(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • झुंडशाही (कथा नंबर १)

    बस्तर मधील सुरगुजा जिल्हा जंगल, नद्या. दर्याने वेढलेला, खळाळणारे असंख्य नाले, रस्त्याला रस्ता म्हणायचे तरी कसे?काही वेळा घनदाट जंगलात नक्षलवादी वस्तीस येत, आदिवासींकडून हक्काने शिधा गोळा करत, तसे पाहता हा प्रदेश इतका मागासलेला, आदिवासींचे विखुरलेले पाडे, थोडीपार शेती, गुजराण तरी कशी करणार? अर्ध पोटी जीवन चालू होते इतकेच.

     

  • दर्शनाचा लाभ

    गणपतीच्या दहा दिवसांच्या उत्सवात गेल्या चाळीस वर्षांत, दूरदर्शनवर ‘अष्ट विनायक’ हा मराठी चित्रपट न पाहिलेला माणूस अवघ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कारण दरवर्षी हा अप्रतिम चित्रपट या दिवसांत दूरदर्शन व इतर वाहिन्यांवरुनही हमखास दाखवला जातो आहे..

  • अकल्पित (भाग – 1)

    मलबार हिलच्या नारायण दाभोळकर रोडवरच्या श्रीमंत वस्तीत ही वीस मजली इमारत. या इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील पाचहजार चौरस फुटाचा हा अलिशान टेरेस फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. मी आज एक तीस वर्षांचा तरुण उद्योजक आहे. संपूर्ण देशभर माझ्या उद्योगाचे जाळे पसरले आहे. हे सर्व वैभव मी माझ्या हुशारीने कमावले आहे. अर्थात माझ्या आईचा फार मोठा सहभाग आहे. नव्हे, आज मी जो काही आहे तो तिच्यामुळेच.

  • चिरयौवना..

    समोरचा माणूस गप्प असताना त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, तो बोलू लागला की, ‘कळू’ लागतो ते त्याच्या बोलण्यातून. सवयीनुसार प्रत्येकाचे बोलणे बदलत जाते. काहींना शिवीचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही. त्याउलट संस्कारी माणूस कितीही चिडला तरी अपशब्द बोलूच शकत नाही, त्याऐवजी तो गप्प राहणेच पसंत करतो.

  • लोअर वरळी

    गिरणगांव बचाव म्हणून बुध्दिवंतांची एक बैठक झाली, त्याला कवी-लेखक-शाहीर सगळे हजर होते. एक गाव लाटेखाली बुडायच्या मार्गावर आहे, त्याला वाचवायच म्हणजे काय करायच, हाच खरा प्रश्न आहे. तस हे गाव संपाच्या ओझ्याखाली केव्हाच मोडून गेलय.

  • डार्लिंग (विनोदी कथा )

    दोन दशकांपूर्वी रविवारची सकाळ होती. सकाळचे दहा वाजले होते. विजय पेपर वाचत वाचता सोनल सोबत गप्पा मारत होता. त्याची आई बाजारात गेली होती तर बाबा त्यांच्या मित्राकडे गेले होते. इतक्यात टेलिफोनची रिंग वाजली.

  • मास्क

    आॅक्सिजनचा ‘मास्क’ लावण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर हा कापडी ‘मास्क’ कायमस्वरूपी वापरत रहा.. मग कोरोनाच काय त्याचा ‘आजोबा’ही तुमच्या वाटेला जाणार नाही…

  • अस्तित्व

    महाभारतातील एक गोष्ट आहे. एक गरीब वृद्ध हस्तिनापूरला गेला आणि धर्मराजाला भेटून त्याने दानाची याचना केली. मात्र सूर्यास्त झाल्यामुळे नियमानुसार धर्मराजाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.‌ तो बिचारा माघारी फिरला. हे भीम पहात होता. तो धर्मराजाला म्हणाला, ‘दादा, एक विचारू का? तुम्ही त्या याचकाला उद्या दान देण्याचं कबूल केले आहे, मात्र त्याच्या उद्याच्या आयुष्याची तुम्ही खात्री देऊ शकता का?’ धर्मराजाला आपली चूक कळून आली. त्यांनी त्या वृद्धाला बोलावून घेतले व भरघोस दान दिले. भीमानं विचारलेला प्रश्न तसा छोटा असला तरी अस्वस्थ करणारा आहे. हा प्रश्र्न जो स्वतःला विचारतो, त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं. जो मला काल भेटला होता, तो आज नाहीये. जो काल माझ्याशी फोनवर भरभरुन बोलला, तो आत्ता नाहीये. असे अनेक प्रसंग आजूबाजूला नेहमीच घडत असतात.

  • पुत्र सांगती.. चरित पित्याचे

    संगीतकार राम कदम यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन ‘चित्रमाऊली’ बॅनरखाली वसंत पेंटर यांच्या सहकार्याने ‘सुगंधी कट्टा’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटास राज्य सरकारचे दहा पुरस्कार मिळाले.

  • मदतनीस ! (गूढकथा)

    प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचणे जितकं कठीण असत, त्यापेक्षा तेथे टिकून रहाणं ज्यास्त अवघड असत. एकदा ती जागा हातून निसटली कि, मग जे दुर्लक्षत जीण नशिबी येते.. त्या पेक्षा नर्क बरा! आणि म्हणून त्यांना पुन्हा ‘त्याची’ मदत घेणे भाग दिसत होते!