नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
वयाच्या आठव्या वर्षापर्यंत माझे बालपण आमच्या गावातच गेले. त्यावेळेस चार आणे आणि आठ आण्यासह जस्ताचे दहा आणि वीस पैसे पण चालायचे. गावात असलेल्या दुकानात तेव्हा चार आण्यात काचेच्या बरणीत ठेवलेली गोळ्या बिस्कीट मिळायची.

रवींद्र च्या मनात विचार आला की या सूर्याने कित्येक युगांतरे पाहिली असतील तरी याचा स्थितप्रज्ञ पणा अजूनही तसाच आहे. पण आज माझ्या आयुष्यात युगांतर होतंय आणि तरीही मी असा भेदरलेला, दबलेला का आहे, नाही मलाही या सुर्यासारखं स्थितप्रज्ञ, अभेद्य व्हायलाच हवं, व्हायलाच हवं.
पूर्वी राजे महाराजे आपल्या पदरी राजवैद्य ठेवायचे. ते नाडी परीक्षा करुन, जडीबुटीची औषध देऊन उपचार करायचे. कालांतराने आजारांवर नवीन औषधे निघाली. इंजेक्शन देऊन उपचार होऊ लागले.

रोजची पहाट चे संपादक आणि स्वतःस मुलाखत सम्राट म्हणवून घेणारे सूर्याजीराव रविसांडे आज फारच अस्वस्थ दिसत होते. दुपारचा रवि आकाशात तळपत होता आणि इकडे सूर्याजीरावांचा तिळपापड होत होता. ते मोठ्या आतुरतेने त्यांचे मुख्य वार्ताहर आणि मुलाखत तज्ञ, काका सरधोपट यांची वाट पहात होते. ‘रोजची पहाटच्या दिवाळी अंकाची ओरात तयारी चालू होती आणि या काकांचा पत्ताच नव्हता! काकांची मुलाखत हे दिवाळी अंकाचे प्रमुख आकर्षण असायचे. आपल्या टकलावर अतिरागाचा ठेका धरत ते ओरडले.

सेफ्टी व्हॉल्वमधून थोडीशी हवा सोडत कुकरने विचार केला. आतल्या आत गास्केट घट्ट करुन पाहिलं आणि म्हणाला,“तुम्हा उघड्या तोंडाच्या लोकांना नाही समजणार ते. म्हणजे “वाफ सोडूंना” आमच्या म्हणजे ‘वाफ पकडूंच्या’ अडचणी समजणं जरा कठीण.”
परात म्हणाली.“एऽऽ कुकरू जरा सोपं करुन सांग रे.” वाफ सोडत कुकर हसला आणि म्हणाला,“अगं आमच्या डोक्यावर मध्यभागी शिटीचं सतत टांगतं वजन असतं! तर दुसऱ्या बाजूला तो सेफ्टी व्हॉल्व डोक्यातच घुसलेला असतो.
आणि गळ्याभोवती त्या रबरी गास्केटचा फास असतो. माझ्या पोटातलं पाणी उकळू लागलं की वाफेचं “धूम मचा दे..” सुरू होतं. अशावेळी तोंड बंद करुन अन् गळा आवळून मला गरम वाफेचा धूम धमाका सहन करावा लागतो!”

हे सगळं घडलं ते त्या भलत्या विचारांच्या “कुंपणानीच शेत खाण्याआधी” मनाच्या मळ्यातून वेळीच ते “कुंपण“ काढून टाकलं sss म्हणून ….
जेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं.
पहाट….कसली मध्यरात्रच ती… तीन सव्वा तीन वाजले होते, ब्रेक चां कर्ण कर्कश आवाज करून बस एका ढाब्यावर थांबली, महत्प्रयासाने सुमारे तासा भरा पूर्वी लागलेली झोप मोडल्या मुळे चरफडत ‘ मानसी ‘ उठली आणि डोळे किलकिले करून तिने खिडकी बाहेर पाहिले, कुठला तरी ‘ दिलखुश इन’ नावाचा पंजाबी ढाबा ‘ दिसत होता. “

ग्रामीण भागामध्ये माणसांच्या जवळ पैसा भयंकर कमी आहे. तरीपण त्यांची जगण्याची धडपड अतिशय मोठी आहे हे मला जाणवत होते पोटासाठी मिळेल ते काम प्रामाणिकपणे गावातील बरीच मंडळी करत होती. पोटासाठी किती मोठी धडपड फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी. तर काही जण म्हणत असत माणसाचा जन्म पुन्हा नको संसारातील यातना सारे दुःख आणि दुःख. या दुःखातून कधी सुटका होते या विचारात ग्रामीण भागातील माणूस पूर्णपणे अडकून पडला होता.
वैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे … म्हणून कथा वाचायला हवी
Copyright © 2025 | Marathisrushti