महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तेलुगूचा व दखनी उर्दूचा उपयोगही काही प्रमाणात या जिल्ह्यात केला जातो.
कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते.
जी ईश्वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे.
तिरुवनंतपुरम हे केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ते वसलेले आहे. महात्मा गांधीजींनी या शहराचे वर्णन सदाहरित शहर असे केले होते. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी ते एक आहे.
मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले.
नौरू हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. नौरू दक्षिण प्रशांत महासागरामधील एका लहान बेटावर वसला आहे. हा जगातील सर्वात लहान द्वीप-देश व सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला राजधानी नाही.
भात’ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
मुंबई-ठाणे-पुणे-बंगळूरू-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) जिल्ह्यातील शिरवळ, खंडाळा, सातारा, उंब्रज व कर्हाड या प्रमुख ठिकाणांवरून जातो. तसेच पुणे-बंगळुरू हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे.
लातूर जिल्ह्यात सुमारे ८७६३ कि.मी.लांबीचे रस्ते असून त्यापैकी राज्य मार्गाची लांबी ८४५ कि.मी.आहे. रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ८०% गावे जिल्हा मुख्यालयाशी जोडली गेली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात महादेव काळी, भिल्ल, पारधी, कोरकू व निहाल यांसारख्या जमातीचे लोक राहतात. कोरकू व निहाल या जमातींची वस्ती ‘जळगाव-(जामोद)’ या तालुक्यात जास्त आहे. मेहकर व चिखली तालुक्यांत ‘बंजारा’ या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांची संख्या ही अधिक आहे
Copyright © 2025 | Marathisrushti