नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी किंवा रसिकांच्या रंजनासाठी सादर होणारी कला जेंव्हा भक्तिभावाने परमेश्वरासाठी सादर होते तेंव्हा त्या कलेच्या साधनेतून पुण्याचीच साठवण होते. शाहीर अनंत फंदी यांची अत्यंत प्रज्ञावंत, हजरजबाबी लोककलाकार म्हणून कीर्ती पसरली होती. या लावणीसम्राटाच्या अंगी जन्मजात कवित्व होते. गावोगाव ते आपली कला सादर करीत. असेच एकदा माळव्यात ते आपला फड घेऊन गेले होते तेंव्हा त्यांच्या अलौकिक कवित्वाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सुद्धा प्रभावित झाल्या. त्यांनी प्रसन्न होऊन अनंत फंदींच्या सन्मानार्थ अलंकार आणि भरजरी पोशाखाची भेट दिली. आणि त्यावेळेस अहिल्याबाई त्यांना म्हणाल्या, “फंदी बुवा ! आपण असामान्य प्रतिभावंत आहात. साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर विलसत आहे. कोणीही प्रभावित होईल असेच आपले कवित्व आहे. परंतु आपली ही काव्यशक्ती तमाशाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनासाठी वापरण्यापेक्षा हरिकीर्तनासाठी उपयोगात आणलीत तर मोठा लौकिक होईल.” अहिल्याबाईंचे हे उद्गार शाहिर अनंत फंदी यांच्या हृदयाला जाऊन भिडले. “यापुढे गाईन ते फक्त हरिकीर्तनासाठीच" अशी भरदरबारात प्रतिज्ञा करून शाहिर अनंत फंदी निघाले. ही प्रतिज्ञा त्यांनी अखेरपर्यंत पाळली. आणि आपल्या प्रतिभेचा उपयोग त्यांनी लोकशिक्षणासाठीच केला. त्यामुळे लोकांना फंदी आठवतात ते त्यांच्या कीर्तनामुळे ! आणि त्यांच्या उपेदशपर फटक्यांमुळे.
तात्पर्य: कोणत्याही कलावंताला जर श्रेष्ठ व्यक्तीच्या विचारांचा परीसस्पर्श झाला तर त्याच्या कलेचे आयाम बदलतात.

सुरूवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण या गोष्टी सतत माझ्या कानावर येवू लागल्या आणि माझ्या लक्षात आलं की, आपली आरूपण आता मोठी झालीय. मी तिला माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल कधीच बोलले नव्हते.

इंग्रजीतील सुप्रसिध्द कथालेखक ओ हेन्री याच खरं नाव विल्यम सिडनी पोर्टर.
विश्वास बसणार नाही पण त्याला पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरून तुरूंगात रहावं लागलं होतं.
त्या काळांत त्याने कथा लिहितांना ओ हेन्री हे टोपण नांव धारण करून आपलं लेखन प्रसिध्दीस पाठवलं आणि पुढे तो याच नावाने लिहित राहिला व प्रसिध्द झाला.
आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !!
आमच्या गाडीने मलकापूर सोडलं आणि कोकरूडमार्गे पुण्याला जाण्यासाठी गाडी वळली . पावसाची हलकी सर पडून गेली होती . गाडीने गती घेतली .पुढच्या उतारावर खूप छान दृश्य होतं . मोकळ्या रस्त्यावर दोन चिमण्या ,रस्त्यावरच्या अगदी लहानशा खड्यात साठलेल्या पाण्यात चोच बुडवून तहान भागवत होत्या . दृश्य खरंच मनोवेधक होतं. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ .डाव्या हाताला एक घर .डांबरी सडक नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरीमुळं ताजीतवानी झालेली . हवेत छानसा गारवा .आणि दूरवर क्षितिजापाशी निळ्या ढगांच्या आश्रयाला आलेले तुरळक काळे ढग .
कॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे! पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस! किती वर्षाची झाली बरं आई? तिला जन्मवर्ष काही आठवेना. विचार करताना एकदम लक्षात आले, आई एकदा म्हणाली होती ‘ तू जन्माला आली तेव्हा मला नुकतंच विसावं वर्ष लागलं होतं.’
त्या दिवशी प्रतिभाला एका तरूणाचा चुकून धक्का लागला असता प्रतिभाला वाटलं त्या तरूणानं आपल्याला जाणुनबुजून धक्का दिला असावा म्हणून प्रतिभा रागावून त्याला म्हणाली, ‘काय रे ! आंधळा आहेस का ? दिसत नाही का ? की जाणुनबुजून धक्का मारतोस ?’ त्यावर तो तरूण रागावून म्हणाला, तू काय स्वतःला महाराणी समजतेस काय ? तसं असेल तर रिक्षाने किंवा टॅक्सीने जात जा !

विजय आज त्याच्या कार्यालयात बसून संगणकावर काम करत होता… इतक्यात त्याचे एक मित्र बऱ्याच महिन्यांनी त्याला भेटायला आले… ते मित्रही साहित्यिक असल्यामुळे विजय आणि त्यांच्या चर्चा रंगणारच होत्या. विजयने बोलायला सुरुवात केली तोच ते म्हणाले,” माझी बायको वारली एक महिन्यापूर्वी ! ते ऐकून विजयला धक्काच बसला ! त्या मित्राचे वय असेल साधरणतः ५० वर्षे, म्हणजे त्यांची पत्नी असेल पंचेचाळीसची वगैरे, त्यामुळे त्या इतक्या कमी वयात वारल्याचे ऐकून विजयला धक्काच बसला ! विजय काही त्यांना कधी प्रत्यक्षात भेटला नव्हता त्यामुळे त्यांच्या एकूणच तब्बेतीबद्दल विजयला काही माहिती नव्हती. पण ! यापूर्वी विजयाच्या त्या मित्राच्या बोलण्यात कधी त्यांच्या तब्बेतीचा विषय निघाला नव्हता म्हणजे त्या फार पूर्वी पासून आजारी वगैरे असण्याची शक्यता कमीच होती.. त्यामुळे विजयने थोडं गंभीर होतच त्यांना प्रश्न केला,” कशा वारल्या ? काय झालं होत ?? त्यावर ते मित्रही गंभीर होत म्हणाले,

एका ६१ वर्षीय प्रियकरचा ४० वर्षीय प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू…ही बातमी विजयच्या वाचनात आली…कोणाच्याही, कोणत्याही कोणत्याही कारणाने झालेल्या मृत्यूची बातमी वाचल्यावर प्रथम वाईटच वाटते.. पण थोड्यावेळाने आपण त्या बातमीकडे बातमी म्हणून पाहायला लागतो…या बातमीत सर्वात पहिली गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या वयातील २० वर्षाचे अंतर आणि पुरुषाचे प्रेमात पडण्याचे वय…पाहता…प्रेमाला कोणती बंधने नसतात ही गोष्ट लक्षात येते…
Copyright © 2025 | Marathisrushti