नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला. मी ही असाच एक.

मी माझ्या मुद्रण / प्रकाशन व्यवसायात दरवर्षी सुमारे 5 दिवाळी अंक छापत असे. त्यातील ज्ञानदूत हा अंक मुंबईतून निघत असे. प्रसिद्ध नोगी कंपनी (माकडछाप काळी टूथ पावडर) यांच्या तर्फे मालक कै. प.सी.बोले व कै. तारा बोले हा दिवाळी अंक प्रकाशित करत असत. त्यांचे आणि माझे खुपच जवळचे संबंध होते. त्यांच्यामुळे मुंबईतही माझ्या खुप ओळखी झाल्या.

मी मूळचा सातारकर असल्यामुळे साहित्य, कला, संस्कृतीचे बीजांकुर माझ्यात या सातारच्या पंचक्रोशीतच घडले. थोडेसे कळायला लागल्यापासूनच आमच्या घरात जी मोठी विचारवंत माणसं येत असत रहात असत त्यामुळे आणि तसेच समोरच प्रख्यात वकील कै. मनोहरपंत (काका) भागवत वकील रहात होते. त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, साहित्य, अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर सातत्याने येत असत. आमच्या कुटुंबाचे व त्यांचे अगदी घरचेच संबंध होते.

नुकतीच एक अस्वस्थ करणारी बातमी मी वाचली. प्रसंग असा घडला. मोठ्या शहरातील एका कचराकुंडीजवळ एक वृद्ध माणूस निपचित पडला होता. काही लोकांनी त्याची विचारपूस करीत त्याला मदतीची तयारी दाखवली.परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माणसाने लोकांच्या दयेस स्पष्ट नकार दिला.

इतिहासाने ज्यांना दीर्घकाळ उपेक्षीत ठेवलं ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छावा संभाजी महाराजांना ‘तह’ कधीच मान्य नव्हता. ७०च्या दशकात त्या संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत सुंदररित्या वठवून त्या अनभिषिक्त राजाला न्याय देण्याचा काम ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्यातून केले ते म्हणजे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर. घाणेकरांना सुद्धा तडजोड, लाचारी मान्य नव्हतीच. म्हणून ज्या नाटकाने त्यांना मराठी व्यावसायिक रंगभूमीवर एक वेगळी प्रतिष्ठा आणि ओळख निर्माण करून दिली ते प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या अवघ्या १०० प्रयोगांच्या ‘घोडदौडी’नंतर घाणेकरांनी ते नाटक सोडून दिले. कारण त्यांना खाजगी सुपाऱ्या पटत नसे आणि त्यामुळे दि गोवा हिंदू असोसिएशन्सशी मतभेद झाल्यामुले डॉक्टरांनी ‘रायगड’ला राम राम ठोकले.असे कलंदर व्यक्तिमत्व आणि बेधडक स्वभाव असलेले नट क्वचितच पाहायला मिळतात.

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं… असं वाटण्याची जागा, मूल झालं की… मोठं घर झालं की… अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .

माझे जीवन असंख्य अनुभवांनी घडलेले आहे. मला लिहिण्याची (लिखाणाची) सवय नव्हती. परंतु कित्येक घटना अशा अनुभवल्या की त्यांना शब्दात उतरविण्याची इच्छा झाली. एका छोट्याश्या गावामधून राज्याच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याच्या माझ्या प्रवासात मला आलेले अनुभव की ज्यापासून मी काही शिकले, प्रेरणा मिळविली व त्याचप्रमाणे माझे व्यक्तिमत्व घडले, त्यांना पुस्तक स्वरुपामध्ये गोष्टीरूपात मी प्रसिद्ध करीत आहे.
नुसतं नाव सांगायचं, तर त्यासोबत ही आगगाडी कशाला? असं तुम्ही म्हणाल. सांगतो. मी आहे शास्त्रज्ञ. जैविकशास्त्रात मी संशोधन करतो. आता आलं ना लक्षात? शास्त्रज्ञ, प्रोफेसर, कलाकार म्हटला की त्याचा एखादा स्क्रू’ ढिला असणार अशी लोकांची समजूत असते.
आम्ही आमच्या नंबरची सीट हुडकून त्यावर बसलो. एका ‘हवाईसुंदरी’च्या मदतीने, हिची हातातली बॅग आणि माझी लॅपटॉपची बॅकसॅक, सीटवरील रॅक मध्ये सारून दिल्या. सीटवर पाघरायची शाल, एक चिटूर्नि उशी, आणि हेडफोनचे पाकीट होते. समोरच्या सीटच्या पाठीवर एक मॉनिटर होता. खूप ‘प्रयत्न-प्रामादा'(Trial – error साठी हा शब्द कोठेतरी वाचला होता. कसा आहे?) नंतर, या स्क्रीनने माझी पंधरा तास करमणूक केली होती. दोन सिनिमे मी पहिले, एक त्यानेच दाखवला!
चैतन्य महाप्रभु’ चित्रपटात तिच्यासोबत आशा पारेख होती. ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटात आधी आशा पारेखच काम करणार होती, ऐनवेळी ते काम अमिताला मिळालं. चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. चित्रपट नायकप्रधान असल्याने प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. फक्त राजेंद्र कुमार!!
Copyright © 2025 | Marathisrushti