. त्यानंतर अमिताभसोबत डॅनींनी हम, खुदा गवाहमध्ये एकत्र काम केलं. सनम बेवफा आणि खुदा गवाह या सिनेमात डॅनींनी हिंदी भाषेवर घेतलेली मेहनती उपयोगी पडली. या दोन्ही फिल्मसाठी डॅनींना सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डॅनी यांनी केवळ निगेटीव्ह भूमिकाच केल्या असं नाही तर सकारात्मक आणि विनोदी भूमिकाही तितक्याच सहजतेने साकारल्या. हिंदी सोबतच अनेक नेपाळी, तेलगू आणि तमिळ भाषेतही डॅनींनी काम केलं. अनेक फिल्मसाठी त्यांना फिल्मफेअरचे नॉमिनेश मिळाले. अभिनयासोबतच डॅनी उत्तम लिहितात. त्यांनी फिर वही रात आणि राम या दोन सिनेमांचं दिग्दर्शनही केलं.
डॅनींचं फिमेल फॅन फॉलोईंग जबरदस्त होतं. इतकंच नाही तर काही मेल फॅन्सही त्यांना रक्ताने पत्र लिहायचे आणि त्यांना गुरु मानल्याचं सांगायचे. दरम्यानच्या काळात डॅनी यांच्या आयुष्यात आली परवीन बाबी. परवीन आणि डॅनी चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्याकाळी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर परवीन कबीर बेदींच्या प्रेमात पडली आणि हे नातं तुटलं. ब्रेकअपनंतरही परवीन त्यांच्या घरी येत राहिली. पण त्यावेळी डॅनींची नवी गर्लफ्रेण्ड असलेल्या किमला हे रुचलं नाही. काही दिवसांतच परवीन स्किझोफेनियाची रुग्ण असल्याचंही समोर आलं. त्यावेळी डॅनी यांचं सिक्किमची प्रिन्सेस गावा डॅन्ग्झोपासोबत लग्न झालं होतं. तर परवीनच्या आयुष्यात महेश भट आले होते. पण दिवसेंदिवस परवीनचा आजार बळावत राहिला. एकेकाळी सतत ग्लॅमरच्या वलयात राहिलेल्या परवीनने एकाकीपणे जगाचा निरोप घेतला. परवीनच्या अंत्यविधीवेळी उपस्थिती असणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये डॅनी होते. डॅनी यांना मनमोहन देसाईंनीही अनेकदा सिनेमासाठी विचारलं होतं. पण दरवेळी डॅनी नकार देत राहिले. डॅनींना देसाईंबद्दल आदर होता पण तरीही एकदा त्यांनी स्पष्टपणे देसाईंना सांगितलं की तुमचे सिनेमे इंडस्ट्रीला आणखी २० वर्षे मागे नेतात. तुम्ही एक हिट सिनेमा देता आणि मग बाकी सारे तुम्हाला फॉलो करतात. ते ऐकून देसाईंनीही त्यांना अगदी ठेवणीतलं ऐकवलं. पण डॅनी स्पष्टवक्ता होते. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी भारंभार सिनेमे अजिबात केले नाही. पण जे सिनेमे केले त्यातून आपले फॅन्स नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली. डॅनींनी नेहमी स्वत:च्या अटींवर काम केलं. डॅनी उत्तम अभिनेताच नाही तर उत्तम पेंटर आणि गायकही आहेत. ते उत्तम बासरी वाजवतात. डॅनींनी लतादीदी, आशाताई, रफी, किशोर कुमार अशा अनेक दिग्गज गायक – गायिकांसोबत गाणी गायली आहेत. काही नेपाळी सिनेमांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं आहे.
काळ मागे सरत राहिला पण डॅनी यांची जादू ओसरली नाही. बदलत्या काळातही नव्या पिढीसोबत डॅनी काम करत राहिले. पुकार, अशोका, १६ डिसेंबर, चायना गेट, लक, रोबोट, जय हो, मेरी कोम, बँग बँग अशा अलीकडच्या काळातल्या सिनेमातही डॅनी यांनी आपली छाप सोडली आहे.
डॅनींनी काही इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्येही काम केलं. २००३ साली भारत सरकारने डॅनींना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. डॅनी आजही मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून ब्रेक घेत ते पर्वतरांगांमधल्या शांततेत रमतात. घरातल्या बागेत त्यांचा अधिकाधिक वेळ जातो. साठी उलटल्यानंतरही फिटनेसच्या बाबतीत आजच्या यंग स्टार्सनाही डॅनी मागे टाकतात. केवळ हिंदी सिनेमातला खलनायक इतकीच डॅनी यांची ओळख मर्यादित राहात नाही. डॅनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बापूसाहेब पेंढारकरांच्या कानी या बालनटाची कीर्ती पडली. त्यांनी भार्गवरामांचे गाणे ऐकले आणि आपल्या संस्थेत दाखल करून घेतले. ललितकलादर्शन मधील १९२५ ते १९३७ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाट्य जीवनाची चढती कमान होती.
अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या अगोदर अभिज्ञा भावे हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. किंगफिशर एअर लाईन्स मध्ये ‘एअर होस्टेस’ म्हणून कार्यरत होती. २०१० साली महाराष्ट्र टाईम्स कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होऊन ‘श्रावण क्वीन’ची ती फायनलिस्ट बनली.
वंचित वर्गातील मुलांचे शिक्षण तसेच निराधार महिलांच्या उत्थानासाठी पायाभूत स्वरुपाचे कार्य करण्याच्या हेतूने दिवंगत स्वातंत्र्य सेनानी तात्या सरवटे यांनी इंदूरच्या पागनीसपाग्यात सुमारे ६० वर्षांपूर्वी बाल निकेतन संघाची स्थापना केली तेंव्हा त्यांच्या समवेत कन्या शालिनीताई या बिनीच्या शिलेदार होत्या. निव्र्याज सेवेचा वसा वडिलांकडून घेतल्यानंतर तो आजन्म पाळताना शालिनीताईंनी त्याला प्रयोगशिलतेची जोड देऊन समाजहितैषी कामाचा एक मानदंड आखून दिला.
गुरुवारी वयाच्या ९८व्या वर्षी शालिनीताईंचे निधन झाले तेंव्हा प्रत्येक इंदूरकर हळहळला. इंदूर आणि मध्य प्रदेशच्या शाजापूर, झाबुआ येथील आदिवासी व वंचितांसाठी बाल निकेतन संघाच्या माध्यमातून काम करताना ताईंनी मोठा गोतावळा जोडला. एखाद्याला, विशेषत ज्याला कशाचाही आधार नाही, अशा दुर्बलाला उभे करून आत्मनिर्भर करणे हे मानवसेवेचे कार्य ताई शेवटपर्यंत अथकपणे करीत राहिल्या. रोज शिकत राहा, सचोटीने व्यवहार करा अन् गरजूंना मदतीसाठी तत्पर राहा ही साधीसोपी त्रिसूत्री स्व. तात्या सरवटे यांनी आखून दिली होती, ताईंनी ती जीवनभर एखाद्या व्रतासारखी पाळली. वडिलांप्रामाणे बंधू व्ही. व्ही. सरवटे तसेच पती दादासाहेब मोघे यांची त्यांना सक्रिय साथ लाभली. बाल निकेतन संघ स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर या क्षेत्रातील कामाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी ताई त्याकाळी अलीगडच्या विश्व विद्यालयात दाखल झाल्या. बालशिक्षणाच्या प्रणेत्या मादाम माँटेसरी यांच्याकडे कराचीला जाऊन त्यांनी मार्गदर्शन घेतले. हाती घेतलेल्या कामाला त्यांनी प्रयोगशीलतेची जोड दिली. बाल शिक्षणाच्या मार्गातील अनेक अडचणींचे भान त्यांना आले होते, आणि म्हणूनच याबाबत नेमके काय करावे याची त्याना जाण होती. बालशिक्षणाच्या बरोबरीने पोषण व दुर्बल घटकातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. गरीब महिलांच्या रोजगारासाठी त्यांनी विविध प्रकल्प राबविले. लहान मुलांसाठी ‘झुला घर' सुरू करून अनेक भागांत त्यांची साखळी तयार केली. शहरी भागाच्या गरीब वस्त्यांतील आरोग्याचा प्रश्नही आपल्या अंगीभूत कार्यात सामावून घेतला. एकात्मिक विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अनेक सेवाभावी संस्थांसाठी आर्दशवत ठरले याचे कारण हेच की, या कामासाठी काय काय करावे याबाबतची ताईंची भूमिका स्पष्ट होती व त्याला कृतिशिलतेची जोड होती. शाळा, ग्रंथालये, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथालय, वात्सल्यधाम, शैक्षणिक साहित्य बनवण्याची केंद्रे आदी प्रयोग राबवून त्यांनी समाजातील मोठय़ा घटकाला त्यात सामावून घेतले. निरपेक्ष सेवा हाच त्यांचा मूलमंत्र राहिला. बाल निकेतन संघाच्या कार्याने प्रभावीत झालेल्यांत आचार्य विनोबा भावे, पं जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी आदी अनेक मान्यवरांचा समावेश करावा लागेल. १९६० साली त्यांना पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले. सेवाभावी संस्थेच्या कार्याचा वस्तूपाठ घालून देणाऱ्या ताई शेवटपर्यंत निगर्वी राहिल्या. त्यांचे व्यक्तिमत्वच इतके आश्वासक अन् प्रेमळ होते की त्यांच्या केवळ दर्शनानेही अनेकजण आश्वस्थ होत असत. त्यांच्या निधनाने एका सेवाव्रतीला आपण मुकलो आहेत.
मुजिबुर रहमान हे बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होते. मुजिबुर रहमान यांना बंगबंधू नावानेही संबोधत. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही.
हरिवंश राय बच्चन यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. १९५२ मध्ये इंग्लंड मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालय येथे अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर भारत सरकारने नियुक्त केले. १९२६ मध्ये हरिवंश राय यांनी श्यामा यांचेशी लग्न केले.त्यांच्या निधना नंतर १९४१ मध्ये, बच्चन यांनी सूरी यांचेशी विवाह केला. हरिवंश राय बच्चन काही काळ मानद राज्यसभा चे सदस्य होते. हरिवंश राय बच्चन यांना १९७६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. १९६९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हरिवंश राय बच्चन यांच्या सुरवातीच्या काळातील 'उमर ख़ैय्याम' ही कविता खूप प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध 'मधुशाला' ही 'उमर ख़ैय्याम' ने प्रेरित होऊन लिहलेली आहे. 'मधुशाला' मुळे हरिवंश राय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मा.हरिवंश राय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ मध्ये निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
हरिवंश राय बच्चन यांचे काही इतर काव्य संग्रह.
मधुबाला, मधुकलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, सतरंगिनी, विकल विश्व, खादी के फूल, सूत की माला, मिलन, दो चट्टानें व आरती और अंगारे
'मधुशाला' च्या काही काव्य पंक्ती.
मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला।। ।
सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।। ।
जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।।
- हरिवंश राय बच्चन
ॲगव्हेन्यूजमध्ये असताना कुकडे यांनी अनेक ब्रॅण्ड्ससाठी जाहिराती केल्या, त्यांपैकी ओनिडा टीव्ही, पानपसंद ही पानाचा स्वाद असलेली गोळी, स्कायपॅक कुरियर्स, यूएफओ जीन्स, व्हीआयपी फ्रेंचीसारखी अंडरवेअर्स ही कामे विशेष गाजली.
कादंबरीकार होण्याच्या आधी गुलशन नंदा दिल्लीतील बल्लीमारान भागात एका चश्माच्या दुकानात काम करत होते. गुलशन नंदा यांना एकदा बसने प्रवास करत असताना एकाने लिखाण करण्यास सांगितले व ते यशव्वी कादंबरीकार आणि हिंदी पटकथा झाले. साठच्या दशकात गुलशन नंदा हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते.
गुलशन नंदा यांच्या कादंबर्यांकनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला कटी पतंग, दाग, अजनबी, नया जमाना, झील के उस पार, शर्मिली, खिलौना, आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबर्यावर जितके हिंदी चित्रपट निघाले तितके हिंदी चित्रपट इतर कोणत्याही हिंदी लेखकाच्या कादंबऱ्यांवर निघाले नसतील.
गुलशन नंदा यांचे निधन १६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला चढविणार्या अनेक महिला आपल्या पाहण्यात येतात. परंतु ही रुळलेली वाट सोडून महिलांइतकाच पुरुषांचाही अभ्यास करुन समान सामाजिक व्यवस्थेसाठी मधू चौगावकर देशभरात काम करीत आहेत. स्त्री-पुरुष समानता खर्या अर्थाने प्रत्यक्षात यावी, यासाठी त्या स्वत:च्या घरापासूनच प्रयत्नशील झाल्या आहेत. युनिसेफच्या जेन्डर एम्पॉवरमेन्ट विषयीच्या कोअर समितीच्या त्या सदस्य आहेत.
स्त्री-पुरुष समानतेसाठी
Copyright © 2025 | Marathisrushti