नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. रात्रभर खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेलतर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! बुटक्याच्या बॉडी बरोबर जर त्याचा मोबाईल हाती लागलातर, राघव कॉल हिस्ट्रीवरून रुद्रापर्यंत पोहचू शकत होता! काल स्पाय कॅमेऱ्या सोबत दोन लाखाची रोकड हि मिळाली होती! मुंबईत थांबणे धोकादायक होते. सारासार विचार करून रुद्राने रत्नागिरीचे तिकीट तत्काल मध्ये बुक केले होते.
वाचू आनंदे ‘चा आगळा वेगळा कार्यक्रम. संपूर्ण सभागृह भरलेले. व्यासपीठावर माईक समोर ती उभी . नाव मुक्ता . इयत्ता चौथी. आवाज खणखणीत . उभं राहण्याची , प्रेक्षकांकडे पाहण्याची आणि त्यांची दाद मिळताच किंचित स्वाभाविक झुकून नम्रपणे दाद स्वीकारण्याची एक विलक्षण शैली. देहबोली आत्मविश्वासाने भरलेली.

साल कुठलं नेमकं आठवत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावी गेलो होतो.नुकताच नोकरीला लागलो होतो.सकाळच्या अकरा वाजल्या असतील . इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या रविवारचा दिवस असल्याने डवरी पतर भरण्यासाठी ( वाळलेल्या भोपळ्याचे पात्र,डमरु त्रिशूळ वगैरे घेऊन) भिक्षा मागण्यासाठी आला होता.त्यांच वय बरंच झालं होतं पण तरीही ते घोड्यावरून फिरत असतं.मला नवागत बघून विचारलं.
शामराव तपास आटोपून परत आले. त्यांच्या मनात मात्र हा भोळसट दिसणारा दिनकरच या प्रकरणाच्या मागे असावा असे राहून राहून वाटत होते. बांगड्यांचे तुकडे सापडल्यापासून त्यांच्या मनात एक कल्पना घोळू लागली होती. या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी मिसिंग केस संदर्भात या भागातील आणि त्याच्या आसपासच्या भागातील सर्व मिसिंग, मर्डर, अॅक्सिडेंट केसचा धांडोळा घेतला होता पण दिनकर आणि ऐश्वर्या कोकणातल्या ज्या राजापूर भागातून आले होते त्या भागातील त्या तारखेच्या आसपासच्या अशा केसेसच्या धांडोळा घेतला तर कदाचित काही हाती लागू शकेल असे त्यांना राहून राहून वाटत होते. त्यांनी जाधवांना बोलावून राजापूर आणि आसपासच्या परिसरातील पोलीस रेकॉर्डवरच्या अशा सगळ्या केसची तपासणी करायला सांगितले. जाधवांनी बारकाईने तसा तपास केला आणि एका केसवर येताच ते चमकले! त्या केसमधल्या मर्डर झालेल्या बाईचे वर्णन ऐश्वर्याशी जुळत होते. उंची साधारण चार फूट, रंग गोरा, चेहेरा ओळखण्यासारखा नव्हता तरी मयताच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या आणि त्याचे डिझाईन ‘दबंग’ बँडचेच होते! ते तडक ही सुवार्ता घेऊन शामरावांकडे गेले. लौकिकार्थाने ही कुवार्ता होती पण पोलीस तपासाच्या दृष्टीने ती सुवार्ता होती. एरवी कुवार्ता ऐकून रडे फुटते. इथे मात्र ती कुवार्ता ऐकून शामरावांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलले! पोलिसांच्या आयुष्यात असेच होते. गुन्ह्याचा शोध घेताना अशा कुवार्ताच त्यांच्या साठी सुवार्ता बनतात.

मी आणि ती ‘ हल्ली अनेकांना आवडत आहे , अर्थात कारण मला ती आवडते .

साल आपल्याच खोबडीत दोष आहे भलतेच उदात्त वगैरे विचार करतो…. जग हे अनेक पायांवर चालते … आपल्यासारखे दोन पायावर नाही….
रोजची पहाट या प्रसिद्ध दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट, श्री सूर्याजीराव रवीसांडे आपल्या दाढीचे खुंट खाजवत अत्यंत खिन्न मुद्रेने बसले होते. दर आठवड्याला एक विशेषांक ही रोजची पहाट ची खासियत आणि त्यातूनही गुढीपाडव्याचा विशेषांक हा तर खूप मानाचा.
आजकाल सर्वांना आयतं हवं, स्वतः काहीही न लिहिता दुसऱ्याचं लेखन स्वतःच्या नावावर खपवणारे व स्वतःला लेखक म्हणवून घेणारे, उदंड झाले आहेत. परदेशात काॅपीराईटचा भंग केल्यास, शिक्षा आहे. भारतात अजून तरी सवलत आहे. त्याचा फायदा अजून काही वर्षं तरी, ही मंडळी घेणारच!!

१९२३ साली गिरगाव चौपाटीवर उभ्या राहिलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्याला, पुढच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.. मुंबईत, या नव्याण्णव वर्षात आमूलाग्र बदल झाला. तरीही बदलला नाही, तो ताठ मानेनं उभा असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा.. शतकानुशतके तो सांगत राहिल… गाथा, एका ‘आयुष्याच्या मातीची’….
Copyright © 2025 | Marathisrushti