नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

परवाच एके ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याला “या Stupid ला काही कळत नाही” असं म्हणताना ऐकलं . आता त्या “स्वारी” पासून या “स्टुपिड” पर्यंतचा हा प्रवास काही एका दिवसात झालेला नाही . या मध्ये बरेच टप्पे आले .

प्रत्येक पोराला ‘पराठे’ आणि मुलींना ‘कराटे’ आले पाहिजेत. हि आजची गरज होऊ पहात आहे. बेफिकीर मायबाप, मोकाट पोर, नवतारूण्याचा माज(जोश असायला हवा!) हे कोण अन कस आवरायचं? प्रश्न आपलेच आहेत. आज दारात असतील. उद्या घरात येतील! उत्तर शोधायला हवीत.

आपल्या सभोवताली वेगवेगळ्या ठिकाणी , वेगवेगळ्या संदर्भातील आजुबाजूला घडणाऱ्या घटना किंवा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशा अनेक अर्धवट,अपूर्ण राहिलेल्या गोष्टी असतात मग त्या “चांगल्या किंवा कधीकधी वाईट” ही असतात पण त्यांना पूर्णत्वास न्यायला लावावंच लागतं ……..असंच एखादं ….”ठिगळ”

खरं पहाल तर भुयारी रेल्वे हा एकच मार्ग आहे. काही कोटीत ती वीस-पंचवीस वर्षापूर्वी तयार झाली असती. आता हजारो कोटी लागतील. त्यावेळी का झाली नाही? उत्तर नाही. गेटवेपासून उरणपर्यंत पूल का बांधला नाही? उत्तर नाही. या शहराच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही.

आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले म्हणाली, “नील किती करतोस ना तू माझ्यासाठी. माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो.”

घराची झालेली पडझड आणि आजूबाजूच्या परिसराची वाताहात बघून राजूलाही खूप वाईट वाटलं. दोघंही खचल्यासारखे वाटत होते . त्यांचे हताश चेहरे बघताच राजूच्या नजरेसमोर आली ती त्या काका-काकूंचा अनमोल खजिना असलेली “अभिप्राय” वही.

“तुम्हाला भविष्यात खूप मोठं व्हायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही उराशी एक मोठं स्वप्न बाळगलं पाहिजे. आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही स्वप्न पाहता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते.”

आप्पांची सहचारीणी, माई, सोडून गेल्याला दोन महिने झाले होते.
आप्पांनी आपला बेत सर्वांना सांगायचा निश्चय केला. आप्पा ६७ वर्षांचे होते आणि माई त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान. त्या गेल्या त्या दिवसापासूनच आप्पांचे मन संसारावरून उडाले. घर भरलेले होते.


चांदणी चौकातल्या हॉरीबल ट्रॅफिकमध्ये प्रचंड बेफिकिरीने निंजा घुसवत तो माझ्या बाजूला केव्हा आला ते कळलच नाही .
ना हेल्मेट . ना ट्रॅफिक जॅमचं टेन्शन .
ना ट्रॅफिक हवालदाराची भीती . चेहऱ्यावर जस्ट बेफिकिरी …
मी पहात राहिले .
तो माझ्या जुन्या गाडीकडे भयंकर नजरेनं पहात होता .
” या नंबरवर मेसेज टाक , उद्या तुला सोडायला येतो आयटी पार्क मध्ये .”
त्यानं त्याचा नंबर त्याच्याच रुमालावर लिहून माझ्या अंगावर फेकला .आणि न बघता स्पिडमध्ये निघून सुध्दा गेला .
मी रुमाल हाती घेतला आणि नकळत तो हुंगला .
कुठल्या तरी उंची सिगारचा वास येत होता .
ट्रॅफिक सरकेल तशी मी हळूहळू पुढं होत होते .
मात्र डोक्यात ‘ तो ‘ होता .
Copyright © 2025 | Marathisrushti