नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
किसनरावांच्या प्रत्येक भेटीत त्यांना असलेली सांस्कृतिक विषयांची आवड दिसून येत होती. साहित्य, संगीत, कला, नाट्य, चित्रपट, इत्यादी विषयांवर आमच्या गप्पा होत असत. भेटी होत होत्या. दरम्यान अप्पा बळवंत चौकात माईंनी ‘संस्कृती प्रकाशन’ची मुहूर्तमेढ रोवली.

ही कहाणी आहे , काही रिपोर्टर्सची , स्टुडिओमधील अनाऊन्सर्सची , ओबी व्हॅनच्या चालकांची , न्यूज कोऑर्डीनर्सची, ग्राफिक डिझाईनर्सची , टीआरपी साठी हपापलेल्यांची , न्यूज मधली एक्सायटिंग व्हॅल्यू शोधण्यासाठी मेंदूचा भुसा करायला लावणाऱ्यांची .
ही कादंबरी लिहिताना खरंतर खूप अस्वस्थ व्हायला झालं होतं . कितीही विधायक दृष्टी ठेवली तरीही प्रत्यक्षात वेगळं घडतं याची टोचणी वारंवार होत होती .
पण जे चाललं आहे ते वाचकांपर्यंत पोहोचविणे मला महत्वाचे वाटत होते .
सलग तीन महिने ही कादंबरी मी लिहीत होतो .
आणि संवेदनशील वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर समाधान वाटले .
मेनका दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली आणि नेहमीप्रमाणे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला .
पण त्याचा आनंद मानायचा , की हे भयंकर विश्व अजूनही त्याच पद्धतीने चालत आहे , याचे वैषम्य वाटून घ्यायचे , या संभ्रमात मी आहे .

गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे..
काहीतरी वेगळा विषय वाटतोय ना ? आहेच वेगळा. म्हणजे विषय तसा परिचयाचा पण अव्यक्त राहण्यात शहाणपण आहे, हा बाळबोध संस्कार करणारा.

विजय टी .व्ही. वर मालिका पाहत असताना विजयच्या लक्षात आले की या मालिकातून रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणही बहिणीला राखी बंधू शकते आणि बहीणही बहिणीचे रक्षण करू शकते हा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसला. प्रथमदर्शनी विचार करता राक्षबांधन हा फक्त भावा- बहिणीचा सण आहे पण सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आणि विभक्त कुटुंब पद्धती पाहता अशी परिस्थिती निर्माण होऊच शकते ज्या घरात भाऊ नसतील फक्त बहिणी असतील तर त्यांनी ओढून ताणून कोणाला भाऊ करण्यापेक्षा विजयला हे बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देणे हा एक उत्तम पायंडा ठरू शकतो असे वाटते. आणि तसेही आज स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कशातही मागे नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या बहिणीचे रक्षण करूच शकतात. यात पुरुषांना कमीपणा वाटण्याचेही काही कारण नाही… आज कित्येक भाऊ राक्षबंधनाला बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत असले तरी कित्येकदा संकट समयी बहिणीही भावाचे रक्षण करतात की ! विजय आपल्या लहान बहिणीच्या बाबतीत पूर्वीपासूनच खूप हळवा होता..
जगन्या शिपाई माणूस. तरी त्याच्याकडे अत्यंत महत्वाचे काम होते. साहेबांच्या हातून वृक्षारोपणा करावे, हि सूचना त्यानेच मांडली होती आणि अपेक्षे प्रमाणे ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. वृक्षारोपणाच्या तयारीची जवाबदारी त्याच्याच खांद्यावर येऊन पडली!
विजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता.
मी भग्या , आवंदा चौथी पास झालाय ह्यो गब्रू ! आता तर उन्हांळ्याचा सुट्ट्या हैत . रट्टाऊन जेवायचं अन गावभर हुंदडायचं , हेच आपलं काम . तस बी शाळा आसन तर बी हेच काम असत आपलं ! आत्ता बी मी आमच्या रानात चिंचाची बोटक खाया आल्तो . खाऊन खिसभर संग घेतल्यात .

आजपर्यंत मी ज्येष्ठवृंद साहित्यिक गुरुवर्य आनंद यादव , अशोक कामत , दवी.केसकर , दभी कुलकर्णी , प्राचार्य बलवंत देशमुख, गुरुवर्य शांताबाईं शेळके , यशवंतजी देव , नंदूजी होनफ अशा काही व्यक्तिन्चे अनुभव कथन केले ..जीवनात साहित्य क्षेत्रात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शक योगदान लाभले अशा अनेक व्यक्तिबद्दल खरे तर खुप लिहायचे आहे..

“…मला बोलता येतं नाही , पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो . शक्य असेल तर डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा . आपण कृतीतून झरा होऊ या .
Copyright © 2025 | Marathisrushti