इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
राजा कृष्णदेवराय यांच्या काळातील एक बालकथा.
https://www.youtube.com/watch?v=AJdXR7JMzRw
श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( कारंजा ) | Shree datta sthan mahatmya darshan ( KARANJA )
कारंजा हे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान. श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार. सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेले गुरु चरित्र हे नृसिंह सरस्वतीं बद्दल स्पष्टीकरण करणारे पवित्र पुस्तक आहे. कारंजा वाशिम जिल्ह्यात उत्तर-मध्य महाराष्ट्रात आहे.
श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात कारंजा येथे झाला. त्याचे मूळ नाव नरहरी असे होते. अंबा काळे आणि माधव काळे त्याचे पालक होते.नरहरी यांनी जन्मानंतर सर्वप्रथम ‘ओम’ हा शब्द उच्चारून सर्वांना चकित केले. ‘ओम’ शब्दाव्यतिरिक्त, त्यांनी नंतर बर्याच वर्षांमध्ये बोलण्याची क्षमता विकसित केली नाही. मुलगा मुका होण्याची भीती त्याच्या पालकांना होती. नरहरीला त्याच्या पालकांच्या काळजीची जाणीव झाली आणि त्यांनी ‘उपनयन विधी (मुंज)’ नंतर बोलण्याची शक्ती मिळेल असे सांकेतिक भाषेद्वारे त्यांना सांगितले आणि त्यांना काळजी करण्याची गरज नाही,असे सांगून योग्य वयातच त्यांच्या ‘उपनयन विधी’ ची योजना संपन्न करण्यास सांगितले. पालकांना धीर आला आणि योग्य वयातच त्यांनी ‘उपनयन संस्कार’ केला. सर्वांना आश्चर्यचकित करणारे म्हणजे जेव्हा संस्काराचा एक भाग म्हणून नरहरी आपल्या आईकडे ‘भिक्षा’ मागण्यासाठी आला आणि आईने भिक्षेची पहिली मुठी दिली तेव्हा नरहरीने स्पष्ट स्वरात ‘ऋग्वेदाचे’ केले. आईकडून दुसर्या मुठीवर नरहरीने ‘यजुर्वेद’ आणि त्यानंतर उर्वरित दोन वेदांचे पठण केले. सर्व वडील आणि उपस्थित असलेले ‘पुरोहित’ यांना नरहरीत दैवी गुण आहेत याची खात्री झाली.
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका

एक गाव बारा भानगडी हा एक विनोदी मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट १९६९ ला प्रदर्शित झाला.
गदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला?
भारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना. लय आणि तालाकडे बघा. भारतीय नसूनही किती सुंदर परफॉर्म केलंय दोघांनी !
गदिमांचे आपल्या आईवर विलक्षण प्रेम होते. आपल्या साहित्याला ते ‘आईच्या गीतगंगेतील भरली कळशी’ म्हणत. पण ‘त्याचा गाडी न घेण्याशी’ काय संबंध होता?
https://www.youtube.com/watch?v=g2fMBQrWN8g
पक्के 'काँग्रेसवाले' असणारे गदिमा 'कोणे एके काळी' गणवेश घालून चक्क संघाच्या शाखेत का जात होते?
अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि वांची अय्यर कर्झन वायलीच्या वधाचे सूत्रधार होते स्वातंत्र्यवीर सावरकर! सावरकरांमागे रीतसर सरकारी ससेमिरा चालू झाला. सावरकरांच्या मोठ्या बंधूना क्षुल्लक कारणास्तव काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्यानं क्रांतिकारक चिडीला आले. त्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा काटा काढण्याचं ठरवलं. कामगिरी पत्करली एका कोवळ्या मुलानं- अनंत लक्ष्मण कान्हेरे यानं.
https://www.youtube.com/watch?v=6Xuo9DnOnrA
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे व्याख्यान म्हणजे विचारांचा एक महाप्रवाह…. मूळ विषय मांडताना, त्या अनुषंगाने इतरही अनेक गोष्टींवर त्यांचे चिंतन प्रगट होत असते. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पुण्यस्मरण करताना कलावंत आणि त्याची प्रतिभा याविषयीचे मुक्त चिंतन त्यांनी केले. ते मौलिक विचार आजच्या भागात ऐकूया….
Copyright © 2025 | Marathisrushti