नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
भालजी पेंढारकर मुंबईत येत असत, तेव्हा आरके स्टुडिओमध्ये भगवा झेंडा उभारला जात असे. ती भालजींना कृतज्ञेपोटी दिलेली मानवंदना असे. भालजींना स्वतः पृथ्वीराज कपूर, पायावर डोकं टेकवून नमस्कार करीत असत.
खरं पहाता, ती एक हिंदी सिने अभिनेत्री.. मात्र तरीदेखील तिच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते.. कारण आपण तारुण्यात असताना, तिचा अभिनय आपल्याला मनापासून आवडलेला असतो.. तिची मनातील ‘मोहक’ छबी, ही कधीही पुसली जात नाही.

न रडणारं, बुटांचा आवाज ऐकत स्तंभित झालेल, नुकतंच जन्मलेलं बालक इतकं बोलकं असू शकतं? कुणास ठाऊक, कॅमेऱ्याची करामतअसावी. टोपलीत ठेवून ते मूल अलगद छोट्या ओहोळात सोडलं जातं. वाहत वाहत पुढे पुढे जात राहतं. अजूबाजूचा प्रदेश बदलत जातो.

पण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि…….. आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं…..”

आजी पुढे बोलू लागली, ….. ती म्हणाली, ” आता मी तुम्हाला आवळ्याचा खूप खूप महत्वाचा उपयोग सांगणार आहे. सगळेजण एकचित्त होऊन ऐका….”
देवांच्या बैठकीला देशभरातील मोठं मोठ्या देवस्थानचे सगळे देव उपस्थित होते. त्यांच्यासह इतर लहान मोठ्या शहरांसह खेडेपाड्यातील लहान मोठी मंदिरातील तसेच गरीब श्रीमंत आणि सर्वसामान्य लोकांच्या देवघरातील देव सुद्धा हजर होते.

किस्ना पेंटर मंजे एक दिलदार अन तितकचं अवली व्यक्तीमत्व व्हतं.कुंचल्यानं जसे चित्रात रंग भरायचा तसेच जिवनात बी रंग वतायचा.त्यामुळं त्याचा गोतावळा लय मोठा व्हता.कुंचल्याच अन त्याच्या हाताचं एवढं घट्ट नातं व्हतं की त्यानं काढलेली चित्र अक्षरशः जिती व्हयाची.असा हा अवलीया जिथ जायचा तिथं रंग भरायचा..

रवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो आता स्वतःला वाचवायच्या स्थितीतही नव्हता, त्याचा श्वास खूपच मंद होत होता आणि तो जणू आता जलसमाधी मिळणार या स्थितीत त्या पुष्करणी च्या तळाशी त्या काळोख्या रात्री बुडत होता. तळाशी बऱ्याच वेली होत्या, गाळ बसून झालेला चिखल होता. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, हात आणि पाय आता सैल झाल्या सारखे स्तब्ध झाले होते.
पूर्वी लहान मुलास भीती दाखवण्यासाठी त्याची आई म्हणायची, ‘तू जर माझं ऐकलं नाहीस तर, तुला ‘दाढीवाल्या बुवा’ला देऊन टाकेन.’ ते मूल लगेच चूप बसायचं.

महाराष्ट्रातील वर्हाड भागात गायली जाणारी ही लोकप्रिय गाणी…
Copyright © 2025 | Marathisrushti