नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

मित्रानो ‘समस्या नाही असा माणूस नाही, आणि समाधान नाही अशी समस्या, या जगात नाही!’ हे सत्यच आहे. फक्त ‘समस्या!’ नक्की काय आहे, हे कळले पाहिजे. नसता पैसे, वेळ वाया जातोच, पण त्याही पेक्षा ‘गाढवपणा’ पदरी पडतो! पण वाईटातहि काही तरी चांगले असतेच. कालांतराने हाच ‘गाढवपणा’ ‘अनुभव’ म्हणून, अभिमानाने चार लोकांना सांगता येतो.

गुस्टॉव्ह फ्लॉबर्ट ह्या प्रथितयश साहित्यिकाने त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतला. फ्लॉबर्टच्या घरी त्याची एमिल झोला व रशियन कादंबरीवर आयव्हॅन तुर्गानेव्ह यांच्याबरोबर भेट झाली. ते दोघेही वास्तववादी लिखाणाचे पुरस्कर्ते होते. १८७५मधे फ्लॉबर्टच्या उत्तेजनाने त्याने एक विनोदी नाटक लिहिले व त्यांत कामही केले.
१८७८मधे त्याची बदली माहिती मंत्रालयाकडे करण्यात आली व तिथे वृत्तपत्रांसाठी लिहिण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. ते काम करून त्याला खूप फावला वेळ मिळे. त्या वेळांत त्याने कथा व कादंबऱ्या लिहायला सुरूवात केली. १८८०मधे त्याने बौल द सीफ ह्या नांवाने त्याच्या मते त्याचा “मास्टरपीस” प्रसिध्द केला.
ती छोटी कादंबरीच होती. त्याचे वाचकांनी स्वागत केले. फ्लॉबर्टनेही त्याची स्तुती केली. लागलीच त्याने दोन कथा लिहिल्या व त्याही खूप गाजल्या.
वाचू आनंदे ‘चा आगळा वेगळा कार्यक्रम. संपूर्ण सभागृह भरलेले. व्यासपीठावर माईक समोर ती उभी . नाव मुक्ता . इयत्ता चौथी. आवाज खणखणीत . उभं राहण्याची , प्रेक्षकांकडे पाहण्याची आणि त्यांची दाद मिळताच किंचित स्वाभाविक झुकून नम्रपणे दाद स्वीकारण्याची एक विलक्षण शैली. देहबोली आत्मविश्वासाने भरलेली.

सगळीकडे संध्याकाळची किरणे पसरली होती. घाटावरून लोकांची परतण्याची लगबग चालली होती. जवळच्या देवळांतून सायंआरतीचे आवाज येत होते. एकंदर खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. आरू या वातावरणाशी तद्रूप झाली होती. एक शांत सुंदर भाव तिच्या चेहेर्यावर पसरला होता. नील तिच्या या लोभस रूपाकडे एकटक पहात बसला होता. जवळच्या देवळातील घंटानादाने आरूची तंद्री भंग पावली. तिचे नीलकडे लक्ष गेले. तो तिच्याकडेच पहात होता.

आई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला …….

प्रदीप निफाडकरांची गझल

संध्याकाळी सूर्यास्ताचा समय….. समुद्रावरून वारा प्रचंड वेगाने वहात होता. समुद्रावरचे काठ म्हणजेच सुरुचं बन अक्षरशः त्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने हेलकावे खात होतं. थंडीचे दिवस असले तरी आभाळ भरून आलं होतं आणि आता अवकाळी पाऊस पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रवींद्र वाडीत फेरफटका मारत होता. ताई आणि तिचे मिस्टर दुपारी काही कामा निमित्त श्रीवर्धन ला गेले होते. गाडी होती त्यांची बरोबर, त्यामूळे प्रवासाची चिंता नव्हती. रात्रीच्या जेवणात धरू नकोस असे सांगून ताई गेली होती. श्रीवर्धन ला एका आश्रमाला भेट द्यायला ते गेले होते. रविंद्रने त्यांना का? कशासाठी? वगैरे प्रश्न विचारायची तसदी घेतली नव्हतीच, त्याला बरच होतं की ते. त्याला जे कार्य तडीस न्यायचे होते त्यासाठी एकांत गरजेचा होताच त्यामुळे त्याने नुसतं ठीक आहे म्हणत विषय सम्पवला. मी कदाचित मित्राकडे जाईन जेवून झाल्यावर असे कानावर घालून ठेवले. आणि ताईकडे घराची एक किल्ली देऊन ठेवली.

लॉकडाऊन २०२० मध्ये लिहिलेली भयकथा

नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले.
ऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे.
Copyright © 2025 | Marathisrushti